Sunday, 30 March 2025

पाणी : जेवणाच्या आधी ? मध्ये ? नंतर ? किती ? दिवसभरात एकूण किती?!

जल💧🌧 जो ना होता, तो ये जग 🌏 जाता जल🔥

पाणी : जेवणाच्या आधी ? मध्ये ? नंतर ? किती दिवसभरात एकूण किती?!


पुनश्च हरिः ॐ !!!


काले सात्म्यं लघु स्निग्धम् उष्णं क्षिप्रं द्रवोत्तरम् ।

बुभुक्षितो अन्नम् अश्नीयात् मात्रावद् विदितागमः ॥


*अष्टांगहृदय सद्वृत्त : भाग 187*

31 मार्च 2025, सोमवार  

*उपविभाग 129*


सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved

Copyright कॉपीराइट ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

MhetreAyurved@gmail.com 

www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/


नमस्कार आपण वरती उल्लेख केलेला श्लोक, जो भोजनविधीचा मूलाधार आहे, त्याविषयी सविस्तर पाहत होतो! आज प्रदीर्घ कालावधीनंतर आपण हा उपक्रम पुन्हा सुरू करत आहोत, तर वरील श्लोकाच्या अनुषंगाने पूर्वी पोस्ट केलेल्या सर्व लेखांच्या लिंक, आजच्या लेखाच्या शेवटी दिल्या आहेत. त्या क्रमशः वाचून घ्याव्यात... ते वाचून झाल्यानंतर आपण पुन्हा याच श्लोकाकडे परत येऊया ... म्हणजे विषयाची सुसंगती लागेल !!!


तोपर्यंत ... भोजन विधीशी संबंधित आणि तितकाच महत्वपूर्ण विषय म्हणजे जलपान अर्थात पाणी पिणे!!! पाणी पिण्याविषयी समाजामध्ये अनेक समज अपसमज रूढ आणि दृढ आहेत. याबाबत सोशल मीडिया वरती "तथाकथित सेलिब्रिटींनी" (ज्ञान अधिकार अनुभव नसताना) अकारण तारे तोडल्यामुळे, गोंधळात अधिकच भर पडली आहे! 


तरी या सर्व समज अपसमजांच्या गोंधळातून बाहेर येऊन , आरोग्यशास्त्र मुळातून काय म्हणते, ते पाहूया ...






प्रक्षालयेदद्भिरास्यं भुञ्जानस्य मुहुर्मुहुः । ... 

जेवण करताना मध्ये मध्ये थोडे थोडे पाणी प्यावे त्यामुळे जीभ स्वच्छ होते

... विशुद्धे रसने तस्य रोचतेऽन्नमपूर्ववत् ।।

जीभ स्वच्छ झाल्याने त्याच्यावरील उपलेप = कोटिंग निघाल्यामुळे पुढचा घास पुन्हा तितकाच रुचकर वाटतो

स्वादुना तस्य रसनं प्रथमेनातितर्पितम् । न तथा स्वादयेद् अन्यत् ... 

सलग पाच-सहा घास खाल्ले की पुढच्या घासाला चव जाणवत नाही कारण ती चव सवयीची होते

तस्मात् प्रक्षाल्यमन्तरा ।। ... 

म्हणून जेवताना दर चार-पाच घासानंतर मध्ये मध्ये थोडे थोडे घोटभर पाणी पीत रहावे

अत्यम्बुपानान्न विपच्यतेऽन्नं 

निरम्बुपानाच्च स एव दोषः |

तस्मान्नरो वह्निविवर्धनाय 

मुहुर्मुहुर्वारि "पिबेद् अभूरि"

जेवताना खूप अधिक पाणी पिले किंवा पाणी अजिबातच पिले नाही, तर अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही. अग्नीची क्षमता = पचनशक्ती उत्तम राहावी, यासाठी जेवताना मध्ये मध्ये (अभूरि म्हणजे) थोडे थोडे पाणी दर चार-पाच घासा नंतर पीत राहावे ...

पाण्याचे सुद्धा पचन व्हावे लागते !

पीतं जलं जीर्यति

यायामयुग्माद्यामैकमात्राच्छृतशीतलञ्च 

तदर्धमात्रेण शृतं कदुष्णं पयः प्रपाके त्रय एव कालाः

साधे नेहमीचे रूम टेंपरेचर चे टॅप वॉटर चे पाणी पिले तर त्याचे पचन होण्यासाठी दोन याम म्हणजे सहा तास लागतात पाणी उकळून गार करून पिले तर ते पाणी पचण्यासाठी एक याम म्हणजे तीन तास लागतात आणि पाणी उकळून (साधारण निम्मे 12 किंवा एक तृतीयांश 13 किंवा एक चतुर्थांश ¼ आटवून, गरम गरम) पिले तर असे पाणी पचण्यासाठी अर्धा याम म्हणजे दीड तास लागतो !!!

वरून तोंडाने पाणी पिले म्हणजे ते किडनीवाटे फ्लश होऊन निघून जाते, हा अपसमज आहे ! शरीर म्हणजे बेसिन नाही ... त्यामुळे दीड लिटरपेक्षा जास्त पाणी विनाकारण तहान नसताना पिऊ नये

अशितश्चोदकं युक्त्या ... भुञ्जानश्चान्तरा पिबेत् ।।

जेवण झाल्यानंतर लगेचच युक्ती पूर्वक म्हणजे पुरेसे आणि जेवताना सुद्धा दर चार-पाच घासानंतर मध्ये मध्ये थोडे थोडे घोट घोटभर पाणी पीत राहावे

*प्रक्षालयेदद्भिरास्यं भुञ्जानस्य मुहुर्मुहुः ।*


जेवताना मध्ये मध्ये पाण्याने तोंड आतल्या आत धुवावे म्हणजे आजच्या सोप्या इंग्रजीमध्ये rinse करावे


*विशुद्धे रसने तस्य रोचतेऽन्नमपूर्ववत् ।।*


असे केल्याने जेव्हा जीभ स्वच्छ शुद्ध होते, त्यामुळे त्यानंतर खाल्लेला घास जणू काही जेवणाच्या सुरुवातीला घेतलेल्या पहिल्या घासाप्रमाणेच रुचकर लागतो


त्यामुळे जेवणाच्या सुरुवातीला पाणी प्यावे , जेवणाच्या शेवटी पाणी प्यावे , जेवताना अजिबात पाणी पिऊ नये, जेवण झाल्यानंतर पाऊण तासाने पाणी प्यावे ... हे सर्व अपसमज आहेत , ते अशास्त्रीय आहेत !!!


शास्त्र सांगते की , 

जेवताना मध्ये मध्ये म्हणजे साधारण चार ते पाच घास खाल्ल्यानंतर, एक घोटभर पाणी प्यावे ... जेणेकरून जिभेवर खाल्लेल्या घासांचा लेप बसल्यामुळे , तीच तीच चव पुन्हा पुन्हा घेतल्यामुळे, अन्नाची चव लागत नाही! म्हणून मध्येच घोटभर पाणी पिले असता, जिभेवर खाल्लेल्या घासांचा अन्नाचा जो लेप बसलेला असतो, तो पाण्यासोबत निघून जातो, पोटामध्ये जाऊन मिसळतो. त्यामुळे जीभ स्वच्छ आणि अन्कोटेड जणू काही कोरी पाटी प्लेन कॅनव्हास अशी स्वच्छ होते. त्यामुळे त्यानंतर खाल्लेला घास हा जणू काही जेवणाच्या प्रारंभी खाल्लेल्या पहिल्या घासाप्रमाणेच पुन्हा चविष्ट रुचकर हवाहवासा वाटतो.


अजून सोपे उदाहरण म्हणजे समजा श्रीखंड एक बोटभर चाटून खाल्ले की ते खूप छान वाटते! 🙂 पहिल्यांदा दुसऱ्या बोट साठवून खाल्लं तरी सुद्धा ठीक वाटतं ... तिसऱ्या चौथ्या बोटाला मात्र त्याची चव तितकीशी आनंददायक नसते आणि पाचव्या बोटाला नुसता श्रीखंडाचा जिभेला स्पर्श होतो, त्यातून जो चवीचा आनंद मिळाला पाहिजे , तो मिळत नाही!!! म्हणून महाराष्ट्रात आपण व्यंजन म्हणजे तोंडी लावण्याचा पदार्थ मध्येच थोडासा खातो किंवा चाटतो, जसे पापड लोणचे चटणी कोशिंबीर कुरडई ... 


त्यामुळे सातत्याने खात असलेल्या गोड चवीमध्ये दुसरी चव आल्याने जिभेचे जे सेन्सिटायझेशन झालेले असते, जिभेला तीच तीच चव घेण्याची सवय झालेली असते, ती बदलते आणि त्या व्यंजनानंतर म्हणजे चटणी पापड लोणचं कोशिंबीर यानंतर, पुन्हा श्रीखंड बोटभर चाटले तर पुन्हा पहिल्यासारखाच श्रीखंडाच्या चवीचा आनंद मिळतो.😃


व्यंजन या शब्दाचा अर्थच व्यक्त करणारे अर्थात तोच तोच चवीचा घास खाऊन जिभेला काही वेळाने त्या घासाची चव समजेनासे होते, कारण त्या घासाचा उपलेप कव्हरिंग कोटिंग जिभेवरती बसते, म्हणून आपण त्यावेळेला पुन्हा तीच चव व्यक्त व्हावी समजावी कळावी, त्या चवीचा आनंद मिळावा म्हणून ... मध्येच पापड लोणचे कोरडे चटणी कोशिंबीर असे थोडेसे खातो किंवा चाटतो आणि मग त्यानंतर पूर्वीच्याच पदार्थाचा घास हा पुन्हा चवदार चविष्ट रुचकर आनंददायक होतो. 


हीच बाब पाण्यामुळे सुद्धा होते ...

परंतु पाणी पिल्याने जीभ स्वच्छ होण्याबरोबरच, चव नव्याने कळण्याबरोबरच ...

अन्नामध्ये दर चार घासांनंतर पुरेसे पाणी मिसळले गेल्यामुळे, पोटामध्ये अन्नाचे घुसळणे त्याचे मिश्रण होणे त्याचे चर्निंग होणे हे सोपे जाते !!!


जसे मिक्सरवर चटणी वाटण करत असताना, त्यामध्ये गृहिणी (सुगरण) मध्ये मध्ये थोडे थोडे पाणी घालते आणि मिक्सर पुन्हा पुन्हा फिरवते, तेव्हा ती चटणी योग्य त्या घनतेची= कन्सिस्टन्सीची होते !


तीच बाब पोटातील अन्न मिसळण्याच्या घुसळण्याच्या प्रक्रियेला लागू आहे. 


म्हणून फक्त चवीसाठी किंवा जीभ स्वच्छ होण्यासाठी नव्हे तर ...

अन्नामध्ये पुरेशा प्रमाणात द्रव पदार्थ = पाणी मिसळून त्याचे घुसळणे चर्निंग चांगले होण्यासाठी, दर चार ते पाच घासानंतर, घोटभरच पाणी प्यावे ... एकदम फुलपात्र भरून किंवा ग्लास भरून पाणी प्यावे , असे नव्हे !!!


स्वादुना तस्य रसनं प्रथमेनातितर्पितम् । 

न तथा स्वादयेदन्यत्तस्मात् प्रक्षाल्यमन्तरा ।।


एखाद्या पदार्थाच्या चवीने चार-पाच घास खाल्ल्यानंतर जीभ त्या चवीला सवयीची होते म्हणजे जिभेला त्या घासाच्या चवीची अति तृप्तता येते ...

त्यामुळे त्या घासाची चव पहिल्यासारखी लागत नाही म्हणून "अंतरा" म्हणजे मध्ये मध्ये जीभ पाण्याने धुतली पाहिजे स्वच्छ केली पाहिजे = तिच्यावरचं कव्हरिंग कोटिंग घालवलं पाहिजे ... थोडक्यात घोटभर पाणी पिऊन, जीभ आणि तोंडाचा आतला भाग रिंझ केला पाहिजे, असे वरील श्लोक सांगतो ... जे आपण आधी सविस्तर पाहिले आहे


अशितश्चोदकं युक्त्या भुञ्जानश्चान्तरा पिबेत् ।।

👆🏼सुश्रुत संहिता


जेवण झाल्यानंतरही युक्तीने म्हणजे पुरेसे पाणी प्यावे आणि *भुंजानः* म्हणजे जेवत असताना व्हाईल डायनिंग ing चालू वर्तमान काळ प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स म्हणजे "जेवण करत असताना , मध्ये मध्ये , थोडे थोडे पाणी प्यावे" असे सुश्रुत संहिता सांगते .


याचा अर्थ जेवण झाल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये , असे जे सांगतात; ते अशास्त्रीय आहे, तो अपसमज आहे.


म्हणून जेवण झाल्यानंतर पुरेसे पाणी "निश्चितपणे प्यावे".


साधारणता आपल्या पोटाचे आपल्या भुकेच्या क्षमतेचे अंदाजे चार भाग मानावेत.


त्यातील एक भाग हा पाण्याने किंवा द्रव पदार्थांनी,

दोन भाग हे घनपदार्थांनी म्हणजे भाकरी पोळी भाजी भात आणि 

उर्वरित एक भाग हा घन+द्रव पदार्थांच्या मोकळेपणाने घुसळण्यासाठी संचारासाठी रिकामा ठेवावा म्हणजेच त्यात एक चतुर्थांश अवकाश = रिकामी जागा असू द्यावी... म्हणूनच मागील पिढीतले लोक "सावकाश" जेवा, असे म्हणायचे !


सावकाश चा अर्थ हळूहळू असा जरी रूढार्थाने घेतला जात असला तरी ...

"सावकाश" याचा खरा अर्थ स + अवकाश म्हणजे अवकाश रिकामी जागा ठेवून भोजन करावे ...

पोट गच्च भरेपर्यंत , तडस लागेपर्यंत , अति तृप्तता येईपर्यंत = सौहित्य असं त्याला म्हणतात = सटायटी असे इंग्लिश मध्ये म्हणतात ... एवढं जेवू नये.


आपल्या भुकेपेक्षा चार घास कमी खावेत !


अन्यथा लोक इतकं दाबून जेवतात की तोंडात बोट घातलं तर घशामध्ये खाल्लेलं अन्न बोटाला लागेल ...😆 यातला विनोद सोडून दिला तरी ...


सर्वसामान्य माणसाने आपल्या पोटाच्या खाण्याच्या भुकेच्या क्षमतेच्या 50% घनपदार्थ 25% द्रव पदार्थ आणि 25% जागा पोटात रिकामी असू द्यावी इतकेच जेवावे


1 द्रव + 2 घन + 1 अवकाश = 4 भाग पोट

25% liquid + 50% solid + 25% empty = capacity of stomach 


अत्यम्बुपानान्न विपच्यतेऽन्नं निरम्बुपानाच्च स एव दोषः ।

तस्मान्नरो वह्निविवर्धनाय मुहुर्मुहुर्वारि पिबेदभूरि ॥

पीतं जलं जीर्यति यामयुग्माद्यामैकमात्राच्छृतशीतलञ्च ।

तदर्धमात्रेण शृतं कदुष्णं पयःप्रपाके त्रय एव कालाः ॥

👆🏼भावप्रकाश संहिता


खूप पाणी प्यावे , दिवसभरात सात ते आठ लिटर पाणी प्यावे, हायड्रेटेड राहावे , वॉटर थेरपी , किडनी फ्लश ... अशा अपसमजांपोटी , अशास्त्रीय सल्ल्यांमुळे ... समाजामध्ये "आवश्यकतेपेक्षा खूप जास्त" पाणी पिले जाते.


भावप्रकाश संहिता म्हणते की,

खूप जास्त पाणी पिल्ले तर अन्न पचत नाही, कारण अन्न पचवणाऱ्या स्रावांचे = एंझायम्सचे = पोटात असलेल्या 2pH हायड्रोक्लोरिक ॲसिडचे डायलूशन होते म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन कमी होते अर्थात त्याची पचवण्याची क्षमता कमी होते म्हणून अन्न पचत नाही.


अजिबातच पाणी पिलं नाही किंवा पान पाणी फारच कमी पिलं तर ...

अन्नाचे घनघास हे योग्य प्रकारे घुसळले जात नाहीत, एकमेकात मिसळले जात नाहीत, त्यामुळे त्यांच्या कणाकणापर्यंत पाचक स्राव पोहोचू शकत नाहीत, त्यामुळे पुन्हा अन्नाचे पचन योग्यरीत्या होत नाही ...


म्हणून, 1.जेवत असताना आणि 2.जेवण झाल्यानंतर मध्ये मध्ये थोडे थोडे पाणी पीत राहावे ... पिबेद् अभूरि याचा अर्थ खूप जास्त नाही असे म्हणजेच "थोडे थोडे अल्प घोटभर घोटभर" ... एकदम गटगट ग्लासभर तांब्याभर पाणी एकदम शेवटी पिणं , हे चुकीचं आहे.


जेवण सुरू असताना दर चार-पाच घासानंतर मध्ये मध्ये थोडे थोडे पाणी पीत राहिल्यामुळे , अग्नीची पचनक्षमता सुधारते टिकून राहते, अन्नाचे पचन योग्य प्रकारे होते , पोटातील पाचक स्राव = टू पीएच इतके तीव्र संहती = कॉन्सन्ट्रेशन असलेले हायड्रोक्लोरिक ॲसिड, आपण खाल्लेल्या अन्नाच्या कणाकणापर्यंत व्यवस्थित पोहोचते ... त्यामुळे पचनाची डायजेशनची प्रक्रिया ही नैसर्गिक रित्या ... सुकर, वेळेत आणि चांगली होते


शरीर हे बेसिन नाही की पाणी वरून ओतलं आणि खालैन किडनीतून फ्लश होऊन गेलं 🚽❌️ असं होत नाही 


प्रत्यक्ष तोंडाचा आणि किडनीचा = मूत्रमार्गाचा थेट संबंध नाही.

आपण तोंडावाटे पिलेले पाणी पोटात जातं, तिथून त्याचं पचन होतं ... हो , पाण्याचं सुद्धा पचन व्हावं लागतं, हेच वरच्या श्लोकात सांगितलेलं आहे ... तर अन्ना प्रमाणेच पाण्याचं = द्रव पदार्थांचही पचन होऊन, ते संपूर्ण शरीरात शोषले जातात ... रक्तासोबत सर्व शरीरभर फिरतात ... आणि शेवटी किडनीमध्ये येऊन त्यांचं फिल्टरेशन गाळण ही प्रक्रिया होते 


आणि त्यातून शरीराला आवश्यक नसलेलं अधिक झालेलं एक्सट्रा असलेलं पाणी किंवा द्रव पदार्थ हे मूत्र स्वरूपात बाहेर टाकले जातात!


याचा अर्थ आपण एक घोट पिलेलं पाणी, पोटामध्ये जाऊन बसतं, शरीरात शोषलं जातं, रक्ताबरोबर संपूर्ण शरीराचा प्रवास करतं ... आणि किडनीमध्ये हृदयातील रक्तदाबापेक्षा जास्त दाब देऊन ते गाळले जातं ... एका घोटासाठी शरीराला एवढा उद्योग परिश्रम करावे लागत असतील तर आपण शरीराला आवश्यकता नसताना तहान लागली नसताना, केवळ किडनी फ्लश ... वॉटर थेरपी. हायड्रेशन अशा चुकीच्या प्रोपोगंडा पोटी गरजेपेक्षा खूप जास्त पाणी पीत असतो !


असे खूप जास्त पाणी पिल्यामुळे पचनक्षमता कमी होणे, ॲसिडिटी जळजळ मळमळ होणे, अतिसार म्हणजे जुलाब होणे, अंगावर सूज येणे, सर्दी होणे, छातीत कफ होणे, घशात कफ साठणे, कान फुटणे कानात पू होणे ... असे शरीरात पाणी साठण्याचे आजार होतात !!


जगातली कुठलीही सर्वाधिक निरोगी माणसाची किडनी सुद्धा, एका मिनिटाला साधारण एक एम एल ... इतकंच मूत्र तयार करते !!!

त्यामुळे 24 तासात कितीही प्रयत्न केला, तरी जास्तीत जास्त चौदाशे चाळीस मिली म्हणजे साधारण दीड लिटर इतकी मूत्र प्रवृत्ती होणे हे स्वाभाविक नैसर्गिक आहे.


त्यापेक्षा अधिकचे काम किडनीला करायला लावणे , हे अनैसर्गिक व आरोग्यनाशक आणि किडनीची क्षमता कमी करणार आहे.


आपण किडनीला बळजबरीने काम करायला लावल्यासारखे आहे! बैलाला झेपणार नाही एवढं ओझं बैलगाडीत घालून, बैलाला चढावर चढायला लावून, त्याला चाकाचे फटकारे देत ... ते ओझं वाहायला लावण्यासारखं आहे.


शरीराला कुठल्याही ऋतूमध्ये साधारणता दीड लिटर अधिक उणे 10% इतक्या पाण्याची गरज असते म्हणजे उन्हाळ्यात दीड लिटरपेक्षा दीडशे दोनशे मिली जास्त आणि थंडीमध्ये दीड लिटर पेक्षा 150 200 मिली कमी असे ... साधारणपणे जाणावे.


तर आधी सांगितलं त्याप्रमाणे पाण्याचं सुद्धा पचन व्हावे लागते ...

आपण जे नेहमीचं टॅप वॉटर , रूम टेंपरेचरला असलेले पाणी पितो ... त्या पाण्याचे पचन होण्यासाठी दोन याम म्हणजे "सहा तास लागतात" 😳😱

शृतशीत = उकळून गार केलेले पाणी असेल बॉईल्ड अँड कूल्ड तर असे पाणी पचन होण्यासाठी , एक याम म्हणजे तीन तास लागतात...

आणि जर पाणी खळाखळा उकळून निम्मे किंवा एक तृतीयांश किंवा एक चतुर्थांश आटवले (reduce) असेल , तर असे पाणी गरम गरम पिले असता ... अशाही पाण्याचे पचन होण्यासाठी अर्धा याम म्हणजे दीड तास लागतो !!!


याचाच अर्थ आपण ढसाढसा घडाघडा पाणी पिलं, म्हणजे ते बेसिनमध्ये ओतल्याप्रमाणे , किडनीतून फ्लश होईल , हा गैरसमज काढून टाका आणि ...


1.

जेवताना दर चार घासांनंतर थोडं थोडं घोट घोट सिप बाय सिप पाणी प्या 


2.

जेवणाच्या शेवटी पुरेसं पाणी प्या आणि 


3.

दिवसभरात एकूण पाण्याचं प्रमाण हे दीड लिटर (1500ml) च्या आसपास राहील, अशी सवय स्वतःला लावा 

👆🏼

हे तुमच्या फक्त पचनाच्याच नव्हे, तर संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी हितकारक आहे...


पाणी या विषयाबाबत चरकसंहिता सुश्रुत संहिता अष्टांग हृदय भावप्रकाश या सर्व ग्रंथांमध्ये अतिशय सविस्तर आणि सोप्या शब्दात माहिती दिलेली आहे ...

ती क्रमशः पाहूया, पुढील काही लेखांमध्ये


तोपर्यंत ...

भोजन विधीशी संबंधित ,

पूर्वप्रकाशित लेख , खालील दिलेल्या लिंक चा उपयोग करून , हळूहळू वाचून घ्या ... जेणेकरून मूळच्या श्लोकाची संगती लक्षात येईल🙏🏼

पुनश्च हरिः ॐ !!!

1

काहीही खा! कसंही खा! कितीही खा! कधीही खा! मजा करा !! ऐश करा !!! 🙃😇😃

👇🏼

https://mhetreayurved.blogspot.com/2025/01/blog-post_23.html


*ड्राय फ्रुट खावेत , ड्राय नट्स नव्हे ... स्निग्ध पदार्थांचे भोजनातील प्रमाण* 😇

👇🏼

https://mhetreayurved.blogspot.com/2025/01/blog-post_24.html


मटण रेड मीट Red Meat याच्यामध्ये कोलेस्टेरॉल असते , असा बागुलबुवा भीती अपसमज गैरसमज प्रवाद समाजामध्ये पसरलेला आहे ...

👇🏼

https://mhetreayurved.blogspot.com/2025/01/red-meat.html


*भोजन करण्याची योग्य रीत = जेवण्याची उचित पद्धत* 😇

👇🏼

https://mhetreayurved.blogspot.com/2025/01/blog-post_89.html


*भोजन कसे करावे? जेवताना कसे जेवावे? Dining Table Etiquettes?* 😇

👇🏼

https://mhetreayurved.blogspot.com/2025/01/dining-table-etiquettes.html


*भोजन करताना कोणत्या क्रमाने कोणत्या चवीचे पदार्थ खावेत ? Sweet Dish Dessert कधी खावेत?

👇🏼

https://mhetreayurved.blogspot.com/2025/01/sweet-dish-dessert.html


नैवेद्य समर्पण आणि राजासाठीचे भोजन

👇🏼

https://mhetreayurved.blogspot.com/2025/01/blog-post_28.html


शुचि सुसंस्कृत गुप्त अन्न म्हणजे काय?

👇🏼

https://mhetreayurved.blogspot.com/2025/01/blog-post_63.html


काय कधी किती कसे खावे? / खाऊ नये? 

👇🏼

https://mhetreayurved.blogspot.com/2025/01/blog-post_75.html


पचनशक्ती अन्नग्रहणक्षमता अग्नि भूक क्षुधा

👇🏼

https://mhetreayurved.blogspot.com/2025/01/blog-post_30.html


प्रीपेड मोबाईलचा रिचार्ज = जितनी चाबी भरी राम ने , उतना चले खिलौना !

👇🏼

https://mhetreayurved.blogspot.com/2025/01/blog-post_53.html


*देहवाक्चेतसां चेष्टाः प्राक् श्रमाद्विनिवर्तयेत्।* 


आणि


*न पीडयेत् इंद्रियाणि*


हे दोन्ही श्लोक आपण एकत्र पहात आहोत.


_(डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.)_


त्वदीय वस्तु गोविंद 

तुभ्यम् एव समर्पये ।


तेरा तुझको अर्पण

क्या लागे मेरा ।


श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु।

🙏🏼


सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved

Copyright कॉपीराइट ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

MhetreAyurved@gmail.com 

www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/

नल दमयंती हॉटेल ऑनलाइन फूड स्ट्रीट फूड सुगरण सुगृहिणी स्वयंपाक घर महानस अन्न हे पूर्णब्रह्म ...

नल दमयंती हॉटेल ऑनलाइन फूड स्ट्रीट फूड सुगरण सुगृहिणी स्वयंपाक घर महानस अन्न हे पूर्णब्रह्म ...

🔥




*अष्टांगहृदय सद्वृत्त : भाग 177*

 

*उपविभाग 122* 


क्षुधा म्हणजे खाण्याची इच्छा म्हणजेच भूक ... असे म्हटले की , पुढील काही प्रश्न हे अगदीच स्वाभाविक आहेत ...

काय खावे 

कधी खावे 

किती खावे 

कसे खावे


आणि या सकारात्मक प्रश्नांच्या बरोबरीनेच ...


काय खाऊ नये 

कधी खाऊ नये 

किती खाऊ नये

आणि कसे खाऊ नये 


अशा दुसऱ्या बाजूचा नकारात्मक प्रश्नांचीही उत्तरे माहिती असायला हवीत


तत्राप्तैर्गुणसम्पन्नं 1 ... 

भक्ष्यमन्नं सुसंस्कृतम् । 2 ...

शुचौ देशे 3 ...

सुसङ्गुप्तं 4... समुपस्थापयेद्


महानस म्हणजे स्वयंपाक घर म्हणजे आजच्या भाषेत किचन हे शुचि म्हणजे स्वच्छ आणि पवित्र मंगल असायला हवं. याचाच अर्थ किचनमध्ये जाताना आपले कपडे हे धुतलेले कोरडे स्वच्छ असायला हवेत. झोपताना घातलेला गाऊन घालून किंवा बाहेरून घालून आलेला ड्रेस तसाच घेऊन, किचनमध्ये वावरू नये, हे घरच्या गृहिणीला आणि बाहेरून येणाऱ्या घरातील सर्व मंडळींना सांगणे आणि त्यांनी ते पाळणे आवश्यक आहे.

बाहेरचे शूज चप्पल घालून किचनमध्ये येणं सर्वत्र व वर्ज्य मानावे.


प्रत्येक गोष्ट ही इन्फेक्शन क्लिनलिनेस याच्याशी संबंधित असते, असे नसून ...

कधी कधी त्याच्या बरोबरीने आज आपला विश्वास बसत नसला तरी, काही अलौकिक अवांछित अपवित्र अमंगल बाबी आपल्या घरात कुटुंबात विचारात घुसू शकतात !


नलराजा हा अत्यंत सदाचारी होता. कलीला नल राजाच्या शरीरात प्रवेश करायचं होता ...

परंतु नलराजाकडून कोणतीही आचारातील चूक होत नव्हती.

त्यामुळे नलराजाच्या शरीरात कली प्रवेश करू शकत नव्हता.

एके दिवशी घाईघाईत नलराजा हातपाय न धुता, तसाच संध्यावंदन या पूजा कर्मासाठी बसला आणि "नेमका तोच दुर्दैवी क्षण साधून" कलीने त्याच्या शरीरात प्रवेश केला आणि ...

पुढची नलदमयंतीची फरपट आपल्या पिढीला कहाणी म्हणून माहित आहे.


आता हल्लीच्या पिढीला नलदमयंती हरिश्चंद्र तारामती शिबिराजा विक्रमादित्य हे अज्ञात आहेत, हे त्या पिढीचे दुर्दैव आणि आपली पिढी या बाबी नव्या पिढीपर्यंत पोहोचवू शकली नाही, हा आपला करंटेपणा !! असो. 


महानस = स्वयंपाक घर म्हणजे किचन इथे आप्त लोक असावेत.

आप्त याचा अर्थ केवळ नातेवाईक असा नसून, ज्यांच्यावर आपण विश्वास भरवसा ट्रस्ट ठेवू शकतो, अशाच व्यक्ती तिथे असाव्यात.

आज बाहेरून पोळ्या करण्यासाठी स्वयंपाक करण्यासाठी धुणं भांडी फरशी करण्यासाठी येणारी घरातील मोलकरीण कामवाली बाई मेड यांच्या बाबतीत ही काळजी घेणे आवश्यक आहे.

अति चिकित्सक नसलं, तरी सावधगिरी बाळगणं, हे निश्चितपणे हितकारक आहे.


शुचि याचा अर्थ स्वच्छता असाही होतोच. त्यामुळे वारंवार हॉटेलमध्ये खायला जाणं, हे टाळावं ...

कारण तिथल्या किचनमध्ये सर्वच गोष्टी ह्या अनिर्वचनीय म्हणजे ज्याच्या विषयी बोलू नये, अशा असतात. तिथे वावरणारी शेफ आणि अन्य माणसं ही आप्त नसतात म्हणजे विश्वास ठेवण्याच्या योग्यतेचे नसतात. तिथे "पडलेले" अन्नपदार्थ भाज्या यांच्या स्वच्छतेविषयी सुरक्षिततेविषयी जितक्या शंका घ्याव्यात, तितक्या कमीच! त्याचप्रमाणे तिथं झुरळ पाल उंदीर यांचा मुक्त वावर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण तिथले अन्नपदार्थ सुरक्षित आणि पवित्र रहावे, अशी कोणा एकाचीही जबाबदारी नसते. कारण ते सगळेच पैशासाठी काम करत असतात. असे म्हटले जाते की कितीही उच्च प्रतीचे हॉटेल असले, तरी ते घरचे स्वयंपाक घर नसते, हे लक्षात ठेवा.

जसे हॉटेलमध्ये जाऊन जेवणे, याला वरील मुद्दे लागू आहेत ...

तसेच ऑनलाइन सर्विस द्वारे घरपोच डिलिव्हरी मागवणे, यालाही हेच मुद्दे आहेत असे जाणावे. ऑनलाइन सर्विस द्वारे घरपोच डिलिव्हरी मागवणे हे अजूनच त्याज्य आहे, कारण ते अन्न , "हॉटेल ते घर" असे कुठून कुठून, उघड्यावर, रस्त्यावरून "मिरवत फिरवत" आणले जाते. त्यासाठी वापरले जाणारे पॅकिंगचे साहित्य / पॅकिंग करणारे हात / पॅक केलेले पार्सल ठेवलेली पिशवी / येणारा माणूस ... यांची "स्वच्छता आणि शुचिता" याबाबत कोणतीच शाश्वती देता येत नसते.

आपण घरच्या स्वयंपाक घरात तयार केलेले अन्न, हे आपण स्वच्छ ताटामध्ये व्यवस्थित मांडून, ते देवाला नैवेद्य दाखवतो ...

आणि मगच सेवन करत असतो!

तसे हॉटेल किंवा ऑनलाईन फूड डिलिव्हरी याबाबत होत नाही. नैवेद्य याचा अर्थ निवेदन. वेदन याचा अर्थ जाणीव! नि याचा अर्थ निश्चित. देवाला निश्चितपणे आपण काय खातो आहे, याची जाणीव करून देऊन, देवाशी ते संवादात्मक शैलीत बोलून, देवाच्या साक्षीने आशीर्वादाने अनुमतीने, आपण अन्न सेवन करतो...

म्हणून समर्थ रामदास, "उदरभरण नोहे, जाणिजे यज्ञ कर्म" असं म्हणतात ...

आणि त्या अन्नाला "पूर्णब्रह्म" असे नाव आहे.

व्यंकटेश स्तोत्र मध्ये "अन्नासाठी दाही दिशा, आम्हा फिरवीशी जगदीशा" अशी करुणामय आळवणी केलेली आहे.

त्यामुळे ज्या अन्नामुळे आपलं जीवित्व चालतं, "जीवन करी जीवित्वा" ... त्या अन्नाच्या बाबतीत, आपल्याला अत्यंत आदर असला पाहिजे.

हॉटेल किंवा ऑनलाईन फूड डिलिव्हरी यामध्ये,

अन्नाची हेळसांड विटंबना अवहेलना होते, हे विसरू नये...

आणि म्हणूनच पूर्वीच्या काळी चुलीजवळ जाताना स्नान केल्याशिवाय स्वयंपाक घरात प्रवेश करत नसत.


*देहवाक्चेतसां चेष्टाः प्राक् श्रमाद्विनिवर्तयेत्।* 

आणि

*न पीडयेत् इंद्रियाणि*

हे दोन्ही श्लोक आपण एकत्र पहात आहोत.


_(डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.)_


त्वदीय वस्तु गोविंद 

तुभ्यम् एव समर्पये ।


तेरा तुझको अर्पण

क्या लागे मेरा ।


श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु।


🙏🏼

सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved

Copyright कॉपीराइट ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

MhetreAyurved@gmail.com 

www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/

Wednesday, 26 March 2025

पारद भस्म मृत पारद & melting evaporating boiling point of mercury

पारद भस्म मृत पारद & melting evaporating boiling point of mercury 




You can verify following statements, on google which quotes authentic and reliable websites of pubmed sciencedirect etc

👇🏼

Hg mercury boiling point 356.7°C


Hg mercury vaporization/volalization 20°C


The freezing point of mercury is −37.6°F, so *it is always evaporating.*


Elemental "mercury evaporates" at a rate of 7 μg/cm2/h "at 20 °C" (Andren and Nriagu, 1979).


Mercury (Hg) is a globally spread pollutant due to characteristics such as "low melting and boiling points"


1

प्रायः सभी रसकल्प मे हम "शुद्धं सूतम्" ऐसा देखते है किंतु, बाकी सभी धातुओं/द्रव्यों का का भस्म = मारण किया हुआ स्वरूप उपयोग मे लाया जाता है. *मृतं सूतं अर्थात पारद का मारण किया हुआ स्वरूप अर्थात पारद का भस्म* ; कभी भी, किसी भी कल्प मे, उल्लेखित या समाविष्ट नही है.

पारद के संदर्भ में केवल शुद्ध किया हुआ पारद ऐसा ही उल्लेख सभी जगह मिलता है


2

लोहानां मारणं श्रेष्ठं सर्वेषां रसभस्मना

वस्तुतः, धातुओं का भस्म निर्माण करणे का सर्वश्रेष्ठ विधी, यह रसभस्म से निर्माण करना यही है, किंतु *रसभस्म असंभव है* = रसभस्म बन ही नही सकता! इसी कारण से धातुभस्म, जो रसभस्म से बने हे, जो सर्वोत्तम संभावना है, यह कभी भी सार्थ सिद्ध नही हो सकते !!!


3

अभी बाकी की जो आप रसकल्प की विधि देखते है, उसमे सबसे सुकर अनायास खल्वी रसायन है, इसमे प्रायः अग्नि का कोई प्रत्यक्ष उपयोग नही होता है. इसके उपर कूपी पक्व और पोट्टली इन कल्पोंका वर्णन मिलता है इन दोनो मे बहुत दीर्घकाल तक और बहुत बडी मात्रा मे अग्नि दिया जाता है.


4

वास्तविक स्थिती यह है कि, पारद का बॉयलिंग पॉईंट और पारद का ईव्हेपोरेटिंग पॉईंट इतना कम तापमान टेंपरेचर है, कि इस कारण से भारत के किसी भी प्रदेश में किसी भी ऋतु मे और दिन के किसी भी क्षण प्रायः 20 डिग्री से अधिक तापमान ही रहता है. ऐसी स्थिती मे पोट्टली और कूपी पक्व तो छोड दीजिए, किंतु खल्वी रसायन मे भी पारद , उस कल्प मे स्थिर नही रह सकता, अदृश्य हो जाता है, और हम पारद के खल्वी रसायन कल्प, सिंदूर , कूपी पक्व और पोट्टली बनाते है ... !!!


5

दूसरा पारद का उत्कलनांक = बॉयलिंग पॉईंट 356.7°C है , अभी कौन सा भी कल्प , जो कूपीपक्व या पोट्टली इस स्वरूप मे बनता है, उसमे टेंपरेचर तो 400 के पार निश्चित ही जाता है, तो ऐसी स्थिती मे पारद उस कल्पसे कबका eveporate होगा! उसकल्प मे बाकी थोडेही रहेगा और फिर पारद का कुछ कार्मुकत्व उस कल्प मे शेष रहेगा यह संभव ही नही !


6.

सारांश सामान्य रूम टेंपरेचर मे भी, केवल 20°C टेंपरेचर मे भी मर्क्युरी निरंतर evaporate = बाष्पीभूत अर्थात gaseous स्टेट में जाता रहता है, तो खल्वी रसायन मे भी पारद की स्थिती बनी नही रह सकती है ...


7.

और दूसरा ...

पोट्टली या कूपीपक्व जैसे विधी में, जहां टेंपरेचर बहुत अधिक होता है, वहा तोङवह निश्चित ही 350°C आगे जाता ही होगा ... तो इन दोनो, कूपी पक्व और पोट्टली, विधियों में भी,ङपारद व्हेपर आऊट = बाष्पीभूत = gaseous state मे जाने के कारण, उस कल्प मे भी पारद की उपस्थिती नही बन सकती ...


8.

तो इन दोनो स्थितियों में पारद का अस्तित्व खल्वी रसायन या पोट्टली या कूपी पक्व इनमे शेष रहता होगा ऐसे नही.


9.

किसी भी धातू का या किसी भी द्रव्य का भस्म करते समय = मारणं करते समय, उसको पुट=अग्नि देना आवश्यक होता है और जब अग्नि देंगे तो यह पारद 20°C को ही हवा मे उडने लगेगा और 350°C में तो निश्चित रूप से इसका बाष्पीभवन होगा, तो ऐसी स्थिती मे इस पारद का भस्म होना, यह असंभव है!!!


10.

अब जब पारद का भस्म ही नही बन सकता, तो रस भस्म से, उत्तम धातू भस्म का निर्माण ... लोहानां मारणं श्रेष्ठं सर्वेषां रसभस्मना... यह संभव ही नही है.


इसलिये भस्म की उत्तमता का जो श्लोक है, इसमे से

लोहानां मारणं श्रेष्ठं सर्वेषां रसभस्मना


यह पहला तो कदापि संभव ही नही है 


11.

और दुसरा 

मूलीभिः मध्यमं प्राहुः ... यह,

वनस्पती के पुटों से मारण करने के लिए इतना समय और इतनी अधिक संख्या मे पुट लगते है, तब तक इतना ॲश (ash रक्षा राख) उस मूल धातू भस्म मे समाविष्ट होता है, की उसको औषध कैसे कहेंगे ??? और वनस्पती द्वारा मारण के लिए इतने अधिक संख्या में पुट लगते है, तो उसका काॅस्ट कितना बढेगा ???


12.

तिसरा विकल्प ...

कनिष्ठं गंधकादिभिः

गंधक इत्यादी से मारण जो स्वयं शास्त्र ही कनिष्ठ = 3rd class = अधम = हीन कहता है, तो क्या ऐसी कनिष्ठ 3rd class हीन अधम भस्म का प्रयोग हम अपने पेशंट पर करने के लिए नैतिक रूप से तयार है???


13.

और चौथा ...

अरिलोहेन लोहस्य मारणं दुर्गुणप्रदम्

अरिलोह से भस्म निर्माण तो दुर्गुण प्रद है, ऐसा स्वयं शास्त्र कहता है किंतु शास्त्र मे ही गंधक मनःशिला टंकण हरताळ इनसे ही = अरिलोह से ही भस्म बनाने का विधान लिखा है, तो ये तो आत्माश्रय = स्वस्कंधारोहण न्याय हुआ ... और ये तो दुर्गुण प्रद है ,


14.

... तो ऐसे भस्म निर्माण के चारो विधी ;

1. या तो असंभव है ...

2. या नॉन ॲफाॅर्डेबल है & समय का अत्यंत अपव्यय करने वाले है ...

3. या फिर कनिष्ठ अधम 3rd class हीन है ...

4. या दुर्गुणकारी है ...


अर्थात रुग्णके शरीर के लिए हितकारी नही है !


तो क्या ऐसी स्थिति में भी आप धातुभस्म जन्य कल्प का अपने अन्नदाता पेशंट पर प्रयोग करेंगे ???


15.

इसके संदर्भ मे एक विस्तृत लेख पहले लिखा हुआ है उसकी लिंक साथ मे दी है 

https://mhetreayurved.blogspot.com/2024/01/blog-post.html

जिज्ञासू और पेशंट हितकारी पेशंट हितदर्शी वैद्य विद्यार्थी सन्मित्रों ने उपरोक्त चारो बातों का अंतर्मुख होकर विचार करके और दिया हुआ धातु भस्म संदर्भ का आर्टिकल पढके स्वयं निर्णय लेना चाहिए


16.

सारांश :

पारद के किसी भी कल्प मे पारद का अस्तित्व होता है , यही बात असंभव है, वास्तविक धरातल पर असत्य है. इसीलिए हवा मे बाते मत कीजिए. धैर्य से सत्य का स्पष्ट रूप से स्वीकार करे!


17.

20 डिग्री से अधिक तापमान में ही पारद बाष्पीभूत evaporate होता रहता है. ऐसी स्थिती मे पोट्टली और कूपी पक्व तो छोड दीजिए, किंतु खल्वी रसायन मे भी पारद , उस कल्प मे स्थिर नही रह सकता, अदृश्य हो जाता है, और हम पारद के खल्वी रसायन कल्प, सिंदूर , कूपी पक्व और पोट्टली बनाते है ... !!!

ये सारा बुद्धीभ्रम है ये सारा अज्ञान है ये सारा अवास्तविक कल्पनारम्य और दिशाहीन प्रयास है ... जो धन समय ऊर्जा और संसाधन का निष्प्रयोजन व्यय है, इट इज शीअर वेस्टेज ऑफ टाईम मनी एनर्जी अँड रिसोर्सेस


18.

सत्यपि निर्देशे कुर्याद् ऊह्यं स्वयं धिया

👇🏼

यद्यपि शास्त्र मे निर्देश हे तथापि उस विषय के संदर्भ मे अपनी बुद्धी से स्वयं भी चिंतन विश्लेषण करना चाहिए


न चैकान्तेन निर्दिष्टेऽप्यर्थेऽभिनिविशेद्बुधः 

👇🏼

केवल पूर्व संस्कार के कारण या ब्रेन वॉशिंग के कारण, जो लिखकर रखा है वही योग्य है; ऐसा एकांतिक एक्स्ट्रीम अभिनवेश हट्टा ग्रह दुराग्रह; कोई भी "बुद्धिमान" व्यक्ती ना रखे


स्वयमप्यत्र वैद्येन तर्क्यं बुद्धिमता भवेत् 

👇🏼

बुद्धिमान वैद्य ने स्वयं इस विषय मे अपना तर्कपूर्वक विचार करना चाहिए


विना तर्केण या सिद्धिर्यदृच्छासिद्धिरेव सा 

👇🏼

बिना तर्क (=सोच विचार) के जो यश प्राप्त होता है, वह केवल एक यदृच्छा = कोइन्सिडन्स फ्लुक संयोग अंदाजा होता है, सिद्धी नही ... शुअर शाॅट सक्सेस नही !!!


Disclaimer/अस्वीकरण: लेखक यह नहीं दर्शाता है, कि इस गतिविधि में व्यक्त किए गए विचार हमेशा सही या अचूक होते हैं। चूँकि यह लेख एक व्यक्तिगत राय एवं समझ है, इसलिए संभव है कि इस लेख में कुछ कमियाँ, दोष एवं त्रुटियां हो सकती हैं। भाषा की दृष्टी से, इस लेखके अंत मे मराठी भाषा में लिखा हुआ/ लिखित डिस्क्लेमर ग्राह्य है

डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.

Disclaimer: The author does not represent that the views expressed in this activity are always correct or infallible. Since this article is a personal opinion and understanding, it is possible that there may be some shortcomings, errors and defects in this article.


Monday, 24 March 2025

हिंदी भाषा में : गर्भसंस्कार : मर्यादा और वस्तुस्थिती !!! 😇🤔⁉️🤫🫣🫢🙃🤦‍♂️🤷🙆

 गर्भसंस्कार : मर्यादा और वस्तुस्थिती : हिंदी भाषा में





आयुर्वेद मे गर्भसंस्कार ऐसा "शब्द" ढूंढेंगे ,

तो नही मिलता है.

फिर भी गर्भ पर कुछ गुणांतराधान = अच्छे गुण उपलब्ध हो, इसलिये किये जाने वाले कर्मों को / कर्मकांड को , यदि "संस्कार" कहेंगे , तो ये दो प्रकार के है... 1.गर्भधारणा पूर्व & 2. गर्भधारणा के पश्चात् 


गर्भधारणा के पूर्व : प्रशस्त बीज निर्मिती तथा स्त्री-पुरुष उत्तम संयोग इसके लिये उपचार, आहार एवं इसके साथ हि कुछ मंत्र पूजा होम हवन आदि क्रियाये या कर्मकांड भी बताया गया है.


किसी भी स्थिति में, गर्भधारणा हो गई है या नही, यह एक महिना या 40 दिन तक पता नही चलता है, क्योंकि एक महीने के बाद आने वाली मेंसेस अगर नही आयी, तो क्या गर्भधारणा हो गई है ऐसा संदेह आता है. 40 या 45 दिन बाद में युरीन प्रेग्नंसी टेस्ट पॉझिटिव्ह आने की संभावना होती है. उसके बाद सोनोग्राफी करके फिटल पोल और एफ एच एस (=फिटल हार्ट साऊंड) इनकी निश्चिती के बाद ही गर्भधारणा हुई है, ऐसा मान सकते है.

तो पहला एक या डेढ महिना तो कोई भी संस्कार करना यह संभव नही है, फिर भी गर्भधारणा हो गई है या होगी हि, "ऐसा मानकर", कुछ संस्कार क्रिया उपचार कर सकते है.


सबसे महत्वपूर्ण बात यह है की, गर्भ को (गर्भिणी को) जो कुछ भी सुनाया जाता है, पढने के लिए, बताया जाता है ... इनका "कुछ भी उपयोग गर्भ को नही हो सकता है".


यद्यपि हमारे पुराण कथी में अष्टावक्र अभिमन्यू मच्छिंद्रनाथ इन्होने गर्भ मे कुछ सुना ऐसा लिखा गया है, वह केवल उस कथा की या उस व्रत की या उस मंत्र की महत्ता बढाने के लिए लिखी हुई "अर्थवादात्मक" प्रशंसा आख्यायिका दंतकथा है, उसका वास्तविकता से सत्य से सार्थकता से कोई संबंध नही है.


एक अत्यंत सामान्य तर्क ऐसा है, की जो शिशु जन्म के बाद हि, स्वयं का श्वास, स्वयं का नेत्र कान नाक त्वचा रसना... ये सारे इंद्रिय और स्वयं की बुद्धी स्वयं का ब्रेन इनका उपयोग करके , ग्रहण करता है ... देखता है सुनता है ...

तो कम से कम, तीन साडेतीन वर्ष के वय तक, जो भी उसने सुना देखा खाया सूंघा स्पर्श किया ... उसमे से "कुछ भी" उसको उसके आगे के जीवन मे स्मरण मे नही रहता है.


हमारी अपने जीवन की सबसे पुरानी अर्लिएस्ट earliest स्मृति, साडेतीन या चार वर्ष वय के बाद की ही होती है.


अगर जन्म के बाद साडेतीन-चार साल तक जो विषय ग्रहण किया है, वो भी अगर हमे स्मरण मे नही रहता है ... तो जब नेत्र कान नाक जिह्वा ये सभी इंद्रिय, विषय से परे है , दूर है, असंयुक्त है और श्वास ले नही रहा है, ऐसे स्थिती मे ... माता ने सुना हुआ देखा हुआ पढा हुआ, कुछ भी गर्भ पर परिणाम करता होगा ... यह केवल श्रद्धा अंधश्रद्धा कल्पना भोलापन assumption consideration supposition imagination fantasy fad है.


इसलिये गर्भसंस्कार के वर्ग मे जाना / न जाना, यह अपना निर्णय विकल्प ऑप्शन होना चाहिए.


किंतु ... मैं गर्भसंस्कार में जाऊंगी, तो मेरा बच्चा आगे जाकर , अत्यंत सुंदर , अत्यंत बुद्धिमान , अत्यंत बलवान, सुपरमॅन ... इस प्रकार का होगा और मेरी प्रसूति, यह फुल टर्म नॉर्मल डिलिव्हरी विदाऊट सिझेरियन विदाऊट कॉम्प्लिकेशन "होगी हि", इसकी कोई भी निश्चित संभावना नही है.


हां अगर कुछ चेंज व्हरायटी हॅपनिंग एंटरटेनमेंट यह चाहिये तो गर्भिणी ने इसके लिए गर्भसंस्कार वर्ग मे जाना ठीक है.


चरक और सुश्रुत मे देखेंगे तो प्राय: "आहार" का हि उल्लेख मिलता है और साथ मे व्यायाम न करे, प्रवास न करे ; ऐसे कुछ विहारात्मक वर्तनात्मक निषेध लिखे है. 


किंतु औषध का उल्लेख नही है प्रायः !!!


आज कल जो गर्भसंस्कार नाम का दो प्रकार का व्यवहार या व्यापार चलता है , उसमे लाभार्थी भी दो प्रकार के है ...

1. यह गर्भसंस्कार कैसे करना है , ये वैद्यों को हि सिखाया जाता है और 

2. गर्भसंस्कार प्रत्यक्ष लाभार्थी would be mother ऐसे गर्भिणी या उस दांपत्य को किये जाते है , प्रत्यक्ष कराये जाते है, उसको एक "कर्मकांडात्मक = हॅपनिंग कोर्स"का रूप दिया जाता है. इसमे मंत्र योगा "इनका भी" समावेश होता है.


किंतु वस्तुतः, आयुर्वेद का कार्यक्षेत्र औषध, अन्न और विहार "इतना ही" है.


इसमे से गर्भ विकास या गर्भधारणा से प्रसूती तक का संपूर्ण कालावधी , यह कोई व्याधी विकार रोग आजार डिसीज नही है ... Pregnancy is "not a disease", it is a celebration! तो ऐसी स्थिती मे इसमे औषधोपचारों का उतना महत्त्व या आवश्यकता नही है, जितना की इसमे सबसे महत्वपूर्ण है, गर्भिणी ने लेने का "आहार" है, क्योंकि उसी आहार से उस गर्भिणी का तथा विकसित होने वाले गर्भ का पोषण होता है.

आगे चरक और सुश्रुत मे प्रथम मास से नवम मास तक क्या आहार लेने का उपदेश है, यह दिया हुआ है.


मास : चरक & सुश्रुत 

1 शीत दुग्ध & मधुर शीत द्रव आहार

2 मधुर औषध सिद्ध दूध & मधुर शीत द्रव आहार

3 तूप मध दूध & साठे साळीचा भात दुधासह

4 दूध घुसळून काढलेले लोणी & साठे साळीचा भात+दही or दूध लोणी जांगल मांस व आवडते अन्न

5 वरील प्रकारच्या लोण्याचे तूप & साठे साळीचा भात+दूध or दूध घुसळून काढलेले लोणी

6 वरील प्रकारचे तूप मधुर औषधांनी सिद्ध करून & साठे साळीचा भात+तूप or गोक्षुर सिद्ध तूप किंवा यवागू

7 वरील प्रमाणेच & पृथक्पर्ण्यादि सिद्ध तूप

8 तूप घातलेली दुधात तयार यवागू & स्निग्ध यवागू आणि जांगल मांस रस

9 मधुर औषध सिद्ध तेलाचा अनुवासन आणि योनी पिचू


अगर यही👆🏼 आहार लेना आज कल के किसी भी गर्भिणी को संभव है , तो उसका अभिनंदन करना चाहिए और इस प्रकार का आहार लेने का विधान, अपने क्लायंट को कस्टमर को पेशंट को,जो वैद्य सचमुच बताता है, उसका भी धन्यवाद और अभिनंदन करना चाहिए.


चरक और सुश्रुत मे उल्लेखित आहार को देखने के बाद, मुझे नही लगता है, कि इस प्रकार का आहार "आज" कोई वैद्य सजेस्ट करता होगा और सजेस्ट करने के बाद इस प्रकार का आहार सेवन कोई कस्टमर क्लाएंट पेशंट गर्भिणी प्रत्यक्ष रूप मे करती भी होगी!!!


वैद्यने कभी यह भी सोचना चाहिए, की हम जो गर्भसंस्कार के नाम पर "बेच" रहे है , क्या वह सत्य सिद्ध सार्थक स्थिती मे , उस ग्राहक कस्टमर क्लायंट पेशंट गर्भिणी को अपेक्षित लाभदायक परिणाम दे रहा है , "जितना की" वह उसके लिए समय पैसा एनर्जी रिसोर्सेस लगा रही है ?!


*गर्भाशयातील बाळाला रक्तपुरवठा कमी पडत होता असे सोनोग्राफी मध्ये कळाले. ही एक गंभीर बाब आहे. याला Placental Insufficiency असे म्हणतात. ही केस आयुर्वेद उपचारांनी1 महिना7 दिवसांत बरी झाली. सोबत दोन्ही रिपोर्ट जोडले आहेत. पेशन्ट व त्यांचे कुटुंबीय यांनी ठेवलेला संयम व विश्वास याबद्दल त्यांचे आभार.

https://www.facebook.com/share/p/161VpxC2ou/

Placental Insufficiency:*

Placental insufficiency (also called placental dysfunction or uteroplacental vascular insufficiency) is an uncommon but serious complication of pregnancy. It occurs when the placenta does not develop properly, or is damaged. This blood flow disorder is marked by a reduction in the mother's blood supply.

👆🏼

Corrected within 1month 1 week by Ayurveda Treatment


www.MhetreAyurved.com

Clinics @ Pune & Clinic


97A Patil Plaza Mitramandal Chauk Near Sarasbag PUNE


DK Nagar Gangapur Road near Prasad Mangal Karyalaya NASHIK


#ayurveda #health #ayurved #nashik #nasik #pune #placentalinsufficuency #lowbloodflowpregnacy


Disclaimer/अस्वीकरण: लेखक यह नहीं दर्शाता है, कि इस गतिविधि में व्यक्त किए गए विचार हमेशा सही या अचूक होते हैं। चूँकि यह लेख एक व्यक्तिगत राय एवं समझ है, इसलिए संभव है कि इस लेख में कुछ कमियाँ, दोष एवं त्रुटियां हो सकती हैं। भाषा की दृष्टी से, इस लेखके अंत मे मराठी भाषा में लिखा हुआ/ लिखित डिस्क्लेमर ग्राह्य है




डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.




Disclaimer: The author does not represent that the views expressed in this activity are always correct or infallible. Since this article is a personal opinion and understanding, it is possible that there may be some shortcomings, errors and defects in this article.

गर्भसंस्कार : मर्यादा व वस्तुस्थिती : मराठी भाषा 😇🤔⁉️🤫🫣🫢🙃🤦‍♂️🤷🙆

 गर्भसंस्कार : मर्यादा व वस्तुस्थिती : मराठी भाषा 😇🤔⁉️🤫🫣🫢🙃🤦‍♂️🤷🙆






सुवर्ण प्राशन या अशास्त्रीय परंतु आकर्षक व यशस्वी मार्केटिंग केल्या गेलेल्या उद्योगाप्रमाणेच दुसरा "लोकप्रिय व फोफावणारा उद्योग" म्हणजे "गर्भसंस्कार"

चरक आणि सुश्रुत यात उल्लेखित गर्भिणी परिचर्येशी अजिबात साम्य/संबंध नसलेला आणि जो आपला अधिकार नाही, त्या मंत्र योग यांच्या आधाराने "सजवलेला" गर्भसंस्कार ... हाही उद्योग याच प्रकारचा आहे

Pregnancy is not a disease... it is a celebration of life !!!

गर्भावरती काही संस्कार होऊ शकतात ही गोष्टच मुळात अशास्त्रीय आहे. ठीक आहे की, शारीरिक प्रशस्ती किंवा शरीराशी संबंधित काही अवयव यांची उत्तम स्थिती यासाठी गर्भिणीला काही उपचार करणे, हे शक्य आवश्यक आणि काही प्रमाणात शास्त्रीय आहे.


परंतु गर्भसंस्कार केल्यामुळे बुद्धी स्मृती अशा अशारीरिक अमूर्त बाबी अपेक्षित पद्धतीने वाढवता येतात/ चांगल्या करता येतात ; अशा प्रकारचा प्रचार मात्र अवास्तव, अशास्त्रीय आणि मार्केटिंगच्या अंगाने केवळ धनार्जनासाठी केला जाणारा स्वार्थी आणि दिशाभूल करणारा उद्योग आहे.


मुळात आयुर्वेद शास्त्रामध्ये गर्भसंस्कार असा शब्द किंवा विधी कुठेही उल्लेख केलेला नाही 


गर्भिणी परिचर्या असे वर्णन सविस्तर उपलब्ध आहे ज्यामध्ये अगदी गर्भधारणे पूर्वीपासून तर प्रसूती होऊन बाळाला दूध पाजेपर्यंत, सर्व कालावधीसाठी, सविस्तर आहार विहार विषयक मार्गदर्शन आहे.


परंतु यात कुठेही योगासने व्यायाम ध्यानधारणा मंत्र आणि अगदी तुरळक अपवाद वगळता औषधे यांचा उल्लेख किंवा मार्गदर्शन नाही.


आयुर्वेद शास्त्राच्या तीनही ग्रंथांमध्ये ज्या पद्धतीची गर्भिणी परिचर्या सविस्तर वर्णन केलेली आहे, प्रत्येक महिन्यासाठी ... त्या पद्धतीने आज कोणी वैद्य आपल्या गर्भिणी असलेल्या पेशंटला सांगत असेल, असे वाटत नाही ... आणि एखादा वैद्य तसे सांगत असला, तरी त्या प्रकारच्या आहारीय बाबी आजचा पेशंट सलग नऊ महिने, त्या क्रमाने सेवन करेल, ही शक्यता फारच धूसर आहे.


त्यामुळे आयुर्वेदात ग्रंथात संहितांमध्ये वर्णन केलेली गर्भिणी परिचर्या, जी मासानुमासिक म्हणजे प्रत्येक महिन्यासाठी वेगवेगळी आहे, ती प्रॅक्टिकली आज अवलंबिली जाते असे नाही !!!


याउलट आयुर्वेद शास्त्र शिकलेले असताना किंवा बी ए एम एस किंवा एमडी आयुर्वेद ही डिग्री घेतलेली असताना, ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला अधिकार अनुभव ज्ञान प्रमाणपत्र शासकीय अनुमती समाज मान्यता यापैकी काहीही नाही, अशा मंत्र योगासने ध्यान धारणा व्यायाम याबाबत , "गर्भसंस्कार" या आर्थिक फायद्याच्या उद्योगांमध्ये, समाजातील आई होऊ घातलेल्या would be mother अशा स्त्रियांना, त्यांच्या भावनिक दुर्बलतेचा हळवेपणाचा इमोशनल vulnerabilityचा गैरफायदा घेऊन, त्यांना त्यात गुंतवणे आणि त्यांच्याकडून पैसे उकळणे/ मिळवणे, हे नैतिकदृष्ट्या योग्य नव्हे !!!अभिमन्यूला किंवा अष्टावक्राला किंवा मच्छिंद्रनाथांना गर्भामध्ये ज्ञान प्राप्त झाले ह्या पुराणातल्या कथा आहेत, ज्या श्रद्धेसाठी म्हणून ठीक आहे ! परंतु वास्तवात शास्त्रीय दृष्टीने असे काहीही होत नाही. 


आणि खरोखरच कुठल्याही आईला तिच्या होणाऱ्या अपत्याचे जीवन अभिमन्यू किंवा अष्टवक्र किंवा मच्छिंद्रनाथ यांच्याप्रमाणे असलेले चालणार आहे का???


पहिला व्यावहारिक स्पष्टीकरणाचा भाग म्हणजे आपण जन्माला आल्यानंतर , आपली सर्व इंद्रिय बुद्धी ही व्यवस्थित काम करीत असताना देखील, वयाच्या साधारण तीन साडेतीन वर्षापर्यंतच्या , कुठल्याही स्मृती आपल्याला पुढील आयुष्यात शिल्लक राहत नाहीत!!! 


वयात जन्मापासून वयाच्या तीन साडेतीन पर्यंत, आपण स्वतः पाहिलेले ऐकलेले अनुभवलेले शिकलेले आपल्याला शिकवलेले असे कोणतेही बुद्धी स्मृती विषयक विषय मोठेपणी शिल्लक राहत नाहीत!! 


असे असेल तर , आपण जन्माला येण्यापूर्वी , जेव्हा आपली इंद्रिय बुद्धी ही सुप्त किंवा अ-जागृत अवस्थेत असतात, त्या काळात आईने ऐकलेल्या पाहिलेल्या अनुभवलेल्या केलेल्या गोष्टींमुळे, आपल्या बुद्धी आणि स्मृतीमध्ये बदल सुधारणा वाढ होईल, ही गोष्ट ... साध्या , न शिकलेल्या माणसाला सुद्धा न पटणारी आहे, सहज समजणारी आहे !!!


असे असताना आपण आपली बुद्धी शिक्षण बाजूला ठेवून, गर्भसंस्कार नावाच्या गोष्टीला बळी पडतो, हा अशिक्षितपणा आहे , निरक्षरपणा आहे, अडाणीपणा आहे!!!


याबाबत ... दुसरे शास्त्रीय स्पष्टीकरण असे की आयुर्वेदाच्या संहितांमध्ये, असे स्पष्टपणे लिहिलेले आहे की, जीवनाच्या सुरुवातीला आणि जीवनाच्या शेवटी म्हणजे जन्म आणि मृत्यू यावेळी , महत्तम = मोठा अंधार अशा स्वरूपाचा *मोह म्हणजे अज्ञान*, या प्रकारचा ज्वर येतो, जो मागील जन्मातील सर्व बुद्धी स्मृती या पुसून टाकतो ... *मोहस्वभावाद् एव अन्यजन्मजं कर्म प्राणी न स्मरति।* याचा अर्थ बाळाच्या जन्मापूर्वी , ते बाळ गर्भात असताना , आपण कोणतेही संस्कार केले , तरीही ते शरीरापुरते उपयोगी होऊ शकतात , परंतु ते बुद्धी स्मृती या अर्थाने लाभदायक होऊ शकत नाहीत!!!


संस्कार या नावाने पुंसवन हा संस्कार आयुर्वेद ग्रंथांमध्ये लिहिलेला आहे, परंतु पुंसवन या संस्कारावरती आज गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याने बंदी आहे, त्यामुळे गर्भसंस्कार यामध्ये, संस्कार या नावाने, निश्चितपणे उल्लेखित असलेला , पुंसवन संस्कारच शासकीय दृष्ट्या आज बंदी खाली आहे !!! त्यामुळे अजून इतर कुठला संस्कार , गर्भसंस्कार या नावाने करता येईल, अशी शास्त्रीय शक्यता निश्चितपणे नाही


आयुर्वेदात संहिता ग्रंथात गर्भिणीसाठी नऊमासांचे क्रमानुसार सांगितलेले आहार

महिना : आहार 

प्रथम : मधुर शीत द्रव आहार

द्वितीय : मधुर शीत द्रव आहार

तृतीय : मधुर शीत द्रव आहार, साठे साळीचा भात आणि दूध

चतुर्थ : साठे साळीचा भात आणि दही, दुधातून काढलेले लोणी आणि बकरीचे मांस शेळीचे मटण

पंचम : साठे साळीचा भात आणि दूध , दुधातून काढलेले तूप

षष्ठ : साठे साळीचा भात आणि तूप, गोखरू सिद्ध तूप किंवा कढण पेज

सप्तम : औषधि सिद्ध तूप किंवा कढण पेज

अष्टम : बस्ति काढायचा आणि तेलाचा असे दोन्ही प्रकारचे

नवम : स्निग्ध पेज कढण, मटण


वरील प्रमाणे प्रत्येक महिन्याचा आहार जर सुचवला जात असेल, तर तो निश्चितपणे शास्त्रीय आहे, असे जाणावे 


परंतु, असा आहार न सुचवता , मंत्र योगा व्यायाम आसने मेडिटेशन , असे "हॅपनिंग" उद्योग , या गर्भसंस्कार उपक्रमात चालत असतील, तर तो आयुर्वेदाचा भाग नसून, ते आयुर्वेदाच्या अधिकाराच्या स्कोपच्या आवाक्याच्या बाहेरचं , काहीतरी वेगळंच चालू आहे, असे जाणावे


*गर्भाशयातील बाळाला रक्तपुरवठा कमी पडत होता असे सोनोग्राफी मध्ये कळाले. ही एक गंभीर बाब आहे. याला Placental Insufficiency असे म्हणतात. ही केस आयुर्वेद उपचारांनी1 महिना7 दिवसांत बरी झाली. सोबत दोन्ही रिपोर्ट जोडले आहेत. पेशन्ट व त्यांचे कुटुंबीय यांनी ठेवलेला संयम व विश्वास याबद्दल त्यांचे आभार!

https://www.facebook.com/share/p/161VpxC2ou/

Placental Insufficiency:*

Placental insufficiency (also called placental dysfunction or uteroplacental vascular insufficiency) is an uncommon but serious complication of pregnancy. It occurs when the placenta does not develop properly, or is damaged. This blood flow disorder is marked by a reduction in the mother's blood supply.

👆🏼

Corrected within 1month 1 week by Ayurveda Treatment


www.MhetreAyurved.com

Clinics @ Pune & Clinic


97A Patil Plaza Mitramandal Chauk Near Sarasbag PUNE


DK Nagar Gangapur Road near Prasad Mangal Karyalaya NASHIK


#ayurveda #health #ayurved #nashik #nasik #pune #placentalinsufficuency #lowbloodflowpregnacy

Disclaimer/अस्वीकरण: लेखक यह नहीं दर्शाता है, कि इस गतिविधि में व्यक्त किए गए विचार हमेशा सही या अचूक होते हैं। चूँकि यह लेख एक व्यक्तिगत राय एवं समझ है, इसलिए संभव है कि इस लेख में कुछ कमियाँ, दोष एवं त्रुटियां हो सकती हैं। भाषा की दृष्टी से, इस लेखके अंत मे मराठी भाषा में लिखा हुआ/ लिखित डिस्क्लेमर ग्राह्य है




डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.




Disclaimer: The author does not represent that the views expressed in this activity are always correct or infallible. Since this article is a personal opinion and understanding, it is possible that there may be some shortcomings, errors and defects in this article.




मूव्ह ऑन... पुढचं पाऊल... वरची पायरी ... नवनवीन *विचारांची बीजं पेरत जाणारा माणूस*

 आपण सगळेच आयुर्वेदाचे विद्यार्थी आणि सहकर्मी आहोत.


*आपल्यापैकी कोणालाही आयुर्वेद किंवा चरक किंवा संहिता ह्या आंदण / मालकीच्या किंवा मुखत्यारपत्र करून दिलेल्या नाहीयेत.*


त्यामुळे आपण लगेच चरकाचा किंवा रसशास्त्र नाडीपरीक्षण योगाचा कैवार घेऊन भांडायला युद्ध करायला लढायला उठलं पाहिजे, असं काही नसतं


आयुर्वेदात ऍडमिशन घेऊन 35 वर्ष होऊन गेलेले आहेत 


त्यामुळे श्वासा श्वासात कणाकणात क्षणाक्षणात आयुर्वेदातील विषयांचे चिंतन चालू असतं 



मग त्याचं पोस्टिंग मी "उचित" अशा प्रकारच्या, "बुद्धिमत्तेची काही लेव्हल" असलेल्या वैद्यांच्या ग्रुप मध्ये करतो 


मी माझ्या पोस्ट लिहिताना, त्या कोणालाही वैयक्तिक उद्देशून लिहित नाही.


माझ्या मता ला महत्व द्यावं किंवा माझ्या पोस्टची दखल घ्यावी किंवा त्या पोस्टवर वाद घालावा किंवा त्या पोस्टच्या निमित्ताने मला यथेच्छ नावे ठेवावीत निंदा करावी टोमणे मारावेत घालून पाडून बोलावे शक्य तितक्या नकारात्मक कॉमेंट करावेत ... तेहीपोस्ट मधील मुद्दे सोडून... याची आवश्यकताच नाहीये!


परंतु लोकांना पोस्ट मधील मुद्द्यापेक्षा, वैयक्तिक निंदा टीका टिप्पणी टोमणे, नालस्ती हे करण्यात इंटरेस्ट *"आणि क्षमता"* अधिक असते


माझ्याकडे कोणताही स्टाफ इन्फ्रास्ट्रक्चर एजन्सी टीम असं काहीही नाहीये 


म्हेत्रेआयुर्वेद MhetreAyurveda ही सगळी वन मॅन इंडस्ट्री / वन मॅन आर्मी आहे ...


त्यामुळे नाशिक आणि मुख्य म्हणजे पुणे क्लिनिक, चालू असलेले 7 प्रकारचे ऑनलाइन कोर्स, त्याच्यासाठीची सातत्याने अपलोड होत राहणारी एडिट होत राहणारे रेकॉर्डिंग... 


उदाहरणार्थ, अष्टांग हृदय कल्पस्थान अध्याय सहा श्लोक केवळ याच्यावरती तब्बल 90 लेक्चर कल्पसिद्धौ च वाग्भटः = औषधे वाग्भट श्रेष्ठ हा या उपक्रमांतर्गत म्हेत्रेआयुर्वेद MhetreAyurveda यांच्या www.MhetreAyurveda.com या वेबसाईटवर अपलोड झाली, चरक शारीर स्थान साठी एक तासाची 70 लेक्चर्स ऑनलाईन अपलोड झाली ... यासोबतच MhetreAyurveda फार्मसी मधून नियमितपणे एफडीए ॲप्रुव्हल घेऊन GMP certificate नुसार तयार होणाऱ्या औषधांची व्यवस्था करणे ... 


या सर्वांमध्ये , प्रतिसा/वादात्मक पोस्ट लिहिणे, याच्यासाठी वेळ काढणं , खूप अवघड होतं ... तरीही ही पोस्ट वेळात वेळ काढून लिहीत आहे


मी काही फार मोठा वैद्य नाही की माझ्याकडे रोज शंभर पेशंट येतात किंवा 

मी फार मोठा गुरु नाही की माझ्याकडे एक 100- 200 स्टुडन्ट आहेत ...

मी एक सर्वसामान्य छोटासा वैद्य आहे ...

त्यामुळेच माझ्या मताला माझ्या पोस्टला दुर्लक्ष केलं तर बिघडलं कुठं?!🤔⁉️


बरं, मी एखादी पोस्ट लिहिली, एखादा मुद्दा मांडला म्हणजे 

तो सगळ्यांना लगेच स्वीकार्य झाला , त्या पोस्ट मधल्या विचारानुसार लगेच उद्या सगळीकडे बदल झाले... असे काही क्रांती होणारेय का??? 


मी म्हणालो दोष नसतात ओज नसतं रसधातु नसतो रसशास्त्र नसतं मन नसतं नाडीपरीक्षा नसते... गर्भसंस्कार सुवर्णप्राशन विद्ध मर्म वर्म शिरोधारा मसाज शोधन (showधन) सौंदर्यशास्त्र हृद् बस्ती हे व्यवसाय धंदा व्यापार अशा आर्थिक स्वरूपाचे उद्योग आहेत, ते आयुर्वेद शास्त्राशी विसंगत आहेत, शास्त्र सुसंगत नाहीत... असे मी म्हणालो ... म्हणून काय लोक लगेच ते सोडून देणार आहेत का? नाही ना ???


ते सगळं चालूच राहणार आहे, मग माझं वैयक्तिक मत मी व्यक्त केलं, म्हणून असं काय फार मोठं आकाश कोसळणार आहे!? 


आत्मा नाकारणाऱ्या चार्वाकालाही आपण दर्शन म्हणतो. 

आत्मा नाकारणाऱ्या बौद्धाला आपण विष्णूच्या अवताराचं स्थान देतो 

ईश्वर नाकारणाऱ्या सांख्यांना आपण दोन क्रमांकाचं सर्वश्रेष्ठ दर्शन म्हणवतो 


मग मी एखादी पोस्ट लिहून एखादा मुद्दा नाकारला, तर त्यात एवढा अकांड तांडव करायची काय गरज आहे? किंवा त्याच्याकडे एवढे लक्ष द्यायची तरी काय गरज आहे?


*मी कुणालाही नावानिशी उद्देशून वैयक्तिक पोस्ट कधीही लिहीत नाही*


मला अशी आशा / अपेक्षा आहे एक लोकप्रिय निरूपणकार या पदापासून आता इथून पुढे हळूहळू पदोन्नती होत होत ... तत्त्वचिंतक आणि तत्ववेत्ते तत्व बोधक तत्त्वदर्शी ... नव सिद्धांत लेखक इथंपर्यंत जाता यायला पाहिजे 


जी माहिती वाक्य श्लोक आधीपासून लिहिलेले आहेत, त्याच्यावर तासनतास किंवा पानोपान बोलणं किंवा लिहिणं ही पहिली पायरी आहे 


अशा प्रकारचं निरूपण करणे ही आज पहिल्यांदा घडणारी गोष्ट नाहीये 


आज पासून 25 30 35 वर्षांपूर्वी त्याला टीकावाचन संहिता पठण अशी नाव होती ...

आता त्याला ऑनलाईन वेबिनार, गुरुकुल, निरूपण अशी नावं आहेत ... दारू तीच ... बाटली नवी!


जोरात नळ सोडला आणि त्याच्या खाली वाटी किंवा बशी धरली , तर त्यात काहीही पाणी साठत नाही 


यथा वाऽऽक्लेद्य मृत्पिण्डमासिक्तं त्वरया जलम् । चरक


तसा प्रकार हा हल्लीच्या सुपरफास्ट गुरुकुलांचा निरूपणांचा झालेला आहे 


दोन-तीन दिवसात पूर्ण होतात ... ज्यांना कसलीही पार्श्वभूमी नाही, त्या विद्यार्थ्यांच्या पदरी काय पडतं, 

काय माहिती?! 


भारावून नक्की जातात अनेक जण ... भरून किती जातात... हा प्रश्न !


संहिता वाचन टीकावाचन हा नित्यकर्म प्रतिदिनी करण्याचा निरंतर अध्ययन प्रकार आहे 


अवचित उठलं आणि पळत सुटलं ... सठी सहामाशी आमुशी पौर्णिमेला करणे असा तो प्रकार नाही ...


त्याच्यात जर सातत्य नसेल, तर त्याचा "इव्हेंट" होतो समारंभ होतो ...

पण त्याचा शास्त्र अध्ययन शास्त्र झिरपणे ज्ञानाचे परकोलेशन होणे असं होत नाही 


वक्ता मोठा होतो पण श्रोता काय लाभ मिळवतो, हे ऑब्जेक्टिव्हली पाहिलं जात नाही 


आणि आता तर ... चल गुरू , हो जा शुरू! सेमिनार वेबिनार झाले उदंड ... अशी परिस्थिती आहे, तो अनेकांचा ऑनलाईन धंदा सुद्धा झालेला आहे अरेंज करणारांचा ... एकाच वेळेस 300 वॉटसप ग्रुप मॅनेज करून त्याच्यावर लोकांच्या इव्हेंटच्या जाहिराती करणारे लोक आहेत.


त्यामुळे कसदार काय आणि फोलपट काय हे कळणं, सर्वसामान्य /नव्या/ तरुण /नुकत्याच प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना कळणं, शक्यच नसतं 


त्यावेळी मग समोर जे मांडलं जातंय, तेच खरं ...असा त्यांचा भ्रम होत जातो 


ज्यांनी लता मंगेशकर किशोर रफी आशा हेमंत कुमार मन्ना डे भीमसेन जोशी सुधीर फडके हे ओरिजनल ऐकलेच नाहीत... त्यांना रिमिक्स मधली मॅशप कव्हर अनप्लग्ड असली व्हर्जनच छान वाटायला लागतात... कारण गुणवत्ता काय असते , हे माहितीच नसतं


मूळ स्वरूपातील संहितांचे पठण संथा पाठांतर निरूपण हे धर्मचैतन्यच्या अदिति वामन मंदिराच्या प्रांगणात महागुरू कोल्हटकर सर गुरुवर्य गाडगीळ सर संजय पेंडसे सर प्रमा जोशी बावडेकर अतुलचंद्र ठोंबरे यांनी अनेक वर्ष केले 


सखा सद्गुरु भगवंत अनिल पानसे याने हे व्रत जीवनभर चालवले 


रसिक पावसकर सलग 24 तास निरूपण करू शकतो एवढी त्याच्यात क्षमता आहे 


गिरनारच्या पायथ्याला जुनागड मध्ये एका मोठ्या सभागृहात चालते बोलते चरक = लिविंग एनसायक्लोपीडिया ऑफ चरक = डॉक्टर सी पी शुक्ला यांचे निरूपण सलग तीन दिवस मी ऐकलेले आहे 1996


फक्त इतकंच की कोल्हटकर पानसे सीपीशुक्ला यांच्या वेळी सोशल मीडिया नसल्यामुळे आज जितक्या सहजपणे पॉप्युलरिटी मिळते , तितकी त्यांना नाही मिळाली 


जितेंद्र अभिषेकींपेक्षा महेश काळेला पाॅप्युलॅरिटी जास्त आहे 

वसंतराव देशपांडेंपेक्षा त्यांचा नातू राहुल देशपांडेला पॉप्युलॅरिटी जास्त आहे 


सुधीर फडके गदिमांपेक्षा आज गुलाबी साडी लिहिणाऱ्याला पॉप्युलॅरिटी करोडोंच्या संख्येत आहे


बिन खर्चाच्या सोशल मीडियाच्या अस्तित्वामुळे लोकप्रियता "measurable" होऊन, त्याची "संख्या" जास्त झाली...

म्हणजे त्याची गुणवत्ता ही आधीच्यांच्या पेक्षा श्रेष्ठ असतेच, असं नसतं ना!?


पूर्वजांनी आधीच लिहून ठेवलेलं आहे त्याचंच तासनतास निरूपण करत वर्षानुवर्ष तसंच राहणं , ही नवीन बाब नाही 


ज्याचं निरूपण संकलन करत आहोत,

 त्याचं चिंतन (स्वयं धिया ऊह्यं) अध्ययन अनुभव (बुद्धिमता वैद्येन तर्क्यम्) याच्यानंतर ..

*त्याच्या पुढे दोन पावलं सुचणं* , 

हे त्याचं खरं इष्ट फलित आहे... 

म्हणून वाग्भटाला ...

सहा शस्त्र जास्त सुचली 

योनिव्रणेक्षण यंत्र सुचलं 

पाच प्रकारच्या वातांची दुष्टी हेतू दुष्टी लक्षणं सुचली 


मूढगर्भाला काढून ग्रहणी हा अष्टौमहागदामध्ये घालावासा वाटला 


दशप्राणायतना मध्ये रसन बंधन याचा समावेश करावासा वाटला 


धमनी मर्म हे सहाव्या प्रकारचे मर्म लिहावसं वाटलं


म्हणजे असं विलक्षण मत मांडणारा वाग्भट हा त्याज्य निंद्य असा मानायचा का?


लंघनं स्वेदनं कालो ... असं सगळीकडे ज्वर चिकित्सा सूत्र असताना....

"ज्वरादौ लंघनं मध्ये पाचनम् अंते रेचनम्"

असे चिकित्सा सूत्र लिहिणारा योग रत्नाकर हा चुकीचा आहे का? 


त्यामुळे *आपल्याला कदापिही सुचू न शकणाऱ्या*

आणि म्हणूनच दुसऱ्याला सुचल्यावर 

*ते सहज पचू न शकणाऱ्या*

प्रस्थापित मतांपेक्षा वेगळं असणारं मत ,

हे नेहमी निंद्य त्याज्य निषेधार्ह वादग्रस्त असतं, असं नाहीये 


*परमत सहिष्णुता ठेवली तर, नवीन काहीतरी शिकायला मिळण्याची शक्यता असते*


एकच भगवद्गीता लोकांनी द्वैतपर लावलेली आहे अद्वैतपर लावलेली आहे 

ज्ञान कर्म भक्ती अशा तीनही प्रकारे लावून दाखवलेली आहे 

गीतेमध्ये लोकांना अहिंसा अभय सत्त्वगुण भक्ती तत्त्वज्ञान असं बरंच काही दिसतं


मला मात्र... "हातात शस्त्र घे आणि समोरच्याला तोडून काढ!!!", असा पराक्रम करण्याची पुरुषार्थाची युद्धासाठी सिद्ध होण्याची वृत्ती दिसते.


https://youtu.be/eWQnhzue5wA?si=bPW7IzmkuktV4SUw


रामायणामध्ये अनेकांना आदर्श बंधुप्रेम पितृप्रेम असलं बरंच काही दिसतं 

मला एवढंच दिसतं की स्वतःच्या बायकोला हात लावणाऱ्याला ठार मारायचं असतं !!!


त्यामुळे एखाद्या गोष्टीकडे बघण्याची विविध लोकांची दृष्टी आणि मतं ही वेगळी असू शकतात , हे आपण आपल्या संस्कृतीतल्या गोष्टींकडे पाहून मान्य का नाही करत?


भारतीय तत्त्वज्ञानावरच पोषण होऊन ओशो रजनीश जे कृष्णमूर्ती अरविंद घोष रमण महर्षी इस्कॉन अशी विविध/विभिन्न मतं जगभरात प्रसृत प्रस्थापित लोकप्रिय आणि अनुकरणीय झाली


ग्रामीण जीवनातील मागील पिढी दुपारी किंवा रात्री देवळात कीर्तन प्रवचन ऐकायला जायची 


हल्लीची शहरी श्रीमंत लोकं पैसे देऊन बुकिंग करून सत्संग करायला जातात 


हे एक उच्चस्तरीय वाटणारं हाय प्रोफाईल स्टेटस साठी केलं जाणारं आधुनिक शैलीचं मनोरंजन आहे 


मागील पिढीतल्या कीर्तन प्रवचनाचा किंवा आत्ताच्या पिढीतल्या सत्संगाचा रोजच्या जीवनातील वागण्या व्यवहाराशी जराही संबंध नसतो


तसाच काहीच प्रकार आयुर्वेदातही चालतो हल्ली.


चरकस्तु चिकित्सिते म्हणून चरकाच्या ज्वरावरती दीड तास व्याख्यान द्यायचं/ऐकायचं आणि प्रत्यक्षात मात्र ते ऐकून स्वतःच्या क्लिनिकमध्ये पेशंट आल्यानंतर ज्वराच्या पेशंटला ट्रिकी द्यायचं आणि आपलं जय मंगल करून घ्यायचं ... असला सावळा गोंधळ चालूच असतो.


 चरकांनी हेतु स्कंध लक्षण स्कंध आणि *त्याच हेतु लक्षणांसाठी* "औषध स्कंध" गंमत म्हणून लिहिलेत का? 


जर हेतुस्कंध आणि लक्षणस्कंध (म्हणजे निदान) हे चरकातून सुश्रुत संहितेतून वाग्भटातून शिकत असू ... तर तिथेच लिहिलेल्या औषधस्कंधाने पेशंट बरा करता येणे, हे सुसंगत नैसर्गिक आहे ...

*पण त्याला हिम्मत आणि क्षमता दोन्ही लागते* ...


आणि ती हिम्मत आणि क्षमता नसल्यामुळेच, ज्या ग्रंथांमध्ये हेतुस्कंध लक्षण स्कंध लिहिलेलंच नाही, तिथला औषध स्कंध "जादुगिरी किमयागिरी" सारखा वापरायचा आणि पुन्हा त्याची भलामण समर्थन जस्टिफिकेशन करायचं की "पेशंटला बरं वाटलं पाहिजे ना" ... अरे, संहितोक्त कल्प वापरून पेशंट बरा करणं , तुम्हाला जमत नाही, म्हणून तुम्ही आयुर्वेदाच्या नावाखाली अशास्त्रीय असे रसकल्प वापरता !!! ... हे मान्य करा ना... 


आणि एखाद्याने स्टेरॉईड वापरले किंवा मॉडर्न वापरलं म्हणून त्याला अस्पृश्य ठरवायचं नावं ठेवायची... हा दुट्टपीपणा ढोंगीपणा लबाडी कशासाठी?


मग ते रस शास्त्रातील द्रव्य संहितेत कशी किती वेळा कुठल्या संदर्भात आली त्याच्यावर लेख लिहायचे आणि मग रसशास्त्र कसं आयुर्वेदात मुरगळता घुसडता येईल याची सोयीस्कर व्यवस्था करायची ...

चरक स्वतः असता तर त्याला खरंच हे मान्य झालं असतं?!


त्यापेक्षा आपल्याला जे जमत नाही ते आपली मर्यादा आहे , असं समजून रेफर करायचं ही पेशंट बेनिफिट च्या दृष्टीने उत्तम नैतिकता आहे !


1988 चा माझा आयुर्वेदातील ऍडमिशन आहे, 1989 पासून मी माझ्या जुनियर बॅचेस ला आणि क्वचित काही सीनियर बॅचेस लाही शिकवत आलेलो आहे 


परंतु पूर्वजांनी लिहिलेल्या ओळींवरती तासनतास व्याख्यान देणं किंवा पानंच्या पानं त्याच्यावर निबंध प्रबंध ग्रंथ लिहिणे, ही एक पर-प्रकाशित परावलंबी उपजीव्य अशी वृत्ती /कृती आहे 


त्याच्या पलीकडे जाणं म्हणजे जे आपण वाचतोय अनुभवतोय 

त्याचं *तत्त्वचिंतन* होऊन 

त्याचं काहीतरी *तत्त्ववेत्ते* या स्तरावरून आपल्याला "नव्याने मांडता येणे" ही त्याच्यातली पुढची पायरी पुढचं पाऊल प्रगती आहे, असं मला वाटतं 


सगळेच रिक्षावाले मुख्यमंत्री होत नाहीत 

सगळे चाय वाले पंतप्रधान होत नाहीत


ते फार कमी लोकांना जमतं ...


ज्यांना जमत नाही त्यांनी चालवावी कि रिक्षा... विकावा की चहा ... नाही कोण म्हणतेय... पण आम्ही रिक्षा चालवतो आम्ही चहा विकतो , म्हणून तुम्ही मुख्यमंत्री पंतप्रधान व्हायचं नाही... हा काय विचित्रपणा आहे!?


जे वेणी माधव शास्त्रींना जमलं 

जे बायवरूशास्त्रींना जमलं 

जे दातार शास्त्रींना जमलं 

जे वाग्भटाला जमलं 


... जे चक्रपाणिला नाही, पण हेमाद्रिला जमलं!!!✅️✅️✅️ 


चक्रपाणी म्हणतो 

नालं तोषयितुं पयोदपयसा नाम्भोनिधिस्तृप्यति।

व्याख्याभासरसप्रकाशनमिदं त्वस्मिन् यदि प्राप्यते

क्वापि क्वापि कणो गुणस्य तदसौ कर्णे क्षणं धीयताम्


अरुण दत्त म्हणतो 

को मत्सरिणि लोकेऽस्मिन्विद्वान्किञ्चिच्चिकीर्षति। 


 पण हेमाद्री म्हणतो ... "वयम् अपि आप्ताः" 💪🏻 ... मीही आप्तच आहे 🏆


शास्त्राचं अध्ययन तीन चार दशकं केल्यानंतर... "मीही आप्तच आहे" ... हा अहंकार अभिमान नव्हे तर, *आत्मविश्वास आलाच पाहिजे*


आणि त्या आत्मविश्वासा पोटी व अनुभवा पोटी, प्रस्थापित मतांपेक्षा "विलक्षण व अभिनव मत" मांडता येणे शक्य असते 


म्हणून अंदनकर हे दोष क्षीणतेने व्याधी होतात असं म्हणू शकले 


अण्णा त्र्यं म गोगटे यांच्यावर कोर्ट केस लागली तरी त्यांनी त्यांची मत ठामपणे मांडलीच


कारण प्रस्थापित विचारांपेक्षा काहीतरी वेगळं मांडताना संघर्ष प्रतिरोध इनर्शिया याचा सामना करावा लागतोच 


"विलक्षण" असले तरी "अभिनव" अशा *विचारांची बीजं पेरत जाणं* 🌱 हा माझा स्वभाव आहे 


कधीकाळी (2002 पर्यंत) माझ्या पीजी एंट्रन्स प्रेपरेशन क्लासची स्टुडन्ट संख्या फक्त 50 च्या आसपास असे.

2003 च्या आसपास, त्यावेळेला पहिल्यांदा माझ्या क्लासच्या स्टुडन्ट ची संख्या 100 च्या पलीकडे गेली होती 


परंतु क्लास चालू केला तो 1999 ला...

तो नावा रुपाला यायला चार वर्षे गेली 

आणि त्यानंतर बारा वर्षांनी 2015 मध्ये मी क्लास संपन्न केला ...


कारण यू हॅव टू मूव्ह ऑन... पुढचं पाऊल... वरची पायरी यायलाच पाहिजे 


वचा हरिद्रादी गणावरती केरळ मधील एका कॉलेज साठी साठी मी व्याख्यान दिले ... सलग सात तासांचं, त्याला जवळपास दहा वर्ष होत आली आता...


https://youtu.be/J9MxYTxWoYo?si=ARMwIeukK3w04DOa


Playlist of 6 video lectures

👇🏼

https://youtube.com/playlist?list=PLGfK-7vCSHv4_0rGQY-0Ren4ZdSgRyjuz&si=cyuGEKsRWprIxdLe


पण वचाहरिद्रादि गण, ब्रँड म्हणून सप्तधा बलाधान वटी या स्वरूपात वैद्यांच्या उपयोगासाठी टॅबलेट स्वरूपात आणण्यासाठी मला मधली दहा वर्षे लागली 


तोपर्यंत मी सातत्याने अनेक ग्रुप वरती त्याविषयी लिहीत आलो 


कारण मला त्याच्या पेशंटच्या मधल्या परिणाम याचे अनुभव मिळत गेले 


माझ्या आधीच अनेक नॉन ब्रांडेड लोकांनी वचाहरिद्रादि टॅबलेट बनवून विकायलाही चालू केले होते 


वचाहरिद्रादि चे श्रेय क्रेडिट मालकी पेटंट माझं नाही, याची मला पूर्ण जाणीव आहे 


पण वचाहरिद्रादि गणाच्या वापराच्या "बीजाची पेरणी" मी केलीये एवढे मला नक्की माहिती आहे 

मी नवनवीन *विचारांची बीजं पेरत जाणारा माणूस* आहे

रसशास्त्र आयुर्वेदाचा भाग नाही अशी पोस्ट मी पहिल्यांदा 2013 मध्ये लिहिली 


त्याच्या आधी माझ्या क्लासमध्ये सातत्याने शिलाजतुच्या निमित्ताने मी रसशास्त्र हा आयुर्वेदाचा भाग नाहीच, असं ठासून सांगत आलो होतो ...

जेव्हा व्हाट्सअप अस्तित्वात नव्हतं तेव्हापासून माझे हे विचार मी प्रस्तुत करत आहे 

आज मी किमान शंभर विद्यार्थी दाखवू शकतो वैद्य दाखवू शकतो की ज्यांनी रस शास्त्राची प्रॅक्टिस बंद केलेली आहे 


स्टेरॉईड मिक्स करून वापरतात, म्हणून आपण काही वैद्यांना डॉक्टरांना बोगस म्हणून बदनाम करतो 

पण दुसरीकडे मात्र, "पेशंटला येन केन प्रकारेण *माझ्याकडूनच* बरं वाटलं पाहिजे" म्हणून आपल्याला योग नाडी रसकल्प मर्म वर्म सत्त्वावजय दैवव्यपाश्रय असं सगळं चालतं ... पेशंटला बरं वाटायला पाहिजे म्हणून आपल्याला रसशास्त्र ही चालतं मग जर रस शास्त्र चालत असेल, तर तो स्टेरॉईड वापरणारा चुकीचा कसा काय ठरतो??? 


चरकच म्हणतो ना... 

तदेव युक्तं भैषज्यं यदारोग्याय कल्पते ।

स चैव भिषजां श्रेष्ठो रोगेभ्यो यः प्रमोचयेत् 


त्यामुळे रसशास्त्र आयुर्वेदाचा भाग नाही, हे विचार बीज मी अनेक वर्ष पेरत आलोय, तेव्हा आज अनेक वैद्य विद्यार्थी रसशास्त्र पासून स्वतःला लांब ठेवून "खऱ्याखुऱ्या आयुर्वेदाची, संहितोक्त आयुर्वेदाची" प्रॅक्टिस करतात याचा मला निश्चितपणे अभिमान आहे 


मी ही जी माझी मतं लिहितो ...

ती प्रस्थापित लोकप्रिय उच्च पदस्थ माझ्यापेक्षा सीनियर ... आणि ज्यांच्या ब्रेनला बुद्धीला झापडं लावलेली आहेत, ज्यांच्या मतांना स्पॅस्टॅसिटी कडकपणा आलेला आहे, लवचिकपणा संपलेला आहे परमत सहिष्णुता अजिबातच नाही ... "अशा लोकांसाठी लिहीत नाही" ...

जी तरुण पिढी आहे उगवती पिढी आहे, ज्यांच्या ~मनावर~ *बुद्धीवर भावनांवर विचारांवर* संस्कार होऊ शकतात ... अशा ताज्या दम्याच्या नववैद्यांवरती या मतांचे संस्कार व्हावेत ... म्हणून ते मी विविध प्लॅटफॉर्म वरती प्रस्तुत करत असतो 


उद्या मी ही मतं या ग्रुप मध्ये मांडायची बंद केली म्हणजे ती अन्यत्र पसरणारच नाहीत ... असं काही नाही 


आणि मी ती मतं इथं मांडतोय म्हणजे त्याला सगळ्यांनी लक्ष दिले पाहिजे, असेही काही नाही 


मी मांडलेला मताकडे पोस्टकडे दुर्लक्ष करणे, दखल न घेणे हा सोपा विकल्प आहे 


इग्नोरंस इज द बेस्ट इन्सल्ट 


एखाद्याच्या मताला पोस्टला इग्नोर करणं दखल न घेणं दुर्लक्ष करणं हा सगळ्यात मोठा अपमान आहे 


बरं, तुम्ही तुमच्या पोस्ट मतं मांडूच नका , असंच हट्टाग्रही धोरण असेल तर एडमिनला मला ग्रुप मधून काढून टाकण्याचा अधिकार आहेच की 


तसे मी वरती व्यक्त केलं त्याप्रमाणे अनेक ग्रुपमधून मी स्वतः लेफ्ट झालेलो आहे 


कारण लोकांना मुद्द्यांचा विरोध करायचं नसतो 

कारण *तो करण्याची क्षमता* आणि शक्यता दोन्ही नसते 


म्हणून मग ते वैयक्तिक निंदा नालस्ती टोमणे ताशेरे शेरे असं करत बसतात 


आणि मला त्यात अजिबात इंटरेस्ट नसतो


कोणी म्हणतंय म्हणून मी माझं मत मांडायचं थांबवेन असं अजिबात होणार नाही 


फार फार तर व्यासपीठ बदलेल 

पण जोपर्यंत मी जिवंत आहे 

तोपर्यंत मला सुचणारे विलक्षण व अभिनव अपूर्व अभूतपूर्व विचार प्रस्थापित विचारांपेक्षा वेगळे असलेले विचार 

मी निश्चितपणे मांडत राहणार 

यात मला कुठलीही शंका नाही 

आणि तसा माझा असलेला निर्धार हा निरंतर कायम राहील 

आणि त्याप्रमाणे मी माझी मतं निश्चितपणे मांडतच राहीन.


वरती इतरांनी जे दोष विषयक बरेऽऽऽच संदर्भ दिलेत, ते *दोष असतात* असा अभ्युपगम/स्वीकार करून दिलेत


त्यासंदर्भांचं काही विशेष कौतुक नाहीये 


कारण, मी *"दोष नसतात"* या स्टेटमेंट वरती पुढची मतं मांडतोय 


जिथे तुमची मतं/संदर्भ संपतात ...

तिथून पुढे माझी मतं सुरू होतात 


जिथे आधुनिक शास्त्राला पूर्वी ज्याच्याबाबत कसलंही डॉक्युमेंट माहिती उपलब्ध नाही, अशा हृदयाच्या परीक्षणासाठी अतिशय मोठी यंत्रणा नव्याने तयार करून ईसीजी ... ब्रेन साठी इइजी ... टू डी इको डॉपलर सीटी सोनोग्राफी पेट स्कॅन अशा अनेक तंत्रांनी सूक्ष्मातिसूक्ष्म शरीर घटक दिसतात... मोजता येतात✅️ तिथे ज्याच्याबद्दल प्रचंड वाङ्मय ग्रंथ साहित्य डॉक्युमेंटेशन उपलब्ध आहे ... अशा 3 बोटांनी कुठल्याही यंत्राविना कळू शकणार्‍या नाडीबाबत आणि नाडीतून "समजतात, असं मानल्या जाणाऱ्या" दोषांबाबत & त्यांच्या पाच प्रकारां बाबत काहीही सापडू नये ... हे किती आश्चर्यजनक आहे ?!

बाकी रक्त ते शुक्र मूत्र पुरीष स्वेद हे सगळं सापडतं पण दोष रस ओज हे मात्र सापडत नाही हे किती आश्चर्यजनक आहे ... आणि म्हणूनच अविश्वसनीय आहे😇


ज्यांना mcg म्हणजे एका ग्रॅमचा 1 कोटीवा भाग (1 gram = 1000000 micrograms= 1 crore mcg) इतक्या अत्यल्प मात्रेत असलेले शरीर घटक अंश उदाहरणार्थ थायरॉक्सिन मोजता येतात, त्यांचे वृद्धिक्षय समजतात, त्यांची पूर्ती करण्याची औषधं, आर्टिफिशियली तितक्याच अचूक मोजमापात, डिस्पेन्सिबल लेव्हलला तयार करता येतात... त्यांना रसधातु ओज सापडू नये, दोष सापडत नाहीत... हे किती आश्चर्यजनक आहे ?!


त्यामुळे *जे डेमॉन्स्ट्रेबल नाही आणि जे डिस्पेन्सिबल नाही, ते प्रॅक्टिकली शास्त्रदृष्ट्या अस्तित्वात नाही*


म्हणूनच चरक सुद्धा पाच महाभूत असतानाही ...

गर्भ निर्मितीच्या वेळेला चार महाभूतांचाच उल्लेख करतो ... कारण आकाश हे महाभूत अस्तित्वात असलं तरीही ते *डिस्पेन्सिबल आणि डेमॉन्स्ट्रेबल नसल्यामुळे त्याचा उल्लेख प्रत्यक्ष शरीर निर्मितीमध्ये सुद्धा चरक करत नाही* 


भूतानि विद्यात् दश षट् च देहे 

रसात्ममातापितृसंभवानि 

असा स्पष्ट उल्लेख चरका मध्ये आहे

म्हणजे चार वेगळ्या वेगळ्या स्थानांमधून उद्गमांमधून, चार महाभुते येतात ... पाच नाही, म्हणून चार गुणिले चार 16 असं चरक म्हणतो


म्हणून दोष असतात *असं "मानून" कितीही संदर्भ दिलेत* तरी ...

ते माझ्या मताला गैर लागू आहेत ...

माझं मत पटत नसेल दुर्लक्ष करा ग्रुप मधून काढून टाका 


पण तुम्ही मत मांडू नका, अशी *परमत असहिष्णुता* असू नये.


मी कधीच कुणालाच असा आग्रह केलेला नाही की तुम्ही मी दिलेल्या मतावर पोस्टवर तुमचं मत प्रतिसाद अनुमती विरोध खंडन मंडन व्यक्त कराच 


मी मत मांडून रिकामा झालेलो आहे 

आता त्या मताचं पोस्टचं काय करायचं दुर्लक्ष करायचं दखल घ्यायची डिलीट करायची वाचायची स्वीकार करायची ... 

त्यानुसार पुढे आपल्या जीवनामध्ये मतामध्ये बदल करायचा का सदर माणसाला वैयक्तिक निंदा नालस्ती करायची का सदर माणसाला ग्रुप मधून काढून टाकायचं ...

हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे 


त्याच्याशी मला काहीच घेणंदेणं नाहीये 


माझ्या मतावर पोस्टवर कुणी काय प्रतिक्रिया द्यावी, याच्यावर मी कसं काय नियंत्रण ठेवू शकतो?? 


त्यामुळे मला सुचणारी मतं ही माझ्या पोस्ट मधून विविध प्लॅटफॉर्मवर सातत्याने निरंतर येत राहणार हे निश्चित ✅️✅️✅️


श्रीकृष्णाऽर्पणम् अस्तु 🙏🏼


Disclaimer/अस्वीकरण: लेखक यह नहीं दर्शाता है, कि इस गतिविधि में व्यक्त किए गए विचार हमेशा सही या अचूक होते हैं। चूँकि यह लेख एक व्यक्तिगत राय एवं समझ है, इसलिए संभव है कि इस लेख में कुछ कमियाँ, दोष एवं त्रुटियां हो सकती हैं। भाषा की दृष्टी से, इस लेखके अंत मे मराठी भाषा में लिखा हुआ/ लिखित डिस्क्लेमर ग्राह्य है


डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.


Disclaimer: The author does not represent that the views expressed in this activity are always correct or infallible. Since this article is a personal opinion and understanding, it is possible that there may be some shortcomings, errors and defects in this article.

इंजिनिअरिंग क्यूं किया?! ... आयुर्वेद में भी ऐसे XX होते है

 https://youtube.com/clip/UgkxZIP3b3GVU9oJrjRfrElxqmNVamKfnQ6a?si=z5ia_KkHAdCh89PT

Or click this link 

https://youtu.be/cMgEjB-qO2I?si=lGQ04AdSsX5hiOR5

👆🏼

इंजिनिअरिंग क्यूं किया?! ... 🫏

आयुर्वेद में भी ऐसे 🫏 होते है

👇🏼 https://www.facebook.com/share/p/1D9pSPUZCc/


थ्री इडियट मध्ये करीनाचा होऊ घातलेला पती सुहास बद्दल आमिर खान म्हणतो की, "पहले इंजिनिअरिंग किया , फिर अमेरिका जा के एमबीए किया और अब बँक मे नौकरी कर रहा है... अगर बँक मे ही नौकरी करना था, तो इंजिनियरिंग कायकू किया?"


जर संहितेमध्ये एमडी करून, रसशास्त्राचीच भलामण करायची असेल, रसशास्त्राचीच प्रॅक्टिस करायची असेल, तर संहितेत एमडी केलंच कशासाठी?


चरकस्तु चिकित्सिते म्हणायचं , चरकाच्या ज्वर चिकित्सा सूत्रावरती दीड तास लेक्चर द्यायचं आणि ज्वराचा पेशंट आला की त्याला ट्रिकी द्यायची आणि स्वतःचं जय मंगल करून घ्यायचं, हा किती स्वतःलाच फसवण्याचा दांभिकपणा आणि दुटप्पीपणा आहे!?


येन केन प्रकारेण, काहीही करून, पेशंटला माझ्याकडूनच बरं वाटलं पाहिजे, असा हट्टाग्रह करण्यासाठी, म्हणून आयुर्वेदाची प्रॅक्टिस करणाऱ्यांनी , स्वतःला वैद्य म्हणून घेणाऱ्याने, रसकल्प वापरण्यासाठी पळवाट शोधणे, असं करण्यापेक्षा स्वतःला आर एम पी RMP म्हणवून घ्या, स्वतःला वैद्य किंवा आयुर्वेद प्रॅक्टिस करणारा म्हणवून घेऊ नये ...

आणि आयुर्वेदाची प्रॅक्टिस करतो असं म्हणायचं असेल, स्वतःला वैद्य म्हणायचं असेल, तर मग त्या माणसाने रसकल्प किंवा आयुर्वेदाच्या बाहेरच्या गोष्टी (योगा मंत्र नाडीपरीक्षा गर्भसंस्कार विद्ध वर्म मर्मचिकित्सा) वापरू नये ... तितकी कट्टरता शुद्धता आपल्या आचरणात ठेवायला हवी


स्वतःला वैद्य म्हणून घ्यायचं आयुर्वेद प्रॅक्टिस करतो म्हणायचं ... आणि रसकल्प वापरायचे हे म्हणजे किराणा दुकान चालवणाराने आत मध्ये केस कापण्याचा व्यवसाय करण्यासारखं आहे ...


शुद्ध शाकाहारी भोजनालय अशी पाटी लिहून उकडीचे मोदक देण्या ऐवजी चिकन मोमोज आणि खिमा पाव विकण्यासारखं आहे


येन-केन प्रकारेण, काहीही करून, माझ्याकडे आलेला पेशंट मी सोडणारच नाही, यासाठी मला जमत नसल्यामुळे, मी संहितोक्त कल्प सोडून, आयुर्वेदाच्या नावाखाली ... रसकल्प विद्ध वर्म मर्म योगा मंत्र असलेही अन्य कुठलेही उपचार बिनदिक्कत करेन, अशी जर वृत्ती असेल तर, स्वतःला आयुर्वेद वैद्य किंवा त्याचा प्रॅक्टिशनर असे म्हणवून न घेता, स्वतःच्या दुकाना वरती "ट्रीटमेंट मॉल / ट्रीटमेंट मार्ट" असे टायटल लावावे आणि स्वतःची डिग्री सगळोपॅथी पाॅलीपॅथी गोधडी वाकळ भेळ मिसळ गाठोड अशी लिहावी, हे बरे!


बरं ... संहितोक्त कल्प सोडून रसकल्प वापरण्याचं पुन्हा समर्थन करायचं की, रसशास्त्रातील द्रव्यांचा चरकामध्ये उल्लेख आहे, मग ते अगदी वेदांपासून तर आत्तापर्यंतचे सगळे संदर्भ द्यायचे, किती द्रव्य किती वेळेला उल्लेख केलेले त्याचा डाटा द्यायचा! 


अरे पण, चरका मध्ये मांसाचे प्रकार दिलेत , मग तुम्ही उद्या मांस विक्रीचे दुकान थाटणार का? चरका मध्ये वास्तुविद्या कुशल असा शब्द आलाय, म्हणून मग तुम्ही आर्किटेक्टचं काम करणार का किंवा इंटिरियर डिझायनरचं?! 


चरकामध्ये महानस शब्द आलाय, मग तुम्ही पोळ्या लाटण्याचं स्वयंपाक करण्याचं काम करणार का चार घरांमध्ये जाऊन ??? किंवा एखादी नाश्त्याची गाडी लावणार का रस्त्याच्या कडेला???


एखाद्या गोष्टीचा चरका मध्ये उल्लेख आहे म्हणजे आपल्याला त्याचा व्यवसाय व्यापार धंदा दुकान चालवण्याचं परमिट मिळालं, असा अर्थ होतो का??? नाही ना!?


तरीही, ते सत्त्वावजयवाल्यांनी दुकान चालू केलेलं आहेच! मनाच्या उपचारांबाबत चरक म्हणतो, "तद्विद्य सेवा" म्हणजे ज्याला सत्त्व याविषयी कळतं, त्यांचं मार्गदर्शन घ्या = त्यांच्याकडे रेफर करा ... पराधिकारेषु न विस्तरोक्तिः!!! ... तर यांनी सत्त्वावजय आयुर्वेदातच कोंबला !!!


अशी कोंबाकोंबी झोंबाझोंबी रसशास्त्र नाडीपरीक्षण विद्ध सुवर्णप्राशन शिरोधारा जानुबस्ति हृद्बस्ति कटीबस्ति, सर्विक्सच्या पलीकडे गर्भाशयाच्या आत दिला जाणारा दोन एम एल चा उत्तर बस्ति, जगातल्या सगळ्या रोगांवर एकमेव रामबाण उपचार असलेला अत्यंत चमत्कारपूर्ण अग्निकर्म, गर्भसंस्कार सौंदर्यशास्त्र केस आणि त्वचा यांची मेकप उत्पादन खपवण्याचा उद्योग ... हे सगळं आयुर्वेदात कोंबणं सुरूच आहे!!!


आपण जर संहितेमध्ये एमडी केलेले आहे किंवा

संहितेतले एमडी राहू द्या, पण आपण संहिता वाचून बीएएमएस शिकलेलो आहोत ... बी एम एस डिग्री राहू द्या , पण आपण संहिता वाचून आयुर्वेद शास्त्र शिकलेलो आहोत ... संहितेत लिहिलेल्या हेतुस्कंध आणि लक्षणस्कंध यापलीकडे आयुर्वेदातलं निदान अस्तित्वात नाहीये ... योग्य निदानाविना औषध सुचणं शक्य नाहीये ... असं असताना ज्या संहिता ग्रंथांमध्ये पेशंटचे हेतुस्कंध पेशंटचे लक्षणस्कंध लिहिलेले आहेत, त्याच संहिता ग्रंथात लिहिलेल्या त्याच हेततलक्षणांसाठी लिहिलेल्या औषध स्कंध चा उपयोग करून पेशंटला बरा करता येणं ही नैतिकता आहे स्वाभाविक आहे नैसर्गिक आहे obvious आहे ऑफकोर्स आहे ...!


"असं सरळ साधं सहज सोपं असताना" ... ज्या ग्रंथांमध्ये हेतुस्कंध लक्षण स्कंध यांचा उल्लेखच नाही, ज्या औषधांची भैषज्य कल्पना ही आयुर्वेदाच्या 5विध कषाय कल्पनांशी आणि संयुक्त कल्पनांशी अजिबात सुसंगत नाही, उलट टोकाची विसंगत आहे, अशा ग्रंथांमधली जादूगिरी ची किमयागिरीची औषधं म्हणजे रसकल्प हे आयुर्वेदाचेच आहेत, असं "मुरगळून" वापरायचं आणि आपण आयुर्वेद करतो, असं स्वतःला समाधान द्यायचं आणि लोकांना सांगायचं, ही पेशंटशी केलेली प्रतारणा वंचना फसवणूक आणि लुबाडणूक आहे, दिशाभूल आहे !!!


रसशास्त्र हे कुठल्याही प्रकारे आयुर्वेदाचा भाग नाहीच्च!!! 


1

आयुर्वेदाची दैवी परंपरा आणि रसशास्त्राची आदि परंपरा या भिन्न आहेत 


2

आयुर्वेदातले द्रव्याचे वर्गीकरण आणि रस शास्त्रातील द्रव्यांचे वर्गीकरण यांचा एकमेकांशी कुठेही मेळ बसत नाही 


3

आयुर्वेदात औषध तयार करण्याच्या मूलभूत 5विध कषाय कल्पना व संयुक्त कल्पना आणि एकूणच भैषज्य कल्पनांचा मूलाधार हा "जलामध्ये औषध उकळणे (water extract)" या स्वरूपाचा आहे. रसशास्त्रामध्ये अशाप्रकारे जला मध्ये उकळलेली औषधे आणि त्यांचा जलामध्ये आलेला एक्सट्रॅक्ट अशी कल्पनाच नाहीये ...


त्यामुळे रसशास्त्रातल्या चार दोन द्रव्यांचा, आयुर्वेदाच्या संहिता ग्रंथात जुजबी नाममात्र उल्लेख असला म्हणजे आपल्याला रसशास्त्र वापरण्याचा सातबारा कुलमुखत्यारपत्र पाॅवर ऑफ ॲटर्नी मिळते , असे जे लंगडं जस्टिफिकेशन केलं जातं ते स्वतःच्या तेजोहीनतेचं दुर्बलतेच अगतिकतेचं आणि भणंग दरिद्रीपणाचं प्रतीक आहे!!!


एखादी गोष्ट बीएमएस कोर्समध्ये आहे म्हणजे ती आयुर्वेद शास्त्रात आहे असा अर्थ अजिबात होत नाही


एखादी गोष्ट औषध म्हणून वापरण्याचा आपल्याला शासकीय कायद्याने परवाना आहे म्हणजे ते नैतिक असतंच असं नाही !!!


मद्यविक्री, तंबाखू विक्री, देहविक्रय याही बाबींना शासकीय कायद्याने परवानगी आहे, पण म्हणून ते नैतिक आहे असं होत नाही.


बी ए एम एस डिग्री च्या सिल्याबस मध्ये आहे आणि शासकीय कायद्याने परवानगी आहे असे असूनही, जर आपण मॉडर्न मेडिसिन वापरणाऱ्याला अशुद्ध आयुर्वेद म्हणत असू, तर मग रसशास्त्र वापरणे हेही तितकंच अनैतिक आहे


रसशास्त्र वापरणं हा आयुर्वेद शास्त्राशी विश्वासघात फितुरी गद्दारी आहे


संहितोक्त कल्प देऊन पेशंट बरा होत नाही, म्हणून रसशास्त्रातलं औषध द्यावंच लागतं असं आमच्या काही सन्मित्रांचं जस्टिफिकेशन आहे!


बरं, रसशास्त्रातला औषध देऊन पेशंट बरा "होईलच" याची काय शंभर टक्के गॅरंटी आहे का? 

समजा एखाद्या पेशंटला रस शास्त्रातलं औषध देऊनही तो बरा नाही झाला तर मग काय करता!? मॉडर्न कडे रेफर करताच ना!? किंवा तो पेशंटच तुम्हाला सोडून लाथ घालून मॉडर्न कडे स्वतःच निघून जातो ... जातो ना!? वस्तुस्थिती मान्य करा ना!? 


मग संहिता कल्पां बाबतच्या तुमच्या ज्ञानाच्या मर्यादामुळे किंवा चला क्षणभर तुमच्या समजूतीसाठी मान्य करू की, संहितोक्त कल्पांच्या सामर्थ्याच्या मर्यादेमुळे, पेशंट नाही बरा झाला ... आणि त्याला तुम्ही मॉडर्न रेफर केलं ... तर काय फरक पडेल असा !?


दादरला उतरून सीएसटी ला गेलात काय आणि माटुंगाला उतरून सीएसटी ला गेलात काय ... तर असं काय मोठा फरक पडणार आहे??? 


रसशास्त्र हा आयुर्वेदाचा भाग नाही, हे स्वतःच्या बुद्धीला सहजपणे पटत असताना सुद्धा, तसं स्पष्टपणे मान्य करण्याची धमक हिम्मत धैर्य धाडस सामर्थ्य तेज आपल्यात का असू नये!? 


आणि जर रसशास्त्र मुरगळून आयुर्वेदात कोंबायचंच असेल ... तर मॉडर्न ने काय अपराध केलाय??


आयुर्वेदाच्या तत्त्वांची विसंगत असलेले रसकल्प आपल्याला चालत असतील पेशंट बरा व्हायचाय म्हणून, तर मग मॉडर्न ने तर नक्की पेशंट बरा होणारेय रसकल्पांच्या तुलनेत ... मग, ते मॉडर्न स्वीकाराला काय हरकत आहे!? पण नाही ... मॉडर्न चं नाव काढलं की तो आयुर्वेदाचा वैद्य हा शास्त्रद्रोही झाला अस्पृश्य झाला अशुद्ध आयुर्वेद झाला इंटिग्रेटेड झाला 


आणि रसशास्त्राशी हातमिळवणी करून आयुर्वेदाशी गद्दारी फितुरी करता आहात, तो विश्वासघात नाहीये प्रतारणा नाहीये !? 


एकदा शांतपणे बसा आणि खरं खरं काय आहे ते फक्त स्वतःला उत्तर द्या ... जाहीर रित्या नाही दिले तरी चालेल !!!


उलट रसशास्त्र हा आयुर्वेदाचा भाग नसल्यामुळे, रस शास्त्राला स्वतंत्र शास्त्र म्हणून मान्यता मिळावी, त्याची स्वतंत्र कौन्सिल असावी, AYUSH आयुष मध्ये जसं, A आयुर्वेद Y योग U युनानी S सिद्ध H होमिओपॅथी, सोवा रिग्पा असे अनेक प्रकार आहेत चिकित्सांचे ... तसे "रस शास्त्र नावाचं एक अजून मेडिसिन सायन्स = चिकित्सा शास्त्र" समाविष्ट करायला सांगावे. त्यामुळे रसशास्त्राला स्वतंत्र ओळख मिळेल, स्वतंत्र अस्तित्व मिळेल ... त्याचा आयुर्वेदावरचं अवलंबित्व नष्ट होईल ... उलट यामध्ये रसशास्त्राचंच चांगभलं आहे, कल्याणच आहे!!!


Disclaimer/अस्वीकरण: लेखक यह नहीं दर्शाता है, कि इस गतिविधि में व्यक्त किए गए विचार हमेशा सही या अचूक होते हैं। चूँकि यह लेख एक व्यक्तिगत राय एवं समझ है, इसलिए संभव है कि इस लेख में कुछ कमियाँ, दोष एवं त्रुटियां हो सकती हैं। भाषा की दृष्टी से, इस लेखके अंत मे मराठी भाषा में लिखा हुआ/ लिखित डिस्क्लेमर ग्राह्य है


डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.


Disclaimer: The author does not represent that the views expressed in this activity are always correct or infallible. Since this article is a personal opinion and understanding, it is possible that there may be some shortcomings, errors and defects in this article.

Monday, 17 March 2025

What is the right age to get pregnant? 16, 20, 25 ... ✅️ 30, 35, 40 ... ❌️

 What is the right age to get pregnant?


16, 20, 25 ... ✅️ 30, 35, 40 ... ❌️

✍🏼

वैद्य हृषीकेश म्हेत्रे 

एमडी आयुर्वेद एम ए संस्कृत 

27 वर्ष से आयुर्वेद की सेवा मे 

संहितोक्त चिकित्सा practice @ पुणे & नाशिक

 17.03.2025 

9422016871


आज वंध्यत्व की चिकित्सा इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट यह हॉट केक इस प्रकार का विषय है.


 उभय अर्थात मॉडर्न मेडिसिन एवं आयुर्वेद क्षेत्र में इसकी प्रॅक्टिस से निश्चित रूप से बहुत अत्यधिक मात्रा मे धनार्जन होता है यह भी सत्य है


किंतु प्रेग्नंसी इज नाॅट अ डिसीज, ॲक्च्युली इट इज द सेलिब्रेशन ऑफ लाईफ ...

इसके लिये योग्य वय मे विवाह तथा गर्भधारणा होना यही इसकी नैसर्गिक चिकित्सा तथा वस्तुस्थिती है 


करिअर ऑपॉर्च्युनिटी के व्यर्थ मायाजाल के कारण पुरुष और स्त्री दोनों के विवाह का और उस कारण से गर्भधारणा का वय 30 या उसे भी आगे जा रहा है. 


इस अनैसर्गिक विलंब के कारण निश्चित रूप से अनपत्यता = इन्फर्टिलिटी की समस्या जटिल होती जा रही है 


यद्यपि यह सत्य है कि इन्फर्टिलिटी के इन पेशंट ( = कस्टमर ?!) के कारण, डॉक्टर वैद्य को धनप्राप्ती होती है


तथापि समाज के आरोग्य के आधार के रूप मे यह डॉक्टर वैद्य इनका कर्तव्य/ उत्तरदायित्व है, की उन्होने आगे आकर इनिशियेटिव्ह लेकर, यह प्रबोधन करना आवश्यक है कि, *गर्भधारणा का उचित वय* _25 30 के आगे न होकर_, *यह 16 से 20 सर्वाधिक आदर्श, तथा 20 to 25 मध्यम सुरक्षित & उपयोगी है* 

👆🏼

अभी स्टेटमेंट पर बहुत सारे लोगों को आपत्ती होगी.


 हमारी पिछली पिढी और उससे भी पिछली पिढी, इनको इस प्रकार की अनपत्यता की समस्या बहुतर मात्रा मे परसेंटेज वाईज देखा जाये , तो करीब करीब आयी ही नही थी और बच्चों की संख्या भी 4 से 8 - 10तक हुआ करती थी और फिर भी प्रायः माता और अपत्य दोनो निरामय और दीर्घायु तथा संपूर्ण जीवन मे सक्षम पाये जाते थे.


25 के पहले ही, जो भी प्रेग्नेंसी है वह पूर्ण होने के कारण , 40 वय में स्त्री अपत्य संगोपन के काम से उत्तरदायित्व से मुक्त हो जाती थी.


पिछले दो पिढियों के इन सभी लाभों का विचार किया जाये और पोस्ट के अंत में संस्कृत और इंग्लिश मे दिये गये रेफरन्स देखे जाये, 

तो आज का ट्रेन्ड और आज के कानून, इनको थोडा देर बाजू को रखकर भी, यह विचार और प्रबोधन, पुनश्च एकवार, समाज के सामने प्रस्तुत करना आवश्यक है कि, *स्त्री और पुरुष के विवाह/गर्भधारणा/अपत्यजन्म का वय, 25 से 30 के बाद नही, अपितु वह संपूर्ण जीवन मे आरोग्य संपन्न तथा सक्षम कार्य कुशलता के लिये विवाह एवं गर्भधारणा/अपत्यजन्म 20 से 25 वय वर्ष मे होना, आवश्यक है*


ऐसा कहना , यह अगतिकता होगी की , काल बहुत बदल गया है...


 काल कभी भी बदलता नही है, आज से कई सदियों पहले भी गर्भधारणा का कालावधी 280 दिन था, आज भी वही है ... आगे भी वही रहेगा !!!

*तो निसर्ग कभी भी बदलता नही है* 


हम निसर्ग के नियमों को धुत्कारकर नकारकर, कुछ अनैसर्गिक मेकॅनिकल जीवनशैली को अपनाने का निष्प्रयोजन & दिग्भ्रमित प्रयास कर रहे है ...


 तो इस दिग्भ्रम को इस गलतफहमी को समाज से दूर करने के लिए डॉक्टर/वैद्य ने प्रयास और प्रबोधन करना अत्यंत आवश्यक है की, स्त्री के विवाह का वय 20 और पुरुष के विवाह का 25 होना चाहिए 


शास्त्र तो इसे 16 और 20 / 25 ऐसेही लिखता है 


अगर हम शास्त्र के आयुर्वेद के अनुयायी है तो हमने इन शास्त्रीय नैसर्गिक विधानों का प्रस्तुतीकरण समाज के सामने , आज के ट्रेन्ड को इग्नोर करके भी , बडे धैर्य के साथ सातत्य निरंतरता के साथ करना आवश्यक है ... जिससे की इन्फर्टिलिटी जैसे केसेस की संख्या निसर्गतः ही कम हो जायेगी या निःशेष हो जायेगी


स्त्री पुरुष समानता के व्यर्थ निरुपयोगी fake नॅरेटिव्ह के प्रस्थापना के कारण , स्त्री-पुरुष _एकसमान equal न होकर_ , *परस्पर पूरक complimentary है* यह सत्य आवारीत तिरोहित रिजेक्ट कर दिया गया है 


इस कारण से एक अनावश्यक असुरक्षितता निर्माण होकर , आज आर्थिक रूप से स्वतंत्र होने के लिए अपने पैरो पर खडा होने के लिए आत्मनिर्भर होने के लिए,

 हर एक व्यक्ति प्रयास कर रहा है और उस आर्थिक स्थैर्यता की rat race मे , परस्परावलंबी परस्पर पूरक कौटुंबिक सहजीवन का मूल उद्देश नैसर्गिक परिचालन स्वाभाविक संचालन ईश्वरी अनुगमन छूट गया है 


और इस अर्थार्जन के चक्कर मे विवाह का वय आगे आगे जा रहा है, विवाह योग्य साथीदार नही मिल पा रहा है...

 और तो और में विवाह न करने की वृत्ती या विवाह अनावश्यक है ऐसी धरणा बनती चली जा रही है


 और इस कारण से भारतीय कुटुंब व्यवस्था का वैवाहिक संस्था का और वैयक्तिक सौख्य सामाजिक शांती इनका मूलाधार कंपित हो रहा है दुर्बल हो रहा है


पूर्णषोडशवर्षा स्त्री पूर्णविंशेन सङ्गता। 


शुद्धे गर्भाशये मार्गे रक्ते शुक्रेऽनिले हृदि॥८॥ 


वीर्यवन्तं सुतं सूते 




ऊनषोडशवर्षायामप्राप्तः पञ्चविंशतिम् । 


यद्याधत्ते पुमान् गर्भं कुक्षिस्थः स विपद्यते ।।




पञ्चविंशे ततो वर्षे पुमान् नारी तु षोडशे । 


समत्वागतवीर्यौ तौ जानीयात् कुशलो भिषक् ।।१३।।




What is the right age to get pregnant?




16, 20, 25 ... ✅️ 30, 35, 40 ... ❌️




While there's no single "right" age, a woman's peak fertility and pregnancy outcomes are generally considered to be in their late 20s and early 30s, with fertility declining as women age, particularly after 35. 


Here's a more detailed look at the factors involved:


Peak Fertility:


A woman's body is most fertile from the late teens through the 20s. 


Decline in Fertility:


As women age, the quantity and quality of eggs in the ovaries begin to decline, making it harder to conceive naturally. 


Increased Risks:


After age 35, there's a higher risk of pregnancy-related complications, such as miscarriage, and the risk of chromosomal conditions in the baby also increases. 


Age and Pregnancy Outcomes:


20s: Women in their 20s have the highest chance of conceiving and the lowest risk of pregnancy complications. 


30s: Fertility starts to decline, and the chances of miscarriage and C-section increase. 


40s: Fertility declines significantly, and the chances of conceiving naturally are very low. 


Other Factors:


Besides age, a woman's overall health, lifestyle, and readiness for motherhood also play a significant role in the decision of when to get pregnant.




वैद्य हृषीकेश म्हेत्रे एमडी आयुर्वेद एम ए संस्कृत 27 वर्ष से आयुर्वेद की सेवा मे संहितोक्त चिकित्सा practice @ पुणे & नाशिक 17.03.2025 

9422016871