Thursday, 23 January 2025

नैवेद्य समर्पण आणि राजासाठीचे भोजन

 नैवेद्य समर्पण आणि राजासाठीचे भोजन

*अष्टांगहृदय सद्वृत्त : भाग 179*

 07 जून 2024, शुक्रवार 

*उपविभाग 123* 


सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved

Copyright कॉपीराइट © लेखक : वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

MhetreAyurved@gmail.com 

www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/


*या उपक्रमात लिहिल्या जाणाऱ्या लेखांमध्ये असणारी विधाने ही आयुर्वेद सिद्धांत व संहिता ग्रंथ यावर आधारित शास्त्रीय सत्य तथ्य अशा स्वरूपाची प्रायः असतात. _परंतु या लेखांमध्ये काही विधाने काही रूढी परंपरा इतिहास याविषयीची माहिती सामाजिक माहिती मनोरंजन वैयक्तिक मत वैयक्तिक आकलन वैयक्तिक समजूत अशा स्वरूपाची सुद्धा असू शकतात_*


सिद्धैर्मन्त्रैर्हतविषं सिद्धमन्नं निवेदयेत् ।।


भोजनासाठी तयार केलेले अन्न हे सिद्धमंत्रांनी निर्विष करून खाण्यासाठी ताटात वाढून घ्यावे.


निवेदयेत् हे क्रियापद जरी संहितेमध्ये खाणारा साठी/ राजासाठी आलेले असले तरी,

निवेदयेत् या शब्दाने *नैवेद्य या विधीचे स्मरण होते*


आणि जनसामान्यांसाठी त्याच्या देवघरात असलेलं त्याचं आराध्य दैवत हाच राजा आहे, असे जाणून ... भोजनासाठी वाढून घेतलेले ताट हे देवाला निवेदन = नि वेदन करावे म्हणजे निश्चितपणे जाणवून द्यावे ... की हे भगवंता, तुझ्या इच्छेने तुझ्या कृपेने लाभलेले हे अन्न मी सेवन करणार आहे, तर ते तुझ्या कृपेने तुझ्या आशीर्वादाने निर्विष = अर्थात् ते मला बाधाकारक न होता, आरोग्यकारक आणि आयुष्यवर्धक होवो, अशी प्रार्थना करावी ... 

प्रार्थना करताना नैवेद्य दाखवताना काही मंत्र म्हणावेत की जे सिद्ध आहेत !


सिद्ध याचा अर्थ जे निश्चितपणे यशस्वी आहेत, जे निश्चितपणे सुफल = चांगले फल देणारे आहेत. 


आणि सुदैवाने मराठी संस्कृतीमध्ये रामदास स्वामींनी प्रत्येक घरामध्ये म्हटले जाणारे (किमान मागल्या पिढीपर्यंत तरी) असे काही श्लोक हे सर्वांच्या श्रीमुखी रुळवलेले आहेत... 

ते म्हणजे *वदनी कवल घेता* ...


मंत्र किंवा सिद्ध मंत्र हे अन्न निर्विष करण्यास समर्थ असतात. ✅️


निर्विष याचा अर्थ प्रत्येक वेळेला अन्नात विष कालवलेले असते ...असा न घेता 

कोणतेही आरोग्य-हानीकारक/ शरीर बाधाकारक घटक किंवा परिणाम त्या अन्नामध्ये असू शकतील, तर त्याचे निवारण हे प्रार्थनेच्या / सिद्धमंत्रांच्या आणि स्वतःच्या शुभ संकल्पा द्वारे व्हावे, या अर्थाने *नैवेद्य हा विधी उपयोगी व हितकारक आहे*.


कोणते अन्नपदार्थ कोणत्या प्रकारच्या पात्रात भांड्यात वाढावेत? 


चला, काही माहीत नसलेल्या गोष्टी समजून घेऊया ...


साजूक तूप हे काळ्या लोखंडाच्या भांड्यात वाढावे.

(खरंतर अन्नपदार्थ काशाच्या भांड्यात सर्वोत्तम मानले जातात पण साजूक तूप आणि काशाचं भांड हे विरुद्धान्न आहे, 10 दिवसानंतर)


पेज, मांसाचा रस्सा soup, सर्व द्रव = पातळ पदार्थ /पिण्याजोगे पदार्थ हे चांदीच्या भांड्यात वाढावेत.

पेशवाई थाटात चांदीच्या ताटात ... अशी लोकप्रिय जाहिरात असली तरी, प्रत्यक्षात चांदीच्या भांड्यामध्ये पातळ पदार्थ वाढावेत.


फळे किंवा फळांच्या कापलेल्या फोडी आणि सर्व भक्ष्य म्हणजे दाताने तोडून खाण्याचे पदार्थ (जसे की लाडू चकली हे) पानावरती वाढावेत म्हणजे पत्रावळ किंवा केळीचे पान याच्यावरती.


पूर्णतः कोरडे पदार्थ (जसे की चिवडा) आणि चाटून खाण्याचे पदार्थ (जसे श्रीखंड), हे सोन्याच्या भांड्यात वाटी / बाऊलमध्ये वाढावेत. 🙂😇🙃


ताका सारखे आंबट पदार्थ आणि फळांचे रस हे दगडी पात्रामध्ये वाढावेत.


ऋतुमानानुसार थंडगार पाणी किंवा उकळून गार केलेले पाणी तांब्याच्या भांड्यात वाढावे.


पन्हे आणि मद्य यासारख्या आंबट बाबी मातीच्या भांड्यात वाढाव्यात. 


मद्य हे अन्न आहे ✅️ ... पण त्यामध्ये चे स्वरूप प्रमाण आणि वारंवारिता ही आरोग्य शास्त्राप्रमाणे असेल तरच!!! 


अन्यथा मद्यच काय ... तर प्रतिदिनी खाल्ले जाणारे सवयीचे अन्न सुद्धा विषच आहे, जर त्या अन्नाचे प्रमाण स्वरूप आणि वारंवारिता (फ्रिक्वेन्सी अँड क्वांटिटी) ही चुकीची असेल तर ...


कोणीही सर्वसामान्य माणूस दोन-तीन पोळ्या खातो, एक दीड वाटी भात खातो, एखादी वाटी आमटी वरण भाजी खातो ...

परंतु तेच जर 10-20 पोळ्या, पाच सहा वाटी भात, चार-पाच वाटी वरण आमटी भाजी खाल्ली ...

तर तेच अन्न हे त्याच्या प्रमाण किंवा फ्रिक्वेन्सी मुळे आरोग्यास हानिकारक ठरू शकते.


मद्य हे अन्न आहे ... पण त्यासाठी तिथले ऋतुमान आणि तिथला भौगोलिक प्रदेश हा मद्य सेवनासाठी आरोग्य शास्त्रदृष्ट्या अनुकूल असायला हवा ... तरच हे विधान योग्य आहे.


अन्यथा... *मद्यम् न पेयम्* हेच सत्य आहे!!!


याव्यतिरिक्त इतर सर्व विविध प्रकारचे अन्नपदार्थ काचेच्या स्फटिकाच्या रत्नांच्या पासून बनवलेल्या पात्रात वाढावेत.


आजकालचे व्यवहार पाहता ...

कुठलीही चवीच्या अन्नपदार्थाचा परिणाम पात्राच्या/भांड्याच्या घटकावर (मटेरिअलवर) होणार नाही किंवा पात्राच्या घटकाचा दुष्परिणाम अन्नपदार्थावर होणार नाही, या दृष्टीने निष्क्रिय किंवा इनर्ट अशा प्रकारच्या पात्रांमध्ये अन्न वाढणे, हे आरोग्यास हितकारक असते.


म्हणून आज एसएस स्टेनलेस स्टील किंवा चिनीमातीची भांडी क्रोकरी काचेचा डिनर सेट असे ज्याला म्हणतात, त्यात अन्नपदार्थ वाढणे, हे सर्वात चांगले!!!


किंबहुना, धातूच्या भांड्यात अन्न शिजवून तयार झाल्यानंतर, ते वाढण्यापूर्वी साठवण्यासाठी व जेवण झाल्यानंतर शिल्लक राहिलेले अन्न ठेवण्यासाठी म्हणून सुद्धा, काचेच्या / चिनी मातीच्या भांड्यांचा वापर करणे, हे योग्य आहे.

कारण त्या भांड्यांचा अन्नावर किंवा अन्नाचा त्या भांड्यांवर कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम /रासायनिक प्रक्रिया /केमिकल रिॲक्शन संभवत नाही.


*परंतु आजकाल जे डिस्पोजेबल कंटेनर वापरले जातात, जे प्रायः पारदर्शक अर्ध पारदर्शक किंवा अपारदर्शक अशा पांढऱ्या किंवा काळ्या रंगाच्या प्लास्टिकचे असतात ... ते मात्र निश्चितपणे निषिद्ध वर्ज्य त्याज्य आहे*


मागील पिढीपर्यंत पंक्तीचे/पंगतीचे किंवा निमंत्रित भोजनाचे, यजमानाचे, जेवायला बोलावलेले मेहूण जेवायला बसताना ...

त्यांचे ताट वाढण्याची एक विशिष्ट पद्धत, क्रम आणि स्थाननिवेश हा ठरलेला होता... तो पाळला जायचा!!! 


आता मात्र कुठेही काहीही वाढले जाते / किंवा बुफे मध्ये स्वतःच वाढून घेतले जाते आणि ते कशानेही खाल्ले जाते. असो.


कोठे काय वाढावे ?

याचे संहितेतील मार्गदर्शन पाहूया 


ताट हे पुरेसे विस्तीर्ण मोठे असावे.


त्यामध्ये जे मुख्य अन्न आहे ते म्हणजे वरण-भात/ पोळी चपाती भाकरी हे अगदी समोर/जवळ ... 

म्हणजे गोल ताट हे घड्याळ आहे, असे समजले तर ... सहा वाजता मुख्य अन्नपदार्थ वाढलेले असावेत. 🕕


फळे, दाताने चावून खाण्याचे तोडून खाण्याचे पदार्थ आणि कोरडे पदार्थ हे उजव्या बाजूला म्हणजे घड्याळाच्या नुसार एक ते पाच या भागात वाढलेले असतात 🕐🕔


पाणी दूध इत्यादी सर्व प्रकारचे पातळ द्रव पदार्थ हे डाव्या बाजूला म्हणजे साधारणतः सात ते अकरा या भागात वाढलेले असावे 🕖🕚


मुख्य अन्नपदार्थांच्या वरती साधारण ताटाच्या मधोमध ते बारा वाजता 🕛एवढ्या भागामध्ये ... इतर सर्व पदार्थ वाढावेत.


ताटातील अन्नपदार्थांच्या स्थाना विषयी सांगताना, घड्याळातील अंकांचा संकेत वरती सांगितला.


म्हणून या प्रसंगानुसार, जाता जाता ... 

हेही सांगणे उपयोगी होईल की ...

अंध व्यक्ती आपल्या सोबत जेवायला असेल तर,

त्या व्यक्तीला अन्नपदार्थ कुठे आहे, हे सांगताना पुढे मागे उजवीकडे डावीकडे खाली वर असे *आपल्या संदर्भात न सांगता* ...

जेवणाऱ्या अंध व्यक्तीच्या संदर्भाने ...

ताटामध्ये *"घड्याळाच्या अंका नुसार"* कोणता पदार्थ कोठे आहे, 🕐🕔🕚🕕🕖🕛 हे सांगावे ...

ते त्यांना अतिशय सोपे होते ✅️ 🫱🏻‍🫲🏽


*देहवाक्चेतसां चेष्टाः प्राक् श्रमाद्विनिवर्तयेत्।* 

आणि

*न पीडयेत् इंद्रियाणि*

हे दोन्ही श्लोक आपण एकत्र पहात आहोत.


_(डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.)_


त्वदीय वस्तु गोविंद 

तुभ्यम् एव समर्पये ।


तेरा तुझको अर्पण

क्या लागे मेरा ।


श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु।


🙏🏼

सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved

Copyright कॉपीराइट ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

MhetreAyurved@gmail.com 

www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/


प्रीपेड मोबाईलचा रिचार्ज = जितनी चाबी भरी राम ने , उतना चले खिलौना !

प्रीपेड मोबाईलचा रिचार्ज = जितनी चाबी भरी राम ने , उतना चले खिलौना !


*अष्टांगहृदय सद्वृत्त : भाग 175*

 8 मार्च 2024, शुक्रवार

*उपविभाग 120* 


सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved

Copyright कॉपीराइट ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

MhetreAyurved@gmail.com 

www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/



इंद्रिय 

कर्मेंद्रिय 

गुद 

उपस्थ 

या अनुषंगाने ...


आधी 

अधोवात/farting

उद्गार ढेकर belching 

पुरीष शौचानंद bowels

मूत्र urine 

शुक्र

निद्रा 

रज पाळी मेन्सेस गर्भ स्तन्य=मातृदुग्ध

स्वेद 

असे विषय आपण आतापर्यंत सविस्तर पाहून झालेले आहेत. आता *वेग* या संकल्पनेतील पुढील विषय, क्रमशः , यथा शक्य ... *न अतिसंक्षेप न अतिविस्तर* ... या पद्धतीने पाहूया.


आयुर्वेद शास्त्रात उल्लेख केलेल्या 14 वेगांपैकी वरील वेगांचे आपण माहिती घेतली.

आता, उर्वरित वेग म्हणजे ...

क्षवथु= शिंक, तृष्णा= तहान, क्षुधा= भूक, कास= खोकला, श्रमश्‍वास= थकल्यानंतरचा सुस्कारा, जृम्भा = जांभई, अश्रू आणि छर्दि= उलटी ... 

या वेगांची माहिती क्रमशः पाहूया.


प्रीपेड मोबाईल ही पद्धत म्हणजे आधी पैसे भरा आणि मग वापरा जितके पैसे भरलेत तितक्या मूल्याच्या विनियोगापर्यंत वापर करता येईल किंवा पैसे द्या टोकन घ्या मगच तुम्हाला हवी ती डिश पदार्थ मिळेल अशी व्यवस्था असते 

म्हणजे एका जुन्या लोकप्रिय गाण्यामध्ये ...

जितनी चाबी भरी राम ने , उतना चले खिलौना !


प्रीपेड मोबाईलचा रिचार्ज संपत आला की, पुन्हा पुढील रिचार्ज करा यासाठीचा रिमाइंडर एसएमएस किंवा फोन या पद्धतीने येतो.


हीच व्यवस्था म्हणजे जीवनात निसर्गतःच आहे. 


शरीरातील ऊर्जा शक्ती सामर्थ्य म्हणजे आजच्या भाषेत एनर्जी संपत आली की त्याचं एक रिमाइंडर येतं, त्यालाच आपण भूक असे म्हणतो ... ज्याला आयुर्वेदात संस्कृत भाषेत क्षुधा, असा शब्द आहे.


बुभुक्षा म्हणजे भोक्तुम इच्छा ... खाण्याची इच्छा अर्थात भूक


जसे पाणी पिण्याची इच्छा, पातुम् इच्छा म्हणजे पिपासा = तृष्णा म्हणजे तहान शरीरात पाण्याचा अंश कमी पडायला लागला की पाणी पिण्याची इच्छा म्हणजे तहान ... तसे शरीरात इंधन शक्ती सामर्थ्य कमी पडू लागले की ते घेण्याची इच्छा म्हणजेच इंधन अर्थात अन्न घेण्याची इच्छा म्हणजे भोक्तुम् इच्छा म्हणजे बुभुक्षा = क्षुधा म्हणजे भूक!


*प्राणाः प्राणभृतामन्नमन्नं लोकोऽभिधावति ।*


अन्न हेच सर्व सजीवांचा प्राण आहे. सर्व जग हे अन्नाच्या मागेच पळत असते अन्न मिळवण्यासाठीच सर्व प्रयत्न करत असते. अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविची जगदीशा पापी पेट का सवाल है


*वर्णः प्रसादः सौस्वर्यं जीवितं प्रतिभा सुखम् ॥*

*तुष्टिः पुष्टिर्बलं मेधा सर्वमन्ने प्रतिष्ठितम् ।*


आपल्या शरीराचा रंग तजेला तेज आपली प्रसन्नता आपला आवाज खणखणीत असणं आपलं सर्व आयुष्य आपले बुद्धी आपलं सुख आपलं तृप्त असणं आपलं पुष्ट होणं पोषण होणं शरीराची वाढ होणं आपलं सामर्थ्य आणि आपली समजूत आकलन शक्ती ... हे सर्व काही अन्नावरच अवलंबून आधारित आहे


*लौकिकं कर्म यद्वृत्तौ स्वर्गतौ यच्च वैदिकम् ॥*


वृत्तीकारक म्हणजे या जगामध्ये जगण्यासाठी जिवंत राहण्यासाठी अस्तित्वासाठी सर्वांसाठी जी लौकिक व्यावहारिक काम करायची आहेत ती आणि जी स्वर्ग प्राप्तीसाठी अलौकिक लाभासाठी जे वेदोक्त कर्म करायचे आहेत, ती करण्यासाठीच सामर्थ्य सुद्धा अन्नावरच अवलंबून आहे


*कर्मापवर्गे यच्चोक्तं तच्चाप्यन्ने प्रतिष्ठितम् ।*


इतकंच काय तर मुक्तीसाठी करावयाचे कर्म सुद्धा अन्नावरतीच अवलंबून आहे ...


अशी अन्नाची प्रशस्ती स्तुती चरकाचार्य करतात.


इच्छा कितीही असली म्हणून, केव्हाही कितीही काहीही खाल्लं , तरी ते शरीरात स्वीकारलं जातच , असं नाही ... कारण खाल्लेलं म्हणजे मुखावाटे पोटात नेऊन ठेवलेलं अन्न, पचलं तरच ते शरीरात स्वीकारले जातं.


थोडक्यात अन्न खाण्याची इच्छा आणि अन्न पचवण्याची क्षमता, या दोन वेगळ्या बाबी आहेत.


क्षुधा आणि अग्नि हे वेगळे विषय आहेत.


क्षुधा ही इच्छा आहे, तर अग्नि ही क्षमता शक्ती सामर्थ्य होय.


आयुर्वर्णो बलं स्वास्थ्यमुत्साहोपचयौ प्रभा ।

ओजस्तेजोऽग्नयः प्राणाश्चोक्ता देहाग्निहेतुकाः ॥३॥


म्हणून जरी वरील श्लोकांमध्ये अन्नाची कितीही प्रशस्ती वर्णन केलेली असली तरीही ... प्रत्यक्षात जीवन वर्ण तेज सामर्थ्य आरोग्य उत्साह शरीराची वाढ किंवा शरीराचे टिकणं तेज ओज आणि साक्षात जिवंत असणं प्राण हे अग्निवरतीच अवलंबून आहेत, ही वस्तुस्थिती आहे


शान्तेऽग्नौ म्रियते, युक्ते चिरं जीवत्यनामयः ।

रोगी स्याद्विकृते, मूलमग्निस्तस्मान्निरुच्यते ॥


पचनशक्ती म्हणजे अग्नि शांत होणे म्हणजे साक्षात मरण होय. जीवन थांबणे म्हणजे अग्नि नष्ट होणे. जोपर्यंत अग्नि हा युक्त म्हणजे योग्य प्रकारे काम करतो आहे, तोपर्यंत मनुष्याला आरोग्य संपन्न दीर्घ आयुष्याची प्राप्ती शक्य आहे. अग्नि विकृत झाला बिघडला योग्य प्रकारे काम करेनासा झाला, तर माणसाला विविध रोग होतात. म्हणून क्षुधा किंवा अन्न याहीपेक्षा अग्नि हे जीवनाचे मूल अधिष्ठान आहे.


क्षुधा म्हणजे खाण्याची इच्छा असे म्हटले की , पुढील काही प्रश्न हे अगदीच स्वाभाविक आहेत ...

काय खावे 

कधी खावे 

किती खावे 

कसे खावे


आणि या सकारात्मक प्रश्नांच्या बरोबरीनेच ...


काय खाऊ नये 

कधी खाऊ नये 

किती खाऊ नये

आणि कसे खाऊ नये 


अशा दुसऱ्या बाजूचा नकारात्मक प्रश्नांचीही उत्तरे माहिती असायला हवीत


क्षुधा हा एक वेग आहे ... म्हणजे अन्न शरीरात घेण्याची इच्छा आहे, ती एक गती आहे. ही अंतर्गामी गती आहे. 


आतापर्यंत पाहिलेले वात मूत्र पुरुष रज स्तन्य गर्भ शुक्र स्वेद हे शरीरातून बाहेर जाणारे भाव पदार्थ आहेत म्हणजेच हे वेग बहिर्गामी आहेत.


क्षुधा हा मात्र अंतर्गामी = शरीराच्या आत भाव पदार्थ घेण्याची स्वीकारण्याची इच्छा असणारा वेग आहे.


वेग म्हटले की त्याचे *धारण आणि उदीरण* अशा दोन्ही गोष्टी पाहणे आवश्यक आहे.


क्षुधा या वेगाचे धारण म्हणजे भूक लागलेली असून सुद्धा, न खाणे = उपास उपवास उपोषण करणे, लंघन करणे


आणि क्षुधा या वेगाचे उदीरण म्हणजे भूक लागलेली नसताना सुद्धा खाणे ... अनावश्यक खाणे , दिसलं म्हणून खाणे , आहे म्हणून खाणे , वेळ झालीये म्हणून खाणे , लोभ मोह यावर नियंत्रण ठेवता येत नाही म्हणून खाणे , धीर संयम पेशंस नाही म्हणून खाणे, अज्ञानापोटी खाणे, देवाने तोंड दिलंय म्हणून खाणे, गिळणे चरत राहणे हादडणे कोंबणे ठूंसना ... असे अनेक प्रकार क्षुधा या वेगाच्या *उदीरण* या बाजूस संभवतात.


वरील सर्व बाबी समाधानकारक विस्ताराने पुढील भागात पाहूया


*देहवाक्चेतसां चेष्टाः प्राक् श्रमाद्विनिवर्तयेत्।* 

आणि

*न पीडयेत् इंद्रियाणि*

हे दोन्ही श्लोक आपण एकत्र पहात आहोत.


_(डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.)_


त्वदीय वस्तु गोविंद 

तुभ्यम् एव समर्पये ।


तेरा तुझको अर्पण

क्या लागे मेरा ।


श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु।


🙏🏼

सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved

Copyright कॉपीराइट ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

MhetreAyurved@gmail.com 

www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/


पचनशक्ती अन्नग्रहणक्षमता अग्नि भूक क्षुधा

 पचनशक्ती अन्नग्रहणक्षमता अग्नि भूक क्षुधा


*अष्टांगहृदय सद्वृत्त : भाग 176*

 13 मार्च 2024, बुधवार 

*उपविभाग 121* 


सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved

Copyright कॉपीराइट ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

MhetreAyurved@gmail.com 

www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/


क्षुधा = भूक हा एक वेग आहे ... म्हणजे ती एक गती आहे. ही अंतर्गामी गती आहे. क्षुधा हा अंतर्गामी = शरीराच्या आत भाव पदार्थ घेण्याची स्वीकारण्याची इच्छा असणारा वेग आहे. अन्न शरीरात घेण्याची इच्छा आहे,


वेग म्हटले की त्याचे *धारण आणि उदीरण* , अशा दोन्ही गोष्टी पाहणे आवश्यक आहे.


क्षुधा या वेगाचे धारण म्हणजे *भूक लागलेली असून सुद्धा, न खाणे* = उपास उपवास उपोषण करणे, लंघन करणे


अतृणे पतितो वह्नि: स्वमेव उपशाम्यति, असे म्हटले जाते.

म्हणजे एखादी गोष्ट निश्चितपणे मिळणारच नाही , असे असले की , त्याविषयीची इच्छा नष्ट होते.

मराठीत कोल्ह्याला द्राक्ष आंबट , अशी म्हण आहे त्याप्रमाणे.

यालाच अनासक्ती विरक्ती इत्यादि आध्यात्मिक मोक्षमार्गातील साधने असे म्हणतात. म्हणजे इतके वैराग्य आले पाहिजे , की त्याविषयीची लालसा अपेक्षा इच्छा ही मरून जाते.


दुसरा एक प्रकार असतो की ज्या गोष्टीची इच्छा कामना लालसा आहे, ती प्राप्त झाली की त्याविषयीची ती उत्सुकता इच्छा हे आपोआपच नष्ट होते. याला संभोगातून समाधी = इच्छा असलेल्या गोष्टीचा योग्य तितका भोग उपयोग करून झाला, की त्याबाबतची इच्छा/ त्यात असलेला रस = इंटरेस्ट हा नष्ट होतो ... अशी सकारात्मक मार्गाने जाणारी मुक्ती, ही वैराग्य अनासक्ती विरक्ती यापेक्षा , सोपी प्रॅक्टिकल सत्य निखळ आणि मुख्य म्हणजे ढोंगी नसलेली , ओढून ताणून न आणलेली, (मन माझं त्यात ... मी नाही खात) असते. असो. परंतु हा आध्यात्मिक वैचारिक बौद्धिक भावनिक असा भाग आहे...


शरीरात मात्र असे घडत नाही.

शरीरात जर भुकेच्या वेळेला अन्न मिळाले नाही किंवा घेतले नाही, तर त्याला आपण क्षुधावेगाचा अवरोध/ धारण असे म्हणतो.


त्याने काय होते??? तर काही मर्यादेपर्यंत त्याचे आरोग्यासाठी निश्चितपणे लाभच होतात !!!


आहारम् अग्निः पचति , दोषान् आहारवर्जितः। 

धातून् क्षीणेषु दोषेषु , जीवितं धातुसङ्क्षये॥


भुकेच्या वेळेला जर आहार मिळाला नाही/ घेतला नाही/ टाळला ... 

तर अग्नी शरीरातील शिल्लक दोषांचे पचन करतो.

हे शरीरातील आरोग्यासाठी चांगलेच असते.

याला आपण लंघन असा उपचार म्हणतो.


म्हणून आपल्याकडे सण संस्कृती रूढी परंपरा या निमित्ताने विशिष्ट कालावधीनंतर उपास करण्याची पद्धत आहे.


यामध्ये दर पंधरा दिवसांनी येणारी एकादशी, की ज्यामध्ये संपूर्ण 24 तास काहीही न खाता, दुसऱ्या दिवशी द्वादशीला उपास सोडतात.

काही उपास हे केवळ अन्न वर्ज्य असे असतात ... तर त्याहीपेक्षा अवघड म्हणजे काही उपास हे निर्जळी म्हणजे अन्नासोबतच जलपानही न करणे, इतके तीव्र असतात.

अशा लंघनाने उपासाने अनाहाराने ,

शरीरात शेष असलेले दोष हे अग्नी कडून पचवले जातात 

आणि ते आरोग्यासाठी हितकारक असते.


म्हणूनच एकादशी प्रमाणे केल्या जाणाऱ्या उपासाच्या मागे ऑटोफॅजी नावाचा जीवशास्त्रीय सिद्धांत आहे, असे सिद्ध करणाऱ्या शास्त्रज्ञाला, नोबेल पारितोषिक मिळाले.


परंतु हितकारक आरोग्यदायक मर्यादे पलीकडे अन्न सेवन करण्याचे टाळले... उपास सुरूच ठेवला... भूक लागलेली असूनही, अन्न सेवन केले नाही किंवा मिळाले नाही तर ...

दोष पचनानंतर शरीरातील धातू घटक अग्नी कडून पचवले जातात.

कारण अन्नाच्या अनुपस्थित शरीर व्यापार चालवण्यासाठी लागणारी ऊर्जा ही सुरुवातीला जशी दोष पचनातून मिळवलेली असते, तशी ती त्यानंतर शरीरातील घटक म्हणजे धातू यांचे पचन= ब्रेकडाऊन करून मिळवली जाते. याही पुढे जर तसेच लंघन उपास अनाहार सुरूच ठेवले/ सुरूच राहिले तर मात्र ... दोष आणि धातू यांच्या पचनानंतर, ब्रेकडाऊन नंतर जीविताचे पचन होते अर्थात मृत्यू संभवतो.


आयुर्वेदशास्त्रात , क्षुधावरोध म्हणजे भूक लागलेली असताना न खाणे , या वेगधारणाची लक्षणे पुढील प्रमाणे दिली आहेत


अङ्गभङ्ग = अंग मोडून येणे शरीराला आवश्यक तेवढी ऊर्जा न मिळाल्याने कार्यक्षमता घटून सर्व अंग मोडकळीस आल्याप्रमाणे वाटते


अरुचि = सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अन्न न मिळाल्याने त्याच्या विषयीची रुची नष्ट होते


ग्लानि= आवश्यक ती ऊर्जा न मिळाल्याने अंग गळून जाते


कार्श्य= उपास केला असता काहीतरी संकट आले आहे, असे समजून इमर्जन्सी तातडी या दृष्टीने शरीर, साठलेली चरबी मेद फॅट यांचा उपयोग न करता, आधी शरीरातील मांस धातू मोडून खाते, ब्रेकडाऊन करून त्याचा उपयोग करते.

यामुळे मसल वेस्टींग / प्रोटीन लॉस / मांस क्षय बल क्षय होतो ...

म्हणूनच प्रायः डायबिटीस चे जे पेशंट असतात, त्यांच्यामध्ये शरीरात शुगर स्वरूपात ऊर्जा एनर्जी उपस्थित असूनही, ती शरीराला म्हणजेच शरीर ज्यापासून निर्माण होते, त्या बिल्डिंग मटेरियल ला म्हणजेच मसल्सना योग्य तो पोषण पुरवठा न झाल्याने, ते मसल /मांस /प्रोटीन मोडून खाणे, अशी प्रक्रिया घडते. त्यामुळे डायबिटीसचे पेशंट हे हात पाय पोटऱ्या मांड्या या बारीक कृश किडकिडीत ... आणि जिथे मेदाचा साठा आहे, ते पोट मात्र सुटलेले / ढेरी असलेले अशी विचित्र परिस्थिती दिसते.

दीर्घकालीन संकटासाठी मेदाचा साठा हा सुरक्षित करून ठेवलेला असतो. त्यामुळे तात्पुरत्या होणाऱ्या उपासासाठी हा मेद वापरला जात नाही. त्यामुळे ढेरी तशीच राहते आणि मांस /मसल हे मोडून खाल्ल्यामुळे हातापायांच्या मात्र काड्या होतात.


शूल = ज्या ठिकाणी अन्नपचन व्हावयाचे आहे, तेथे अग्नीची उपस्थिती असते. ती प्रत्यक्ष ज्वाला फ्लेम अशा स्वरूपात नसून, ती द्रव स्वरूपातील / लिक्विड स्वरूपातील , अत्यंत तीव्र संहतीचे /कॉन्सन्ट्रेशनचे पाचक स्राव (दोन पीएच असलेले एच सी एल हायड्रोक्लोरिक ऍसिड) असते आणि हे जाळून टाकणारे करोजिव्ह असल्यामुळे , अन्न नसल्यास आमाशयाची अंतस्त्वचा ही होरपळून निघाल्याने, भुकेचा अवरोध सातत्याने केला असता, तेथे शूल = वेदना होऊ शकतात.


भ्रम = पुरेशी ऊर्जा एनर्जी न मिळाल्यामुळे , उत्तमांग म्हणजे जिथे इंद्रिये आहेत, अशा शिरःप्रदेशी पोषण न लाभल्याने , चक्कर येणे असे होऊ शकते.


या व्यतिरिक्त एक विशेष लक्षण म्हणजे दीर्घकालीन/पुनःपुनः वारंवार , भूक अवरोध = क्षुधावेगाचे धारण = अन्नाचा/ आहाराचा अभाव, असे असल्यास ...

*दृष्टीची क्षमता क्षीण होत जाते* !


यावरून ... ज्यांच्या दिनक्रमा मध्ये / रुटीनमध्ये, दोन जेवणांमध्ये खूप अधिक अंतर आहे अशा व्यक्तींनी आपल्या दृष्टीक्षमतेच्या क्षीण होण्याचे कारण , आपल्या आहारातील चुकीच्या वेळा हे आहे का , असे तपासून पाहणे आवश्यक आहे.


कामाच्या गडबडीत वेळच मिळत नाही हो ... असे सांगणाऱ्या गृहिणी / कामगार , प्रवासात असणारे लोक, क्लास शाळा छंद वर्ग ग्राउंड या दुष्टचक्रात अडकलेली शाळकरी मुले , डेडलाईन किंवा वर्कलोड यामुळे खाणं टाळणारे आयटी किंवा तत्सम सेडेंटरी जॉब टेबल वर्क मधले कर्मचारी ... 

या सर्वांच्या, भुकेच्या वेळी अन्न न मिळणे किंवा अन्न खाणे टाळणे अशा स्थितीमुळे, त्यांच्या दृष्टिक्षमते वरती घातक परिणाम होणे शक्य आहे , याची जाणीव ठेवून ...

योग्य त्यावेळी भूक लागलेली असताना, घन solid अन्नपदार्थ खावेत.

याचाच अर्थ , भुकेच्या वेळेला चहा कॉफी मिल्कशेक ज्यूस पाणी अशा द्रव liquid आहाराचे सेवन करू नये.


काम हे महत्त्वाचे आहेच ...

परंतु , *माझ्यासाठी काम आहे ... मी कामासाठी नाही* ; हा साध्य साधन विवेक जागा ठेवणे आवश्यक आहे.

जॉब इज फॉर मी ... आय एम नॉट फॉर जॉब ;

ही प्रेफरेन्शियल ऑर्डर विसरून चालणार नाही.


*देहवाक्चेतसां चेष्टाः प्राक् श्रमाद्विनिवर्तयेत्।* 

आणि

*न पीडयेत् इंद्रियाणि*

हे दोन्ही श्लोक आपण एकत्र पहात आहोत.


_(डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.)_


त्वदीय वस्तु गोविंद 

तुभ्यम् एव समर्पये ।


तेरा तुझको अर्पण

क्या लागे मेरा ।


श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु।


🙏🏼

सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved

Copyright कॉपीराइट ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

MhetreAyurved@gmail.com 

www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/


काय कधी किती कसे खावे? / खाऊ नये?

 काय कधी किती कसे खावे? / खाऊ नये? 


*अष्टांगहृदय सद्वृत्त : भाग 177*

 05 जून 2024, बुधवार 

*उपविभाग 122* 


सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved

Copyright कॉपीराइट ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

MhetreAyurved@gmail.com 

www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/


क्षुधा म्हणजे खाण्याची इच्छा म्हणजेच भूक ... असे म्हटले की , पुढील काही प्रश्न हे अगदीच स्वाभाविक आहेत ...

काय खावे 

कधी खावे 

किती खावे 

कसे खावे


आणि या सकारात्मक प्रश्नांच्या बरोबरीनेच ...


काय खाऊ नये 

कधी खाऊ नये 

किती खाऊ नये

आणि कसे खाऊ नये 


अशा दुसऱ्या बाजूचा नकारात्मक प्रश्नांचीही उत्तरे माहिती असायला हवीत


तत्राप्तैर्गुणसम्पन्नं 1 ... 

भक्ष्यमन्नं सुसंस्कृतम् । 2 ...

शुचौ देशे 3 ...

सुसङ्गुप्तं 4... समुपस्थापयेद्


महानस म्हणजे स्वयंपाक घर म्हणजे आजच्या भाषेत किचन हे शुचि म्हणजे स्वच्छ आणि पवित्र मंगल असायला हवं. याचाच अर्थ किचनमध्ये जाताना आपले कपडे हे धुतलेले कोरडे स्वच्छ असायला हवेत. झोपताना घातलेला गाऊन घालून किंवा बाहेरून घालून आलेला ड्रेस तसाच घेऊन, किचनमध्ये वावरू नये, हे घरच्या गृहिणीला आणि बाहेरून येणाऱ्या घरातील सर्व मंडळींना सांगणे आणि त्यांनी ते पाळणे आवश्यक आहे.

बाहेरचे शूज चप्पल घालून किचनमध्ये येणं सर्वत्र व वर्ज्य मानावे.


प्रत्येक गोष्ट ही इन्फेक्शन क्लिनलिनेस याच्याशी संबंधित असते, असे नसून ...

कधी कधी त्याच्या बरोबरीने आज आपला विश्वास बसत नसला तरी, काही अलौकिक अवांछित अपवित्र अमंगल बाबी आपल्या घरात कुटुंबात विचारात घुसू शकतात !


नलराजा हा अत्यंत सदाचारी होता. कलीला नल राजाच्या शरीरात प्रवेश करायचं होता ... परंतु नलराजाकडून कोणतीही आचारातील चूक होत नव्हती. त्यामुळे नलराजाच्या शरीरात कली प्रवेश करू शकत नव्हता. एके दिवशी घाईघाईत नलराजा हातपाय न धुता, तसाच संध्यावंदन या पूजा कर्मासाठी बसला आणि "नेमका तोच दुर्दैवी क्षण साधून" कलीने त्याच्या शरीरात प्रवेश केला आणि ...

पुढची नलदमयंतीची फरपट आपल्या पिढीला कहाणी म्हणून माहित आहे. आता हल्लीच्या पिढीला नलदमयंती हरिश्चंद्र तारामती शिबिराजा विक्रमादित्य हे अज्ञात आहेत, हे त्या पिढीचे दुर्दैव आणि आपली पिढी या बाबी नव्या पिढीपर्यंत पोहोचवू शकली नाही, हा आपला करंटेपणा !! असो. 

महानस = स्वयंपाक घर म्हणजे किचन इथे आप्त लोक असावेत.

आप्त याचा अर्थ केवळ नातेवाईक असा नसून, ज्यांच्यावर आपण विश्वास भरवसा ट्रस्ट ठेवू शकतो, अशाच व्यक्ती तिथे असाव्यात.

आज बाहेरून पोळ्या करण्यासाठी स्वयंपाक करण्यासाठी धुणं भांडी फरशी करण्यासाठी येणारी घरातील मोलकरीण कामवाली बाई मेड यांच्या बाबतीत ही काळजी घेणे आवश्यक आहे.

अति चिकित्सक नसलं, तरी सावधगिरी बाळगणं, हे निश्चितपणे हितकारक आहे.


शुचि याचा अर्थ स्वच्छता असाही होतोच. त्यामुळे वारंवार हॉटेलमध्ये खायला जाणं, हे टाळावं ...

कारण तिथल्या किचनमध्ये सर्वच गोष्टी ह्या अनिर्वचनीय म्हणजे ज्याच्या विषयी बोलू नये, अशा असतात. तिथे वावरणारी शेफ आणि अन्य माणसं ही आप्त नसतात म्हणजे विश्वास ठेवण्याच्या योग्यतेचे नसतात. तिथे "पडलेले" अन्नपदार्थ भाज्या यांच्या स्वच्छतेविषयी सुरक्षिततेविषयी जितक्या शंका घ्याव्यात, तितक्या कमीच! त्याचप्रमाणे तिथं झुरळ पाल उंदीर यांचा मुक्त वावर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण तिथले अन्नपदार्थ सुरक्षित आणि पवित्र रहावे, अशी कोणा एकाचीही जबाबदारी नसते. कारण ते सगळेच पैशासाठी काम करत असतात. असे म्हटले जाते की कितीही उच्च प्रतीचे हॉटेल असले, तरी ते घरचे स्वयंपाक घर नसते, हे लक्षात ठेवा. जसे हॉटेलमध्ये जाऊन जेवणे, याला वरील मुद्दे लागू आहेत ... तसेच ऑनलाइन सर्विस द्वारे घरपोच डिलिव्हरी मागवणे हे अजूनच त्याज्य आहे, कारण ते अन्न , "हॉटेल ते घर" असे कुठून कुठून, उघड्यावर, रस्त्यावरून "मिरवत फिरवत" आणले जाते. त्यासाठी वापरले जाणारे पॅकिंगचे साहित्य / पॅकिंग करणारे हात / पॅक केलेले पार्सल ठेवलेली पिशवी / येणारा माणूस ... यांची "स्वच्छता आणि शुचिता" याबाबत कोणतीच शाश्वती देता येत नसते.


आपण घरच्या स्वयंपाक घरात तयार केलेले अन्न, हे आपण स्वच्छ ताटामध्ये व्यवस्थित मांडून, ते देवाला नैवेद्य दाखवतो ...

आणि मगच सेवन करत असतो!

तसे हॉटेल किंवा ऑनलाईन फूड डिलिव्हरी याबाबत होत नाही. नैवेद्य याचा अर्थ निवेदन. वेदन याचा अर्थ जाणीव! नि याचा अर्थ निश्चित. देवाला निश्चितपणे आपण काय खातो आहे, याची जाणीव करून देऊन, देवाशी ते संवादात्मक शैलीत बोलून, देवाच्या साक्षीने आशीर्वादाने अनुमतीने, आपण अन्न सेवन करतो...

म्हणून समर्थ रामदास, "उदरभरण नोहे, जाणिजे यज्ञ कर्म" असं म्हणतात ...

आणि त्या अन्नाला "पूर्णब्रह्म" असे नाव आहे.

व्यंकटेश स्तोत्र मध्ये "अन्नासाठी दाही दिशा, आम्हा फिरवीशी जगदीशा" अशी करुणामय आळवणी केलेली आहे.

त्यामुळे ज्या अन्नामुळे आपलं जीवित्व चालतं, "जीवन करी जीवित्वा" ... त्या अन्नाच्या बाबतीत, आपल्याला अत्यंत आदर असला पाहिजे.

हॉटेल किंवा ऑनलाईन फूड डिलिव्हरी यामध्ये,

अन्नाची हेळसांड विटंबना अवहेलना होते, हे विसरू नये...

आणि म्हणूनच पूर्वीच्या काळी चुलीजवळ जाताना स्नान केल्याशिवाय स्वयंपाक घरात प्रवेश करत नसत.


*देहवाक्चेतसां चेष्टाः प्राक् श्रमाद्विनिवर्तयेत्।* 

आणि

*न पीडयेत् इंद्रियाणि*

हे दोन्ही श्लोक आपण एकत्र पहात आहोत.


_(डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.)_


त्वदीय वस्तु गोविंद 

तुभ्यम् एव समर्पये ।


तेरा तुझको अर्पण

क्या लागे मेरा ।


श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु।


🙏🏼

सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved

Copyright कॉपीराइट ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

MhetreAyurved@gmail.com 

www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/


शुचि सुसंस्कृत गुप्त अन्न म्हणजे काय?

 शुचि सुसंस्कृत गुप्त अन्न म्हणजे काय?


*अष्टांगहृदय सद्वृत्त : भाग 178*

 06 जून 2024, गुरुवार 

*उपविभाग 122* 


सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved

Copyright कॉपीराइट © लेखक : वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

MhetreAyurved@gmail.com 

www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/


वस्तुतः हा पुढे दिलेला श्लोक राजासाठी आलेला आहे. संपूर्ण आयुर्वेद संहिता याच मुळात *'राजा'* यालाच समोर ठेवून लिहिलेल्या आहेत.

तत्राप्तैर्गुणसम्पन्नं 1 ... भक्ष्यमन्नं सुसंस्कृतम् । 2 ...

शुचौ देशे 3 ... सुसङ्गुप्तं 4... समुपस्थापयेद्

परंतु आपल्या जीवनात आपल्या घरात आपल्या कार्यक्षेत्रात आपणही आपल्यासाठी स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी आपल्यावर अवलंबून असलेल्या अन्य स्टाफ साठी एका अर्थाने, आंशिक स्वरूपात का होईना, पण राजा / स्वामी आहोतच !

जसे हे सद्वृत्त म्हणजेच सदाचरण म्हणजे चांगले वागणे = गुड बिहेवियर ह्या उपक्रमात लिहिताना आपण सुरुवातीलाच पाहिले की, सद्वृत्त = सदाचरण याचा अर्थ "केवळ दुसऱ्याशी चांगले वागणे" असा होतो त्याचप्रमाणे "माणसाने स्वतःशी सुद्धा चांगलं वागणे" असाही होतोच!! 

आपल्या जीवनाच्या सुरक्षित आणि आरोग्य संपन्न स्थितीसाठी, आपण आपल्याशी चांगलं वागणं, आपल्याशी आपला सदाचार असणं, हेही आवश्यक आहेच !

म्हणून जरी पुढील श्लोक हा तत्कालीन संहिताकारांनी तत्कालीन राजांसाठी लिहिलेला असला तरी ...

त्यातील उपदेश हा प्रत्येक माणसासाठी तितकाच हितकारक आहे हे निश्चित!!! ✅️


तत्राप्तैर्गुणसम्पन्नं 1 ... भक्ष्यमन्नं सुसंस्कृतम् । 2 ...

शुचौ देशे 3 ... सुसङ्गुप्तं 4... समुपस्थापयेद्


वरील चार मुद्द्यांपैकी आप्त व्यक्ती आपल्या स्वयंपाक घरात असाव्यात. याचाच अर्थ आप्त नसलेल्या म्हणजे अविश्वासार्ह व्यक्तींना थेट स्वयंपाक घरापर्यंत अधिकार/ प्रवेश हा शक्यतो टाळावा.


आता काही लोकांना मी सांगत असलेला पुढील प्रसंग हा अतिरेक वाटेल.

परंतु आज पासून 30-35 वर्षांपूर्वी मी मंगळवेढा येथे माझ्या एका मित्राच्या घरी सहज भेट द्यायला म्हणून गेलो होतो. सोबत आमचे अन्य एक सन्मित्र सुद्धा होते. तेथे गेल्यानंतर तहान लागली, म्हणून मोठ्या माणसाला पाणी आणा, असे सांगण्यापेक्षा समोर दिसत असलेल्या हंड्यातून मी ग्लासच्या सहाय्याने पाणी घेतले ... तर नंतर मला मित्र म्हणाला की "उगीचच स्वतः तू ते पाणी घेतलेस ... ते तू कुणाला तरी सांगायला हवे होतेस! *आता ते सर्व पाणी ओतून देणार आणि पुन्हा नव्याने भरणार!* 


इतकं शौच सोवळं हे त्या घरामध्ये पाळलं जात होतं. त्यामुळे इतक्या टोकाचे शौच/सोवळे आपल्याला पाळता येणार आहे की नाही, हे बाजूला ठेवलं...

तरीही निश्चितपणे खऱ्या अर्थाने स्वच्छता आणि शुचिता ही आपल्या आहाराच्या बाबतीत स्वयंपाक घरामध्ये आणि आपण खायला घेत असलेल्या अन्नाच्या बाबतीत पाळली जाते आहे का? याची स्वतःच खात्री करावी.

आपण ज्यांना ते अन्न खायला देतो, ते घरातले अन्य कुटुंबीय आणि अजाणती वाढत्या वयातली मुलं; यांच्यासाठी आपण देत असलेले अन्न, निश्चितपणे केवळ स्वच्छच नव्हे तर, ते सुरक्षित आणि मंगल / पवित्र आहे का? हे पाहणे घरातील कर्त्या पुरुषाचे आणि कर्त्या स्त्रीचे कर्तव्य आहे.

त्यामुळे किती वेळा घर सोडून हॉटेलमध्ये खायला जायचे आणि किती वेळा ऑनलाईन ऑर्डर करून बाहेरचे अन्न घरात खायला मागवायचे, याचे तारतरम्य बाळगले पाहिजे!


सुविधा उपलब्ध आहे म्हणजे ती आपण वापरलीच पाहिजे , असा त्याचा अर्थ निश्चितपणे होत नाही!!!


माझ्याकडे बाजलं आहे , म्हणून तुम्ही बाळंत व्हा ... तुम्ही गरोदर आहेत की नाही , याच्याशी काही घेणं देणं नाही !!!

अशी वृत्ती निश्चितपणे चुकीची आहे.


त्यामुळे अत्यंत निकड असल्याविना, विकतचे तयार अन्नपदार्थ हॉटेलवर जाऊन खाणे किंवा ऑनलाईन मागवणे, ह्या दोन्ही गोष्टी टाळाव्यातच.


एकट्या घरातल्या कर्त्या स्त्रीवर सगळा स्वयंपाकाचा भार/ लोड येऊ नये ... म्हणून किमान तिच्या अडचणीच्या चार दिवसात तरी, पोट भरेल एवढे दोन नाश्त्याचे पदार्थ आणि चार मुख्य जेवणातले पदार्थ घरातल्या प्रत्येकाला करता/शिजवता/रांधता येतील, इतकं प्रशिक्षण घरातल्या सर्वांना असायलाच हवे.

असो.


आप्तजन स्वयंपाक घरात असावेत, याच्यानंतर म्हणजे स्वच्छता आणि मांगल्य पावित्र असावे , याबाबत आपण मागील भागात पाहिले सविस्तर.


यात अजून दोन मुद्दे श्लोकामध्ये उल्लेख केलेले आहेत ... 


ते म्हणजे *सुसंस्कृत आणि सुसंगुप्त !!!*


सुसंस्कृत याचा अर्थ चांगल्या पद्धतीचे संस्कार केलेले. 


अर्थात पुन्हा संस्कार दोन प्रकारचे ...

एक भौतिक संस्कार म्हणजे रेसिपी / अन्न तयार करणे. त्यासाठी केल्या जाणाऱ्या सर्व बाबी म्हणजे अगदी अन्नपदार्थ कच्च्या मालाच्या स्वरूपात बाजारातून किराणा दुकानातून आणणे, निवडणे , ते व्यवस्थित बरणीमध्ये किंवा फ्रिजमध्ये ठेवणे , त्यापासून अन्नपदार्थ करताना ते काढल्यानंतर पुन्हा धुवून घेणे, चिरणे शिजवणे फोडणी देणे, योग्य तितके तिखट मीठ योजणे ... या सर्व बाबी म्हणजे भौतिक संस्कार !!

हे सुगृहिणीचं किंवा सुगरणीचं कर्तव्य आणि कौशल्य ... आवड आणि अधिकार सर्वच आहे ...


परंतु दुसरा संस्कार म्हणजे अन्न शिजत असताना/ अन्न वाढत असताना/ अन्न खात असताना ...

आसपासचे वातावरण हे उत्तम असणे सात्त्विक सोज्वळ मंगल पवित्र असणे , याचीही व्यवस्था घरातल्या सर्वांनी / घरातल्या ज्येष्ठांनी आणि घरातल्या कर्त्या स्त्रीने विशेषतः, करणं ...

हे त्या कुटुंबांच्या दीर्घकालीन लाभासाठी उपयोगाचे आहे.


त्यामुळे ज्यांना पटत असेल, त्यांनी चांगली स्तोत्रे ...

ते पटत नसल्यास चांगले अर्थ आणि शब्द असणारी गाणी भक्ती गीते किंवा अगदी भावगीते ...

तेही पटत नसेल तर शब्द विरहित केवळ इंस्ट्रुमेंटल म्युझिक ,

त्यावेळी सुरू ठेवणे 

किंवा एखादा रेकॉर्ड करून ठेवलेला जप रिपीट मोडमध्ये लावून ठेवणे, 

हे हितकर असू शकते.


समजा, यातलं काहीच जमणार नसेल तर किमान अन्न शिजत असताना / वाढत असताना / खात असताना आचकट विचकट , अर्थहीन, वाईट अर्थ असलेली, धांगडधिंगा असलेली, मनाचा + कानाचा क्षोभ करणारी ऑडिबल गाणी ... किंवा मोबाईल वरती रील्स किंवा टीव्ही वरती पातळयंत्री / दुसऱ्याचं वाटोळं कसं करता येईल असंच प्रायः दाखवणाऱ्या सिरीयल सुरू असणार नाहीत, धर्म राजकारण क्रिकेट अशा आपल्या जनसामान्यांच्या जीवनाशी थेट संबंध/उपयोग नसलेल्या बाबी त्यावेळी सुरू असणार नाहीत, याची कटाक्षाने काळजी घ्यावी.


*कोरोना नंतर धर्म राजकारण क्रिकेट सिरीयल हे सर्व पूर्णपणे बंद करूनही, दैनंदिन व्यवहारांमध्ये काहीही समस्या कमतरता उणीव येत नाही ... 

उलट धर्म राजकारण क्रिकेट सिरीयल हे बंद केल्यामुळे, चांगल्या कंटेंट कडे ... राहून गेलेल्या वाचनाकडे श्रवणाकडे लिखाणाकडे, लक्ष आणि वेळ दोन्ही देता येतो, असे "स्वानुभवावरून" निश्चितपणे सांगता येते.*


त्यामुळे, *सुसंस्कृतम् अन्नम्* याचा अर्थ ...

चांगले भौतिक स्वयंपाक कौशल्याचे रुची युक्त संस्कार ...

आणि दुसरं, त्यावेळी आसपासचं असणारं वातावरणही तितकंच सुसंस्कृत असेल , असे पाहणे योग्य होय.


किमान आसपासचे वातावरण नकारात्मक किंवा हानीकारक अनिष्ट अभद्र असणार नाही, एवढे तरी पाहायला हवेच हवे.


जसे अन्न हे सुसंस्कृत आणि शुची असायला हवे ...

तसेच अन्न हे सुसंगुप्त = स्वनगुप्त म्हणजे सुअनुगुप्त म्हणजे सु =चांगल्या प्रकारे, सं = योग्य प्रकारे, झाकून/ सुरक्षित ठेवलेले असायला हवे.


याचेही पुन्हा दोन अर्थ होतात की ...

1.

उघडे वागडे अन्न खाऊ नये ... याचाच अर्थ रस्त्याच्या कडेला टपरीवर ढाब्यावर स्ट्रीट फूड जंक फूड असे खायला जाऊ नये.


रस्त्यावरून अनेक प्रकारचे टू व्हीलर फोर व्हीलर हेवी व्हेईकल जात असतात. कुठलेही वाहन जवळून गेल्यानंतर, रस्त्याला चिकटलेली धूळ ही आसमंतात साधारणतः माणसाच्या दुप्पट तिप्पट उंचीपर्यंत "उधळली जाते/ स्कॅटर होते" ... आणि त्यातले काही कण का होईना, पण तुम्ही रस्त्याच्या कडेला बसून खात असलेल्या अन्नावरती निश्चितपणे येतात ... हे तुम्हाला स्वतःला पटतंय का, असं विचार करून पहा.


हे जसे उघड्या वागड्यावर अन्न खाऊ नये , याबाबतीत भौतिक दृष्ट्या प्रत्यक्ष अनुभव घेणे या दृष्टीने आहे ...


तसेच इतरांची नजर आपल्या अन्नावर पडू नये, याचीही दक्षता घ्यावी.

पूर्वीच्या काळी लग्नात पंगत असायची आणि आधीच्या पंगतीला जेवायला बसलेले लोक उठायच्या आधीच, त्यांचे जेवण संपत आले असताना, "आता तुम्ही कधी उठाल?", याची वाट पाहणारे लोक तुमच्या मागे येऊन उभे राहत असत ... हे अत्यंत ओंगळवाणे आणि मनस्तापदायक होत असे. त्यामुळे, आपण काय खात आहोत, याच्याकडे दुसऱ्याची दृष्टी असणं, हे तितकसं चांगलं नसतं!!!

म्हणून सुद्धा हॉटेलमध्ये खायला जाणे, लग्न रिसेप्शन इत्यादी ठिकाणी बुफे पद्धतीने खाणे आणि रस्त्यावरचे उघडे वागडे अन्न खाणे, या तिन्ही गोष्टी टाळाव्यातच. 


जसे रस्त्यावरची वाहनांमुळे उडणारी धूळ ही, रस्त्याच्या कडेला तयार होणाऱ्या / खाल्ल्या जाणाऱ्या अन्नामध्ये येऊ शकते...

त्याचप्रमाणे प्रायः अशा प्रकारची अन्न विक्री व्यवस्था जिथे असते, त्याच्या आसपास साठलेले टाकलेले उष्टे खरकटे आपल्या आधी इतरांनी खाल्लेले प्लेट कप चमचे फाॅईल डिस्पोजेबल कंटेनर्स , त्यांनी धुतलेले हात/ भरलेली चूळ/ याचे पाण्याचे पिंप ... या सगळ्या गोष्टी *"तिथेच आसपास"* असतात.

त्यामुळे अशा प्रकारच्या सामुदायिक अन्न सेवन स्थानांमध्ये आपण शक्यतो स्वतःला घेऊन जाऊ नये.


याला *सत्राशन किंवा पणिकाशन* असे म्हणतात. याबाबतचा अजून एक श्लोक पुढे येणार आहे, तेव्हा आवश्यकता वाटल्यास सविस्तर पाहूया.


घरामध्ये सुद्धा सु सं अनु गुप्त याचा अर्थ प्रत्येक अन्न हे ज्या पात्रात ठेवले आहे , त्याच्यावर योग्य पद्धतीचे झाकण असेल किंवा ते डब्यात बरणीत व्यवस्थित झाकण लावून ठेवलेले असणे, जितके गरजेचे आहे ... तितकेच फ्रीजमध्ये ठेवतानाही याबाबतची काळजी घेतली गेली पाहिजे.


आज नव्याने तयार केलेल्या आणि शिल्लक राहिलेल्या अन्नापासून ... तर मागील दोन-तीन दिवसातले किंवा आठवडाभरातले सुद्धा काही शिजवलेले किंवा कच्चे अन्नपदार्थ अन्नघटक फ्रीजमध्ये एकत्रच ठेवलेले असतात, हे तितकेसे योग्य नव्हे ...


तर अशा प्रकारे एकूण या श्लोकातील चारही मुद्दे आपण सावधानतेने दक्षतेने काळजीने आपल्या आचरणात आणले पाहिजेत,

जेणेकरून ...

आम्हाला मेडिक्लेम आहे, आम्हाला ॲडमिट व्हायची वेळ आली तरी , पैसे देण्याची आमची क्षमता आहे , या खोट्या अहंकारामध्ये ; ॲडमिट व्हायची वेळ येईल किंवा डॉक्टरच्या क्लिनिक मध्ये फेऱ्या माराव्या लागतील ...

इतपत स्वतःला अन-आरोग्याच्या बाबतीत एक्सपोज करू नये.


पुन्हा एकदा मूळ श्लोकातील चारही मुद्द्यांची उजळणी करून आजचा भाग संपन्न करूया


*तत्राप्तैर्गुणसम्पन्नं 1* ... 

स्वयंपाक घरात आपले आप्त म्हणजे हितचिंतक विश्वासार्ह लोकच असावेत.


*भक्ष्यमन्नं सुसंस्कृतम् । 2* ... 

जे अन्न आपण खाणार आहोत, त्याच्यावर चांगले संस्कार झालेले असावेत.


*शुचौ देशे 3* ... 

अन्न तयार करण्याची आणि खाण्याची जागा स्थान परिसर हे शुची म्हणजे स्वच्छ मंगल आणि पवित्र असावे


*सुसङ्गुप्तं 4* ... समुपस्थापयेद् 

... आणि अन्न तयार करण्यापूर्वी/ तयार केल्यानंतर/ वाढताना/ वाढून झाल्यानंतर आणि शिल्लक राहिलेले; असे सर्व प्रकारचे अन्न हे सुसंअनुगुप्त म्हणजे चांगल्या प्रकारे झाकून ठेवलेले , सुरक्षित ठेवलेले आणि इतरांची दृष्टी पडणार नाही , अशा पद्धतीने ठेवलेले असावे.


*देहवाक्चेतसां चेष्टाः प्राक् श्रमाद्विनिवर्तयेत्।* 

आणि

*न पीडयेत् इंद्रियाणि*

हे दोन्ही श्लोक आपण एकत्र पहात आहोत.


_(डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.)_


त्वदीय वस्तु गोविंद 

तुभ्यम् एव समर्पये ।


तेरा तुझको अर्पण

क्या लागे मेरा ।


श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु।


🙏🏼

सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved

Copyright कॉपीराइट ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

MhetreAyurved@gmail.com 

www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/


*भोजन करताना कोणत्या क्रमाने कोणत्या चवीचे पदार्थ खावेत ? Sweet Dish Dessert कधी खावेत?*

*भोजन करताना कोणत्या क्रमाने कोणत्या चवीचे पदार्थ खावेत ? Sweet Dish Dessert कधी खावेत?* 

*अष्टांगहृदय सद्वृत्त : भाग 180*
 12 जून 2024, बुधवार 
*उपविभाग 124* 

सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved
Copyright कॉपीराइट © लेखक : वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 
एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.
आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.
9422016871
MhetreAyurved@gmail.com 
www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/

भोजन करताना कोणत्या क्रमाने कोणत्या चवीचे पदार्थ खावेत ? 

प्रथम मधुर रसाचे पदार्थ खावेत.
म्हणजे गोड चवीचे पदार्थ खावेत.
हल्ली स्वीट डिश किंवा डेझर्ट हे शेवटी खाण्याचा प्रघात आहे ... परंतु ही युरोपियन पद्धत आहे.
युरोपातील लोक हे उत्तर ध्रुवाच्या जवळ राहतात, त्यामुळे तेथील सर्वसाधारण तापमान हे शून्य ते पंधरा इतके कमी असते. त्यामुळे त्यांची पचनशक्ती अतिशय प्रचंड असते. त्यामुळे त्यांनी कोणतेही पदार्थ कोणत्याही प्रकारे कुठल्याही क्रमाने कितीही खाल्ले तरी प्रायः त्यांना अपचन होणे असे होत नाही.

 आपल्याकडे मात्र प्रत्येक ऋतू नुसार तापमान बदलते आणि पचनशक्ती ही कमी जास्त होते. आपली पचनशक्ती ही थंडीच्या चार महिन्यात म्हणजे नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात उत्तम असते , त्या काळात प्रमाण प्रकार अशी पथ्ये नाही पाड
ळली तरी प्राय चालते. म्हणूनच दिवाळीच्या सणात आपण अनेक प्रकारचे गोड पचायला जड तेलकट अशा प्रकारचे फराळाचे पदार्थ करून आवर्जून खातो. 

परंतु मार्च ते ऑक्टोबर या काळात आपली भूक ही मंदावत जाते आणि पचनशक्ती क्षीण/दुर्बल असते.

 कारण आपण विषुववृत्ताच्या जवळ राहतो, म्हणून या काळात म्हणजे मार्च ते ऑक्टोबर = वर्षातल्या दोन तृतीयांश काळात, आपण भोजन करताना अन्नाचा प्रकार, त्याचे प्रमाण, त्याच्यावर झालेले स्वयंपाकाचे संस्कार, त्याचा क्रम याचा विचार करणे हे आरोग्य दृष्ट्या आवश्यक असते.

म्हणूनच आपण ज्या प्रदेशात राहतो तेथे मधुर रस म्हणजे गोड चवीचे पदार्थ सुरुवातीला खावेत.

अर्थातच मधुर रस गोड चवीचे पदार्थ हे पृथ्वी जल प्रधान म्हणजे पचायला जड असतात.

म्हणजेच पचनाला जड असणारे पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खावेत.

त्याचप्रमाणे फळांचे सेवन सुद्धा जेवणाच्या सुरुवातीला करावे कारण फळे ही प्रायः मधुर रसाची आणि पल्प आणि फ्लूड = पाणी आणि लगदा म्हणजेच पृथ्वी आणि जल म्हणजेच पचायला जड अशी असतात ...

जर मधुर गोड चवीच्या पदार्थांचे सेवन जेवणाच्या शेवटी केले, तर ते पचायला जड असल्याने शरीरात कफाचे प्रमाण वाढते आणि नाभीच्या, छातीच्या, गळ्याच्या, डोक्याच्या भागातील कफाच्या आजारांचे होणे संभवते 

म्हणजेच अम्लपित्त अपचन उलटी मळमळ जळजळ छातीत कफ होणे ओला खोकला होणे कफ पडणे घसा धरणे, घसा सुजणे दात किंवा हिरड्या सुजणे कान फुटणे सर्दी होणे डोके गच्च होणे वारंवार पडसे होणे डोके जड होणे डोके दुखणे *अशा प्रकारचे कफाचे रोग, हे जेवणाच्या शेवटी गोड पदार्थ किंवा जड पदार्थ खाल्ल्याने होण्याची शक्यता असते*.

मुळात ज्यांना असे आजार आहेत , त्यांनी पण जेवणाच्या शेवटी गोड पदार्थ किंवा जड पदार्थ किंवा द्रव पदार्थ पातळ पदार्थ किंवा पाणी यासारख्या अन्नपदार्थांचे सेवन करतो का? हे पाहावे ...
तसे होत असल्यास ते त्वरित थांबवावे.

म्हणून जेवणाच्या शेवटी किंवा जेवण झाल्यानंतर रात्री उशिरा झोपेपर्यंत केव्हाही ...
गोड पदार्थ = श्रीखंड आईस्क्रीम दूध कुल्फी किंवा बाहेरून मागवलेला वाढदिवसाचा मैद्याचा अंड्याचा पेस्ट्री चा केक किंवा त्यासोबत पिले जाणारे कोल्ड्रिंक वडापाव सामोसे कचोरी यासारखे तळलेले जड पदार्थ किंवा त्यावेळेला प्यायले जाणारी कोल्ड कॉफी किंवा चहा कॉफी सारखे पातळ पदार्थ किंवा एखादे डेझर्ट अशा गोष्टी निश्चितपणे टाळल्या पाहिजेत 

आणि ज्यांना मुळातच कफाचे आजार आहेत डायबिटीस आहे शुगर आहे कोलेस्टेरॉल आहे बीपी आहे वजन खूप वाढलेले आहे अंगावरती अनेक ठिकाणी लोंबकळणारा मेद म्हणजे सस्पेंडेड फॅट आहे लूज वेट आहे ...
अशांनी जेवणानंतर गोड चवीचे पदार्थ जड पदार्थ चिकट पदार्थ खाणे हे निश्चितपणे टाळावे 

म्हणून मधुर रसाचे गोड चवीचे पचायला जड पल्प फ्लूईड लगदा चिकटपणा पातळपणा असणारे सर्व पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खावेत 

*अगदी ज्यांना डायबिटीस शुगर कोलेस्ट्रॉल बीपी वाढते वजन असे आहे, त्यांनी सुद्धा आपली इच्छा मारायची नाही मन मारायचे नाही, म्हणून जे काही अपथ्य स्वरूपातील थोडेफार गोड पदार्थ खायचे आहेत, जसे की आमरस किंवा फळे शिकरण श्रीखंड या बाबी इच्छा पेक्षा निम्म्या /एक तृतीयांश किंवा एक चतुर्थांश (1/2 , 1/3 , 1/4) प्रमाणात *जेवणाच्या सुरुवातीला खाव्यात म्हणजे तेवढे जड गोड पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खाल्ल्याने, एकूण जाणाऱ्या जेवणातील चार सहा घास निश्चितपणे कमी जातात आणि शुगर वाढण्याची शक्यता थोडी कमी राहते*.

 जेवणाच्या सुरुवातीला मधुर गोड जड पातळ असे पदार्थ खाल्ल्यानंतर ...

जेवणाच्या मध्ये आंबट आणि खारट पदार्थ खावेत म्हणजे लोणचे पापड 

आणि जेवणाच्या शेवटी कडू तिखट आणि तुरट पदार्थ खावे म्हणजेच आमटी चटण्या असे पदार्थ जेवणाच्या शेवटी खावेत 

आणि जेवण झाल्यानंतर तुरट पदार्थ म्हणजे सुपारी बडीशेप विडा असे पदार्थ खावेत

शास्त्रीय दृष्ट्या जरी सुरुवातीला मधुर मध्ये आंबट खारट आणि शेवटी तिखट कडू तुरट असे पदार्थ खावे असे सांगितलेले असले, तरी प्रत्यक्षात मात्र व्यवहारात जेवताना सुरुवातीला वरण भात , वरण आमटी , दूध भात कढी भात असे खाल्ले जाते किंवा जेवणाच्या सुरुवातीला पोळी भाजी भाकरी भाजी असे खाल्ली जाते 

आणि हे मुख्य जेवण जेवत असताना मध्ये मध्ये खारट अशा स्वरूपातील पापड कुरडया खाल्ल्या जातात ... तसेच मध्ये मध्ये चवीत बदल व्हावा / रुचिपालट या अर्थी लोणचं चटण्या या चाखल्या जातात.

जेवणातील मुख्य पदार्थ म्हणजे भात चपाती भाकरी हे पचायला जड आणि गोड चवीचे असतात ...
तर सर्व प्रकारच्या भाज्या आणि उसळी या प्रायः, मूलतः कडू तुरट चवीच्या असतात आणि त्याला फोडणी देऊन चटणी मीठ घालून त्या बऱ्यापैकी चमचमीत सणसणीत झणझणीत तिखट असे त्या त्या घराच्या कुटुंबाच्या व्यक्तीच्या आवडीप्रमाणे रूढीप्रमाणे केलेले असते...

म्हणून जरी शास्त्रामध्ये 
सुरुवातीला मधुर, 
मध्ये आंबट खारट आणि 
शेवटी कडू तिखट तुरट 
असा क्रम सांगितलेला असला तरी ...
आलटून पालटून प्रायः सर्व चवी खाल्ल्या जातात!

 ज्याच्यामध्ये मधुर चवीचे प्रमाण सर्वाधिक आणि आंबट तिखट कडू यांचे प्रमाण कमी, तर खारट याचे प्रमाण अत्यल्प असते, हा व्यवहार आहे!
हे आपण सर्वजण जाणतोच ...

तरीही यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवणाच्या शेवटी मधुर गोड पचायला जड पातळ असे कफवर्धक पदार्थ शेवटी खाऊ नयेत 

आणि अर्थापत्तीने दुसरे असे की ...

*जेवणाच्या सुरुवातीला तिखट झणझणीत झणझणीत चमचमीत अग्नी प्रधान असे पदार्थ खाऊ नयेत*...

कारण जेवणाची सुरुवात जर अशा प्रकारच्या अग्नी प्रधान तिखट मसालेदार पदार्थांनी केली, तर कालांतराने मलावरोध अम्लपित्त जळजळ पोटात आणि संडासच्या जागेला दाह क्वचित संडासवाटे रक्त पडणे मूळव्याध भगंदर फिशर यांचा त्रास होणे ...
अशा उष्णताजन्य तक्रारी होतात ...
अंगावरून पाळीच्या वेळेला अधिक रक्तस्राव होणे किंवा अधिक दिवस रक्तस्राव होत राहणे , असेही होऊ शकते.
याचबरोबर उन्हाळी लागणे, लघवी थेंब थेंब होणे, वारंवार संडासला जावेसे वाटणे, संडासच्या जागेची आग होणे अशाही तक्रारी होऊ शकतात.

म्हणून सर्वसाधारणतः जेवणाची सुरुवात ही मधुर रसाने गोड चवीच्या पदार्थांनी करावी, हे बरे 
आणि जेवणाच्या मध्ये मध्ये आलटून पालटून आंबट खारट तिखट असे पदार्थ रुचिपालट = चव बदलण्यासाठी खावेत 
आणि जेवणाच्या शेवटी ज्यांना शक्य आहे त्यांनी सुपारी बडीशेप पान विडा तांबूल यांचे सेवन करणे हे आरोग्यासाठी हितकारक आहे

संत वाङ्मयामध्ये 
साच जोडी शेवटी गोड घास ।। 
असा उल्लेख आहे ..
परंतु _शेवटचा घास_ गोड घेण्यापेक्षा ...
जीवनातील *शेवटचे दिवस हे खऱ्या अर्थाने गोड* म्हणजे आरोग्य संपन्न आणि स्वावलंबी होवोत; परावलंबी होऊ नयेत / हॉस्पिटलमध्ये खितपत पडावे लागू नये ... म्हणून _शेवटचा घास गोड घेण्याऐवजी_ *जेवणाच्या सुरुवातीला गोड पदार्थ खाणे हे हितकर असते*

याजसाठी केला होता अट्टाहास । 
*शेवटचा दिस गोड व्हावा* ।। ✅️
🙏🏼🪔🪷
*या उपक्रमात लिहिल्या जाणाऱ्या लेखांमध्ये असणारी विधाने ही आयुर्वेद सिद्धांत व संहिता ग्रंथ यावर आधारित शास्त्रीय सत्य तथ्य अशा स्वरूपाची प्रायः असतात. _परंतु या लेखांमध्ये काही विधाने काही रूढी परंपरा इतिहास याविषयीची माहिती सामाजिक माहिती मनोरंजन वैयक्तिक मत वैयक्तिक आकलन वैयक्तिक समजूत अशा स्वरूपाची सुद्धा असू शकतात_*

*देहवाक्चेतसां चेष्टाः प्राक् श्रमाद्विनिवर्तयेत्।* 
आणि
*न पीडयेत् इंद्रियाणि*
हे दोन्ही श्लोक आपण एकत्र पहात आहोत.

_(डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.)_

त्वदीय वस्तु गोविंद 
तुभ्यम् एव समर्पये ।

तेरा तुझको अर्पण
क्या लागे मेरा ।

श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु।

🙏🏼
सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved
Copyright कॉपीराइट ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 
एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.
आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.
9422016871
MhetreAyurved@gmail.com 
www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/

*भोजन कसे करावे? जेवताना कसे जेवावे? Dining Table Etiquettes?* 😇

*भोजन कसे करावे? जेवताना कसे जेवावे? Dining Table Etiquettes?* 😇

*सुखमुच्चैः समासीनः समदेहोऽन्नतत्परः । अन्नम् अश्नीयात्*

*अष्टांगहृदय सद्वृत्त : भाग 181* 13जून 2024, गुरुवार *उपविभाग 125* 


सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved

Copyright कॉपीराइट © लेखक : वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

MhetreAyurved@gmail.com 

www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/


भोजन कसे करावे? जेवताना कसे जेवावे? 

Dining Table Etiquettes? 😇


सुखमुच्चैः समासीनः समदेहोऽन्नतत्परः । 

अन्नम् अश्नीयात्


अन्नम् अश्नीयात् म्हणजे अन्न खावे, भोजन करावे जेवण घ्यावे अन्न सेवन करावे


*सुखमुच्चैः समासीनः* ... म्हणजे 


जमिनीपासून थोडे उंचावर आरामदायक पद्धतीने उजवे डावे अंग तिरके वाकडे होणार नाही अशा पद्धतीने समसमान पातळीत बसावे म्हणजे आपल्याकडे मागील काही पिढ्यांमध्ये पाटावर बसून जेवणे ही पद्धत होती ही जमिनीपासून थोडेसे उंचावर या अर्थी योग्य होते परंतु त्यावेळेला ताट हे पाटा पेक्षा खालच्या पातळीवर म्हणजे जमिनीवर ठेवलेले असायचे त्याच्याऐवजी जर ते साधारणता नऊ इंच ते 12 इंच इतक्या उंचीवर म्हणजे चौरंगावर ठेवलेले असेल तर ते अधिक उचित होय. त्यामुळे आजकाल आपण जे डायनिंग चेअरवर बसतो की जी साधारणतः जमिनीपासून 18 इंच उंच असते आणि डायनिंग टेबलची पातळी ही साधारणतः 30 इंचापर्यंत किंवा 32 इंच पर्यंत असते ते योग्य आहे. आपले दोन्ही कोपर हे सहजपणे टेबलाच्या पृष्ठभागावर टेकतील असे बसता यावे. डायनिंग चेअर ही 90 अंश काटकोनात सरळ पाठ राहील, अशी असते... हे अतिशय योग्य आहे.

यालाच वरील श्लोकामध्ये समासीन म्हणजे सम पद्धतीने बसलेला म्हणजे पाठीला बाक न येऊ देता, पोक न काढता, कुबड न काढता, पुढे न वाकता बसणं हे योग्य आहे. अभ्यासाला बसताना सुद्धा, भगवान श्रीकृष्णाने *समं काय शिरो ग्रीवम्* असे बसायला सांगितलेले आहे. भोजन हे सुद्धा एक यज्ञ कर्म असल्यामुळे, तेव्हा सुद्धा *समासीन* म्हणजे आज डायनिंग चेअर जी काटकोनात 90 अंशात असते ते योग्य आहे.

पाट आणि चौरंग हे जमिनीपासून उंच असणे, हे योग्य आहे. कारण त्यामुळे वाढायला येणाऱ्या व्यक्तीच्या चालण्याने, त्याच्या पावलाने उडू शकणारी धूळ किंवा त्याच्या पायाच्या जवळपास रुळणारे लोळणारे वस्त्र यामुळे उडणारी धूळ ही ताटापर्यंत पोहोचणे टळते.


परंतु पाठ आणि चौरंग या तुलनेत, डायनिंग टेबल आणि डायनिंग चेअर ही व्यवस्था अधिक सुरक्षित व स्वच्छ अशी निश्चितपणे आहे


युरोपामध्ये अतिशय थंडी असल्याने जमीन खूप गार पडते. म्हणून त्या प्रदेशात जमिनीवर बसणे, ही पद्धत नाही. उलट तेथे जमिनीवर लाकडी आवरण म्हणजे वूडन फ्लोरिंग असते.

म्हणून ते लोक प्रायः जमिनीवर मांडी घालून बसण्यापेक्षा, जमिनीपासून वरती साधारणता 18 इंच उंच आसनावर म्हणजे खुर्चीवर /चेअर वर /सोफ्यावर बसणे योग्य समजतात, ते उचित आहे.


आपल्याकडेही सर्व देवता या सिंहासनावर बसलेल्या दिसतात. असे उच्चासनावर बसणे, हे भोजन समयी स्वच्छतेच्या दृष्टीने योग्यच आहे !


*अन्न तत्परः*


कार्यतत्पर म्हणजे कामाविषयी निष्ठा समर्पण असणारा कामाशी एकाग्र असणारा तसे ...


अन्न तत्पर म्हणजे अन्ना विषयी, ताटात वाढलेल्या अन्नपदार्थांविषयी, जेवणाविषयी, भोजनाविषयी ...

आदर एकाग्रता समर्पण निष्ठा सद्भावना असणारा!


*अन्न तत्परः* याला चरक संहितेमध्ये *तन्मना भुञ्जीत* म्हणजे अन्नाकडेच लक्ष ठेवून /अन्नाकडेच मन ठेवून/ अन्न वगळता अन्य विचार न करता ... तत्पर म्हणजे अन्नविषयक एकाग्रता ठेवून जेवावे !


याचाच अर्थ मौन राखून जेवावे 


जेवताना मध्ये मध्ये बोलू नये 


अपूर्वाई या पु ल देशपांडे यांच्या पुस्तकात युरोपातील दोन देशांच्या परस्पर विरुद्ध पद्धती बद्दल सांगितले आहे, की फ्रेंच की ब्रिटिश (?) माणूस हा जेवताना अजिबात बोलत नाही आणि तद्विपरीत देशातील माणूस हा फक्त जेवतानाच बोलतो ... असे काहीसे वर्णन त्यात आहे.


परंतु आपल्या शास्त्रात आणि परंपरेत जेवताना बोलणे हे निषिद्ध आहे 


किंबहुना जेवताना मध्येच बोलल्यास, तिथून पुढचे भोजन तसेच ठेवून, ताटावरून उठावे व हात धुवावेत, असा नियम आहे 


याचा अर्थ जेवताना बोलणे / हसणे ...

हे निषिद्ध वर्ज्य त्याज्य आहे.


आता हल्ली मात्र डायनिंग चेअर वर बसून जेवतानाच, सर्व कुटुंबाने गप्पा गोष्टी हास्य विनोद करत जेवावे ...

असे सांगितले जाते !

*हे आरोग्यदृष्ट्या योग्य नाही*


प्राण नावाच्या वायूच्या गतीने, अन्न हे तोंडातून पोटाकडे जाते ...

तर उदान = उद् आन म्हणजे वरती आणणारा , वरच्या दिशेने जाणारा उदान नावाचा वायू हा आपली वाणी शब्द उलटी स्मृती सामर्थ्य यांना *शरीरातून बाहेरच्या दिशेने* ढकलत असतो.


त्यामुळे प्राण हा आत जाणारा ...

तर उदान हा बाहेर येणारा ,

असे परस्पर विपरीत वायूंचे कर्म एकाच वेळेस होणे योग्य नव्हे ...


म्हणून जेवताना प्राणाचे म्हणजे तोंडाकडून पोटाकडे जाण्याच्या दिशेचे कर्म होणे योग्य आहे ...

यासाठी जेवण करत असताना, 

बोलणे आणि हसणे हे निश्चितपणे टाळले पाहिजे!!! 


यालाच *अन्न तत्पर किंवा तन्मना भुञ्जीत* असे म्हटलेले आहे 


जसे बोलणे आणि हसणे टाळले पाहिजे ... त्याचप्रमाणे जेवत असताना टीव्ही पाहणे , मोबाईल पाहणे , मोबाईलवर बोलणे , रिल्स पाहणे याही गोष्टी टाळल्या पाहिजेत ... कारण जेवण म्हणजे *उदरभरण नोहे, जाणिजे यज्ञ कर्म* अशा भावनेने अन्न सेवन केले ... तरच *जीवन करी जीवित्वा* हे फळ मिळते आणि ते अन्न आपल्याला *पूर्णब्रह्म म्हणजे जगातील आणि जीवनातील सर्व लाभ प्राप्त करण्याइतपत समर्थ बनवते*


तिसरी साधी, सोपी, सरळ, शास्त्रीय नसलेली, गुंतागुंतीची नसलेली गोष्ट म्हणजे ...

जी माऊली गृहिणी, घरातील स्त्री, आई पत्नी सून बहिण मुलगी हे अतिशय कष्टाने ...

त्यांचा सर्व जीव ओतून ,

आपल्या घरातल्या माणसाने सुखाने चार घास खावेत, त्याला उत्तम स्वाद लाभावा...

यासाठी सकाळपासून राबत असतात, कष्टत असतात, खपत असतात ...

त्यांच्या परिश्रमाचे आपण अवमूल्यन केले असे होते, जर आपण जेवताना त्या अन्नाकडे , त्याच्या वासाकडे/ चवीकडे /रंगाकडे /वाढण्याच्या मांडण्याच्या पद्धतीकडे दुर्लक्ष करून ... 

केवळ उदरभरण करत असू किंवा

भोजन सोडून अन्य विषयांवरती गप्पा मारत असू किंवा 

टीव्ही वरती सिरीयल क्रिकेट धर्म राजकारण किंवा 

मोबाईल वरती रील्स whatsapp facebook insta यात गुंगून जात असू ...


तर ...आपल्या घरातील जी अन्नपूर्णा आपल्या ताटात उत्तम प्रकारचे अन्न यावे व 

आपले जीवन आरोग्य संपन्न राहावे समर्थ रहावे,

म्हणून सकाळपासून ते अन्न तयार करण्यासाठी मनापासून समर्पितपणे राबलेली असते,

तिचा आपण धडधडीत अपमान केल्याप्रमाणे व 

तिच्या कष्टांकडे दुर्लक्ष केल्याप्रमाणे होत असते.


आपल्या घरातील स्त्रीने तयार केलेला *स्वयंपाक हा महाप्रसाद आहे* अशी भावना ठेवून, तिच्या त्या कष्टांची जाणीव ठेवून, त्या केलेल्या स्वयंपाकाशी कृतज्ञ राहून, जर आपण अन्न सेवन केले तर ... घरामध्ये सुख समृद्धी शांती आनंद आरोग्य प्रीती अशा उच्च जीवन मूल्यांची जपणूक व वाढ निरंतर निश्चित होत राहील


*या उपक्रमात लिहिल्या जाणाऱ्या लेखांमध्ये असणारी विधाने ही आयुर्वेद सिद्धांत व संहिता ग्रंथ यावर आधारित शास्त्रीय सत्य तथ्य अशा स्वरूपाची प्रायः असतात. _परंतु या लेखांमध्ये काही विधाने काही रूढी परंपरा इतिहास याविषयीची माहिती सामाजिक माहिती मनोरंजन वैयक्तिक मत वैयक्तिक आकलन वैयक्तिक समजूत अशा स्वरूपाची सुद्धा असू शकतात_*


*देहवाक्चेतसां चेष्टाः प्राक् श्रमाद्विनिवर्तयेत्।* 

आणि

*न पीडयेत् इंद्रियाणि*

हे दोन्ही श्लोक आपण एकत्र पहात आहोत.


_(डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.)_


त्वदीय वस्तु गोविंद 

तुभ्यम् एव समर्पये ।


तेरा तुझको अर्पण

क्या लागे मेरा ।


श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु।


🙏🏼

सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved

Copyright कॉपीराइट ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

MhetreAyurved@gmail.com 

www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/

  

*भोजन करण्याची योग्य रीत = जेवण्याची उचित पद्धत* 😇

 *भोजन करण्याची योग्य रीत = जेवण्याची उचित पद्धत* 😇


*काले सात्म्यं लघु स्निग्धम् उष्णं क्षिप्रं द्रवोत्तरम् ।।*

*बुभुक्षितो अन्नम् अश्नीयात् मात्रावद् विदितागमः ।*


*अष्टांगहृदय सद्वृत्त : भाग 182*

14 जून 2024, शुक्रवार  

*उपविभाग 126* 


सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved

Copyright कॉपीराइट © लेखक : वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

MhetreAyurved@gmail.com 

www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/


*भोजन करण्याची योग्य रीत = जेवण्याची उचित पद्धत* 😇


*काले सात्म्यं लघु स्निग्धम् उष्णं क्षिप्रं द्रवोत्तरम् ।।*

*बुभुक्षितो अन्नम् अश्नीयात् मात्रावद् विदितागमः ।*


अन्नम् अश्नीयात् म्हणजे अन्न खावे, भोजन करावे जेवण घ्यावे, अन्न सेवन करावे


अन्न कधी खावे? याचं सगळ्यात पहिलं योग्य नैसर्गिक उत्तर म्हणजे *भूक लागलेली असतानाच खावे* ... वेळ झाली आहे , समोर दिसतं आहे, उपलब्ध आहे, आवडतं आहे, पुढे वेळ मिळणार नाही, पुढे गाडी थांबणार नाही, वाटेत सोय होणार नाही ... अशा कारणांसाठी , *_भूक नसताना_* अन्न खाऊ नये. 


*काले = योग्य काळ*

भूक लागलेली असताना सुद्धा, *योग्य काळ कोणता*, असे आरोग्य दृष्ट्या हितकर सविस्तर सांगता येते


भारतातील वातावरणानुसार ...

साधारणता मध्याह्न म्हणजे सूर्य डोक्यावर असताना म्हणजे दुपारी बारा वाजता या वेळेच्या अलीकडे/ पलीकडे दीड तास या वेळात जेवण करावे = 10.30 ते 1.30 किंवा खरंतर साडेदहाच्या 10.30 च्या सुमारास जेवण करावे... जेणेकरून पुढील पित्तप्रकोपाच्या / पित्त कार्यक्षमतेच्या उत्तम व सुयोग्य काळात त्या वेळेत खाल्लेल्या अन्नाचे घेतलेल्या आहाराचे व्यवस्थित पचन होऊन, त्याचे योग्य त्या शरीर घटकांमध्ये व्यवस्थित रूपांतर होणे, सहजपणे निसर्गतःच संभवते.


त्या पुढील भोजन तीन तासाच्या आत करू नये 

आणि 

आधीच्या सकाळच्या भोजनानंतर, सहा तासांपेक्षा अधिक वेळ/काळ, रिकामे पोटी राहू नये


म्हणजे साधारणता सकाळच्या भोजनानंतर पुढील भोजन सायंकाळचे भोजन किंवा रात्रीचे भोजन हे साडेचार - पाच ते साडेसात - आठ (4.30-5 ते 7.30-8) या वेळात करावे


*सात्म्य = मानवणारे, सवयीचे*

आपण घेणार असलेला आहार हा *सात्म्य म्हणजे आपल्याला मानवणारा / परिचयाचा / सवयीचा असावा.


उगीचच काहीतरी फॅन्सी/ व्हरायटी/ नाॅवेल्टी/ ट्राय करायची म्हणून ...

काहीही तोंडात / पोटात "कोंबू" नये ...

पास्ता पिझ्झा बर्गर मोमो शवर्मा मंचुरियन चायनीज नूडल्स हे भारतीय वातावरणात व भारतीय संस्कृतीला आणि शतकानुशतकांच्या भारतीय पचनसंस्थेला सात्म्य नसलेले/ न मानवणारे / सवयीचे नसलेले अन्नपदार्थ आहेत. 

त्यामुळे उगीचच अशा गोष्टी "ट्राय करू नयेत".


कारण त्याचे दीर्घकाळानंतर/कालांतराने दुष्परिणामच होतात. अशा सर्व गोष्टी ह्या आरोग्याला आवश्यक नसतात / जीवनावश्यक नसतात.


म्हणून अगदी एखाद्या वेळेला / मनाची उत्सुकता- कुतूहल शमवण्यासाठी म्हणून / चवीपुरते / थोडेसे हे अन्नपदार्थ चाखून पाहणे ...


आणि त्यानंतर "हे अन्नपदार्थ", आपण *"खाण्यायोग्य नव्हेत"* अशा कॅटेगरीमध्ये ... त्यांचे आपल्या मेमरीमध्ये ...

निगेटिव्ह रजिस्ट्रेशन किंवा 

खरंतर डी-रजिस्ट्रेशन किंवा 

डिलीट फॉर ऑल किंवा 

परमनंटली डिलीट / शिफ्ट डिलीट असे करायला हवे! 


अशा प्रकारचे डी-रजिस्ट्रेशन हे अनेक अनावश्यक आणि अहितकारक अन्नपदार्थांबाबत करणे, निश्चितपणे आवश्यक आहे.


यामध्ये मैद्यापासून बनणारे सर्व बेकरी पदार्थ ...

यामध्ये अतिपरिचित असलेला वडापाव पावभाजी बर्गर पिझ्झा कॉर्न फ्लोअर मेयोनी स्पिनर बटर बटर ची विविध प्रकारचे तळलेले वेफर्स चटपटीत स्पायसी हवाबंद पॅक मध्ये तीन किंवा सहा महिन्यापूर्वी पॅक केलेले विविध प्रकारची बिस्किटे केक की दुकान बंद केल्यानंतर त्याच्यावर झुरळे माशा चिलटे काय फिरते याचे शाश्वती नसलेले पदार्थ ज्या देहावरती ज्या अन्नावरती आपला देह लहानपणापासून पोचलेला आहे अशा प्रकारच्या आहाराचा अन्नपदार्थांचा आपल्या रोजच्या भोजनामध्ये समावेश असणं हे सुरक्षित आरोग्य रक्षक आणि शरीर वर्धक असते म्हणून घरात तयार होणारी पोळी भाकरी, भात भाजी भरड आमटी उसळ कोशिंबीर यांना प्राधान्य द्यावे त्यात आपले सुगरणीचे कौशल्य वापरून किंवा स्वतःच्या पाकक कौशल्याला आव्हान देऊन विविध प्रकारचे प्रयोग घरच्या घरी स्वच्छ शुद्ध पवित्र मंगल अशा साधने अन्नघटक आणि स्थान म्हणजे किचन या ठिकाणी करून पहावे जिभेचे चोचले पुरवण्यासाठी विकत आणलेले किंवा रस्त्यावरचे टपरीवरचे ढाब्यावरचे हॉटेलचे ऑनलाइन मागवलेले असे पदार्थ आपल्या पवित्र यज्ञविधी मध्ये म्हणजे आपल्या उदरस्थ अग्नीमध्ये टाकू नये


लघु स्निग्धम् उष्णं = 


लघु = पचायला हलके, स्निग्ध = योग्य तितकी स्निग्धता असणारे आणि उष्ण = नुकतेच तयार केलेले असल्यामुळे गरम उबदार (= एकदा तयार केल्यानंतर, काही वेळाने गार झाले, म्हणून पुन्हा गरम केलेले ... असे उष्ण नको उष्णीकृतम् पुनः असे अभिप्रेत नाही, रि-हीटेड Re-Heated असे नव्हे) असे अन्नपदार्थ खावेत.


एखादा अन्नपदार्थ त्याच्या चवीमुळे किंवा निसर्गतःच गुरु म्हणजे पचायला जड असू शकतो ... तर त्याचे प्रमाण हे आपल्याला जितके खावेसे वाटते , त्याच्या निम्मे किंवा एक तृतीयांश (½ or ⅓) असावे.

असे जड अन्नपदार्थ अगदी पोट भरून पोटाला तडस (satiety) लागेपर्यंत हावरेपणाने खाऊ नयेत.

कारण त्याचे पचन करणे शरीराला जड जाते वेळ लागतो अवघड होते किंवा त्यातून अपचन उलटी मळमळ जळजळ गॅसेस पोट गच्च होणे जुलाब होणे पोट दुखणे अशा प्रकारचे पचनसंस्थेचे मध्यम किंवा तीव्र स्वरूपाचे त्रास होऊ शकतात पचायला जड आणि पचायला हलके ही संकल्पना आपल्या शरीरात तो पदार्थ गेल्यानंतर त्याच्या पचनासाठी लागणारा वेळ यावर अवलंबून असते पाण्यावर तेल तरंगते तेलावर भजी तरंगतात म्हणजे भजी हे हलके आहेत असा त्याचा अर्थ नव्हे ब्रेड किंवा खारी हे जाळीदार किंवा दिसायला हलके दिसतात म्हणजे ते पचायला हलके असतात असे नसते त्यामुळे एखादी गोष्ट शरीराबाहेर वजनाला किंवा दिसायला हलकी वाटली तरी ती पचायला सोपी असेल असे नसते हे आपल्या घरातील ज्येष्ठांच्या किंवा आरोग्य तज्ञांच्या किंवा रुढीपरंपरेने माहीत असलेल्या अनुभवानुसार ठरवावे प्राया हा सर्व गोड पदार्थ तळलेले पदार्थ मैद्याचे पदार्थ सर्व प्रकारचे मांसाहारी नॉनव्हेज पदार्थ जमिनीखाली तयार होणारे बटाटा साबुदाणा रताळे बीट यासारखे कंद पदार्थ अंडरग्राउंड फूड आयटम्स बेकरीचे पदार्थ आंबून फर्मेंटेशन करून तयार केले जाणारे दक्षिणात्य पदार्थ कुकरमध्ये शिजवले जाणारे पदार्थ हवाबंद डब्यात रिझर्वेटिव्ह घालून साठवलेले पदार्थ हे सर्व पचायला जड असतात म्हणून असे जड पदार्थ कधीतरी थोड्या प्रमाणात चवीपुरते मनाची उत्सुकता कुतूहल समवन्या पुरतेच खावेत अशा जड पदार्थांच्या खाण्याचे प्रमाण आणि वारंवारिता कॉन्टिटी आणि फ्रिक्वेन्सी ही शक्य तितकी कमी असावी


आपण अन्न खाल्ल्यानंतर ते पचनसंस्थेतून 22 फुटांचा प्रवास करून पचन प्रक्रिया पूर्ण होऊन मळविष्ठा पुरुष फिकल मटेरियल या स्वरूपात बाहेर पडेपर्यंत ते आतड्याच्या पृष्ठभागावरून सरफेस वरून सहजपणे पुढे सरकले पाहिजे घसरले पाहिजे स्लाईड झाले पाहिजेत यासाठी आतड्याचा पृष्ठभाग आणि अन्नपदार्थ यामध्ये पुरेशी स्निग्धता तेलकटपणा गुळगुळीतपणा गुळगुळीत पणा स्मूदनेस असायला हवा त्याच्यामध्ये कोरडेपणा अडथळा संकोच कुठेही असता कामा नये म्हणून आपण खात असलेले अन्नपदार्थ हे अतिशय कोरडे, शुष्क रुक्ष ड्राय असू नये ते पुरेसे स्निग्ध तेल तूप लोणे यांनी युक्त असावे चीज बटर हे सुद्धा स्निग्ध पदार्थ असले तरी त्याच्यामध्ये मिठाचे प्रमाण जास्त असल्याने ते आरोग्यासाठी तितकेसे योग्य नसतात म्हणून चीज बटर यांचा वापर कमी करून घरात लोणी विरघळवून केलेले लोणकढही साजूक तूप शुद्ध देसी घी विकत आणलेले सुद्धा बाहेरचे आयते मिळणारे गीर गाईचे तूप हे विश्वासार्ह असेलच याची कोणतीही खात्री देता येत नसते म्हणून तू स्वतः गृहिणीने दुधापासून विरजण दही ताक लोणी घरात घडवणे या पद्धतीने करणे हे तिच्या घरातील सर्वांच्या दीर्घकालीन आरोग्यासाठी निश्चितपणे आवश्यक आणि पायाभूत आहे असे जाणारे सर्व गोष्टी विकत मिळतात म्हणजे त्या गुणवत्तापूर्ण असतात असे नव्हे सोय सुविधा याचा स्वीकार करताना आपण आपली पारंपारिक कौशल्य गमावत आहोत आणि आळशीपणाकडे ऐदीपणाकडे वाटचाल करत आहोत असे होऊ देऊ नये जे पदार्थ पटपट खाल्ल्यानंतर घास बसतो तोटरा बसतो सफोकेशन होते असे पदार्थ वृक्ष आहेत असे जाणारे जसे की इडली मैद्याचे सर्व पदार्थ कुरमुरे चुरमुरे लाह्या फुटाणे वाटाणे शेंगदाणे इत्यादी म्हणून या पदार्थांना शक्यतो तुपाची फोडणी देऊन ते पदार्थ खावेत किंवा त्याच्याबरोबर दर घासायला घोटघोटभर सिप बाय सिप पाणी पीत राहावे


आपण कितीही कोलेस्टेरॉल फॅट लिपीड याचा बागुलबुवा केला तरीही हे सत्य विसरून चालत नाही की शरीरातील प्रत्येक पेशी सेल याचे जे आवरण आहे ते प्रोटीन आणि फॅट यांनीच बनलेले असते त्यामुळे स्निग्ध पदार्थ खाण्याचे पूर्णतः टाळणे किंवा त्याची उणीव कमतरता करणे हे सर्वांगीण शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने निश्चितपणे घातक असते युरोपातील लोकांना भारतीय पद्धतीने केलेले तू ही प्रक्रिया ज्ञात नाही नव्हती गायीने म्हशीने खाल्लेला हिरवा चारा हा एकदा मानवी शरीराप्रमाणे पूर्णतः अन्नपचन होऊन तिच्या वासराच्या पोषणासाठी दूध या स्वरूपात गाई म्हशीच्या शरीरातून बाहेर येत अशा दुधाला विरजण लावून म्हणजे एक प्रकारची रासायनिक प्रक्रिया करून त्याचे दह्यात रूपांतर होते त्या दह्यातील घट्ट भागावरती घुसळणे ही यांत्रिकी मेकॅनिकल क्रिया होऊन ताकाची निर्मिती होऊन त्यातून लोणी हा पदार्थ तयार होतो या लोण्यावरती निर्द्रावीकरण डीहायड्रेशन अशी अग्नीची पुन्हा प्रक्रिया होऊन तूप तयार होते ज्याला युरोपीय लोक क्लारीफाईड बटर म्हणतात ही प्रक्रियाच मुळात चार ते पाच वेगळ्यावेगळ्या स्थित्यंतरातून जाते त्यामुळे अशा प्रकारे निसर्गतः त्याच्यावर इतके संस्कार झालेले आहेत ते तू प्राणीजन्य असल्यामुळे मानवी देहाला हानिकारक नसते. अर्थात नवीन शास्त्राच्या संशोधनाप्रमाणे शरीरातील किंवा आहारातील एकूण स्निग्ध पदार्थांचे प्रमाण हे 10 ते 40% इतके असावे 60 ते 70 किलो वजनाच्या माणसाला 60 ते 70 ग्रॅम पर्यंत रोज स्निग्ध पदार्थांची आवश्यकता असते आपण निश्चितपणे आज आपल्या आहारामध्ये इतके स्निग्ध पदार्थ घेत नाही म्हणून शक्य होईल तितके तेलाचे प्रमाण कमी करून घरी वरील भारतीय पारंपरिक शतकानू शतकांच्या पद्धतीप्रमाणे तयार केलेले तूप वापरणे चांगले बाजारात मिळणारी बहुतांश तूप ही दूध घुसळून तयार झालेल्या क्रीम पासून मिळणारे तू या स्वरूपाचे आहे बाजारात विकत मिळणारे डबाबंद तू हे दूध दही ताक लोणी तूप या पारंपारिक प्रक्रियेतून आलेले नसते त्यामुळे विकतच्या तुपावरती भले ते कितीही महाग असले तरीही किंवा गीर गायीचे असले तरीही विश्वास ठेवण्यापेक्षा आपल्या घरात जे कोणते दूध येते ते खळखळा उकळून त्यातील साईला योग्य पद्धतीने दीड ते दोन दिवस विरजण लावून त्याचे घट्ट पातळ असे विभाजन होईल इतके चांगले दही झाल्यानंतर त्यात समभाग ते दुप्पट पाणी घालून ते ब्लेंडर ने नव्हे रिपरणे नव्हे तर दोन्ही बाजूंनी क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज फिरणाऱ्या रवीने घुसळून त्याचे ताक करून त्यावर येणाऱ्या ताज्या लोण्याला कडून त्यातील बेरी गाळून येणारे रवाळ अतिशय सुगंधी किंचित पिवळसर पांढरे असे तूप आहारात निश्चितपणे प्रतिदिनिप्रती आहार उपयोगात आणावे.


स्निग्धता लिपीड फॅट तेल तूप लोणी साय दूध हे अल्प प्रमाणात काही प्रमाणात मर्यादित प्रमाणात शरीराला आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी निश्चितपणे आवश्यक आहे परंतु चीज बटर चॉकलेट मेयोनीज पेस्ट्री सॉस अशा स्वरूपातील फॅट मात्र शरीराला निश्चितपणे वर्ज आहे रेडमी याच्यामध्ये कोलेस्टेरॉल असते असा बागुलबुवा भीती अपसमज गैरसमज प्रवाद समाजामध्ये पसरलेला आहे परंतु त्याविषयी पुढील भागात सविस्तर आणि सहजपणे पटेल असे स्पष्टीकरण पाहूया



*या उपक्रमात लिहिल्या जाणाऱ्या लेखांमध्ये असणारी विधाने ही आयुर्वेद सिद्धांत व संहिता ग्रंथ यावर आधारित शास्त्रीय सत्य तथ्य अशा स्वरूपाची प्रायः असतात. _परंतु या लेखांमध्ये काही विधाने काही रूढी परंपरा इतिहास याविषयीची माहिती सामाजिक माहिती मनोरंजन वैयक्तिक मत वैयक्तिक आकलन वैयक्तिक समजूत अशा स्वरूपाची सुद्धा असू शकतात_*


*देहवाक्चेतसां चेष्टाः प्राक् श्रमाद्विनिवर्तयेत्।* 

आणि

*न पीडयेत् इंद्रियाणि*

हे दोन्ही श्लोक आपण एकत्र पहात आहोत.


_(डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.)_


त्वदीय वस्तु गोविंद 

तुभ्यम् एव समर्पये ।


तेरा तुझको अर्पण

क्या लागे मेरा ।


श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु।


🙏🏼

सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved

Copyright कॉपीराइट ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

MhetreAyurved@gmail.com 

www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/

 

रेड मीट Red Meat याच्यामध्ये कोलेस्टेरॉल असते , असा बागुलबुवा भीती अपसमज गैरसमज प्रवाद समाजामध्ये पसरलेला आहे ...

 *स्निग्ध पदार्थांचे भोजनातील प्रमाण : तेल तूप फॅट चरबी मेद लिपिड* 😇




~काले सात्म्यं लघु~ *स्निग्धम्* ~उष्णं क्षिप्रं द्रवोत्तरम्~ ।।

~बुभुक्षितो~ *अन्नम् अश्नीयात्* ~मात्रावद् विदितागमः~ ।


*अष्टांगहृदय सद्वृत्त : भाग 183*

15 जून 2024, शनिवार  

*उपविभाग 127* 


सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved

Copyright कॉपीराइट © लेखक : वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

MhetreAyurved@gmail.com 

www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/


*स्निग्ध पदार्थांचे भोजनातील प्रमाण : तेल तूप फॅट चरबी मेद लिपिड* 😇


~काले सात्म्यं लघु~ *स्निग्धम्* ~उष्णं क्षिप्रं द्रवोत्तरम्~ ।।

~बुभुक्षितो~ *अन्नम् अश्नीयात्* ~मात्रावद् विदितागमः~ ।


काल आपण वरील श्लोका मधील *काले सात्म्य लघु आणि बुभुक्षित* या चार शब्दांविषयी पाहिले होते.


*स्निग्ध* याबाबत आपण पुरेसे स्पष्टीकरण पाहिले.


कालच्या भागात व्हाईस टायपिंग करत असताना बरेचसे एडिशन संपादन शाब्दिक चुका सुधारण्याचे राहून गेले , त्याबद्दल खेद आहे.🙏🏼


अन्नम् अश्नीयात् म्हणजे अन्न खावे, भोजन करावे जेवण घ्यावे, अन्न सेवन करावे


 रेड मीट Red Meat याच्यामध्ये कोलेस्टेरॉल असते ,

असा बागुलबुवा भीती अपसमज गैरसमज प्रवाद समाजामध्ये पसरलेला आहे ...

परंतु त्याविषयी आजच्या भागात सविस्तर आणि सहजपणे पटेल असे स्पष्टीकरण पाहूया


आधुनिक वैद्य किंवा मॉडर्न मेडिसिन याचे सर्व रिसर्च हे प्रायः युरोप अमेरिका येथून आपल्याकडे पोहोचतात. मॉडर्न मेडिसिन मध्ये भारतातील स्थानिक डॉक्टरांनी काही भरीव रिसर्च केल्याची उदाहरणे अत्यल्प आहेत. त्यामुळे भारत किंवा महाराष्ट्र येथील वातावरणाशी सुसंगत अशा प्रकारचे आरोग्य नियम असणे किंवा ते युरोप अमेरिकेतील वातावरणानुसार असले, तरी आपल्याला लागू पडणारे आहेत की नाही, याची पडताळणी करणे, आवश्यक आहे.


रेड मीट मध्ये कोलेस्ट्रॉल असते हे युरोपीय अमेरिकन माणसांच्या दृष्टीने योग्य निरीक्षण आहे. कारण तेथे जे रेड मीट खाल्ले जाते, ते प्रायः पोर्क म्हणजे डुक्कर, बीफ म्हणजे बैल म्हैस किंवा लॅम्ब शीप मेंढी याचे असते.

आपण कधीतरी डुक्कर बैल मेंढी यांना कृश किडकिडीत बारीक असे पाहिले आहे का ?

तर कधीच नाही !!

हे तीनही प्राणी बऱ्यापैकी पुष्ट असे असतात.

आयुर्वेद शास्त्रात तर पुष्ट होणे याला ... वराह इव पुष्यति ... डुकराप्रमाणे पोषण होणे पोसला जाणे = जाड होणे, अशीच उपमा आहे.


तर युरोप अमेरिकेमध्ये ज्या प्रकारच्या प्राण्यांचे मांस खाल्ले जाते, ते प्राणी मुळातच लठ्ठ जाड गुबगुबीत अधिक मेद असणारे असेच असतात...

परंतु भारतामध्ये प्रायः किमान महाराष्ट्रामध्ये तरी आपण बकरी बोकड शेळी याचे मांस अधिक्याने खातो.


आपण कधीतरी शेळी जाडजूड गुबगुबीत लठ्ठ पाहिली आहे का ?

तर नाही ... शेळी ही सतत इकडे तिकडे फिरत असते आणि प्रायः ती कडवट पाला खात असते ... त्यामुळे शास्त्रामध्ये शेळीचे मांस हे लघु म्हणजे पचण्यास सहज हलके असे सांगितले आहे 

आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेळीच्या शरीरातील सर्वच अवयव सर्वच धातू घटक हे मनुष्य शरीराप्रमाणे असतात, असे आयुर्वेद शास्त्र सांगते.


शरीर धातु सामान्यात् अनभिष्यन्दि बृंहणम्


याच्या अगदी विरुद्ध ... मेंढीचे म्हणजे बोलाईचे म्हणजे लॅम्ब शीप हिचे मांस असते ... आणि नेमके अशाच प्रकारचे लॅम्ब शीप किंवा त्याहीपेक्षा अधिक चरबी फॅट मेद असलेले मांस युरोप अमेरिकेमध्ये खाल्ले जाते.


प्राण्यांच्या शरीरातील मांसाचा मसलचा जाडपणा जितका जास्त, जितका त्यातून येणारा कोलेस्टेराॅलचा अंश जास्त असतो ... त्यामुळे डुक्कर बैल मेंढी यांच्या मांसातून म्हणजे सो कॉल्ड रेड मीट मधून कोलेस्टेरॉल वाढणे हे शक्य असते, हे युरोप अमेरिकेतील माणसांच्या दृष्टीने योग्य निरीक्षण आहे !


*परंतु भारतातील किंवा महाराष्ट्रातील शेळी बोकड बकरी अशा प्रकारचे कृश कमी जाडीचे मसल मांस खाणाऱ्या व्यक्तींना अशा प्रकारच्या कोलेस्टेरॉलची भीती बाळगण्याचे कारण नाही.*


त्यातही ज्यांना अधिकच साशंकता आहे सावधानता बाळगायची आहे ...

त्यांनी शेळीचे सुद्धा मांस खाताना , गर्दन मांडी खिमा असे जाडजूड मसल्स असलेले बोनलेस मांस खाण्याऐवजी ...

शक्यतो सीना चाॅप अशा प्रकारातील मणके व बरगड्या यांच्याशी जोडलेले पातळ कमी जाडीचे मसल असणारे मांस खाणे आरोग्यासाठी हितकर आहे 


आणि त्यातून कोलेस्टेरॉल वाढणार नाही ...

उलट चांगल्या प्रतीचे प्रोटीन शरीराला हितकारक आरोग्य रक्षक असा अन्न अंश त्यातून लाभतो.


जोपर्यंत आपण रॉजर डेव्हिड जॉन मायकेल यांनी युरोप अमेरिका येथे बसून लिहिलेल्या गोष्टींवर डोळे झाकून विश्वास ठेवू ...

तोपर्यंत आपल्याला आपल्याकडील आहाराबाबत साशंकता येणार विश्वास राहणार नाही 


परंतु त्या त्या वातावरणातील तीव्रतेनुसार 

त्या त्या ठिकाणचे स्थानिक आरोग्य नियम हे अनुकूल प्रतिकूल अशा पद्धतीने बदलू शकतात ,

हे लक्षात घेणे आवश्यक आहे.


अत्यंत थंडी असल्यामुळे युरोप अमेरिकेतील माणसे थ्री पीस सूट घालतात , नेक टाय लावतात , सॉक्स घालतात , शूज घालतात, वूडन फ्लोअर वापरतात, सिगरेट फुंकतात , मद्य पितात, घरामध्ये त्यांच्या सतत लाकडी ओंडके जळत ठेवलेले असतात ... याचाच अर्थ अत्यंत थंडीपासून बचावाचे सर्व उपाय ते करतात ...


म्हणजे मग येथे भारतात महाराष्ट्रात चाळीस डिग्री 40° मध्ये सुद्धा भर मार्चमध्ये लग्न करत असताना लाजा होम करताना समोर अग्नि पेटलेला असताना, आपण थ्री पीस सूट घालून बसावे हे हास्यास्पद नव्हे का ???


हाच नियम युरोप अमेरिकेतून येणाऱ्या मॉडर्न मेडिसिनच्या अंतर्गत असणाऱ्या सर्व बाबींना लावून पहावा ... त्याची पडताळणी आपल्या येथील स्थानिक वातावरण , उपलब्ध अन्नपदार्थ याच्याशी सुसंगतपणे करून, मगच त्यांच्या स्वीकार किंवा त्यात योग्य तो बदल करावा, हे सुज्ञपणाचे होय 


*अर्थात मी या लेखामध्ये असे लिहिले म्हणजे लगेच उद्या क्रांती होईल आणि संपूर्ण भारतभरातील लोकांचे मॉडर्न मेडिसिनच्या डॉक्टरांचे किंवा मुळात ज्यांच्या डोक्यात घट्ट गैरसमज बसलेले आहेत , त्यांचे मत बदलेल , असा माझा समज नाही ...*

परंतु जे योग्य आहे , ते मांडण्याचा प्रयत्न करणे समाज हिताच्या दृष्टीने, मी माझे कर्तव्य समजतो.


स्निग्ध याच्याबाबत , पुढे ...

जसे चांगले स्निग्ध पदार्थ म्हणजे तूप आहे 


तसे सर्व तेले वाईटच असतात असे जाणावे. खाण्यायोग्य तसे आज मार्केटमध्ये कुठलेही तेल उपलब्ध नाही.

सर्व विकत मिळणाऱ्या तेलांमध्ये अनेक प्रकारची तेले ब्लेंड मिक्स केलेली असतात. पाम तेल हे तर बहुतांश तेलाचा अंश असतेच असते.


त्यामुळे तेल कुठले चांगले ? याचे उत्तर *कुठलेही नाही* असेच द्यावे लागते. 


तेल हा शब्द मुळात तिळ यापासून आलेला आहे. म्हणजे तिळाचे तेल वापरावे असा त्याचा अर्थ होतो. पण महाराष्ट्रासारख्या प्रदेशात तिळाचे तेल उष्ण पडते. आणि उत्तर भारतात त्यापेक्षा उष्ण असलेले मोहरीचे म्हणजे सरसो का तेल वापरले जाते. तर अति उष्ण असलेल्या दक्षिणेकडच्या किनारी भागात शीत थंड असणारे खोबरेल तेल वापरले जाते. मागील दोन-तीन पिढ्यापासून महाराष्ट्रात शेंगदाणा तेल वापरले जात असे ... तर या पिढीमध्ये सर्रास सनफ्लॉवर किंवा दर महिन्याला तेल बदलणे असेही उद्योग केले जातात.


परंतु खऱ्या अर्थाने जर आरोग्याची जपणूक करायची असेल तर ...


*तेलाचा वापर शून्य टक्के करून*

*शंभर टक्के घरी तयार केलेल्या दूध विरजण दही ताक लोणी तूप या प्रक्रियेतून घरात तयार केलेल्या शुद्ध साजूक तुपाचा स्वयंपाकासाठी फोडणीसाठी तळण्यासाठी वापर करणे हे आरोग्य दृष्ट्या 100% सुरक्षित आहे*.


तुपाव्यतिरिक्त बाजारात मिळणारी सर्व तेले ही आरोग्यासाठी हितकर नसतील तर ...

त्या व्यतिरिक्त बाजारात असणारे अनेक प्रकारचे स्निग्ध पदार्थ म्हणजे बटर चीज वनसपति तूप = हायड्रोजनेट ऑईल खवा क्रीम स्प्रेड याबाबत तर काही बोलायचीच आवश्यकता नाही. 


वनस्पती तूप = ज्याला मागच्या पिढीमध्ये डालडा म्हणत असत परंतु डालडा हे वनस्पती तुपाचे ब्रँड नेम आहे ... जसे दात घासायच्या पेस्टला सर्रास कोलगेट किंवा धुण्याच्या पावडरला निरमा म्हणण्याची पद्धत होती, इतके ते ब्रँड नेम त्या वस्तूशी एकरूप झालेले होते.


या सर्वांचे प्रमाण हे केव्हातरी आणि अत्यल्प = क्वांटिटी आणि फ्रिक्वेन्सी या दृष्टीने कमीत कमी नगण्य किंवा खरंतर शून्य असणे हेच योग्य आहे.


तेल आणि तूप यांच्या बाबत शास्त्रात एक वैशिष्ट्यपूर्ण भेद सांगितलेला आहे ते म्हणजे तुपात तयार केलेले सर्व पदार्थ हे दृष्टीसाठी हितकर असतात आणि तेलात तयार केलेले सर्व पदार्थ दृष्टीसाठी हानिकारक असतात अर्थात यातील तेल हे तिळतेल अभिप्रेत आहे आज मात्र इतक्या प्रकारची तेले वापरली जातात की त्यांचा दृष्टीवर काय परिणाम होतो हा संशोधनाचा विषय आहे परंतु *तुपात पदार्थ तयार केले असता ते आपल्या दृष्टीला दीर्घकाळपर्यंत सक्षम ठेवतील ही लाभाची गोष्ट त्यातून लक्षात घेण्याजोगी व आचरणात आणण्याजोगी निश्चितपणे आहे*


स्निग्ध किंवा प्रत्यक्ष तेलकट तळलेले फ्राईड असे पदार्थ न खाता सुद्धा ...

शरीरात तेलकट पदार्थ = मेद = फॅट = लिपिड हे तयार होतातच !!!


आपण जी शुगर ग्लुकोज कार्बोहायड्रेट खातो ...

परंतु ते आपल्या हालचालीसाठी व्यायामासाठी वापरत नाही ... तर त्याचे रूपांतर हळूहळू तेलामध्ये/fat/lipid होत जाते म्हणजे लिपिड्स मध्ये होत जाते.


म्हणूनच हळूहळू ढेरी सुटते , सीट चा आकार वाढतो, कमरेचा घेर वाढतो, लोंबळणारे टायर दिसू लागतात, दंड थुलथुलित होतात , डबल चीन दिसते ,मानेभोवती मेद जमा होतो ...

आणि एकूणच माणसाचा आकार गोल गरगरीत होत जातो.


त्याचे कारण ...

तो प्रत्येक वेळेला तेल तूप खातो असे नसून...

त्याच्या हालचालीला व्यायामाला आवश्यक आहे, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात, 

गोड पदार्थ दूध फळे ड्रायफ्रूट किंवा अगदी रोजची भाकरी चपाती पोळी रोटी भात यातूनही ...

जी शुगर ग्लुकोज कार्बोहायड्रेट शरीरात जाते ... 

ती जर रोजच्या व्यायाम हालचाल यासाठी वापरली गेली नाही ...

*तर त्याचे रूपांतर हळूहळू शरीरातील चरबी मेद फॅट लिपिड यामध्ये होत असते.*


साधारणतः माणसाच्या वजनाच्या प्रति किलो 1 ग्रॅम पर्यंत फॅट प्रतिदिनी आहारात असायला हवे, असे शास्त्र सांगते. याचा अर्थ सर्वसाधारण 60 किलो वजन असलेल्या माणसाने रोज 60 ग्रॅम पर्यंत स्निग्ध पदार्थ = खरंतर घरी तयार केलेले लोणकढी शुद्ध साजूक तूप आपल्या आहारात खायला हवे. हे त्याच्या दीर्घकालीन आरोग्यासाठी हितकारक आहे, अर्थात यासोबत प्रतिदिनी एक तास सर्वांगीण मस्क्युलर व्यायाम करणे आवश्यक आहे, _सायकलिंग जिम रनिंग किंवा योगा प्राणायाम नव्हे!_


म्हणून स्निग्ध भोजन घ्यावे याचा अर्थ एकूण आहाराच्या म्हणजे जेवणातील एकूण अन्नपदार्थांच्या दहा ते वीस टक्के पर्यंत, घरी तयार केलेल्या लोणकढी शुद्ध साजूक तुपाचा वापर आपल्या आहारात भोजनात असावा ...


या व्यतिरिक्त चे सर्व प्रकारचे स्निग्ध पदार्थ फॅट असलेले पदार्थ हे टाळावेतच , हेच योग्य आहे


*या उपक्रमात लिहिल्या जाणाऱ्या लेखांमध्ये असणारी विधाने ही आयुर्वेद सिद्धांत व संहिता ग्रंथ यावर आधारित शास्त्रीय सत्य तथ्य अशा स्वरूपाची प्रायः असतात. _परंतु या लेखांमध्ये काही विधाने काही रूढी परंपरा इतिहास याविषयीची माहिती सामाजिक माहिती मनोरंजन वैयक्तिक मत वैयक्तिक आकलन वैयक्तिक समजूत अशा स्वरूपाची सुद्धा असू शकतात_*


*देहवाक्चेतसां चेष्टाः प्राक् श्रमाद्विनिवर्तयेत्।* 

आणि

*न पीडयेत् इंद्रियाणि*

हे दोन्ही श्लोक आपण एकत्र पहात आहोत.


_(डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.)_


त्वदीय वस्तु गोविंद 

तुभ्यम् एव समर्पये ।


तेरा तुझको अर्पण

क्या लागे मेरा ।


श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु।


🙏🏼

सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved

Copyright कॉपीराइट ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

MhetreAyurved@gmail.com 

www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/

 

*ड्राय फ्रुट खावेत , ड्राय नट्स नव्हे ... स्निग्ध पदार्थांचे भोजनातील प्रमाण* 😇

 *ड्राय फ्रुट खावेत , ड्राय नट्स नव्हे ... स्निग्ध पदार्थांचे भोजनातील प्रमाण* 😇


👆🏼🚫❌️⛔️👆🏼


👇🏼✅️👌🏼



~काले सात्म्यं लघु~ *स्निग्धम्* ~उष्णं क्षिप्रं द्रवोत्तरम्~ ।।

~बुभुक्षितो~ *अन्नम् अश्नीयात्* ~मात्रावद् विदितागमः~ ।


*अष्टांगहृदय सद्वृत्त : भाग 184*

25 जून 2024, मंगळवार  

*उपविभाग 128* 


*ड्राय फ्रुट खावेत , ड्राय नट्स नव्हे ... स्निग्ध पदार्थांचे भोजनातील प्रमाण* 😇


अनेक जण आरोग्य विषयी अति जागरूक असतात! किंवा कुठेतरी वाचलेलं, फॅड/ फॅशन म्हणून... आरोग्याला चांगलं असतं अशा समजा पोटी, रात्री भिजवलेले बदाम खाणे किंवा काजू पिस्ता अक्रोड असे ड्रायफ्रूट(?) = नट्स खाणे अशी सवय असते.


प्रत्यक्षात बदाम काजू पिस्ता अक्रोड हे ड्रायफ्रूट नसून, *"ड्राय नट्स आहेत"* या चारही बिया कठीण कवचाच्या आत असतात, त्या फोडून काढाव्या लागतात ... म्हणून त्यांना ड्राय नट्स किंवा नट्स असे म्हणतात. खऱ्या अर्थाने ड्रायफ्रूट ही स्पर्शाला तुलनेने मऊ असतात, यामध्ये अंजीर काळे मनुके आणि जर्दाळू यांचा समावेश होतो.


ज्यांना मुळात ओबेसिटी शुगर कोलेस्टेरॉल बीपी आहे, त्यांनी असे ड्राय नट्स खाण्याचे टाळावे... कारण त्यांच्या शरीरात आधीच मोठ्या प्रमाणावर स्निग्ध पदार्थ कार्बोहायड्रेट्स साठून राहिलेले असतात ... तेच त्यांनी आधी योग्य तितका पुरेसा व्यायाम करून वापरून काढावेत. आधीच ओबेसिटी शुगर कोलेस्टेरॉल बीपी असताना पुन्हा अशा प्रकारचे खाणे म्हणजे साठलेल्या गोदामात अजून भर घालण्यासारखे असते.


वाढत्या वयातल्या मुलांना ड्राय नट्स द्यावेत असा एक समज असतो, परंतु त्यांची तेवढी पचनशक्ती आहे का... रोजची तेवढी हालचाल व्यायाम मैदानी खेळ आहे का ... त्यांना इतर उष्णतेचे आजार नाहीत ना ... याची खात्री करून, मगच अशा प्रकारचे ड्राय नट्स त्यांना द्यावेत.


मुळात उष्णतेचे आजार असतील, अपचन असेल, ॲसिडिटी मुळव्याध गॅसेस मलावरोध असे पचनाचे किंवा उष्णतेचे आजार असतील, तर ड्राय नट्स खाऊ नयेत.


ड्राय फ्रुट्स म्हणजे अंजीर आणि काळ्या मनुका ह्या योग्य ऋतूमध्ये ताज्या ओल्या स्वरूपातही मिळतात.

जेव्हा त्यांचा सिझन नसेल, तेव्हा सुके अंजीर आणि सुकलेले काळे मनुके हे रात्री भिजवून सकाळी खाणे योग्य असते.


अंजीर साधारण एक ते दोन रोज 

आणि काळे मनुके हे प्रत्येकी 20 तीनही जेवणाच्या सुरुवातीला खावेत म्हणजे रात्री भिजवतानाच साठ 60 काळे मनुके (तपकिरी पिवळे बेदाणे सीडलेस नव्हे) भिजवून ठेवावेत.

सकाळी भिजवलेले पाणी ओतून द्यावे म्हणजे काळ्या मनुकांच्या वर मारलेले केमिकल त्यात विरघळून निघून जातात.


काजू पिस्ता बदाम अक्रोड हे ड्राय नट्स अतिशय उष्ण आणि पचायला खूप जड आहेत.

त्यामुळे हे चार पदार्थ खाण्याचा योग्य कालावधी म्हणजे थंडीचे चार महिने 15 नोव्हेंबर ते 15 मार्च! इतकाच असतो असे लक्षात असू द्यावे.


अन्य ऋतूंमध्ये हे चारही पदार्थ उष्ण पडतात (विशेषतः मार्च एप्रिल मे आणि ऑक्टोबर या काळात) तर वर्षा ऋतू म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात हे पचायला जड असतात ...

त्यामुळे मला परवडतात, मला सवय आहे असे म्हणून रेटून खाल्ले तरी प्रत्यक्ष शरीराला त्याचा काहीही उपयोग होत नाही ... ते फक्त कमोडवाटे वाहून जातात इतकंच !


वस्तुतः या अतिशय महागड्या ड्राय नट्सच्या तुलनेत, स्वस्त आणि निश्चितपणे समकक्ष पोषणमूल्य आणि आरोग्य लाभ असलेली अन्य आहार द्रव्ये म्हणजे तीळ, खोबरे , काही प्रमाणात शेंगादाणे हे आहेत.


या तीनही स्निग्ध पदार्थांमध्ये पुरेशा प्रमाणात फॅट प्रोटीन फायबर कॅल्शियम अशा सर्व आरोग्य रक्षक बाबी असतात.

हे स्निग्ध तीनही पदार्थ आपल्याला रोजच्या फोडणीमध्ये भाजी करताना किंवा त्याची चटणी करून व्यंजन म्हणून दोन-चार घासानंतर मध्ये मध्ये लेहन चाटण या स्वरूपात खाणे योग्य असते.

अशा चटण्यांसोबत तेल किंवा तूप घ्यावे तीळ हे उष्ण आहेत म्हणून थंडीच्या दिवसात खोबरे हे शीत आहे म्हणून उन्हाळ्याच्या दिवसात आणि शेंगदाणे हे समशीतोष्ण आहेत म्हणून प्रायः बाराही महिने थोड्या प्रमाणात खाणे योग्य असते.


खोबरे हे ओले या स्वरूपात म्हणजे ओला नारळ (शहाळे नव्हे) फोडून त्याचे आठ भाग करून ते किसून किंवा खोवून किंवा तसेच किंवा समभाग गुळा बरोबर (मोदकाचे सारण करतात तसे करून) जेवणाच्या सुरुवातीला खाल्ले असता ... एका आठवड्यात एक ओला नारळ पूर्ण होतो ... अशा प्रकारचे सेवन हे अस्थि संधी मांस मेद मज्जा अशा सर्वच धातूंचे पोषण करणारे असते.


जेवणामध्ये किंवा मोदकाच्या सारणामध्ये काही प्रमाणात खसखस असणं, हे उपयोगी असतं ... परंतु खसखस ही अति प्रमाणात संडास घट्ट करणारी आणि गुंगी आणणारी आहे. काही मिडल ईस्ट देशांमध्ये याच्यावर पूर्णतः बंदी आहे.


अहळीव किंवा हळीव हे सुद्धा काही प्रमाणात उपयोगी आहेत पण थंडीच्या दिवसात !!!


अनेक लोक कुठेतरी वाचून फ्लेक्स सीड्स म्हणजे अतसी= अळशी च्या बिया खातात ... परंतु शास्त्रामध्ये या सर्वात कनिष्ठ किंवा वर्ज्य त्याज्य म्हणून सांगितलेले आहेत. म्हणून शक्यतो फ्लेक्स सीड्स खाऊ नयेत.


त्या पेक्षा, *प्रतिदिनी तीळ खाणे हा उत्तम पर्याय आहे* आपल्या एका मुठीत मावतील इतके तीळ (शक्य असल्यास काळे; न मिळाल्यास पांढरे ... काळे तीळ अनेकदा नकली असतात) दाताने चावून चावून खावेत... सकाळी रिकामी पोटी! त्यावर एक कप साधे पाणी प्यावे (गार गरम नव्हे)आणि त्यानंतर एक तास काहीही खाऊ नये ... अशा पद्धतीने शरीराची पुष्टी चांगल्या प्रकारे होते आणि दीर्घकाळपर्यंत दात मजबूत बळकट राहणे शक्य असते


*या उपक्रमात लिहिल्या जाणाऱ्या लेखांमध्ये असणारी विधाने ही आयुर्वेद सिद्धांत व संहिता ग्रंथ यावर आधारित शास्त्रीय सत्य तथ्य अशा स्वरूपाची प्रायः असतात. _परंतु या लेखांमध्ये काही विधाने काही रूढी परंपरा इतिहास याविषयीची माहिती सामाजिक माहिती मनोरंजन वैयक्तिक मत वैयक्तिक आकलन वैयक्तिक समजूत अशा स्वरूपाची सुद्धा असू शकतात_*


*देहवाक्चेतसां चेष्टाः प्राक् श्रमाद्विनिवर्तयेत्।* 

आणि

*न पीडयेत् इंद्रियाणि*

हे दोन्ही श्लोक आपण एकत्र पहात आहोत.


_(डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.)_


त्वदीय वस्तु गोविंद 

तुभ्यम् एव समर्पये ।


तेरा तुझको अर्पण

क्या लागे मेरा ।


श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु।


🙏🏼

सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved

Copyright कॉपीराइट ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

MhetreAyurved@gmail.com 

www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/

 

काहीही खा! कसंही खा! कितीही खा! कधीही खा! मजा करा !! ऐश करा !!! 🙃😇😃

 काहीही खा! कसंही खा! कितीही खा! कधीही खा! मजा करा !! ऐश करा !!! 🙃😇😃



*अष्टांगहृदय सद्वृत्त : भाग 186*

27 जून 2024, बुधवार  

*उपविभाग 128* 


लेखक : वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे


काहीही खा! कसंही खा! कितीही खा! कधीही खा! मजा करा !! ऐश करा !!! 🙃😇😃


जीवन जगताना किती नियम पाळायचे ?

काय काय लक्षात ठेवायचं ?

किती काळजी घ्यायची ? सारखं सारखं हे करू नको, ते खाऊ नको, हे खाल्लं तर असं होईल, ते खाल्लं तर तसं होईल ...अशी किती भीती बाळगायची?

आणि कितीही सावधगिरी बाळगली तरी, आपण थोडेच अजरामर होणार आहोत?... 

असा एक बंडखोर किंवा चुकार किंवा बेशिस्त किंवा एक उनाड विचार, कधी न कधी, प्रत्येकाच्या मनात येतोच ..


आणि तसं पाहिलं तर कोणालाच शिस्त पूर्णपणे पाळणं आवडतही नसतं आणि शक्यही नसतं!!!


आदर्श स्थितीत जर सर्वांनी आरोग्याचे नियम पाळले असते, तर आजार झालेच नसते ...

आणि डॉक्टरांचा व्यवसाय सुद्धा चाललाच नसता! 


त्यामुळे कितीही प्रबोधन केलं तरी ...

मन विचार बुद्धी भावना या उच्छृंखलपणाकडे , बंधन मोडण्याकडे, मोहाच्या क्षणांकडे , लोभाच्या बाबींकडे धाव घेणारच!


मन वढाय वढाय

उभ्या पिकातलं ढोर,

किती हाकला हाकला

फिरी येतं पिकावर


ही बहिणाबाईंची कविता अगदी प्रतिक्षणी प्रत्ययास येणारी आहे!


न खाऊन मरण्यापेक्षा, खाऊन मेलेलं काय वाईट!?!? 😆😵‍💫😇


एक असाही विचार आहे की समजा...

मी सर्व पथ्य पाळली, हितकारक तेवढेच अन्न खाल्लं, व्यायाम केला, झोपेच्या वेळा पाळल्या... असं सगळं शिस्तबद्ध वागलो ... तर काय होईल?


... तर मला दीर्घायुष्य मिळेल ...

पण जे दीर्घायुष्य मिळेल ... 

त्यात जे माझ्या आयुष्यातले दिवस वाढणार आहेच,

ते माझ्या म्हातारपणातले दिवस वाढणार आहेत.


आणि त्या म्हातारपणातल्या वाढू शकणाऱ्या दिवसांसाठी,

मी माझ्या तारुण्यातल्या मौजमजा करण्याच्या दिवसांवरती का बरे नियंत्रण घालू? 

तारुण्यात मी घेऊ शकणाऱ्या आनंदा पासून मी स्वतःला का वंचित ठेवू? 

असा प्रश्न प्रत्येकाला पडतो !!!


याचं खरं उत्तर असं आहे की पथ्य पाळण्याची गरज, शिस्त पाळण्याची गरज, आहार व्यायाम यांचा विचार करण्याची गरज ... *प्रत्येकालाच नसते*.


जी माणसं ...

👇🏼

दीप्ताग्नयः खराहाराः कर्मनित्या महोदराः ।

ये नराः प्रति तांश्चिन्त्यं नावश्यं गुरुलाघवम् ॥

👆🏼

याप्रमाणे असतात ...

त्यांनी कुठलंही पथ्य नाही पाळलं तरी चालतं!!! 


व्यवहारातही आपल्याला अनेकदा असं दिसतं की, काही माणसं कुठलंच पथ्य पाळत नाहीत, कसलाच नियमितपणा त्यांच्या वागण्यात नसतो ... खाण्यापिण्यात त्यांच्या अत्यंत बेशिस्तपणा असतो, तरीही त्यांना कसलाही आजार होत नाही ... ते चांगले ठणठणीत टुणटुणीत असतात !


आणि सर्व गोष्टींची काळजी घेऊनही, शिस्तबद्ध वागूनही, काही माणसांना मात्र सातत्याने कुठल्या ना कुठल्या समस्यांना पुन्हा पुन्हा सामोरे जावे लागते किंवा एखादी फार मोठी अनपेक्षित भयंकर समस्या स्वास्थ्य विषयक त्यांच्यासमोर उभी रहाते. 


_याची उत्तरं जशी आहार विहारात आहेत,

तशी काही प्रमाणात त्याची उत्तरं नियती कर्मविपाक यामध्ये सुद्धा आहेत, पण तो आत्ताचा विषय नसल्यामुळे ते बाजूला ठेवू ..._


मुळात ज्यांची परिस्थिती वरती सांगितलेल्या श्लोका प्रमाणे असते ...

त्यांनी कुठल्याही प्रकारच्या पथ्य अपथ्य यांचा विचार करण्याची, अन्नपदार्थ आहार यांच्या बाबतची सावधगिरी फारशी बाळगण्याची आवश्यकता नसते !


✅️ *दीप्ताग्नयः* ... ज्यांची पचनक्षमता चांगली आहे = जे काहीही पचवू शकतात


✅️ *खराहाराः* ... ज्यांनी मिळेल / त्या अनेक प्रकारचा आहार खाल्लेला आहे किंवा विविध ठिकाणच्या विविध प्रकारच्या आहार खाण्याची ज्यांना सवय आहे ... ज्याला ग्रामीण भाषेत बारा गावचं पाणी पिलेला माणूस, असं म्हणतात.


✅️ *कर्मनित्या* ... जे सतत कार्यमग्न असतात, विशेषतः जे शारीरिक कामात व्यग्र असतात.


✅️ *महोदराः* ... ज्यांची भूक मोठी आहे, जास्त आहे, ज्यांची आहार क्षमता जास्त आहे.

👇🏼

ये नराः प्रति तांश्चिन्त्यं नावश्यं गुरुलाघवम् ॥

अशा लोकांना आहाराच्या बाबतीतली पथ्याऽपथ्य पाळणं, फारसं आवश्यक नसतं!!


व्यायाम स्निग्ध दीप्ताग्नि वयःस्थ बलशालिनाम्। 

विरोध्यपि न पीडायै सात्म्यमल्पं च भोजनम्॥


जे प्रतिदिनी नियमित व्यायाम करतात ...

ज्यांच्या आहारामध्ये पुरेसे स्निग्ध पदार्थ असतात ...

ज्यांची पचनक्षमता अतिशय चांगली आहे ...

जे तरुण वयात आहेत (म्हणजे साधारणता 20 ते 30 या वयामध्ये आहेत) ...

जे मूलतः बलशाली आहेत , सामर्थ्यवान आहेत , शक्ती संपन्न आहेत , ज्यांच्या शरीराची ठेवण ही घट्ट स्टाउट मजबूत दणकट आहे ...


अशा लोकांना चुकीचा आहार केला तरी सुद्धा, तो जर अल्प प्रमाणात असेल आणि सवयीचा असेल तर, तो फारसा बाधत नाही


अर्थातच वरील सर्व स्थिती असली तरी ...

आपण जो बेशिस्त नियमबाह्य अहितकारक असा चुकीचा आहार विहार करणार आहोत ...

त्याचे *प्रमाण आणि त्याची वारंवारिता = क्वांटिटी आणि फ्रिक्वेन्सी ही "कमी" असायला हवी ... 📅कधीतरी आणि 🤏🏼 थोडसं* अशा प्रकारचं बेशिस्त वागणं किंवा बेशिस्त आहार हा लगेच अहितकारक होत नाही.


म्हणूनच *मन मारू नये, अति करू नये* असा *सुवर्ण मध्य* साधूनच, जो काही बेशिस्तपणा उनाडपणा नियमबाह्यपणा उच्छृंखलपणा करायचाय, तो करावा!!


अगदी आमचंच बालपणीच उदाहरण घेतलं तर, फिल्टरचं पाणी आयुष्यात पहिल्यांदा वयाच्या अडतीसाव्या वर्षी प्यायलो. बालपणी तर शेतामध्ये न बांधलेली पडीक विहीर की ज्याच्यामध्ये शेतातल्या सगळ्या चिखलाचं पाणी, विहिरीच्या बाजूला असलेल्या झाडाचा पालापाचोळा, त्यावर राहणाऱ्या पक्षांचे मलमूत्र, क्वचित शेतातली गांडूळं उंदीर साप हेही त्या पाण्यात जाऊन मिसळत असत... अशा पडीक विहिरीतलं पाणी की, जे बऱ्याच वेळेला विहिरीतल्या शेवाळामुळे हिरवट दिसायचं ... असं पाणी पिऊन बालपण गेलेलं आहे. 

परंतु वयाच्या 24 व्या वर्षापर्यंत हॉटेलचं काहीही खाल्लेले नाही, घरचं आईच्या हातचं सात्विक जेवण खाऊन पोसलेला हा देह !

त्यामुळे त्यानंतर अनेक प्रकारचं पाणी/ खाणं, अनेक ठिकाणी प्रवास झाला... क्लासच्या निमित्ताने, दर आठवड्याला, पुणे मुंबई कोल्हापूर नाशिक असं बारा वर्षे, दर आठवड्याला, पंधराशे किलोमीटर प्रवास झाला, तोही लालपरी एसटी एशियाड ने ! कुठलं कुठलं पाणी, कुठलं कुठलं आहार खाल्ला गेला ... पण ईश्वर कृपेने , आई-वडिलांच्या पुण्याइने , त्यांनी दिलेल्या आरोग्य संपन्न देहाला कसलीही बाधा झाली नाही, हे वरती दिलेल्या श्लोकातील नियमाचे एक अपवादात्मक उदाहरण आहे, असं समजा !

परंतु , यासाठी बालपणी काही नियम पाळलेले असणं, आवश्यक असतं !

भगवंताने तुम्हाला उत्तम देह देणे, आई-वडिलांच्या पुण्याईने तुम्हाला उत्तम देह लाभणं , याही गोष्टी जुळून येणं , आवश्यक असतं!!! 


२० ते ३० या वयात पुरेसा व्यायाम केलेला असणं आवश्यक असतं, अख्खं बालपण आणि डिग्री पूर्ण होईपर्यंत, प्रतिदिनी 18 किलोमीटर सायकलिंग, हे सर्व ऋतूंमध्ये... कॅप नाही, रेनकोट नाही, स्वेटर नाही, शूज नाही ... अशा परिस्थितीत गेलेले असल्याने , तरुण वय, व्यायाम, कुठल्याही प्रकारचा आहार & पाणी ... असं सगळं जुळून आल्यामुळे आणि पूर्व कर्म कदाचित चांगलं असल्यामुळे, भगवंताच्या कृपेने, आई-वडिलांच्या आशीर्वादाने ... कुठल्याही प्रकारचा मोठा आजार झाला नाही ... हे सुदैव!!


मानवी जीवनातील तारुण्याचा काळ हा 20 ते 30 हे वय आहे.

या वयात जर उत्तम व्यायाम केलेला असेल, चांगल्या प्रतीचे सात्विक अन्न खाल्लेले असेल ...

तर प्रायः पथ्याऽपथ्य नाही पाळले तरी चालते...

परंतु तरीही चाळिशी नंतर शरीर हे पडझड होण्याच्या मार्गाला लागते.


त्यामुळे चाळिशी नंतर, 

आपण पूर्वी केलेल्या सर्व बेशिस्त उच्छृंखल उनाड अनियमित अशा सर्व गोष्टी, 

शरीराला *व्याजासहित परतफेड कराव्या लागतात*.


चाळिशीच्या आधीही, अगदी बालपणापासूनच, काही व्यक्तींनी पथ्य अपथ्य यांची काळजी घेणे आवश्यक असते !!


अशा व्यक्ती म्हणजे ज्यांच्या घरात आनुवंशिकतेने काही दीर्घ व गंभीर आजार होण्याचा इतिहास आहे ... विशेषतः डायबिटीस बीपी हार्ट डिसीज त्वचारोग ओबीसीटी मूळव्याध पाइल्स भगंदर अशा प्रकारची यांची कौटुंबिक इतिहास / हिस्ट्री आहे ...

त्यांनी प्रथमपासूनच असे आजार होणार नाहीत, यासाठी योग्य ती सावधगिरी /काळजी ;

आहार आणि विहाराच्या बाबतीत घेणे आवश्यक असते.


त्यामुळे शक्य होईल तेवढं , सावध राहून , हितकारक बाबींकडेच आपल्या आहाराची विहाराची प्रवृत्ती राहील, असे पाहावे.


जागृति व संयम / नियंत्रण हे आरोग्य आणि दीर्घायुष्याचे मूलाधार आहेत, हे केव्हाही सत्यच आहे!


*या उपक्रमात लिहिल्या जाणाऱ्या लेखांमध्ये असणारी विधाने ही आयुर्वेद सिद्धांत व संहिता ग्रंथ यावर आधारित शास्त्रीय सत्य तथ्य अशा स्वरूपाची प्रायः असतात. _परंतु या लेखांमध्ये काही विधाने काही रूढी परंपरा इतिहास याविषयीची माहिती सामाजिक माहिती मनोरंजन वैयक्तिक मत वैयक्तिक आकलन वैयक्तिक समजूत अशा स्वरूपाची सुद्धा असू शकतात_*


*देहवाक्चेतसां चेष्टाः प्राक् श्रमाद्विनिवर्तयेत्।* 

आणि

*न पीडयेत् इंद्रियाणि*

हे दोन्ही श्लोक आपण एकत्र पहात आहोत.


_(डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.)_


त्वदीय वस्तु गोविंद 

तुभ्यम् एव समर्पये ।


तेरा तुझको अर्पण

क्या लागे मेरा ।


श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु।


🙏🏼

सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved

Copyright कॉपीराइट ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

MhetreAyurved@gmail.com 

www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/