Monday, 24 March 2025

गर्भसंस्कार : मर्यादा व वस्तुस्थिती : मराठी भाषा 😇🤔⁉️🤫🫣🫢🙃🤦‍♂️🤷🙆

 गर्भसंस्कार : मर्यादा व वस्तुस्थिती : मराठी भाषा 😇🤔⁉️🤫🫣🫢🙃🤦‍♂️🤷🙆






सुवर्ण प्राशन या अशास्त्रीय परंतु आकर्षक व यशस्वी मार्केटिंग केल्या गेलेल्या उद्योगाप्रमाणेच दुसरा "लोकप्रिय व फोफावणारा उद्योग" म्हणजे "गर्भसंस्कार"

चरक आणि सुश्रुत यात उल्लेखित गर्भिणी परिचर्येशी अजिबात साम्य/संबंध नसलेला आणि जो आपला अधिकार नाही, त्या मंत्र योग यांच्या आधाराने "सजवलेला" गर्भसंस्कार ... हाही उद्योग याच प्रकारचा आहे

Pregnancy is not a disease... it is a celebration of life !!!

गर्भावरती काही संस्कार होऊ शकतात ही गोष्टच मुळात अशास्त्रीय आहे. ठीक आहे की, शारीरिक प्रशस्ती किंवा शरीराशी संबंधित काही अवयव यांची उत्तम स्थिती यासाठी गर्भिणीला काही उपचार करणे, हे शक्य आवश्यक आणि काही प्रमाणात शास्त्रीय आहे.


परंतु गर्भसंस्कार केल्यामुळे बुद्धी स्मृती अशा अशारीरिक अमूर्त बाबी अपेक्षित पद्धतीने वाढवता येतात/ चांगल्या करता येतात ; अशा प्रकारचा प्रचार मात्र अवास्तव, अशास्त्रीय आणि मार्केटिंगच्या अंगाने केवळ धनार्जनासाठी केला जाणारा स्वार्थी आणि दिशाभूल करणारा उद्योग आहे.


मुळात आयुर्वेद शास्त्रामध्ये गर्भसंस्कार असा शब्द किंवा विधी कुठेही उल्लेख केलेला नाही 


गर्भिणी परिचर्या असे वर्णन सविस्तर उपलब्ध आहे ज्यामध्ये अगदी गर्भधारणे पूर्वीपासून तर प्रसूती होऊन बाळाला दूध पाजेपर्यंत, सर्व कालावधीसाठी, सविस्तर आहार विहार विषयक मार्गदर्शन आहे.


परंतु यात कुठेही योगासने व्यायाम ध्यानधारणा मंत्र आणि अगदी तुरळक अपवाद वगळता औषधे यांचा उल्लेख किंवा मार्गदर्शन नाही.


आयुर्वेद शास्त्राच्या तीनही ग्रंथांमध्ये ज्या पद्धतीची गर्भिणी परिचर्या सविस्तर वर्णन केलेली आहे, प्रत्येक महिन्यासाठी ... त्या पद्धतीने आज कोणी वैद्य आपल्या गर्भिणी असलेल्या पेशंटला सांगत असेल, असे वाटत नाही ... आणि एखादा वैद्य तसे सांगत असला, तरी त्या प्रकारच्या आहारीय बाबी आजचा पेशंट सलग नऊ महिने, त्या क्रमाने सेवन करेल, ही शक्यता फारच धूसर आहे.


त्यामुळे आयुर्वेदात ग्रंथात संहितांमध्ये वर्णन केलेली गर्भिणी परिचर्या, जी मासानुमासिक म्हणजे प्रत्येक महिन्यासाठी वेगवेगळी आहे, ती प्रॅक्टिकली आज अवलंबिली जाते असे नाही !!!


याउलट आयुर्वेद शास्त्र शिकलेले असताना किंवा बी ए एम एस किंवा एमडी आयुर्वेद ही डिग्री घेतलेली असताना, ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला अधिकार अनुभव ज्ञान प्रमाणपत्र शासकीय अनुमती समाज मान्यता यापैकी काहीही नाही, अशा मंत्र योगासने ध्यान धारणा व्यायाम याबाबत , "गर्भसंस्कार" या आर्थिक फायद्याच्या उद्योगांमध्ये, समाजातील आई होऊ घातलेल्या would be mother अशा स्त्रियांना, त्यांच्या भावनिक दुर्बलतेचा हळवेपणाचा इमोशनल vulnerabilityचा गैरफायदा घेऊन, त्यांना त्यात गुंतवणे आणि त्यांच्याकडून पैसे उकळणे/ मिळवणे, हे नैतिकदृष्ट्या योग्य नव्हे !!!अभिमन्यूला किंवा अष्टावक्राला किंवा मच्छिंद्रनाथांना गर्भामध्ये ज्ञान प्राप्त झाले ह्या पुराणातल्या कथा आहेत, ज्या श्रद्धेसाठी म्हणून ठीक आहे ! परंतु वास्तवात शास्त्रीय दृष्टीने असे काहीही होत नाही. 


आणि खरोखरच कुठल्याही आईला तिच्या होणाऱ्या अपत्याचे जीवन अभिमन्यू किंवा अष्टवक्र किंवा मच्छिंद्रनाथ यांच्याप्रमाणे असलेले चालणार आहे का???


पहिला व्यावहारिक स्पष्टीकरणाचा भाग म्हणजे आपण जन्माला आल्यानंतर , आपली सर्व इंद्रिय बुद्धी ही व्यवस्थित काम करीत असताना देखील, वयाच्या साधारण तीन साडेतीन वर्षापर्यंतच्या , कुठल्याही स्मृती आपल्याला पुढील आयुष्यात शिल्लक राहत नाहीत!!! 


वयात जन्मापासून वयाच्या तीन साडेतीन पर्यंत, आपण स्वतः पाहिलेले ऐकलेले अनुभवलेले शिकलेले आपल्याला शिकवलेले असे कोणतेही बुद्धी स्मृती विषयक विषय मोठेपणी शिल्लक राहत नाहीत!! 


असे असेल तर , आपण जन्माला येण्यापूर्वी , जेव्हा आपली इंद्रिय बुद्धी ही सुप्त किंवा अ-जागृत अवस्थेत असतात, त्या काळात आईने ऐकलेल्या पाहिलेल्या अनुभवलेल्या केलेल्या गोष्टींमुळे, आपल्या बुद्धी आणि स्मृतीमध्ये बदल सुधारणा वाढ होईल, ही गोष्ट ... साध्या , न शिकलेल्या माणसाला सुद्धा न पटणारी आहे, सहज समजणारी आहे !!!


असे असताना आपण आपली बुद्धी शिक्षण बाजूला ठेवून, गर्भसंस्कार नावाच्या गोष्टीला बळी पडतो, हा अशिक्षितपणा आहे , निरक्षरपणा आहे, अडाणीपणा आहे!!!


याबाबत ... दुसरे शास्त्रीय स्पष्टीकरण असे की आयुर्वेदाच्या संहितांमध्ये, असे स्पष्टपणे लिहिलेले आहे की, जीवनाच्या सुरुवातीला आणि जीवनाच्या शेवटी म्हणजे जन्म आणि मृत्यू यावेळी , महत्तम = मोठा अंधार अशा स्वरूपाचा *मोह म्हणजे अज्ञान*, या प्रकारचा ज्वर येतो, जो मागील जन्मातील सर्व बुद्धी स्मृती या पुसून टाकतो ... *मोहस्वभावाद् एव अन्यजन्मजं कर्म प्राणी न स्मरति।* याचा अर्थ बाळाच्या जन्मापूर्वी , ते बाळ गर्भात असताना , आपण कोणतेही संस्कार केले , तरीही ते शरीरापुरते उपयोगी होऊ शकतात , परंतु ते बुद्धी स्मृती या अर्थाने लाभदायक होऊ शकत नाहीत!!!


संस्कार या नावाने पुंसवन हा संस्कार आयुर्वेद ग्रंथांमध्ये लिहिलेला आहे, परंतु पुंसवन या संस्कारावरती आज गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याने बंदी आहे, त्यामुळे गर्भसंस्कार यामध्ये, संस्कार या नावाने, निश्चितपणे उल्लेखित असलेला , पुंसवन संस्कारच शासकीय दृष्ट्या आज बंदी खाली आहे !!! त्यामुळे अजून इतर कुठला संस्कार , गर्भसंस्कार या नावाने करता येईल, अशी शास्त्रीय शक्यता निश्चितपणे नाही


आयुर्वेदात संहिता ग्रंथात गर्भिणीसाठी नऊमासांचे क्रमानुसार सांगितलेले आहार

महिना : आहार 

प्रथम : मधुर शीत द्रव आहार

द्वितीय : मधुर शीत द्रव आहार

तृतीय : मधुर शीत द्रव आहार, साठे साळीचा भात आणि दूध

चतुर्थ : साठे साळीचा भात आणि दही, दुधातून काढलेले लोणी आणि बकरीचे मांस शेळीचे मटण

पंचम : साठे साळीचा भात आणि दूध , दुधातून काढलेले तूप

षष्ठ : साठे साळीचा भात आणि तूप, गोखरू सिद्ध तूप किंवा कढण पेज

सप्तम : औषधि सिद्ध तूप किंवा कढण पेज

अष्टम : बस्ति काढायचा आणि तेलाचा असे दोन्ही प्रकारचे

नवम : स्निग्ध पेज कढण, मटण


वरील प्रमाणे प्रत्येक महिन्याचा आहार जर सुचवला जात असेल, तर तो निश्चितपणे शास्त्रीय आहे, असे जाणावे 


परंतु, असा आहार न सुचवता , मंत्र योगा व्यायाम आसने मेडिटेशन , असे "हॅपनिंग" उद्योग , या गर्भसंस्कार उपक्रमात चालत असतील, तर तो आयुर्वेदाचा भाग नसून, ते आयुर्वेदाच्या अधिकाराच्या स्कोपच्या आवाक्याच्या बाहेरचं , काहीतरी वेगळंच चालू आहे, असे जाणावे


*गर्भाशयातील बाळाला रक्तपुरवठा कमी पडत होता असे सोनोग्राफी मध्ये कळाले. ही एक गंभीर बाब आहे. याला Placental Insufficiency असे म्हणतात. ही केस आयुर्वेद उपचारांनी1 महिना7 दिवसांत बरी झाली. सोबत दोन्ही रिपोर्ट जोडले आहेत. पेशन्ट व त्यांचे कुटुंबीय यांनी ठेवलेला संयम व विश्वास याबद्दल त्यांचे आभार!

https://www.facebook.com/share/p/161VpxC2ou/

Placental Insufficiency:*

Placental insufficiency (also called placental dysfunction or uteroplacental vascular insufficiency) is an uncommon but serious complication of pregnancy. It occurs when the placenta does not develop properly, or is damaged. This blood flow disorder is marked by a reduction in the mother's blood supply.

👆🏼

Corrected within 1month 1 week by Ayurveda Treatment


www.MhetreAyurved.com

Clinics @ Pune & Clinic


97A Patil Plaza Mitramandal Chauk Near Sarasbag PUNE


DK Nagar Gangapur Road near Prasad Mangal Karyalaya NASHIK


#ayurveda #health #ayurved #nashik #nasik #pune #placentalinsufficuency #lowbloodflowpregnacy

Disclaimer/अस्वीकरण: लेखक यह नहीं दर्शाता है, कि इस गतिविधि में व्यक्त किए गए विचार हमेशा सही या अचूक होते हैं। चूँकि यह लेख एक व्यक्तिगत राय एवं समझ है, इसलिए संभव है कि इस लेख में कुछ कमियाँ, दोष एवं त्रुटियां हो सकती हैं। भाषा की दृष्टी से, इस लेखके अंत मे मराठी भाषा में लिखा हुआ/ लिखित डिस्क्लेमर ग्राह्य है




डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.




Disclaimer: The author does not represent that the views expressed in this activity are always correct or infallible. Since this article is a personal opinion and understanding, it is possible that there may be some shortcomings, errors and defects in this article.




मूव्ह ऑन... पुढचं पाऊल... वरची पायरी ... नवनवीन *विचारांची बीजं पेरत जाणारा माणूस*

 आपण सगळेच आयुर्वेदाचे विद्यार्थी आणि सहकर्मी आहोत.


*आपल्यापैकी कोणालाही आयुर्वेद किंवा चरक किंवा संहिता ह्या आंदण / मालकीच्या किंवा मुखत्यारपत्र करून दिलेल्या नाहीयेत.*


त्यामुळे आपण लगेच चरकाचा किंवा रसशास्त्र नाडीपरीक्षण योगाचा कैवार घेऊन भांडायला युद्ध करायला लढायला उठलं पाहिजे, असं काही नसतं


आयुर्वेदात ऍडमिशन घेऊन 35 वर्ष होऊन गेलेले आहेत 


त्यामुळे श्वासा श्वासात कणाकणात क्षणाक्षणात आयुर्वेदातील विषयांचे चिंतन चालू असतं 



मग त्याचं पोस्टिंग मी "उचित" अशा प्रकारच्या, "बुद्धिमत्तेची काही लेव्हल" असलेल्या वैद्यांच्या ग्रुप मध्ये करतो 


मी माझ्या पोस्ट लिहिताना, त्या कोणालाही वैयक्तिक उद्देशून लिहित नाही.


माझ्या मता ला महत्व द्यावं किंवा माझ्या पोस्टची दखल घ्यावी किंवा त्या पोस्टवर वाद घालावा किंवा त्या पोस्टच्या निमित्ताने मला यथेच्छ नावे ठेवावीत निंदा करावी टोमणे मारावेत घालून पाडून बोलावे शक्य तितक्या नकारात्मक कॉमेंट करावेत ... तेहीपोस्ट मधील मुद्दे सोडून... याची आवश्यकताच नाहीये!


परंतु लोकांना पोस्ट मधील मुद्द्यापेक्षा, वैयक्तिक निंदा टीका टिप्पणी टोमणे, नालस्ती हे करण्यात इंटरेस्ट *"आणि क्षमता"* अधिक असते


माझ्याकडे कोणताही स्टाफ इन्फ्रास्ट्रक्चर एजन्सी टीम असं काहीही नाहीये 


म्हेत्रेआयुर्वेद MhetreAyurveda ही सगळी वन मॅन इंडस्ट्री / वन मॅन आर्मी आहे ...


त्यामुळे नाशिक आणि मुख्य म्हणजे पुणे क्लिनिक, चालू असलेले 7 प्रकारचे ऑनलाइन कोर्स, त्याच्यासाठीची सातत्याने अपलोड होत राहणारी एडिट होत राहणारे रेकॉर्डिंग... 


उदाहरणार्थ, अष्टांग हृदय कल्पस्थान अध्याय सहा श्लोक केवळ याच्यावरती तब्बल 90 लेक्चर कल्पसिद्धौ च वाग्भटः = औषधे वाग्भट श्रेष्ठ हा या उपक्रमांतर्गत म्हेत्रेआयुर्वेद MhetreAyurveda यांच्या www.MhetreAyurveda.com या वेबसाईटवर अपलोड झाली, चरक शारीर स्थान साठी एक तासाची 70 लेक्चर्स ऑनलाईन अपलोड झाली ... यासोबतच MhetreAyurveda फार्मसी मधून नियमितपणे एफडीए ॲप्रुव्हल घेऊन GMP certificate नुसार तयार होणाऱ्या औषधांची व्यवस्था करणे ... 


या सर्वांमध्ये , प्रतिसा/वादात्मक पोस्ट लिहिणे, याच्यासाठी वेळ काढणं , खूप अवघड होतं ... तरीही ही पोस्ट वेळात वेळ काढून लिहीत आहे


मी काही फार मोठा वैद्य नाही की माझ्याकडे रोज शंभर पेशंट येतात किंवा 

मी फार मोठा गुरु नाही की माझ्याकडे एक 100- 200 स्टुडन्ट आहेत ...

मी एक सर्वसामान्य छोटासा वैद्य आहे ...

त्यामुळेच माझ्या मताला माझ्या पोस्टला दुर्लक्ष केलं तर बिघडलं कुठं?!🤔⁉️


बरं, मी एखादी पोस्ट लिहिली, एखादा मुद्दा मांडला म्हणजे 

तो सगळ्यांना लगेच स्वीकार्य झाला , त्या पोस्ट मधल्या विचारानुसार लगेच उद्या सगळीकडे बदल झाले... असे काही क्रांती होणारेय का??? 


मी म्हणालो दोष नसतात ओज नसतं रसधातु नसतो रसशास्त्र नसतं मन नसतं नाडीपरीक्षा नसते... गर्भसंस्कार सुवर्णप्राशन विद्ध मर्म वर्म शिरोधारा मसाज शोधन (showधन) सौंदर्यशास्त्र हृद् बस्ती हे व्यवसाय धंदा व्यापार अशा आर्थिक स्वरूपाचे उद्योग आहेत, ते आयुर्वेद शास्त्राशी विसंगत आहेत, शास्त्र सुसंगत नाहीत... असे मी म्हणालो ... म्हणून काय लोक लगेच ते सोडून देणार आहेत का? नाही ना ???


ते सगळं चालूच राहणार आहे, मग माझं वैयक्तिक मत मी व्यक्त केलं, म्हणून असं काय फार मोठं आकाश कोसळणार आहे!? 


आत्मा नाकारणाऱ्या चार्वाकालाही आपण दर्शन म्हणतो. 

आत्मा नाकारणाऱ्या बौद्धाला आपण विष्णूच्या अवताराचं स्थान देतो 

ईश्वर नाकारणाऱ्या सांख्यांना आपण दोन क्रमांकाचं सर्वश्रेष्ठ दर्शन म्हणवतो 


मग मी एखादी पोस्ट लिहून एखादा मुद्दा नाकारला, तर त्यात एवढा अकांड तांडव करायची काय गरज आहे? किंवा त्याच्याकडे एवढे लक्ष द्यायची तरी काय गरज आहे?


*मी कुणालाही नावानिशी उद्देशून वैयक्तिक पोस्ट कधीही लिहीत नाही*


मला अशी आशा / अपेक्षा आहे एक लोकप्रिय निरूपणकार या पदापासून आता इथून पुढे हळूहळू पदोन्नती होत होत ... तत्त्वचिंतक आणि तत्ववेत्ते तत्व बोधक तत्त्वदर्शी ... नव सिद्धांत लेखक इथंपर्यंत जाता यायला पाहिजे 


जी माहिती वाक्य श्लोक आधीपासून लिहिलेले आहेत, त्याच्यावर तासनतास किंवा पानोपान बोलणं किंवा लिहिणं ही पहिली पायरी आहे 


अशा प्रकारचं निरूपण करणे ही आज पहिल्यांदा घडणारी गोष्ट नाहीये 


आज पासून 25 30 35 वर्षांपूर्वी त्याला टीकावाचन संहिता पठण अशी नाव होती ...

आता त्याला ऑनलाईन वेबिनार, गुरुकुल, निरूपण अशी नावं आहेत ... दारू तीच ... बाटली नवी!


जोरात नळ सोडला आणि त्याच्या खाली वाटी किंवा बशी धरली , तर त्यात काहीही पाणी साठत नाही 


यथा वाऽऽक्लेद्य मृत्पिण्डमासिक्तं त्वरया जलम् । चरक


तसा प्रकार हा हल्लीच्या सुपरफास्ट गुरुकुलांचा निरूपणांचा झालेला आहे 


दोन-तीन दिवसात पूर्ण होतात ... ज्यांना कसलीही पार्श्वभूमी नाही, त्या विद्यार्थ्यांच्या पदरी काय पडतं, 

काय माहिती?! 


भारावून नक्की जातात अनेक जण ... भरून किती जातात... हा प्रश्न !


संहिता वाचन टीकावाचन हा नित्यकर्म प्रतिदिनी करण्याचा निरंतर अध्ययन प्रकार आहे 


अवचित उठलं आणि पळत सुटलं ... सठी सहामाशी आमुशी पौर्णिमेला करणे असा तो प्रकार नाही ...


त्याच्यात जर सातत्य नसेल, तर त्याचा "इव्हेंट" होतो समारंभ होतो ...

पण त्याचा शास्त्र अध्ययन शास्त्र झिरपणे ज्ञानाचे परकोलेशन होणे असं होत नाही 


वक्ता मोठा होतो पण श्रोता काय लाभ मिळवतो, हे ऑब्जेक्टिव्हली पाहिलं जात नाही 


आणि आता तर ... चल गुरू , हो जा शुरू! सेमिनार वेबिनार झाले उदंड ... अशी परिस्थिती आहे, तो अनेकांचा ऑनलाईन धंदा सुद्धा झालेला आहे अरेंज करणारांचा ... एकाच वेळेस 300 वॉटसप ग्रुप मॅनेज करून त्याच्यावर लोकांच्या इव्हेंटच्या जाहिराती करणारे लोक आहेत.


त्यामुळे कसदार काय आणि फोलपट काय हे कळणं, सर्वसामान्य /नव्या/ तरुण /नुकत्याच प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना कळणं, शक्यच नसतं 


त्यावेळी मग समोर जे मांडलं जातंय, तेच खरं ...असा त्यांचा भ्रम होत जातो 


ज्यांनी लता मंगेशकर किशोर रफी आशा हेमंत कुमार मन्ना डे भीमसेन जोशी सुधीर फडके हे ओरिजनल ऐकलेच नाहीत... त्यांना रिमिक्स मधली मॅशप कव्हर अनप्लग्ड असली व्हर्जनच छान वाटायला लागतात... कारण गुणवत्ता काय असते , हे माहितीच नसतं


मूळ स्वरूपातील संहितांचे पठण संथा पाठांतर निरूपण हे धर्मचैतन्यच्या अदिति वामन मंदिराच्या प्रांगणात महागुरू कोल्हटकर सर गुरुवर्य गाडगीळ सर संजय पेंडसे सर प्रमा जोशी बावडेकर अतुलचंद्र ठोंबरे यांनी अनेक वर्ष केले 


सखा सद्गुरु भगवंत अनिल पानसे याने हे व्रत जीवनभर चालवले 


रसिक पावसकर सलग 24 तास निरूपण करू शकतो एवढी त्याच्यात क्षमता आहे 


गिरनारच्या पायथ्याला जुनागड मध्ये एका मोठ्या सभागृहात चालते बोलते चरक = लिविंग एनसायक्लोपीडिया ऑफ चरक = डॉक्टर सी पी शुक्ला यांचे निरूपण सलग तीन दिवस मी ऐकलेले आहे 1996


फक्त इतकंच की कोल्हटकर पानसे सीपीशुक्ला यांच्या वेळी सोशल मीडिया नसल्यामुळे आज जितक्या सहजपणे पॉप्युलरिटी मिळते , तितकी त्यांना नाही मिळाली 


जितेंद्र अभिषेकींपेक्षा महेश काळेला पाॅप्युलॅरिटी जास्त आहे 

वसंतराव देशपांडेंपेक्षा त्यांचा नातू राहुल देशपांडेला पॉप्युलॅरिटी जास्त आहे 


सुधीर फडके गदिमांपेक्षा आज गुलाबी साडी लिहिणाऱ्याला पॉप्युलॅरिटी करोडोंच्या संख्येत आहे


बिन खर्चाच्या सोशल मीडियाच्या अस्तित्वामुळे लोकप्रियता "measurable" होऊन, त्याची "संख्या" जास्त झाली...

म्हणजे त्याची गुणवत्ता ही आधीच्यांच्या पेक्षा श्रेष्ठ असतेच, असं नसतं ना!?


पूर्वजांनी आधीच लिहून ठेवलेलं आहे त्याचंच तासनतास निरूपण करत वर्षानुवर्ष तसंच राहणं , ही नवीन बाब नाही 


ज्याचं निरूपण संकलन करत आहोत,

 त्याचं चिंतन (स्वयं धिया ऊह्यं) अध्ययन अनुभव (बुद्धिमता वैद्येन तर्क्यम्) याच्यानंतर ..

*त्याच्या पुढे दोन पावलं सुचणं* , 

हे त्याचं खरं इष्ट फलित आहे... 

म्हणून वाग्भटाला ...

सहा शस्त्र जास्त सुचली 

योनिव्रणेक्षण यंत्र सुचलं 

पाच प्रकारच्या वातांची दुष्टी हेतू दुष्टी लक्षणं सुचली 


मूढगर्भाला काढून ग्रहणी हा अष्टौमहागदामध्ये घालावासा वाटला 


दशप्राणायतना मध्ये रसन बंधन याचा समावेश करावासा वाटला 


धमनी मर्म हे सहाव्या प्रकारचे मर्म लिहावसं वाटलं


म्हणजे असं विलक्षण मत मांडणारा वाग्भट हा त्याज्य निंद्य असा मानायचा का?


लंघनं स्वेदनं कालो ... असं सगळीकडे ज्वर चिकित्सा सूत्र असताना....

"ज्वरादौ लंघनं मध्ये पाचनम् अंते रेचनम्"

असे चिकित्सा सूत्र लिहिणारा योग रत्नाकर हा चुकीचा आहे का? 


त्यामुळे *आपल्याला कदापिही सुचू न शकणाऱ्या*

आणि म्हणूनच दुसऱ्याला सुचल्यावर 

*ते सहज पचू न शकणाऱ्या*

प्रस्थापित मतांपेक्षा वेगळं असणारं मत ,

हे नेहमी निंद्य त्याज्य निषेधार्ह वादग्रस्त असतं, असं नाहीये 


*परमत सहिष्णुता ठेवली तर, नवीन काहीतरी शिकायला मिळण्याची शक्यता असते*


एकच भगवद्गीता लोकांनी द्वैतपर लावलेली आहे अद्वैतपर लावलेली आहे 

ज्ञान कर्म भक्ती अशा तीनही प्रकारे लावून दाखवलेली आहे 

गीतेमध्ये लोकांना अहिंसा अभय सत्त्वगुण भक्ती तत्त्वज्ञान असं बरंच काही दिसतं


मला मात्र... "हातात शस्त्र घे आणि समोरच्याला तोडून काढ!!!", असा पराक्रम करण्याची पुरुषार्थाची युद्धासाठी सिद्ध होण्याची वृत्ती दिसते.


https://youtu.be/eWQnhzue5wA?si=bPW7IzmkuktV4SUw


रामायणामध्ये अनेकांना आदर्श बंधुप्रेम पितृप्रेम असलं बरंच काही दिसतं 

मला एवढंच दिसतं की स्वतःच्या बायकोला हात लावणाऱ्याला ठार मारायचं असतं !!!


त्यामुळे एखाद्या गोष्टीकडे बघण्याची विविध लोकांची दृष्टी आणि मतं ही वेगळी असू शकतात , हे आपण आपल्या संस्कृतीतल्या गोष्टींकडे पाहून मान्य का नाही करत?


भारतीय तत्त्वज्ञानावरच पोषण होऊन ओशो रजनीश जे कृष्णमूर्ती अरविंद घोष रमण महर्षी इस्कॉन अशी विविध/विभिन्न मतं जगभरात प्रसृत प्रस्थापित लोकप्रिय आणि अनुकरणीय झाली


ग्रामीण जीवनातील मागील पिढी दुपारी किंवा रात्री देवळात कीर्तन प्रवचन ऐकायला जायची 


हल्लीची शहरी श्रीमंत लोकं पैसे देऊन बुकिंग करून सत्संग करायला जातात 


हे एक उच्चस्तरीय वाटणारं हाय प्रोफाईल स्टेटस साठी केलं जाणारं आधुनिक शैलीचं मनोरंजन आहे 


मागील पिढीतल्या कीर्तन प्रवचनाचा किंवा आत्ताच्या पिढीतल्या सत्संगाचा रोजच्या जीवनातील वागण्या व्यवहाराशी जराही संबंध नसतो


तसाच काहीच प्रकार आयुर्वेदातही चालतो हल्ली.


चरकस्तु चिकित्सिते म्हणून चरकाच्या ज्वरावरती दीड तास व्याख्यान द्यायचं/ऐकायचं आणि प्रत्यक्षात मात्र ते ऐकून स्वतःच्या क्लिनिकमध्ये पेशंट आल्यानंतर ज्वराच्या पेशंटला ट्रिकी द्यायचं आणि आपलं जय मंगल करून घ्यायचं ... असला सावळा गोंधळ चालूच असतो.


 चरकांनी हेतु स्कंध लक्षण स्कंध आणि *त्याच हेतु लक्षणांसाठी* "औषध स्कंध" गंमत म्हणून लिहिलेत का? 


जर हेतुस्कंध आणि लक्षणस्कंध (म्हणजे निदान) हे चरकातून सुश्रुत संहितेतून वाग्भटातून शिकत असू ... तर तिथेच लिहिलेल्या औषधस्कंधाने पेशंट बरा करता येणे, हे सुसंगत नैसर्गिक आहे ...

*पण त्याला हिम्मत आणि क्षमता दोन्ही लागते* ...


आणि ती हिम्मत आणि क्षमता नसल्यामुळेच, ज्या ग्रंथांमध्ये हेतुस्कंध लक्षण स्कंध लिहिलेलंच नाही, तिथला औषध स्कंध "जादुगिरी किमयागिरी" सारखा वापरायचा आणि पुन्हा त्याची भलामण समर्थन जस्टिफिकेशन करायचं की "पेशंटला बरं वाटलं पाहिजे ना" ... अरे, संहितोक्त कल्प वापरून पेशंट बरा करणं , तुम्हाला जमत नाही, म्हणून तुम्ही आयुर्वेदाच्या नावाखाली अशास्त्रीय असे रसकल्प वापरता !!! ... हे मान्य करा ना... 


आणि एखाद्याने स्टेरॉईड वापरले किंवा मॉडर्न वापरलं म्हणून त्याला अस्पृश्य ठरवायचं नावं ठेवायची... हा दुट्टपीपणा ढोंगीपणा लबाडी कशासाठी?


मग ते रस शास्त्रातील द्रव्य संहितेत कशी किती वेळा कुठल्या संदर्भात आली त्याच्यावर लेख लिहायचे आणि मग रसशास्त्र कसं आयुर्वेदात मुरगळता घुसडता येईल याची सोयीस्कर व्यवस्था करायची ...

चरक स्वतः असता तर त्याला खरंच हे मान्य झालं असतं?!


त्यापेक्षा आपल्याला जे जमत नाही ते आपली मर्यादा आहे , असं समजून रेफर करायचं ही पेशंट बेनिफिट च्या दृष्टीने उत्तम नैतिकता आहे !


1988 चा माझा आयुर्वेदातील ऍडमिशन आहे, 1989 पासून मी माझ्या जुनियर बॅचेस ला आणि क्वचित काही सीनियर बॅचेस लाही शिकवत आलेलो आहे 


परंतु पूर्वजांनी लिहिलेल्या ओळींवरती तासनतास व्याख्यान देणं किंवा पानंच्या पानं त्याच्यावर निबंध प्रबंध ग्रंथ लिहिणे, ही एक पर-प्रकाशित परावलंबी उपजीव्य अशी वृत्ती /कृती आहे 


त्याच्या पलीकडे जाणं म्हणजे जे आपण वाचतोय अनुभवतोय 

त्याचं *तत्त्वचिंतन* होऊन 

त्याचं काहीतरी *तत्त्ववेत्ते* या स्तरावरून आपल्याला "नव्याने मांडता येणे" ही त्याच्यातली पुढची पायरी पुढचं पाऊल प्रगती आहे, असं मला वाटतं 


सगळेच रिक्षावाले मुख्यमंत्री होत नाहीत 

सगळे चाय वाले पंतप्रधान होत नाहीत


ते फार कमी लोकांना जमतं ...


ज्यांना जमत नाही त्यांनी चालवावी कि रिक्षा... विकावा की चहा ... नाही कोण म्हणतेय... पण आम्ही रिक्षा चालवतो आम्ही चहा विकतो , म्हणून तुम्ही मुख्यमंत्री पंतप्रधान व्हायचं नाही... हा काय विचित्रपणा आहे!?


जे वेणी माधव शास्त्रींना जमलं 

जे बायवरूशास्त्रींना जमलं 

जे दातार शास्त्रींना जमलं 

जे वाग्भटाला जमलं 


... जे चक्रपाणिला नाही, पण हेमाद्रिला जमलं!!!✅️✅️✅️ 


चक्रपाणी म्हणतो 

नालं तोषयितुं पयोदपयसा नाम्भोनिधिस्तृप्यति।

व्याख्याभासरसप्रकाशनमिदं त्वस्मिन् यदि प्राप्यते

क्वापि क्वापि कणो गुणस्य तदसौ कर्णे क्षणं धीयताम्


अरुण दत्त म्हणतो 

को मत्सरिणि लोकेऽस्मिन्विद्वान्किञ्चिच्चिकीर्षति। 


 पण हेमाद्री म्हणतो ... "वयम् अपि आप्ताः" 💪🏻 ... मीही आप्तच आहे 🏆


शास्त्राचं अध्ययन तीन चार दशकं केल्यानंतर... "मीही आप्तच आहे" ... हा अहंकार अभिमान नव्हे तर, *आत्मविश्वास आलाच पाहिजे*


आणि त्या आत्मविश्वासा पोटी व अनुभवा पोटी, प्रस्थापित मतांपेक्षा "विलक्षण व अभिनव मत" मांडता येणे शक्य असते 


म्हणून अंदनकर हे दोष क्षीणतेने व्याधी होतात असं म्हणू शकले 


अण्णा त्र्यं म गोगटे यांच्यावर कोर्ट केस लागली तरी त्यांनी त्यांची मत ठामपणे मांडलीच


कारण प्रस्थापित विचारांपेक्षा काहीतरी वेगळं मांडताना संघर्ष प्रतिरोध इनर्शिया याचा सामना करावा लागतोच 


"विलक्षण" असले तरी "अभिनव" अशा *विचारांची बीजं पेरत जाणं* 🌱 हा माझा स्वभाव आहे 


कधीकाळी (2002 पर्यंत) माझ्या पीजी एंट्रन्स प्रेपरेशन क्लासची स्टुडन्ट संख्या फक्त 50 च्या आसपास असे.

2003 च्या आसपास, त्यावेळेला पहिल्यांदा माझ्या क्लासच्या स्टुडन्ट ची संख्या 100 च्या पलीकडे गेली होती 


परंतु क्लास चालू केला तो 1999 ला...

तो नावा रुपाला यायला चार वर्षे गेली 

आणि त्यानंतर बारा वर्षांनी 2015 मध्ये मी क्लास संपन्न केला ...


कारण यू हॅव टू मूव्ह ऑन... पुढचं पाऊल... वरची पायरी यायलाच पाहिजे 


वचा हरिद्रादी गणावरती केरळ मधील एका कॉलेज साठी साठी मी व्याख्यान दिले ... सलग सात तासांचं, त्याला जवळपास दहा वर्ष होत आली आता...


https://youtu.be/J9MxYTxWoYo?si=ARMwIeukK3w04DOa


Playlist of 6 video lectures

👇🏼

https://youtube.com/playlist?list=PLGfK-7vCSHv4_0rGQY-0Ren4ZdSgRyjuz&si=cyuGEKsRWprIxdLe


पण वचाहरिद्रादि गण, ब्रँड म्हणून सप्तधा बलाधान वटी या स्वरूपात वैद्यांच्या उपयोगासाठी टॅबलेट स्वरूपात आणण्यासाठी मला मधली दहा वर्षे लागली 


तोपर्यंत मी सातत्याने अनेक ग्रुप वरती त्याविषयी लिहीत आलो 


कारण मला त्याच्या पेशंटच्या मधल्या परिणाम याचे अनुभव मिळत गेले 


माझ्या आधीच अनेक नॉन ब्रांडेड लोकांनी वचाहरिद्रादि टॅबलेट बनवून विकायलाही चालू केले होते 


वचाहरिद्रादि चे श्रेय क्रेडिट मालकी पेटंट माझं नाही, याची मला पूर्ण जाणीव आहे 


पण वचाहरिद्रादि गणाच्या वापराच्या "बीजाची पेरणी" मी केलीये एवढे मला नक्की माहिती आहे 

मी नवनवीन *विचारांची बीजं पेरत जाणारा माणूस* आहे

रसशास्त्र आयुर्वेदाचा भाग नाही अशी पोस्ट मी पहिल्यांदा 2013 मध्ये लिहिली 


त्याच्या आधी माझ्या क्लासमध्ये सातत्याने शिलाजतुच्या निमित्ताने मी रसशास्त्र हा आयुर्वेदाचा भाग नाहीच, असं ठासून सांगत आलो होतो ...

जेव्हा व्हाट्सअप अस्तित्वात नव्हतं तेव्हापासून माझे हे विचार मी प्रस्तुत करत आहे 

आज मी किमान शंभर विद्यार्थी दाखवू शकतो वैद्य दाखवू शकतो की ज्यांनी रस शास्त्राची प्रॅक्टिस बंद केलेली आहे 


स्टेरॉईड मिक्स करून वापरतात, म्हणून आपण काही वैद्यांना डॉक्टरांना बोगस म्हणून बदनाम करतो 

पण दुसरीकडे मात्र, "पेशंटला येन केन प्रकारेण *माझ्याकडूनच* बरं वाटलं पाहिजे" म्हणून आपल्याला योग नाडी रसकल्प मर्म वर्म सत्त्वावजय दैवव्यपाश्रय असं सगळं चालतं ... पेशंटला बरं वाटायला पाहिजे म्हणून आपल्याला रसशास्त्र ही चालतं मग जर रस शास्त्र चालत असेल, तर तो स्टेरॉईड वापरणारा चुकीचा कसा काय ठरतो??? 


चरकच म्हणतो ना... 

तदेव युक्तं भैषज्यं यदारोग्याय कल्पते ।

स चैव भिषजां श्रेष्ठो रोगेभ्यो यः प्रमोचयेत् 


त्यामुळे रसशास्त्र आयुर्वेदाचा भाग नाही, हे विचार बीज मी अनेक वर्ष पेरत आलोय, तेव्हा आज अनेक वैद्य विद्यार्थी रसशास्त्र पासून स्वतःला लांब ठेवून "खऱ्याखुऱ्या आयुर्वेदाची, संहितोक्त आयुर्वेदाची" प्रॅक्टिस करतात याचा मला निश्चितपणे अभिमान आहे 


मी ही जी माझी मतं लिहितो ...

ती प्रस्थापित लोकप्रिय उच्च पदस्थ माझ्यापेक्षा सीनियर ... आणि ज्यांच्या ब्रेनला बुद्धीला झापडं लावलेली आहेत, ज्यांच्या मतांना स्पॅस्टॅसिटी कडकपणा आलेला आहे, लवचिकपणा संपलेला आहे परमत सहिष्णुता अजिबातच नाही ... "अशा लोकांसाठी लिहीत नाही" ...

जी तरुण पिढी आहे उगवती पिढी आहे, ज्यांच्या ~मनावर~ *बुद्धीवर भावनांवर विचारांवर* संस्कार होऊ शकतात ... अशा ताज्या दम्याच्या नववैद्यांवरती या मतांचे संस्कार व्हावेत ... म्हणून ते मी विविध प्लॅटफॉर्म वरती प्रस्तुत करत असतो 


उद्या मी ही मतं या ग्रुप मध्ये मांडायची बंद केली म्हणजे ती अन्यत्र पसरणारच नाहीत ... असं काही नाही 


आणि मी ती मतं इथं मांडतोय म्हणजे त्याला सगळ्यांनी लक्ष दिले पाहिजे, असेही काही नाही 


मी मांडलेला मताकडे पोस्टकडे दुर्लक्ष करणे, दखल न घेणे हा सोपा विकल्प आहे 


इग्नोरंस इज द बेस्ट इन्सल्ट 


एखाद्याच्या मताला पोस्टला इग्नोर करणं दखल न घेणं दुर्लक्ष करणं हा सगळ्यात मोठा अपमान आहे 


बरं, तुम्ही तुमच्या पोस्ट मतं मांडूच नका , असंच हट्टाग्रही धोरण असेल तर एडमिनला मला ग्रुप मधून काढून टाकण्याचा अधिकार आहेच की 


तसे मी वरती व्यक्त केलं त्याप्रमाणे अनेक ग्रुपमधून मी स्वतः लेफ्ट झालेलो आहे 


कारण लोकांना मुद्द्यांचा विरोध करायचं नसतो 

कारण *तो करण्याची क्षमता* आणि शक्यता दोन्ही नसते 


म्हणून मग ते वैयक्तिक निंदा नालस्ती टोमणे ताशेरे शेरे असं करत बसतात 


आणि मला त्यात अजिबात इंटरेस्ट नसतो


कोणी म्हणतंय म्हणून मी माझं मत मांडायचं थांबवेन असं अजिबात होणार नाही 


फार फार तर व्यासपीठ बदलेल 

पण जोपर्यंत मी जिवंत आहे 

तोपर्यंत मला सुचणारे विलक्षण व अभिनव अपूर्व अभूतपूर्व विचार प्रस्थापित विचारांपेक्षा वेगळे असलेले विचार 

मी निश्चितपणे मांडत राहणार 

यात मला कुठलीही शंका नाही 

आणि तसा माझा असलेला निर्धार हा निरंतर कायम राहील 

आणि त्याप्रमाणे मी माझी मतं निश्चितपणे मांडतच राहीन.


वरती इतरांनी जे दोष विषयक बरेऽऽऽच संदर्भ दिलेत, ते *दोष असतात* असा अभ्युपगम/स्वीकार करून दिलेत


त्यासंदर्भांचं काही विशेष कौतुक नाहीये 


कारण, मी *"दोष नसतात"* या स्टेटमेंट वरती पुढची मतं मांडतोय 


जिथे तुमची मतं/संदर्भ संपतात ...

तिथून पुढे माझी मतं सुरू होतात 


जिथे आधुनिक शास्त्राला पूर्वी ज्याच्याबाबत कसलंही डॉक्युमेंट माहिती उपलब्ध नाही, अशा हृदयाच्या परीक्षणासाठी अतिशय मोठी यंत्रणा नव्याने तयार करून ईसीजी ... ब्रेन साठी इइजी ... टू डी इको डॉपलर सीटी सोनोग्राफी पेट स्कॅन अशा अनेक तंत्रांनी सूक्ष्मातिसूक्ष्म शरीर घटक दिसतात... मोजता येतात✅️ तिथे ज्याच्याबद्दल प्रचंड वाङ्मय ग्रंथ साहित्य डॉक्युमेंटेशन उपलब्ध आहे ... अशा 3 बोटांनी कुठल्याही यंत्राविना कळू शकणार्‍या नाडीबाबत आणि नाडीतून "समजतात, असं मानल्या जाणाऱ्या" दोषांबाबत & त्यांच्या पाच प्रकारां बाबत काहीही सापडू नये ... हे किती आश्चर्यजनक आहे ?!

बाकी रक्त ते शुक्र मूत्र पुरीष स्वेद हे सगळं सापडतं पण दोष रस ओज हे मात्र सापडत नाही हे किती आश्चर्यजनक आहे ... आणि म्हणूनच अविश्वसनीय आहे😇


ज्यांना mcg म्हणजे एका ग्रॅमचा 1 कोटीवा भाग (1 gram = 1000000 micrograms= 1 crore mcg) इतक्या अत्यल्प मात्रेत असलेले शरीर घटक अंश उदाहरणार्थ थायरॉक्सिन मोजता येतात, त्यांचे वृद्धिक्षय समजतात, त्यांची पूर्ती करण्याची औषधं, आर्टिफिशियली तितक्याच अचूक मोजमापात, डिस्पेन्सिबल लेव्हलला तयार करता येतात... त्यांना रसधातु ओज सापडू नये, दोष सापडत नाहीत... हे किती आश्चर्यजनक आहे ?!


त्यामुळे *जे डेमॉन्स्ट्रेबल नाही आणि जे डिस्पेन्सिबल नाही, ते प्रॅक्टिकली शास्त्रदृष्ट्या अस्तित्वात नाही*


म्हणूनच चरक सुद्धा पाच महाभूत असतानाही ...

गर्भ निर्मितीच्या वेळेला चार महाभूतांचाच उल्लेख करतो ... कारण आकाश हे महाभूत अस्तित्वात असलं तरीही ते *डिस्पेन्सिबल आणि डेमॉन्स्ट्रेबल नसल्यामुळे त्याचा उल्लेख प्रत्यक्ष शरीर निर्मितीमध्ये सुद्धा चरक करत नाही* 


भूतानि विद्यात् दश षट् च देहे 

रसात्ममातापितृसंभवानि 

असा स्पष्ट उल्लेख चरका मध्ये आहे

म्हणजे चार वेगळ्या वेगळ्या स्थानांमधून उद्गमांमधून, चार महाभुते येतात ... पाच नाही, म्हणून चार गुणिले चार 16 असं चरक म्हणतो


म्हणून दोष असतात *असं "मानून" कितीही संदर्भ दिलेत* तरी ...

ते माझ्या मताला गैर लागू आहेत ...

माझं मत पटत नसेल दुर्लक्ष करा ग्रुप मधून काढून टाका 


पण तुम्ही मत मांडू नका, अशी *परमत असहिष्णुता* असू नये.


मी कधीच कुणालाच असा आग्रह केलेला नाही की तुम्ही मी दिलेल्या मतावर पोस्टवर तुमचं मत प्रतिसाद अनुमती विरोध खंडन मंडन व्यक्त कराच 


मी मत मांडून रिकामा झालेलो आहे 

आता त्या मताचं पोस्टचं काय करायचं दुर्लक्ष करायचं दखल घ्यायची डिलीट करायची वाचायची स्वीकार करायची ... 

त्यानुसार पुढे आपल्या जीवनामध्ये मतामध्ये बदल करायचा का सदर माणसाला वैयक्तिक निंदा नालस्ती करायची का सदर माणसाला ग्रुप मधून काढून टाकायचं ...

हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे 


त्याच्याशी मला काहीच घेणंदेणं नाहीये 


माझ्या मतावर पोस्टवर कुणी काय प्रतिक्रिया द्यावी, याच्यावर मी कसं काय नियंत्रण ठेवू शकतो?? 


त्यामुळे मला सुचणारी मतं ही माझ्या पोस्ट मधून विविध प्लॅटफॉर्मवर सातत्याने निरंतर येत राहणार हे निश्चित ✅️✅️✅️


श्रीकृष्णाऽर्पणम् अस्तु 🙏🏼


Disclaimer/अस्वीकरण: लेखक यह नहीं दर्शाता है, कि इस गतिविधि में व्यक्त किए गए विचार हमेशा सही या अचूक होते हैं। चूँकि यह लेख एक व्यक्तिगत राय एवं समझ है, इसलिए संभव है कि इस लेख में कुछ कमियाँ, दोष एवं त्रुटियां हो सकती हैं। भाषा की दृष्टी से, इस लेखके अंत मे मराठी भाषा में लिखा हुआ/ लिखित डिस्क्लेमर ग्राह्य है


डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.


Disclaimer: The author does not represent that the views expressed in this activity are always correct or infallible. Since this article is a personal opinion and understanding, it is possible that there may be some shortcomings, errors and defects in this article.

इंजिनिअरिंग क्यूं किया?! ... आयुर्वेद में भी ऐसे XX होते है

 https://youtube.com/clip/UgkxZIP3b3GVU9oJrjRfrElxqmNVamKfnQ6a?si=z5ia_KkHAdCh89PT

Or click this link 

https://youtu.be/cMgEjB-qO2I?si=lGQ04AdSsX5hiOR5

👆🏼

इंजिनिअरिंग क्यूं किया?! ... 🫏

आयुर्वेद में भी ऐसे 🫏 होते है

👇🏼 https://www.facebook.com/share/p/1D9pSPUZCc/


थ्री इडियट मध्ये करीनाचा होऊ घातलेला पती सुहास बद्दल आमिर खान म्हणतो की, "पहले इंजिनिअरिंग किया , फिर अमेरिका जा के एमबीए किया और अब बँक मे नौकरी कर रहा है... अगर बँक मे ही नौकरी करना था, तो इंजिनियरिंग कायकू किया?"


जर संहितेमध्ये एमडी करून, रसशास्त्राचीच भलामण करायची असेल, रसशास्त्राचीच प्रॅक्टिस करायची असेल, तर संहितेत एमडी केलंच कशासाठी?


चरकस्तु चिकित्सिते म्हणायचं , चरकाच्या ज्वर चिकित्सा सूत्रावरती दीड तास लेक्चर द्यायचं आणि ज्वराचा पेशंट आला की त्याला ट्रिकी द्यायची आणि स्वतःचं जय मंगल करून घ्यायचं, हा किती स्वतःलाच फसवण्याचा दांभिकपणा आणि दुटप्पीपणा आहे!?


येन केन प्रकारेण, काहीही करून, पेशंटला माझ्याकडूनच बरं वाटलं पाहिजे, असा हट्टाग्रह करण्यासाठी, म्हणून आयुर्वेदाची प्रॅक्टिस करणाऱ्यांनी , स्वतःला वैद्य म्हणून घेणाऱ्याने, रसकल्प वापरण्यासाठी पळवाट शोधणे, असं करण्यापेक्षा स्वतःला आर एम पी RMP म्हणवून घ्या, स्वतःला वैद्य किंवा आयुर्वेद प्रॅक्टिस करणारा म्हणवून घेऊ नये ...

आणि आयुर्वेदाची प्रॅक्टिस करतो असं म्हणायचं असेल, स्वतःला वैद्य म्हणायचं असेल, तर मग त्या माणसाने रसकल्प किंवा आयुर्वेदाच्या बाहेरच्या गोष्टी (योगा मंत्र नाडीपरीक्षा गर्भसंस्कार विद्ध वर्म मर्मचिकित्सा) वापरू नये ... तितकी कट्टरता शुद्धता आपल्या आचरणात ठेवायला हवी


स्वतःला वैद्य म्हणून घ्यायचं आयुर्वेद प्रॅक्टिस करतो म्हणायचं ... आणि रसकल्प वापरायचे हे म्हणजे किराणा दुकान चालवणाराने आत मध्ये केस कापण्याचा व्यवसाय करण्यासारखं आहे ...


शुद्ध शाकाहारी भोजनालय अशी पाटी लिहून उकडीचे मोदक देण्या ऐवजी चिकन मोमोज आणि खिमा पाव विकण्यासारखं आहे


येन-केन प्रकारेण, काहीही करून, माझ्याकडे आलेला पेशंट मी सोडणारच नाही, यासाठी मला जमत नसल्यामुळे, मी संहितोक्त कल्प सोडून, आयुर्वेदाच्या नावाखाली ... रसकल्प विद्ध वर्म मर्म योगा मंत्र असलेही अन्य कुठलेही उपचार बिनदिक्कत करेन, अशी जर वृत्ती असेल तर, स्वतःला आयुर्वेद वैद्य किंवा त्याचा प्रॅक्टिशनर असे म्हणवून न घेता, स्वतःच्या दुकाना वरती "ट्रीटमेंट मॉल / ट्रीटमेंट मार्ट" असे टायटल लावावे आणि स्वतःची डिग्री सगळोपॅथी पाॅलीपॅथी गोधडी वाकळ भेळ मिसळ गाठोड अशी लिहावी, हे बरे!


बरं ... संहितोक्त कल्प सोडून रसकल्प वापरण्याचं पुन्हा समर्थन करायचं की, रसशास्त्रातील द्रव्यांचा चरकामध्ये उल्लेख आहे, मग ते अगदी वेदांपासून तर आत्तापर्यंतचे सगळे संदर्भ द्यायचे, किती द्रव्य किती वेळेला उल्लेख केलेले त्याचा डाटा द्यायचा! 


अरे पण, चरका मध्ये मांसाचे प्रकार दिलेत , मग तुम्ही उद्या मांस विक्रीचे दुकान थाटणार का? चरका मध्ये वास्तुविद्या कुशल असा शब्द आलाय, म्हणून मग तुम्ही आर्किटेक्टचं काम करणार का किंवा इंटिरियर डिझायनरचं?! 


चरकामध्ये महानस शब्द आलाय, मग तुम्ही पोळ्या लाटण्याचं स्वयंपाक करण्याचं काम करणार का चार घरांमध्ये जाऊन ??? किंवा एखादी नाश्त्याची गाडी लावणार का रस्त्याच्या कडेला???


एखाद्या गोष्टीचा चरका मध्ये उल्लेख आहे म्हणजे आपल्याला त्याचा व्यवसाय व्यापार धंदा दुकान चालवण्याचं परमिट मिळालं, असा अर्थ होतो का??? नाही ना!?


तरीही, ते सत्त्वावजयवाल्यांनी दुकान चालू केलेलं आहेच! मनाच्या उपचारांबाबत चरक म्हणतो, "तद्विद्य सेवा" म्हणजे ज्याला सत्त्व याविषयी कळतं, त्यांचं मार्गदर्शन घ्या = त्यांच्याकडे रेफर करा ... पराधिकारेषु न विस्तरोक्तिः!!! ... तर यांनी सत्त्वावजय आयुर्वेदातच कोंबला !!!


अशी कोंबाकोंबी झोंबाझोंबी रसशास्त्र नाडीपरीक्षण विद्ध सुवर्णप्राशन शिरोधारा जानुबस्ति हृद्बस्ति कटीबस्ति, सर्विक्सच्या पलीकडे गर्भाशयाच्या आत दिला जाणारा दोन एम एल चा उत्तर बस्ति, जगातल्या सगळ्या रोगांवर एकमेव रामबाण उपचार असलेला अत्यंत चमत्कारपूर्ण अग्निकर्म, गर्भसंस्कार सौंदर्यशास्त्र केस आणि त्वचा यांची मेकप उत्पादन खपवण्याचा उद्योग ... हे सगळं आयुर्वेदात कोंबणं सुरूच आहे!!!


आपण जर संहितेमध्ये एमडी केलेले आहे किंवा

संहितेतले एमडी राहू द्या, पण आपण संहिता वाचून बीएएमएस शिकलेलो आहोत ... बी एम एस डिग्री राहू द्या , पण आपण संहिता वाचून आयुर्वेद शास्त्र शिकलेलो आहोत ... संहितेत लिहिलेल्या हेतुस्कंध आणि लक्षणस्कंध यापलीकडे आयुर्वेदातलं निदान अस्तित्वात नाहीये ... योग्य निदानाविना औषध सुचणं शक्य नाहीये ... असं असताना ज्या संहिता ग्रंथांमध्ये पेशंटचे हेतुस्कंध पेशंटचे लक्षणस्कंध लिहिलेले आहेत, त्याच संहिता ग्रंथात लिहिलेल्या त्याच हेततलक्षणांसाठी लिहिलेल्या औषध स्कंध चा उपयोग करून पेशंटला बरा करता येणं ही नैतिकता आहे स्वाभाविक आहे नैसर्गिक आहे obvious आहे ऑफकोर्स आहे ...!


"असं सरळ साधं सहज सोपं असताना" ... ज्या ग्रंथांमध्ये हेतुस्कंध लक्षण स्कंध यांचा उल्लेखच नाही, ज्या औषधांची भैषज्य कल्पना ही आयुर्वेदाच्या 5विध कषाय कल्पनांशी आणि संयुक्त कल्पनांशी अजिबात सुसंगत नाही, उलट टोकाची विसंगत आहे, अशा ग्रंथांमधली जादूगिरी ची किमयागिरीची औषधं म्हणजे रसकल्प हे आयुर्वेदाचेच आहेत, असं "मुरगळून" वापरायचं आणि आपण आयुर्वेद करतो, असं स्वतःला समाधान द्यायचं आणि लोकांना सांगायचं, ही पेशंटशी केलेली प्रतारणा वंचना फसवणूक आणि लुबाडणूक आहे, दिशाभूल आहे !!!


रसशास्त्र हे कुठल्याही प्रकारे आयुर्वेदाचा भाग नाहीच्च!!! 


1

आयुर्वेदाची दैवी परंपरा आणि रसशास्त्राची आदि परंपरा या भिन्न आहेत 


2

आयुर्वेदातले द्रव्याचे वर्गीकरण आणि रस शास्त्रातील द्रव्यांचे वर्गीकरण यांचा एकमेकांशी कुठेही मेळ बसत नाही 


3

आयुर्वेदात औषध तयार करण्याच्या मूलभूत 5विध कषाय कल्पना व संयुक्त कल्पना आणि एकूणच भैषज्य कल्पनांचा मूलाधार हा "जलामध्ये औषध उकळणे (water extract)" या स्वरूपाचा आहे. रसशास्त्रामध्ये अशाप्रकारे जला मध्ये उकळलेली औषधे आणि त्यांचा जलामध्ये आलेला एक्सट्रॅक्ट अशी कल्पनाच नाहीये ...


त्यामुळे रसशास्त्रातल्या चार दोन द्रव्यांचा, आयुर्वेदाच्या संहिता ग्रंथात जुजबी नाममात्र उल्लेख असला म्हणजे आपल्याला रसशास्त्र वापरण्याचा सातबारा कुलमुखत्यारपत्र पाॅवर ऑफ ॲटर्नी मिळते , असे जे लंगडं जस्टिफिकेशन केलं जातं ते स्वतःच्या तेजोहीनतेचं दुर्बलतेच अगतिकतेचं आणि भणंग दरिद्रीपणाचं प्रतीक आहे!!!


एखादी गोष्ट बीएमएस कोर्समध्ये आहे म्हणजे ती आयुर्वेद शास्त्रात आहे असा अर्थ अजिबात होत नाही


एखादी गोष्ट औषध म्हणून वापरण्याचा आपल्याला शासकीय कायद्याने परवाना आहे म्हणजे ते नैतिक असतंच असं नाही !!!


मद्यविक्री, तंबाखू विक्री, देहविक्रय याही बाबींना शासकीय कायद्याने परवानगी आहे, पण म्हणून ते नैतिक आहे असं होत नाही.


बी ए एम एस डिग्री च्या सिल्याबस मध्ये आहे आणि शासकीय कायद्याने परवानगी आहे असे असूनही, जर आपण मॉडर्न मेडिसिन वापरणाऱ्याला अशुद्ध आयुर्वेद म्हणत असू, तर मग रसशास्त्र वापरणे हेही तितकंच अनैतिक आहे


रसशास्त्र वापरणं हा आयुर्वेद शास्त्राशी विश्वासघात फितुरी गद्दारी आहे


संहितोक्त कल्प देऊन पेशंट बरा होत नाही, म्हणून रसशास्त्रातलं औषध द्यावंच लागतं असं आमच्या काही सन्मित्रांचं जस्टिफिकेशन आहे!


बरं, रसशास्त्रातला औषध देऊन पेशंट बरा "होईलच" याची काय शंभर टक्के गॅरंटी आहे का? 

समजा एखाद्या पेशंटला रस शास्त्रातलं औषध देऊनही तो बरा नाही झाला तर मग काय करता!? मॉडर्न कडे रेफर करताच ना!? किंवा तो पेशंटच तुम्हाला सोडून लाथ घालून मॉडर्न कडे स्वतःच निघून जातो ... जातो ना!? वस्तुस्थिती मान्य करा ना!? 


मग संहिता कल्पां बाबतच्या तुमच्या ज्ञानाच्या मर्यादामुळे किंवा चला क्षणभर तुमच्या समजूतीसाठी मान्य करू की, संहितोक्त कल्पांच्या सामर्थ्याच्या मर्यादेमुळे, पेशंट नाही बरा झाला ... आणि त्याला तुम्ही मॉडर्न रेफर केलं ... तर काय फरक पडेल असा !?


दादरला उतरून सीएसटी ला गेलात काय आणि माटुंगाला उतरून सीएसटी ला गेलात काय ... तर असं काय मोठा फरक पडणार आहे??? 


रसशास्त्र हा आयुर्वेदाचा भाग नाही, हे स्वतःच्या बुद्धीला सहजपणे पटत असताना सुद्धा, तसं स्पष्टपणे मान्य करण्याची धमक हिम्मत धैर्य धाडस सामर्थ्य तेज आपल्यात का असू नये!? 


आणि जर रसशास्त्र मुरगळून आयुर्वेदात कोंबायचंच असेल ... तर मॉडर्न ने काय अपराध केलाय??


आयुर्वेदाच्या तत्त्वांची विसंगत असलेले रसकल्प आपल्याला चालत असतील पेशंट बरा व्हायचाय म्हणून, तर मग मॉडर्न ने तर नक्की पेशंट बरा होणारेय रसकल्पांच्या तुलनेत ... मग, ते मॉडर्न स्वीकाराला काय हरकत आहे!? पण नाही ... मॉडर्न चं नाव काढलं की तो आयुर्वेदाचा वैद्य हा शास्त्रद्रोही झाला अस्पृश्य झाला अशुद्ध आयुर्वेद झाला इंटिग्रेटेड झाला 


आणि रसशास्त्राशी हातमिळवणी करून आयुर्वेदाशी गद्दारी फितुरी करता आहात, तो विश्वासघात नाहीये प्रतारणा नाहीये !? 


एकदा शांतपणे बसा आणि खरं खरं काय आहे ते फक्त स्वतःला उत्तर द्या ... जाहीर रित्या नाही दिले तरी चालेल !!!


उलट रसशास्त्र हा आयुर्वेदाचा भाग नसल्यामुळे, रस शास्त्राला स्वतंत्र शास्त्र म्हणून मान्यता मिळावी, त्याची स्वतंत्र कौन्सिल असावी, AYUSH आयुष मध्ये जसं, A आयुर्वेद Y योग U युनानी S सिद्ध H होमिओपॅथी, सोवा रिग्पा असे अनेक प्रकार आहेत चिकित्सांचे ... तसे "रस शास्त्र नावाचं एक अजून मेडिसिन सायन्स = चिकित्सा शास्त्र" समाविष्ट करायला सांगावे. त्यामुळे रसशास्त्राला स्वतंत्र ओळख मिळेल, स्वतंत्र अस्तित्व मिळेल ... त्याचा आयुर्वेदावरचं अवलंबित्व नष्ट होईल ... उलट यामध्ये रसशास्त्राचंच चांगभलं आहे, कल्याणच आहे!!!


Disclaimer/अस्वीकरण: लेखक यह नहीं दर्शाता है, कि इस गतिविधि में व्यक्त किए गए विचार हमेशा सही या अचूक होते हैं। चूँकि यह लेख एक व्यक्तिगत राय एवं समझ है, इसलिए संभव है कि इस लेख में कुछ कमियाँ, दोष एवं त्रुटियां हो सकती हैं। भाषा की दृष्टी से, इस लेखके अंत मे मराठी भाषा में लिखा हुआ/ लिखित डिस्क्लेमर ग्राह्य है


डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.


Disclaimer: The author does not represent that the views expressed in this activity are always correct or infallible. Since this article is a personal opinion and understanding, it is possible that there may be some shortcomings, errors and defects in this article.

Monday, 17 March 2025

What is the right age to get pregnant? 16, 20, 25 ... ✅️ 30, 35, 40 ... ❌️

 What is the right age to get pregnant?


16, 20, 25 ... ✅️ 30, 35, 40 ... ❌️

✍🏼

वैद्य हृषीकेश म्हेत्रे 

एमडी आयुर्वेद एम ए संस्कृत 

27 वर्ष से आयुर्वेद की सेवा मे 

संहितोक्त चिकित्सा practice @ पुणे & नाशिक

 17.03.2025 

9422016871


आज वंध्यत्व की चिकित्सा इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट यह हॉट केक इस प्रकार का विषय है.


 उभय अर्थात मॉडर्न मेडिसिन एवं आयुर्वेद क्षेत्र में इसकी प्रॅक्टिस से निश्चित रूप से बहुत अत्यधिक मात्रा मे धनार्जन होता है यह भी सत्य है


किंतु प्रेग्नंसी इज नाॅट अ डिसीज, ॲक्च्युली इट इज द सेलिब्रेशन ऑफ लाईफ ...

इसके लिये योग्य वय मे विवाह तथा गर्भधारणा होना यही इसकी नैसर्गिक चिकित्सा तथा वस्तुस्थिती है 


करिअर ऑपॉर्च्युनिटी के व्यर्थ मायाजाल के कारण पुरुष और स्त्री दोनों के विवाह का और उस कारण से गर्भधारणा का वय 30 या उसे भी आगे जा रहा है. 


इस अनैसर्गिक विलंब के कारण निश्चित रूप से अनपत्यता = इन्फर्टिलिटी की समस्या जटिल होती जा रही है 


यद्यपि यह सत्य है कि इन्फर्टिलिटी के इन पेशंट ( = कस्टमर ?!) के कारण, डॉक्टर वैद्य को धनप्राप्ती होती है


तथापि समाज के आरोग्य के आधार के रूप मे यह डॉक्टर वैद्य इनका कर्तव्य/ उत्तरदायित्व है, की उन्होने आगे आकर इनिशियेटिव्ह लेकर, यह प्रबोधन करना आवश्यक है कि, *गर्भधारणा का उचित वय* _25 30 के आगे न होकर_, *यह 16 से 20 सर्वाधिक आदर्श, तथा 20 to 25 मध्यम सुरक्षित & उपयोगी है* 

👆🏼

अभी स्टेटमेंट पर बहुत सारे लोगों को आपत्ती होगी.


 हमारी पिछली पिढी और उससे भी पिछली पिढी, इनको इस प्रकार की अनपत्यता की समस्या बहुतर मात्रा मे परसेंटेज वाईज देखा जाये , तो करीब करीब आयी ही नही थी और बच्चों की संख्या भी 4 से 8 - 10तक हुआ करती थी और फिर भी प्रायः माता और अपत्य दोनो निरामय और दीर्घायु तथा संपूर्ण जीवन मे सक्षम पाये जाते थे.


25 के पहले ही, जो भी प्रेग्नेंसी है वह पूर्ण होने के कारण , 40 वय में स्त्री अपत्य संगोपन के काम से उत्तरदायित्व से मुक्त हो जाती थी.


पिछले दो पिढियों के इन सभी लाभों का विचार किया जाये और पोस्ट के अंत में संस्कृत और इंग्लिश मे दिये गये रेफरन्स देखे जाये, 

तो आज का ट्रेन्ड और आज के कानून, इनको थोडा देर बाजू को रखकर भी, यह विचार और प्रबोधन, पुनश्च एकवार, समाज के सामने प्रस्तुत करना आवश्यक है कि, *स्त्री और पुरुष के विवाह/गर्भधारणा/अपत्यजन्म का वय, 25 से 30 के बाद नही, अपितु वह संपूर्ण जीवन मे आरोग्य संपन्न तथा सक्षम कार्य कुशलता के लिये विवाह एवं गर्भधारणा/अपत्यजन्म 20 से 25 वय वर्ष मे होना, आवश्यक है*


ऐसा कहना , यह अगतिकता होगी की , काल बहुत बदल गया है...


 काल कभी भी बदलता नही है, आज से कई सदियों पहले भी गर्भधारणा का कालावधी 280 दिन था, आज भी वही है ... आगे भी वही रहेगा !!!

*तो निसर्ग कभी भी बदलता नही है* 


हम निसर्ग के नियमों को धुत्कारकर नकारकर, कुछ अनैसर्गिक मेकॅनिकल जीवनशैली को अपनाने का निष्प्रयोजन & दिग्भ्रमित प्रयास कर रहे है ...


 तो इस दिग्भ्रम को इस गलतफहमी को समाज से दूर करने के लिए डॉक्टर/वैद्य ने प्रयास और प्रबोधन करना अत्यंत आवश्यक है की, स्त्री के विवाह का वय 20 और पुरुष के विवाह का 25 होना चाहिए 


शास्त्र तो इसे 16 और 20 / 25 ऐसेही लिखता है 


अगर हम शास्त्र के आयुर्वेद के अनुयायी है तो हमने इन शास्त्रीय नैसर्गिक विधानों का प्रस्तुतीकरण समाज के सामने , आज के ट्रेन्ड को इग्नोर करके भी , बडे धैर्य के साथ सातत्य निरंतरता के साथ करना आवश्यक है ... जिससे की इन्फर्टिलिटी जैसे केसेस की संख्या निसर्गतः ही कम हो जायेगी या निःशेष हो जायेगी


स्त्री पुरुष समानता के व्यर्थ निरुपयोगी fake नॅरेटिव्ह के प्रस्थापना के कारण , स्त्री-पुरुष _एकसमान equal न होकर_ , *परस्पर पूरक complimentary है* यह सत्य आवारीत तिरोहित रिजेक्ट कर दिया गया है 


इस कारण से एक अनावश्यक असुरक्षितता निर्माण होकर , आज आर्थिक रूप से स्वतंत्र होने के लिए अपने पैरो पर खडा होने के लिए आत्मनिर्भर होने के लिए,

 हर एक व्यक्ति प्रयास कर रहा है और उस आर्थिक स्थैर्यता की rat race मे , परस्परावलंबी परस्पर पूरक कौटुंबिक सहजीवन का मूल उद्देश नैसर्गिक परिचालन स्वाभाविक संचालन ईश्वरी अनुगमन छूट गया है 


और इस अर्थार्जन के चक्कर मे विवाह का वय आगे आगे जा रहा है, विवाह योग्य साथीदार नही मिल पा रहा है...

 और तो और में विवाह न करने की वृत्ती या विवाह अनावश्यक है ऐसी धरणा बनती चली जा रही है


 और इस कारण से भारतीय कुटुंब व्यवस्था का वैवाहिक संस्था का और वैयक्तिक सौख्य सामाजिक शांती इनका मूलाधार कंपित हो रहा है दुर्बल हो रहा है


पूर्णषोडशवर्षा स्त्री पूर्णविंशेन सङ्गता। 


शुद्धे गर्भाशये मार्गे रक्ते शुक्रेऽनिले हृदि॥८॥ 


वीर्यवन्तं सुतं सूते 




ऊनषोडशवर्षायामप्राप्तः पञ्चविंशतिम् । 


यद्याधत्ते पुमान् गर्भं कुक्षिस्थः स विपद्यते ।।




पञ्चविंशे ततो वर्षे पुमान् नारी तु षोडशे । 


समत्वागतवीर्यौ तौ जानीयात् कुशलो भिषक् ।।१३।।




What is the right age to get pregnant?




16, 20, 25 ... ✅️ 30, 35, 40 ... ❌️




While there's no single "right" age, a woman's peak fertility and pregnancy outcomes are generally considered to be in their late 20s and early 30s, with fertility declining as women age, particularly after 35. 


Here's a more detailed look at the factors involved:


Peak Fertility:


A woman's body is most fertile from the late teens through the 20s. 


Decline in Fertility:


As women age, the quantity and quality of eggs in the ovaries begin to decline, making it harder to conceive naturally. 


Increased Risks:


After age 35, there's a higher risk of pregnancy-related complications, such as miscarriage, and the risk of chromosomal conditions in the baby also increases. 


Age and Pregnancy Outcomes:


20s: Women in their 20s have the highest chance of conceiving and the lowest risk of pregnancy complications. 


30s: Fertility starts to decline, and the chances of miscarriage and C-section increase. 


40s: Fertility declines significantly, and the chances of conceiving naturally are very low. 


Other Factors:


Besides age, a woman's overall health, lifestyle, and readiness for motherhood also play a significant role in the decision of when to get pregnant.




वैद्य हृषीकेश म्हेत्रे एमडी आयुर्वेद एम ए संस्कृत 27 वर्ष से आयुर्वेद की सेवा मे संहितोक्त चिकित्सा practice @ पुणे & नाशिक 17.03.2025 

9422016871

Wednesday, 12 March 2025

आरोग्यवर्धिनी : एक आय ओपनर 👀 ॲनालिसिस तथा एक सशक्त 💪🏼 विकल्प

आरोग्यवर्धिनी : एक आय ओपनर 👀 ॲनालिसिस तथा एक सशक्त 💪🏼 विकल्प

सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved

Copyright कॉपीराइट © वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत. 

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे (रविवार) & नाशिक (बुधवार). 

9422016871

www.YouTube.com/MhetreAyurved/

www.MhetreAyurveda.com 

+91 94 220 16 871

MhetreAyurveda@gmail.com

www.Mixcloud.com/MhetreAyurved/


आरोग्यवर्धिनी

रसगंधकलोहाभ्रशुल्बभस्मसमांशकम् ।

त्रिफला द्विगुणा योज्या त्रिगुणं तु शिलाजतु ॥

चतुर्गुणं पुरं शुद्धं चित्रमूलं च तत्समम् ।

तिक्ता सर्वसमा ज्ञेया (देवा) सर्वं संचूण्यं यत्नतः ।

निंबवृक्षदलांभोभिर्मर्दयेत् द्विदिनावधि ।

ततस्तु गुटिका कार्या क्षुद्रकोलफलोपमाः ।।

मंडलं सेविता सैषा (ह्येषा) हन्ति कुष्ठान्यशेषतः।

वातपित्तकफोद्भूताञ्ज्वरान्नानाप्रकारजान् ॥

देया पञ्चदिने जाते ज्वरे रोगे वटी शुभा ।

पाचनी दीपनी पथ्या हृद्या मेदोविनाशिनी ॥

मलशुद्धिकरी नित्यं दुर्धर्षक्षुत्प्रवर्तिनी । 

बहुनाऽत्र किमुक्तेन सर्वरोगेषु शस्यते ॥

आरोग्यवर्धनी नाम्ना गुटिकेयं प्रकीर्तिता । 

सर्वरोगप्रशमनी श्रीनागार्जुनयोगिना


आरोग्यवर्धिनी यह सभी आयुर्वेद प्रॅक्टिशनर वैद्यों के उपयोग मे आनेवाला, सूतशेखर के बाद, दूसरा लोकप्रिय कल्प है.

इसका रोग अधिकार रसरत्नसमुच्चय में कुष्ठ है 

इसके प्रथम पांच कंटेंट =घटक द्रव्य ये, भस्म स्वरूप है जिसमें से रस अर्थात पारद का भस्म असंभव हि है. इसलिए उसका "शोधित पारद" इतना ही प्रॅक्टिकली लिया जा सकता है.

दूसरा गंधक , जिसका फिर से भस्म नहीं होता है, वह भी शुद्ध गंधक के रूप में लेना है 

लोह अभ्रक और ताम्र इनका भस्म "बनाया जाता" है, किंतु ऐसे भस्मों की व्यावहारिक स्थिति क्या है, इसके लिए निम्नोक्त लेख अवश्य पढ़े

https://mhetreayurved.blogspot.com/2024/01/blog-post.html

इसके पश्चात त्रिफला त्रिगुण मात्रा में उल्लेखित है. लोकप्रिय रसकल्प विवरणकारी, आयुर्वेदीय औषधि गुण धर्म शास्त्र, इस पुस्तक के लेखक, आदरणीय गुणे शास्त्री ने हरीतकी आमलकी बिभीतक ये तीनों द्विगुण मात्रा में लेने के लिए कहे हैं, जो अनुचित है. कुल मिलाकर त्रिफला द्विगुण मात्रा में लेनी है. अगर हरीतकी बिभीतकी आमलकी तीनों भी दुगुनी मात्रा में लेंगे, तो त्रिफला द्विगुण की बजाय, 6 गुना हो जाएगी!!! जो इस कल्प के पाठक के अनुसार नहीं है. 


आगे शिलाजीत तीन भाग या त्रिगुण लेने के लिए कहा है , किंतु रस शास्त्र में जो अपेक्षित है या संहिता में जो अपेक्षित है, ऐसा शिलाजीत तो, आज व्यवहार में प्राप्त होता ही नहीं है. रस शास्त्र में , शिलाजीत की परीक्षा "सलिले अपि अविलीनं" अर्थात जल में अविलेय अर्थात वाॅटर इनसोल्युबल water insoluble, ऐसी लिखी है और आज व्यवहार में शिलाजीत का शोधन त्रिफला के क्वाथ में "घोलकर" 😇यानी "डिझाॅल्व्ड् 🙃 इन त्रिफला क्वाथ". तो ऐसे आज का व्यावहारिक शिलाजीत वॉटर सॉल्युबल है, ना कि वाटर इनसोल्युबल 😆🤣... "जो मूल ग्रंथ की शिलाजीत ग्राह्यता परीक्षा के संपूर्णतः विपरीत है".

वैसे तो संहितोक्त शिलाजीत 4 प्रकार का चरक में और 6 प्रकार का सुश्रुत में, किंतु रस रत्न समुच्चय में तो ऐसे 4 या 6 प्रकार ना होते हुए, केवल 2 ही प्रकार है ... जिसमें से गोमूत्र गंधी शिलाजीत है, जो जैसे ऊपर बताया वाटर इनसोल्युबल के रूप में वैसे, आज अस्तित्व में ही नहीं है और कर्पूर शिलाजीत का शिलाजीत से कोई संबंध नहीं है, वह कलमी सोरा= पोटॅशियम नाइट्रेट है.

आगे गुग्गुल चार गुणा लिखा है ... जितनी चंद्रप्रभा और आरोग्य वर्धिनी भारत में बनती है , उसके लिए जितना गुग्गुल आवश्यक है, उतना तो पूरे विश्व में भी नहीं बन सकता है , उपलब्ध नहीं हो सकता है😖😩 ... ऐसी स्थिति में सभी की चंद्रप्रभा और आरोग्यवर्धिनी एक ही रंग की हो, इसलिए यह टैबलेट्स काले रंग की बनाई जाती है, क्योंकि उसमें गुग्गुल तो मिलता नहीं है, जितना चाहिए उतना, इसलिए गम ॲकेशिया= बब्बूल का गोंद और चारकोल अर्थात कोयले का चूर्ण डाला जाता है 😳😱... 


तो इस प्रकार से आप देखेंगे तो , त्रिफला नामक कंटेंट बाजू को रखेंगे , तो रस से लेकर गुग्गुल तक के कंटेंट, यह व्यावहारिक & शास्त्रीय इस प्रकार से, असंभव है अनुपलब्ध है अशास्त्रीय है विसंगत है अनुचित है अयोग्य है अहितकारी है ⛔️🚫❌️


चित्रक जैसा अत्यंत उष्ण वीर्य द्रव्य, कुष्ठ रोग में उपयोगी कल्प में होना , अत्यंत अनुचित है ... वैसे भी देखा जाए तो, यह संपूर्ण कप अत्यंत रूक्ष है , इसमें त्रिफला गुग्गुलु कटुकी निंब ऐसे अत्यंत रूक्ष द्रव्य है और कुष्ठ में इतनी रूक्षता योग्य नहीं है !!!


चित्रक तो साक्षात् अग्नि है , इसलिए वह उष्ण और रूक्ष दोनों हैं , जो कुष्ठ के लिए अत्यंत हानिकारक है. 


अगर आप देखेंगे तो "कुष्ठ का उल्लेख" चरक सूत्र स्थान 28 विविधाशितपीतीय , इस अध्याय में "रक्त प्रदोषज" विकारों में हुआ है और कुष्ठ में जो धातुओं की स्थिति होती है, वह "क्लेद और कोथ" इस प्रकार की होती है और "क्लेद और कोथ" यह दोनों भी चरक सूत्र 20 तथा अष्टांगहृदय सूत्र स्थान 12 में, "प्रकुपित पित्त के कर्म" लिखे हैं अर्थात जहां कुष्ठ की संप्राप्ति होने के लिए "पित्त और रक्त की दुष्टि मूलभूत कारण" है , ऐसी स्थिति में , चित्रक का वहां पर प्रयोग करना, तो अशास्त्रीय अनुचित अयोग्य और पेशंट के दृष्टि से हानिकारक है.


वैसे भी आप अगर संहिता में कुष्ठ चिकित्सा देखेंगे, तो उसका प्रारंभ स्नेहपान से होता है. इसका अर्थ यह होता है की "कुष्ठ चिकित्सा का मूलाधार स्नेह चिकित्सा" है, इसलिए उसकी चिकित्सा में प्रारंभ में ही तिक्तक महातिक्तक वज्रक महावज्रक इन "घृतों" का उल्लेख हुआ है.


वैसे भी बहुत लोकप्रिय है ऐसे, महातिक्तक घृत में , घृत की द्विगुण मात्रा में आमलकी स्वरस है, किंतु आमलकी स्वरस में जल/द्रव की मात्रा अधिक होने के कारण, जब घृत सिद्ध हो जाता है, तो महातिक्तक के अन्य सभी तिक्त द्रव्य और आमलकी इनकी मिलकर जो रूक्षता है, इसका कंपनसेशन या अनुपद्रवता; घृत की उपस्थिति से हो जाता है.


संहिता में चित्रक का उल्लेख केवल कफज कुष्ठ में है, वह भी फिर से घृत सिद्ध करके ही देना है. इसलिए चित्रक जैसे उष्ण रूक्ष घटक द्रव्य का आरोग्यवर्धिनी नामक कुष्ठ अधिकार में उल्लेखित कल्प में होना अनुचित है.


आरोग्यवर्धिनी को परिवर्तित/ नामांतरित रूप में 50 टू लीव इस नाम से बाजार में मार्केट में पाया जाता है, जो कुष्ठ नहीं, अपितु लीवर की हेपेटाइटिस की जॉन्डिस की स्थिति में प्रायः दिया जाता है ... यह भी पित्त प्रधान रक्त प्रधान ही स्थिती है, तो ऐसी स्थिति में भी चित्रक जैसे द्रव्य का आरोग्यवर्धिनी या 50 टू लीव , इनमें होना अनुचित है.


अर्थात इसी प्रकार से पारद गंधक ताम्र ऐसे आत्यंतिक उष्ण और विष सदृश विष युक्त द्रव्यों का आरोग्यवर्धिनी में होना, वैसे भी असुरक्षित और अशास्त्रीय है.


मूलतः विचार किया जाए तो, यदि पारद गंधक लोह अभ्रक ताम्र शिलाजीत गुग्गुल चित्रक इन अयोग्य द्रव्यों को बाजू को रखेंगे, तो भी जो बाकी तीन (3) मुख्य द्रव्य इस कल्प में शेष रहते हैं ... "त्रिफला कटुकी और निंब" यह भी अत्यंत रूक्ष है और कुष्ठ की चिकित्सा स्नेह से होती है ... रूक्षता से नहीं! 


इसलिए मूलतः इस कल्प का फाॅर्म्युलेशन/ डिजाइन ही आप्त प्रमाण से विसंगत तथा अशास्त्रीय और अनुचित है


फिर भी जिनको दुराग्रह हट्टाग्रह करके आरोग्यवर्धिनी उपयोग में "लानी ही है", उन्होंने उपरोक्त असुरक्षित और अशास्त्रीय द्रव्यों को इस कल्प से हटाकर (अर्थात पारद गंधक लोह अभ्रक ताम्र शिलाजीत गुग्गुलु और चित्रक इनको हटाकर), केवल त्रिफला व कटुकी उनके चूर्ण को निंब पत्र स्वरस की भावना देकर, उस कल्प का प्रयोग करना उचित होगा !!


आगे ... यह आरोग्य"वर्धनी या वर्धिनी" नाम का कल्प निर्माण करने के बाद , उसकी वटी का प्रमाण क्षुद्र कोल और राज कोल ऐसे दोनों शब्दों में लिखा गया है तो यह कन्फ्यूजिंग है.


कोल का अर्थ = अर्ध कर्ष अर्थात 5 (या 6.15) ग्राम होता है , तो आपने कभी भी, किसी भी फार्मेसी की आरोग्यवर्धिनी वटी 5 या 6 ग्राम की देखी तक नहीं होगी !!!

प्राय यह वटी 250 मिलीग्राम की मात्रा में ही आती है. और अगर शास्त्रोक्त मात्रा कोल प्रमाण देना हुआ, तो इस वटी के 20 वटिया/टॅबलेट्स देना, एक समय में, आवश्यक होगा, जो प्रॅक्टिकली इंपॉसिबल है ...

और जो लोग 250 मिलिग्राम वटी देकर, उसके "रिजल्ट आते हैं" , ऐसा कहते हैं, यह एक बुद्धि भ्रम है या इल्यूजन डिलूजन है.😇🙃


त्रिफला और निंबपत्र यह दोनों नेत्र्य है चक्षुष्य 👁👁 है, फिर भी आरोग्यवर्धिनी की फलश्रुती में इस प्रकार का कोई उल्लेख प्राप्त नहीं होता है , यह आश्चर्यकारक है


आगे ... यह एक ही वटी वात पित्त कफ ऐसे "तीनों / कई/विविध/नाना प्रकार के ज्वर" का नाश करती है , ऐसा लिखा है ... जो इसके कंटेंट देखकर शास्त्रसुसंगत नहीं लगता है


ज्वर के लिए यह वटी पांचवें दिन देने के लिए कहा है, यह भी शास्त्र के विरोध में है , क्योंकि ज्वर के लिए जो औषध देना है , वह सातवें दिन देना है , वस्तुतः अगर ठीक से कॅलक्युलेट करें तो लंघन स्वेदन कालो ... इस श्लोक के अनुसार औषध देने की बात तो 7 दिन के भी बहुत बाद आती है ... तो यहां पर पांचवें दिन ज्वर के लिए आरोग्यवर्धिनी वटी देना यह शास्त्रविसंगत है 


और थोड़ा व्याकरण की दृष्टि से अलग देखा जाए ... और कोई कहे कि पांचवें दिन नहीं देना है , अपितु 5 वटियां देनी है, तो यह भी अनुचित है , क्योंकि आगे वटी यह शब्द एक वचन में है ... अगर पंच वटी ऐसा अभिप्रेत होता यानी पांच वटियां देनी है ऐसा अभिप्रेत होता तो, वटी शब्द का बहुवचन वट्यः आना आवश्यक था.


आत्यंतिक उष्ण द्रव्य इसमें होने के कारण दीपनी पाचनी यह तो ठीक है , किंतु पथ्या कहना शास्त्रविसंगत है , इतनी रूक्ष उष्ण वटी पथ्या है, ऐसा कहना ठीक नहीं.


आगे हृद्य ऐसा इसका गुणधर्म लिखा है, जो फिर से शास्त्रविसंगत है, इतना रूक्ष द्रव्य हृदय जैसे त्रिमर्म में उल्लेखित अवयव के लिए हानिकारक ही होगा 


और हृद्य का अर्थ "रुचि कारक" लेंगे तो इतनी कड़वी जिसकी टेस्ट है, वह रुचिकर हो या मन के लिए प्रिय हो, हृद्य के अर्थ में यह भी संभव नहीं है 


मेदोविनाशिनी लिखा है, यह ठीक है ... किंतु आरोग्यवर्धिनी की कितनी मात्रा कितनी कालावधी तक देने के बाद , अपेक्षित मेदोनाश होगा , यह करके देखने की बात है ... किंतु प्रायः इस प्रकार का व्यवहार आरोग्यवर्धिनी के संदर्भ में देखा सुना नहीं है की यह वटी मेदो नाश के लिए दी गई है 


अगर इसमें त्रिफला और कटुकी इतनी बड़ी मात्रा में है तो , विरेचन के द्वारा मल शुद्धिकरी होना , यह सामान्य सी बात है 


दुर्धर्ष क्षुत् प्रवर्तनी यह विसंगत है , क्योंकि आरोग्यवर्धिनी से क्षुत् = क्षवथु = छींके आना यह असंभव है 


क्षृत् शब्द का अर्थ क्षुधा लेना, यह यहां पर व्याकरण की दृष्टि से संभव नहीं है, क्योंकि क्षुध् ऐसा शब्द है, तो ध् का द् होगा (झलां जशोऽन्ते) इसलिए क्षुद्प्रवर्तिनी होना चाहिए था क्षुत्प्रवर्तिनी नहीं ... क्षुत्प्रवर्तिनी यह शब्द क्षुधा को बोधित नहीं करता 


आगे ... "सर्वरोगेषु शस्यते" कह कर, फिर से, "सर्वरोगप्रशमनी" कहा है यह पुनरुक्ति दोष है ... 

और कोई एकही कल्प व भी ऐसे उटपटांग शास्त्रविसंगत अयोग्य असुरक्षित विष सदृश जिसके घटक द्रव्य है, ऐसा एकही कल्प सभी रोगमे प्रशस्त है या सभी रोगों का प्रशमन करेगा यह वाक्य ही दोषयुक्त है असंभव है


इतने उष्ण तीक्ष्ण रूक्ष कंटेंट्स है , यह सभी रोगों को नष्ट करेंगी, यह शास्त्रविसंगत है


अभी, जैसे पहले स्पष्ट किया, वैसे इस कल्प के पारद गंधक लोह अभ्रक ताम्र शिलाजीत और गुग्गुल चित्रक ये घटक द्रव्य शास्त्रविसंगत है ... इसलिए शेष बचे त्रिफला और कटुकी , इनके चूर्ण को यदि निम्ब पत्रों की भावना दी जाए , तो भी यह कल्प, स्नेह के साथ या स्निग्ध अनुपान के साथ उचित और शास्त्रसुसंगत होगा!!! 


किंतु इतना करने की आवश्यकता ही नहीं 🙂

... अगर आप "कल्पशेखर भूनिंबादि" देखेंगे , तो इसमें त्रिफला कटुकी और निंब इनका समावेश पहले से ही है ... साथ में वासा गुडूची पटोल पर्पट और मार्कव इनका भी इसमें समावेश होने के कारण यह "कल्पशेखर भूनिंबादि", आरोग्यवर्धिनी के सुसंगत और शास्त्रीय घटक द्रव्य त्रिफला कटुकी नंबर इनकी तुलना में भी, अधिक उपयोगी सुरक्षित और श्रेष्ठ कल्प है, यह निश्चित!!!✅️👍🏼


✍🏼 कल्प'शेखर' भूनिंबादि एवं शाखाकोष्ठगति, छर्दि वेग रोध तथा ॲलर्जी 👇🏼

https://mhetreayurved.blogspot.com/2023/12/blog-post.html

इसलिए अत्यंत कॉस्टली (रसकल्प होने के कारण), आरोग्यवर्धिनी का , शास्त्रोक्त मात्रा में प्रयोग किए बिना, मनघडन व्यवहार = प्रॅक्टिस में इर्लीव्हन्ट उपयोग करने की जगह, यदि शास्त्रीय सुरक्षित इस प्रकार के "कल्पशेखर भूनिंबादि" का यहां पर उपयोग किया जाए, तो यह अत्यंत योग्य और पेशंट के हित में होगा!!! ... साथ ही पेशंट एवं वैद्य, दोनो के लिए भी यह अफॉर्डेबल है 


अगर ठीक से कुष्ठ रोग अधिकार देखा जाए तो,

माधव निदान में कुष्ठ के पहले नाडीव्रण भगंदर उपदंश शूकदोष का वर्णन है , "जो क्लेदप्रधान रोग" है और कुष्ठ के पश्चात ... पुनः "क्लेदप्रधान" ही अम्लपित्त शीतपित्त विसर्प विस्फोट मसूरिका इनका वर्णन आता है ...

अर्थात यह सारे "क्लेद प्रधान व्याधियों का संप्राप्ति मार्ग है", इसी कारण से कुष्ठ में उल्लेखित आरोग्यवर्धिनी की जगह , यदि कुष्ठ के समान ही क्लेद प्रधान संप्राप्ति जिसमें है ऐसे अम्लपित्त अधिकार में उल्लेखित कल्प शेखर भूनिंबादि का प्रयोग कुष्ठ के संप्राप्ति में करना, वह भी स्निग्ध अनुपान के साथ, यह अत्यंत उचित शास्त्र सुसंगत और पेशंट के लिए हितकारक तथा वैद्य के लिए अफॉर्डेबल होगा


वटी की मात्रा एक कर्ष है अर्थात 10 (या 12) ग्राम है. तो 250 मिलीग्राम की 40 टैबलेट देना आवश्यक है. किंतु यदि जिस चूर्ण की टॅबलेट बन रही है, उस चूर्ण को उसी चूर्ण की 7 भावनाएं दी जाए, तो यह मात्रा एक सप्तमांश 1/7 अर्थात 14% तक नीचे आती है ... इसी कारण से 250 mg की 40 गोली देने के बजाय, केवल 6 गोलियों में इच्छित कार्य परिणाम कारक रूप से हो सकता है. ✅️👍🏼


आरोग्यवर्धिनी की शास्त्रोक्त मात्रा कोल प्रमाण है. कोल का अर्थ = अर्ध कर्ष होता है = जो 5 ग्राम के बराबर आता है , तो 250 मिलीग्राम की 20 टॅबलेट देना, एक समय में, आवश्यक है... जो प्रॅक्टिकली इंपॉसिबल है पेशेंट के लिए असुविधा कारक है तथा नॉन अफॉर्डेबल है, कॉस्टली है , रसकल्प पर होने के कारण !!!


इन सभी मुद्दों का अगर आप शास्त्र , व्यवहार , पेशंट का हित तथा ॲफॉर्डेबिलिटी (पेशंट और वैद्य दोनों के लिए) इन सभी बातों का विचार करें, तो आरोग्यवर्धिनी जैसे शास्त्रविसंगत अत्यंत रूक्ष कल्प की जगह, यदि क्लेद जन्य संप्राप्ति में उल्लेखित, अम्लपित्त अधिकार में उल्लेखित, कल्पशेखर भूनिंबादि का प्रयोग करेंगे, तो आपको आपकी अपेक्षा से भी अधिक अच्छे रिजल्ट्स, कम समय में प्राप्त होंगे.


आरोग्यवर्धिनी के लिए लिखा गया है कि, 42 दिन अर्थात एक मंडल = 6 सप्ताह में सभी कुष्ठ का नाश 🤔⁉️करती है ... 

कुष्ठं दीर्घ रोगाणाम् ऐसा चरकोक्त अग्रे संग्रह है

कुष्ठ यह एक दीर्घरोग है ... दीर्घरोग का अर्थ यह क्रॉनिक होता है, जिसमें रिकरंस फ्लेअर्स यह बात बहुत ही सामान्य है, तो ऐसी स्थिति में केवल 6 सप्ताह में आरोग्यवर्धिनी से सभी कुष्ठ नष्ट हो जाएंगे , यह एक अशास्त्रीय और आगम प्रमाण से विसंगत विधान है!!! 


इसलिए प्रॅक्टिकल, व्यावहारिक स्तर पर जो संभव है, ऐसी अपेक्षा रखकर , कुष्ठ में कल्पशेखर भूनिंबादि का, स्निग्ध अनुपान के साथ, यदि 3 से 6 मास तक आहार के पथ्यपालन के साथ, प्रयोग किया जाए , तो निश्चित रूप से सभी प्रकार के कुष्ठ में त्वचा रोगों में रक्त पित्त दुष्टि में "कल्पशेखर भूनिंबादि" अत्यंत कार्यकारी सिद्ध हो सकता है.


अर्थात "औषध अन्न और विहार" इन तीनों का समन्वय👍🏼 ही पेशंट को आरोग्य की प्राप्ति ✅️करा सकता है ...

इसलिए "कल्पशेखर भूनिंबादि" देते समय, पेशंट के आहार में अम्ल वर्ग के पदार्थ ,अति नमकीन पदार्थ, जमीन के नीचे आने वाले अंडरग्राउंड पदार्थ , मैदा और कॉर्नफ्लोअर से बनने वाले पदार्थ जैसे की बेकरी पिझ्झा इत्यादि तथा कुकर में पकने वाले अन्न पदार्थ, सभी पल्प और फ्लुईड वाले अन्न पदार्थ वर्ज्य रखेंगे ; जैसे यह निगेटिव्ह पथ्य है या अपथ्य है, ...


वैसे ही पॉझिटिव पथ्य के रूप में ...

सुबह के नाश्ते में मूंग मसूर चवळी ...

दोपहर के भोजन मे फुलके, वेलवर्गीय लंबी फल वाली सब्जियां = गॉर्ड्स, कुकर में ना पकाया हुआ चावल, मांड/स्टार्च निकालकर और

रात्रि के भोजन में ... हो सके तो केवल लाजा या मूंग से बने पदार्थ या मूंग की खिचड़ी इतना ही आहार करेंगे ... 

तो निश्चित रूप से व्याधि की क्राॅनिसिटी के अनुसार और रुग्ण के वय के अनुसार ... 3 से 6 महीने में सभी कुष्ठ/ त्वचा रोगों में "कल्पशेखर भूनिंबादि" के उपयोग से पेशंट को आरोग्य की प्राप्ति निश्चित रूप से हो सकती है.

सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved

Copyright कॉपीराइट © वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत. 

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे (रविवार) & नाशिक (बुधवार). 

9422016871

Articles about a few medicines that we manufacture

👇🏼

पूर्वप्रकाशित 

अन्य लेखों की 

ऑनलाईन लिंक👇🏼


✍🏼


The BOSS !! VachaaHaridraadi Gana 7dha Balaadhaana Tablets 

👇🏼

https://mhetreayurved.blogspot.com/2023/11/blog-post.html

👆🏼

वचाहरिद्रादि गण सप्तधा बलाधान टॅबलेट : डायबेटिस टाईप टू तथा अन्य भी संतर्पणजन्य रोगों का सर्वार्थसिद्धिसाधक सर्वोत्तम औषध


✍🏼


कल्प'शेखर' भूनिंबादि एवं शाखाकोष्ठगति, छर्दि वेग रोध तथा ॲलर्जी

👇🏼

https://mhetreayurved.blogspot.com/2023/12/blog-post.html


✍🏼


वेदनाशामक आयुर्वेदीय पेन रिलिव्हर टॅबलेट : झटपट रिझल्ट, इन्स्टंट परिणाम

👇🏼

https://mhetreayurved.blogspot.com/2023/10/blog-post.html


✍🏼


स्थौल्यहर आद्ययोग : यही स्थूलस्य भेषजम् : त्रिफळा अभया मुस्ता गुडूची

👇🏼

https://mhetreayurved.blogspot.com/2024/06/blog-post.html


✍🏼


क्षीरपाक बनाने की विधि से छुटकारा, अगर शर्करा कल्प को स्वीकारा

👇🏼

https://mhetreayurved.blogspot.com/2023/11/blog-post_25.html


✍🏼


ऑलिगो एस्थिनो स्पर्मिया oligo astheno spermia और द्रुत विलंबित गो सप्तधा बलाधान टॅबलेट

👇🏼

https://mhetreayurved.blogspot.com/2024/06/oligo-astheno-spermia.html


✍🏼

All articles on our MhetreAyurveda blog

👇🏼

https://mhetreayurved.blogspot.com/


वैद्य हृषीकेश म्हेत्रे

आयुर्वेद क्लिनिक्स @ पुणे & नाशिक 

9422016871 


www.YouTube.com/MhetreAyurved/


www.MhetreAyurveda.com

Tuesday, 11 March 2025

डायबिटीस टाईप टू में, औषध अन्न विहार + रिपोर्ट इनका प्रशस्त नियोजन, म्हेत्रेआयुर्वेद MhetreAyurveda के अनुसार

डायबिटीस टाईप टू में, औषध अन्न विहार + रिपोर्ट इनका प्रशस्त नियोजन, म्हेत्रेआयुर्वेद MhetreAyurveda के अनुसार

वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे.

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत. 

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे (रविवार) & नाशिक (बुधवार). 9422016871


औषधान्नविहाराणाम् उपयोगं सुखावहम्॥

औषध अन्न विहारा णाम् उपयोगं सरिपोर्टम्॥





औषध अन्न विहार & रिपोर्ट इन चारों के साथ ही अगर ट्रीटमेंट करेंगे, तो ही अपेक्षित परिणाम प्राप्त होते है ...


औषध 

वचाहरिद्रादि 6 टॅबलेट दिन मे 3 बार ,

यदि एच बी ए वन सी Hba1c 9 तक हो तो!



वचाहरिद्रादि 6 टॅबलेट दिन मे 4 बार अगर 

एचबीएवनसी HBA1C 10 or 10+ हो 

यह 👇🏼विस्तारित लेख भी पढे, समय निकाल कर

The BOSS !! VachaaHaridraadi Gana 7dha Balaadhaana Tablets 👇🏼

https://mhetreayurved.blogspot.com/2023/11/blog-post.html

👆🏼 वचाहरिद्रादि गण सप्तधा बलाधान टॅबलेट : डायबेटिस टाईप टू तथा अन्य भी संतर्पणजन्य रोगों का सर्वार्थसिद्धिसाधक सर्वोत्तम औषध

यह 👆🏼विस्तारित लेख भी पढे, समय निकाल कर

अन्न 


नाश्ता = ब्रेकफास्ट

सुबह के नाश्ते मे मूग मसूर चवळी उडीद इन से बने हुए चीला डोसा उसळ धिरडं पिठलं आप्पे (वडे अगर लिपिड्स नॉर्मल हो तो ... वडे छोटे छोटे तलना, अपने अंगुली के पर्व के आकार के, जैसे मूंग भजी होते है वैसे, बडे बडे बडे नही तलना, मेदुवडा की तरह) अर्थात प्रोटीन =हर्बल प्रोटीन= नैसर्गिक रूप मे आहार के रूप मे सुबह नाष्टे मे देना.


चिकन अंडे मच्छी ऐसी प्रोटीन वाली चीजे नही देना


पनीर मे भी प्रोटीन होता है, किंतु बाजार के पनीर मे कॉर्नफ्लोअर होता है और घर मे बने हुए पनीर मे भी दूध के फॅट = लिपिड तथा लॅक्टोज अर्थात शुगर होती है.


तो सर्वाधिक अच्छा है कि हप्ते मे पाच 5 बार मूंग मसूर चवळी उडीद से बने हुए व्यंजन 


एखाद बार नॉनव्हेज = बकरे अजा goat का मटन देना (अवि मेंढी लॅम्प शीप बोल्हाई का नहीं)  किंतु वह भी बोनलेस खिमा गर्दन मांडी यहा का न देते हुए , सीना+चाॅप के रूप मे देना 


और एकादबार पनीर (घर मे बना हुआ) देना ... ठीक रहेगा.


दोपहर का भोजन = lunch  

इसमें पूरा/संपूर्ण/complete भोजन अर्थात 

1. मूंग की दाल (या मसूर की चवली की उडद की)

2. चावल (कुकर मे पकाया हुआ नही ... मांड निकाला हुआ = स्टार्च स्ट्रेन आउट किया हुआ, चावल के दानो को शुद्ध देसी घी पर भून के रखा हो, तो जादा अच्छा) 

3. रोटी के बदले फुलके और 

4. लंबी वेलवर्गीय फल वाली सब्जी या अर्थात Gourds = पडवळ दुधी भोपळा घोसाळ गिलक दोडका गवार भेंडी वांग शिमला मिरची शेवगा कोहळा ... 10 सब्जियां व्हरायटी के लिए काफी है, ये भी मूंग डाल डालकर पकाये 


सॅलड खाना ही है तो कम मात्रा मे खाये ... मूली काकडी ये ठीक है ... गाजर बीट कोबी ये न खाये


मुख्य रूप से भोजन के जो चार अंग है 

अर्थात कार्बोहाइड्रेट = फुलके और (कुकर के बिना पकाया हुआ) चावल 

प्रोटीन = मूंग या उसकी की दाल या मसूर चवळी उडद इन से बनी सब्जी = उसळ वरण आमटी पिठलं. 

मूंग या मसूर चवळी उडद ये कभी भी अंकुरित स्प्राऊटेड करके न खाये

फायबर के रूप मे लंबी वेलवर्गीय फल वाली सब्जीयां अर्थात गॉर्ड्स और इन सबको यथा संभव , कम से कम तेल या शुद्ध देसी घी का तडका आवश्यकता नुसार 


रात का भोजन अर्थात डिनर 

यह डायबिटीस टाईप टू तथा ओबेसिटी कोलेस्टेरॉल इनका मुख्य कारण है 

डिनर इस द कल्प्रिट dinner is the culprit 

डिनर ही सर्वदोषकारी है 

प्रायः 30 35 40 उमर के पश्चात्, हमारे शरीर मे तारुण्य यौवन की तरह शीघ्र धातु वृद्धी नही होती है 

और इसी उमर मे हमारा लाइफस्टाईल , सभी का जीवनशैली इस प्रकार का होता है ... हम बेडसे उठते है, कमोड पर बैठते है, बाद मे डायनिंग चेअर पर बैठकर नाश्ता करते है, फिर टू व्हीलर बस रिक्षा कार इसमे बैठकर हमारे कार्यस्थळ ऑफिस बिजनेस दुकान स्कूल कॉलेज यहा जाते है, वहा पर भी चेअर बेंच इस पर बैठते है, फिर वापस किसी ना किसी वाहन की सीट पर बैठकर घर आते है, फिर सोपे पर बैठकर टीव्ही/ मोबाईल या लॅपटॉप देखते है, फिर डायनिंग चेअर पर बैठकर डिनर करते है और फिर बेड पर सो जाते है ... ऐसी जीवनशैली मे, अगर हम डिनर मे ... फिरसे दाल चावल सब्जी रोटी ऐसा "संपूर्ण आहार" लेंगे और उसके बाद छ से आठ घंटे तक, बिना कोई चलन वलन करे बिना मूव्हमेंट करे हालचाल किये बिना, बेड पर पडे रहेंगे ... तो डिनर के समय, शरीर मे जाने वाला कार्बोहाइड्रेट शुगर ग्लुकोज जल पृथ्वी क्लेद , इसका कोई भी उपयोग नही होता है ... और यह रोज रात्री के भोजन मे रोज के डिनर मे शरीर मे अनावश्यक रूप मे संचित होने वाला, जिसका कभी भी उपयोग नही होता है, ऐसा अन्न, शरीर मे आगे जाकर , दीर्घकाल संचित होकर ... शुगर कोलेस्टेरॉल ओबीसीटी डायबेटीस और अन्य कई तरह की संतर्पण जन्य विकारों का मुख्य निदान बनता है ... इसलिये डिनर इज द कल्प्रिट डिनर सर्व दोष प्रकोपक है 


इसलिये डिनर मे ऐसा भोजन करे की ... जो उदर की पूर्ती करे क्षुधा का शमन करे ... किंतु शरीर मे नये रूप मे अनावश्यक रूप मे अधिक रूप मे एक्स्ट्रा रूप मे अनुपयोगी रूप मे फिरसे , शुगर कार्बोहायड्रेट ग्लुकोज जल पृथ्वी क्लेद इनका संवर्धन डिपॉझिशन ना करे 


इसलिये सबसे आदर्श है की डिनर मे लाजा = साळीच्या लाह्या खाये ... राईस फ्लेक्स कुरमुरे चिरमुरे मुरमुरे नही. लाजा= जो हम लक्ष्मी पूजन मे प्रसाद के रूप मे लक्ष्मी जी को चढाते है ये साळीच्या लाह्या जिसे कई जगह खील कहा जाता है. उपर इसका चित्र लेखके आदि और अंत मे दिया है. साळीच्या लाह्या उपलब्ध न हो तो, ज्वारी लाह्या बनाये, इसके कई व्हिडिओ युट्युब पर उपलब्ध है 

मखाना न खाये , पॉपकॉर्न ना खाये 

ये लाजा अगर खाने मे अरुचिकारक लगे , तो उस को टेस्टी बनाने के लिए, धना जीरा अजवायन बडीशोप हलदी मिर्च नमक इनका शुद्ध देसी घी मे तडका लगाकर खाये.

किन्तु, इसमे कांदा फरसाण टमाटा शेंगदाणा ना मिलाये. 

ना ही इस लाजा को, जो रुक्ष है ... शोषणे रुक्षः ... शुगर कार्बोहायड्रेट ग्लुकोज जल पृथ्वीक्लेदको शोषण करने वाला है , इस लाजा में दूध या दाल/ आमटी वरण रस्सा सांबार या अन्य कोई लिक्विड नही मिलाना है ... रुक्ष शुष्क रूप मे हि इसको खाना है ... आवश्यकता पडे तो टेस्ट के लिए उपर सुझाया वैसे उसको तडका देना है (फोडणी द्यायची आहे)


दिन मे दो बार दूध और शक्कर वाला चाय पियेंगे तो भी चलता है ... नही पियेंगे तो जादा अच्छा है ✅️


1. नाष्टे मे मूग मसूर चवळी का बनाया हुआ पदार्थ 


2. दोपहर मे पूर्ण भोजन (कुकर के बिना पकाया हुआ) और 


3. रात के भोजन मे लाजा खाना 



यह आदर्श आहार है ✅️👍🏼


लाजा एक बार खाने के बाद , यदि फिर से भूक लगे तो फिर से लाजा खाना है , 23 घंटे मे 46 बार भी भूक लगे तो फिर से लाजाही खाना है ... ऐसा संयम निर्धार रखेंगे तो रिझल्ट शीघ्र निश्चित रूप से आता है 


लाजा खाने का अगर उद्वेग आ जाये तो ... मूग मसूर चवळी से बने हुए चीला के साथ, फल वाली सब्जी अर्थात गॉर्ड्स खाने है, जिससे की पेट मे फिर से प्रोटीन और फायबर जायेंगे ...


रात के भोजन मे किसी भी स्थिति मे गेहू चावल बाजरा ज्वार बटाटा साबुदाणा दूध फल ... ऐसा कार्बोहायड्रेट शुगर ग्लुकोज जल क्लेद पृथ्वी बढाने वाला आहार नही लेना है 


विहार 


विहार एक्सरसाइज व्यायाम जीवनशैली के रूप मे 

1. 70 मिनिट तक चलना और 

2. 10p बार स्पायनल ट्विस्ट और 

3. 100 बार एअर सायकलिंग करना 

यह अत्यंत आवश्यक है 


🚫⛔️❌️

किसी भी स्थिती मे दिन मे सोना नही हे 

दिवास्वाप नही करना है 

❌️🚫⛔️

अगर दिन मे नींद आये तो बैठ कर सोना है 

जैसे हम फ्लाइट मे कार मे बस मे बैठकर सोते है वैसे ... किसी कुर्सी या सिंगल सोफे पर बैठकर सामने दूसरी कुर्स पर उस पर पैर रखकर , दीवार पर सर लगाकर सो सकते है 

या स्कूल में जैसे बच्चों को हेड डाऊन करने के लिए बोलते है वैसे डायनिंग चेअर पर बैठकर सामने वाले टेबल पर माथा रख कर सो सकते है 


किंतु 180° मे दिन मे बेड पर सोपे पर लेट कर नही सोना है 

ज्यादा से ज्यादा 120 °or 135° में कर सोना है 


जादा अच्छा है कि दिन मे बिलकुल ही ना सोये 


रिपोर्ट: ब्लड टेस्ट 

हर 15 दिन बाद (ग्लुकोमीटर पर घर मे नही, अपितु ... ) लॅबोरेटरी मे व्हीनस ब्लड के साथ फास्टिंग पीपी ब्लड शुगर रिपोर्ट करे 

और हर 90 दिन के बाद, BSL F PP, Hba1c, Lipid Profile, LFT, RFT, Electrolytes, Calcium, Vit D, VitB12 , (& TSH अगर डिस्टर्ब है तो) रिपोर्ट अवश्य करे 


👍🏼 90 दिन के ट्रीटमेंट के बाद एचबीएवनसी 5.4 आ ही जाता है ✅️

अधिक सविस्तर जानकारी के लिए लेख भी पढे

👇🏼

The BOSS !! VachaaHaridraadi Gana 7dha Balaadhaana Tablets 


👇🏼


https://mhetreayurved.blogspot.com/2023/11/blog-post.html


👆🏼


वचाहरिद्रादि गण सप्तधा बलाधान टॅबलेट : डायबेटिस टाईप टू तथा अन्य भी संतर्पणजन्य रोगों का सर्वार्थसिद्धिसाधक सर्वोत्तम औषध

#diabetes #sugar #डायबिटीज #obesity #insulin #exercise #fat #tummy #overweight #weightgain #weightloss

#Diabetes #bloodsugar #sugar #hba1c #GlucoseRegulation #glucose #fasting #pp #cholesterol #lipid #fat #overweight #diabetic #triglycerides #obesity

साधारण नियम ऐसा है की जितना एचबीएवनसी होता है इसमे से 5.4 मायनस करेंगे, तो जो उत्तर आयेगा, उतने महिने ट्रीटमेंट की आवश्यकता होती है


Articles about a few medicines that we manufacture

👇🏼

पूर्वप्रकाशित 

अन्य लेखों की 

ऑनलाईन लिंक👇🏼


✍🏼


The BOSS !! VachaaHaridraadi Gana 7dha Balaadhaana Tablets 

👇🏼

https://mhetreayurved.blogspot.com/2023/11/blog-post.html

👆🏼

वचाहरिद्रादि गण सप्तधा बलाधान टॅबलेट : डायबेटिस टाईप टू तथा अन्य भी संतर्पणजन्य रोगों का सर्वार्थसिद्धिसाधक सर्वोत्तम औषध


✍🏼


कल्प'शेखर' भूनिंबादि एवं शाखाकोष्ठगति, छर्दि वेग रोध तथा ॲलर्जी

👇🏼

https://mhetreayurved.blogspot.com/2023/12/blog-post.html


✍🏼


वेदनाशामक आयुर्वेदीय पेन रिलिव्हर टॅबलेट : झटपट रिझल्ट, इन्स्टंट परिणाम

👇🏼

https://mhetreayurved.blogspot.com/2023/10/blog-post.html


✍🏼


स्थौल्यहर आद्ययोग : यही स्थूलस्य भेषजम् : त्रिफळा अभया मुस्ता गुडूची

👇🏼

https://mhetreayurved.blogspot.com/2024/06/blog-post.html


✍🏼


क्षीरपाक बनाने की विधि से छुटकारा, अगर शर्करा कल्प को स्वीकारा

👇🏼

https://mhetreayurved.blogspot.com/2023/11/blog-post_25.html


✍🏼


ऑलिगो एस्थिनो स्पर्मिया oligo astheno spermia और द्रुत विलंबित गो सप्तधा बलाधान टॅबलेट

👇🏼

https://mhetreayurved.blogspot.com/2024/06/oligo-astheno-spermia.html


✍🏼

All articles on our MhetreAyurveda blog

👇🏼

https://mhetreayurved.blogspot.com/


वैद्य हृषीकेश म्हेत्रे

आयुर्वेद क्लिनिक्स @ पुणे & नाशिक 

9422016871 


www.YouTube.com/MhetreAyurved/


www.MhetreAyurveda.com

Thursday, 6 March 2025

खुर्चीवर बसून किंवा बेडवर झोपून, घरच्या घरी करण्याचा ... तरीही चालणे आणि सूर्यनमस्कार यासारखाच परिणामकारक लाभदायक सर्वांगीण व्यायाम

खुर्चीवर बसून किंवा बेडवर झोपून, घरच्या घरी करण्याचा ... तरीही चालणे आणि सूर्यनमस्कार यासारखाच परिणामकारक लाभदायक सर्वांगीण व्यायाम

लेखक : ©️ © Copyright

वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

MhetreAyurved@gmail.com 

www.MhetreAyurveda.com

 www.YouTube.com/MhetreAyurved/

एअर सायकलिंग करण्याचे विविध लाभ आपण पूर्वी पाहिलेत ...

https://mhetreayurved.blogspot.com/2024/12/complete-exercise.html


Air cycling

Spinal twist

Toe touch

https://youtu.be/5FGcJ4k0ZZA

या व्हिडिओ मध्ये 8 मिनिटे 10 सेकंद पासून पुढे करून दाखवलेले व्यायाम करावेत

https://mhetreayurved.blogspot.com/2024/12/complete-exercise.html

https://mhetreayurved.blogspot.com/2024/12/do-dont.html

एअर सायकलिंग करण्याचा अजून एक विशेष लाभ असा होतो की ... पाऊल, घोटा, पिंडऱ्या/पोटऱ्या, गुडघा, मांडी आणि कमरेचा खुबा हे सर्व सांधे आणि त्याला जोडलेले मसल्स; या कमरे खालच्या शरीराच्या भागातील सर्व अवयवांना विशेष करून तत्केंद्रित व्यायाम निश्चितपणे होतो. (LOWER BODY COMPLETEEXERCISE). त्यामुळे थाईज आणि सीट (मांड्या आणि नितंब) येथील मेद फॅट चरबी कमी होते आणि अवघ्या पंधरा दिवसात तेथील इंच घेर परीघ circumference कमी झाला आहे, (inch loss upto 5%) असे अनुभवायला येते... सीट नितंब येथे साठलेला मेद फॅट चरबी अवघ्या 15 दिवसात, 5 टक्के पर्यंत (inch loss upto 5%) घेर परिघ सर्कम्फरन्स इंच कमी होतात ... म्हणजे 40 इंच सीटचा टमीचा घेर असेल तर तो पंधरा दिवसात दोन इंच (2 inch) कमी होऊन 38 इंच पर्यंत येऊ शकतो

एअर सायकलिंगच्या व्यायामामुळे पहिल्या पाच-सात दिवसातच , प्रत्यक्षात जमिनीवर चालताना ज्यांना , त्यातही विशेषतः स्त्रियांना , मांड्या घासल्या गेल्यामुळे , थाय रब thigh rub मुळे लाली आणि खाज (रॅश आणि इचिंग rash & itching) बंद होते.  ते बंद झालेले अनुभवाला आल्यामुळे खरोखरच मांडया thighs इथला मेद कमी झाला आहे, हा आनंद आत्मविश्वास वाढवणारा ठरतो.

याचप्रमाणे नितंबा वरचा = सीटवरचा मेद कमी झाल्याने, व्यक्ती पाच वर्ष यंग तरुण फ्रेश दिसू लागते ... सध्याचे कपडे सैल होतात, जुने कपडे पुन्हा फिट होऊ लागतात, साईज ही डबल एक्सएल (XXL) वरून एल (L) आणि एक्सेल (XL) वरून एम (M) पर्यंत खाली येते ... "रूप तेरा ऐसा ... दर्पण में ना समाये" अशा "अवाढव्य" आकारातून आपण हळूहळू का होईना, पण सुडौल शेप (shape) मध्ये येत आहोत , असे जाणवायला लागते. आपल्या व्यक्तिमत्त्वात शरीरयष्टीत आणि एकूणच सौंदर्यात ही सकारात्मक भर पडल्यामुळे, प्रत्येकाचा आनंद आणि आत्मविश्वास दुणावतो, हे पंधरा दिवसातच सुरुवातीला जाणवते ... आणि सातत्याने दीड महिना केल्यास हा फरक सर्वांच्याच नजरेत भरण्याजोगा स्पष्ट ठळक ठसठशीत असा होतो.

आणि हे सातत्य 90 दिवस टिकले तर , आपणच आपल्याला नव्याने सापडतो ... यु विल फाइंड अ न्यू यु You will find a "New You" ... एकाच या जन्मी जणू फिरुनी नवे जन्मेन मी


दुसरे असे की ... सातत्याने श्रोणी म्हणजे पेल्विस = कटी या भागातील सांधे विशिष्ट गतीने उलटपालट दिशेने हलल्यामुळे, तेथील गती संवर्धन =अपान वायूचे कार्य कुशलता ही चांगल्या पद्धतीने सुधारते आणि याच भागामध्ये मलप्रवृत्ती= संडासला होणे =मोशन्स, मूत्रप्रवृत्ती =लघवी =युरीन आणि रजप्रवृत्ती= पाळी= मेंसेस या बाबी असतात आणि शिवाय गर्भधारणा ही याच भागात होते ; त्यामुळे या चारही शारीर भावांसाठी म्हणजे 1संडास 2लघवी 3पाळी आणि 4गर्भ यांच्यासाठी एअर सायकलिंग हा व्यायाम अतिशय सुरक्षित उपयोगी उपकारक हितकारक असा आहे.


एअर सायकलिंग चा अजून एक चांगला भाग म्हणजे ...

कमी वेळात, अधिक परिणामकारक व्यायाम ... यामुळे होतो.


आपण जन्माला आल्यानंतर अकराव्या महिन्यापासून उभे राहून एकेक पाऊल टाकायला सुरू करतो आणि प्रायः मरेपर्यंत आपण पायांवरती चालत असतो. त्यामुळे "चालणे" ही एक "सहज प्रवृत्ती" मानवी जीवनात आहे , त्यामुळे ठरवलं तर माणूस रोज पाच ते सहा किलोमीटर सहज ... आणि थोडे अधिक प्रयत्न केले तर दहा किलोमीटर पर्यंत ... आणि अगदी जिद्दीने ठरवलं तर 20 40 किलोमीटर पर्यंत सुद्धा चालू शकतो!!! त्यामुळे चालण्याचा व्यायाम हा तितकासा परिणामकारक होत नाही, जरी तो अतिशय लोकप्रिय व्यायाम असला तरी !!!

आज प्रत्येक शहरांमध्ये अनेक ठिकाणी जॉगिंग ट्रॅक तयार झालेले आहेत आणि त्याच्यावर लोक "घरातली काम करायचं सोडून", तिथे येऊन चालण्याचे राउंड मारत बसतात !!! 

चालताना आपल्या मित्रपरिवार किंवा सोबत असलेल्या व्यक्तीबरोबर गप्पा मारतात... बाहेर आलं की तिथे ठेवलेले कसले कसले ज्यूस पितात ... त्याचा आरोग्य शास्त्राशी व केलेल्या व्यायामाने होऊ शकणारे लाभ याच्याशी कसलाही संबंध सुतराम नसतो


शिवाय समूहाने आलेले असल्यास घरी जाताना कुठल्यातरी टपरीवर चहा आणि प्रायः शुगर कार्बोहायड्रेट ग्लुकोज फॅट चरबी मेद वाढवणारा = पोहे इडली उपमा सामोसा वडा असा नाष्टा करतात!!! 


त्यामुळे चालण्याच्या व्यायामाचे अपेक्षित परिणाम दिसलेत , अशी माणसं नगण्य असतात.


म्हणूनच वर्षानुवर्षे चालून सुद्धा थुलथुलित ढेरी कमी होत नाही. 


याउलट ...

जर पाठीवर झोपून, एअर सायकलिंग करताना, कमरेच्या खालचा संपूर्ण शरीर भाग, साधारणतः 45° पर्यंत, हवेत उचलून, पायांनी क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज = पुढच्या आणि मागच्या दिशेने, एअर सायकलिंगचा व्यायाम केला ... तर सर्वसामान्य माणूस सहजपणे जितकं चालू शकतो, त्याच्या वीस पंचवीस टक्के (20%-25%) सुद्धा वेळा करता, एअर सायकलिंग करणे शक्य होत नाही !!!

कारण तेवढ्यात तुमचे पायाचे, कमरेपर्यंत स्नायू भरून येतात, थकतात, दमतात!

याचाच अर्थ त्यांना आवश्यक असलेला व्यायाम पूर्ण होतो ... अतिशय कमी वेळात... चालण्याच्या व्यायामाच्या तुलनेत अवघ्या वीस ते पंचवीस टक्के वेळात एक तास चालण्याच्या व्यायामाचे लाभ निश्चितपणे मिळतात 

अर्थात एक तास = 60 मिनिटे चालण्याऐवजी, घरच्या घरी बेडवर किंवा जमिनीवर झोपून केलेल्य, केवळ 12 ते 15 मिनिटांच्या एअर सायकलिंगच्या व्यायामाने लोअर बॉडी एक्सरसाइजचे सर्वांगीण लाभ मिळतात

आणि कुठल्याही प्रकारचा धोका / इजा न होता !!


म्हणजे एअर सायकलिंग मुळे कमरेखालच्या शरीराचा संपूर्ण व्यायाम पुरेशा प्रमाणात होतो ... शिवाय देहाचा अतिरिक्त भार गुडघ्यावर न पडल्यामुळे, गुडघे दुखणे सुजणे असे होत नाही, घोटा पाऊल लचकणे असे होत नाही, पिंडऱ्यांना पोटऱ्यांना क्रॅम्प येणे असे होत नाही ... अनेक स्त्रियांना होत असलेला मांड्यांना खाज सुटणे असा भाग होत नाही, कंबर दुखत नाही ... कारण कमरेला बेडवर किंवा जमिनीवर झोपलेले असल्यामुळे, पुरेसा आधार असतो!!! 


त्यामुळे ह्या दोन बाबी लक्षात घेता, 

एअर सायकलिंग हे कंबरेच्या वरील शरीराच्या ओझ्याचा भाराचा वजनाचा दुष्परिणाम, कंबर मणके गुडघे घोटा पाऊल , यावर नुकसानकारक रित्या होऊ न देता , 

शिवाय आपल्या अपान क्षेत्रातील म्हणजे कटी क्षेत्रातील म्हणजे पेल्विस या एरियातील मल मूत्र शुक्र रज गर्भ या सर्व बाहेर उत्सर्जित होणाऱ्या शारीरभावांची स्थिती अत्यंत चांगली राहील, 

याची व्यवस्था, ह्या एअर सायकलिंग मुळे निश्चितपणे होते


अशा प्रकारे ... एअर सायकलिंग हा शरीराच्या खालच्या भागाचा, कमरेच्या खालच्या शरीराचा (Lower Body Exercise) सर्वांगीण व्यायाम करण्या साठी, अतिशय निर्धोक, सोपा, घराबाहेर न पडता, बेडवर झोपल्या झोपल्या करण्याचा, अतिशय परिणामकारक लाभदायक खात्रीशीर उपाय आहे


स्थिर सायकल किंवा प्रत्यक्ष सायकलिंग करणे, हा मात्र तितकासा चांगला व्यायाम नाही, कारण अशा प्रकारच्या सायकलिंग मध्ये शरीराचा कमरेच्या वरचा सर्व भाग हा "स्थिर" असतो आणि सायकलचे हँडल धरण्यासाठी आपण आयुष्यभर जसे बसलेलो आहोत तसाच पुन्हा "फॉरवर्ड वेंडिंग"= पुढे वाकणे या स्थितीतच शरीर राहते.

शिवाय हातांना दुसरे काहीही काम नसल्यामुळे, हात खांदा हे आखडणे असे होऊ शकते. शिवाय सायकलिंग करताना केवळ पाऊल आणि पोटऱ्या गुडघे यांनाच सर्वाधिक कष्ट होतात, तर मांडी आणि कमरेचा सांधा यांना मध्यम व्यायाम होतो ... परंतु एकदा सायकल ला गती आली की हे सर्व पॅडल मारणे आणि त्यामुळे होऊ शकणारा व्यायाम हा थांबतो ... शिवाय अत्याधुनिक सायकल गिअर सहित असल्या तर, खरोखरच व्यायाम होतो असे नसून, फक्त स्टाईल मध्ये, स्टेटस साठी, चित्रविचित्र कपडे घालून, फेरफटका मारून आले, एवढेच होते... किंवा अति सायकलिंगच्या हौसेमुळे , पुढे जाऊन मणके कंबर मांडीचा खुबा गुडघे घोटा आणि याला जोडलेले सर्व स्नायू मसल यांना दुखापत होणे शक्य असते ...

शिवाय रस्त्यावरती असुरक्षितपणे सायकलिंग करत असल्यामुळे, अपघाताचा/ स्वतःहून पडण्याचा किंवा इतरांकडून धडक बसण्याचा धोका संभवतो.


याव्यतिरिक्त चढावर सायकल चालवणे किंवा उतारावर सायकल चालवणे या दमछाक होणे किंवा तोल जाणे= संतुलन न राहणे, यामुळे अनेकांना हृदयविकाराचा त्रास किंवा पडझडीचे प्रसंग अनुभवाला आलेले आहेत.


म्हणून असा अतिशय धोकादायक आणि फारसे लाभ न देणारा महागडा ... सायकलिंगचा व्यायाम, तोही असुरक्षित वातावरणात करण्यापेक्षा ... घरच्या घरी बेडवर किंवा जमिनीवर झोपून, कितीतरी जास्त लाभ, कमीत कमी वेळात निश्चितपणे देणारा, एअर सायकलिंग हा व्यायाम करणे, सुरक्षित आणि इष्ट आहे✅️ 


एअर सायकलिंग हा कमरेच्या खालच्या भागातील शरीराचा (Lower BodyExercise) सर्वांगीण व्यायाम आहे.


चालणे आणि सूर्यनमस्कार यापेक्षा सुद्धा...

एअर सायकलिंग आणि स्पायनल ट्विस्ट ही जोडगोळी शरीराचा सर्वांगीण व्यायाम करण्यासाठी, कमी वेळात अधिक परिणामकारक व उपयोगी आहे... तेही घराबाहेर न पडता!!!

सूर्यनमस्कार करण्यासाठी थोडेफार का होईना, पण कौशल्य आवश्यक असते ... आणि मुख्य म्हणजे कंबर मनगट खांदा गुडघे घोटा हे सर्व सांधे व स्नायू मजबूत आणि वेदना रहित असणे, आवश्यक असते!

एअर सायकलिंग आणि स्पायनल ट्विस्टच्या बाबतीत मात्र या सर्व सांध्यांच्या ठिकाणी पुरेशी शक्ती नसली आणि थोड्याफार वेदना असल्या, तरीही हे दोन व्यायाम निश्चितपणे करता येतात

... ... ...


स्पायनल ट्विस्ट ... हा कमरेच्या वरच्या शरीर भागाचा (Upper BodyExercise) सर्वांगीण व्यायाम आहे...

कारण स्पायनल ट्विस्ट म्हणजेच खुर्चीवर बसून किंवा पाय पसरून L शेपमध्ये जमिनीवर बसून पाठीचा कणा 18 ते 270° अंशामध्ये पिळणे,

जणू अर्धमत्स्येंद्रासन... न थांबता, उभय बाजूने करत राहणे म्हणजेच स्पायनल ट्विस्ट !!!


यामध्ये कमरेपासून वरती खांद्यापर्यंत म्हणजे पेल्विक गर्डल ते शोल्डर गार्डन यामध्ये असणारे सर्व स्नायू सर्व मसल्स हे पुरेशा/ मॅक्झिमम प्रमाणात पिळले जातात, वापरले जातात, त्यामुळे त्यांचा चांगला व्यायाम होतो.

यामुळे पोट आणि दोन्ही कुशी (= टमी आणि टायर्स Tummy & Tyres) येथे लोंबकळत (loose suspended) असलेला मेद फॅट चरबी अवघ्या 15 दिवसात, 5 टक्के पर्यंत (inch loss upto 5%) घेर परिघ सर्कम्फरन्स इंच कमी होतात ... म्हणजे 40 इंच पोटाचा टमीचा घेर असेल तर तो पंधरा दिवसात दोन इंच (2 inch) कमी होऊन 38 इंच पर्यंत येऊ शकतो

जुने शर्ट , जुने ड्रेस , जुने टी-शर्ट विशेषतः ... पुन्हा फिट बसू लागतात ... आपले पोट आकाराने कमी झाल्यामुळे, आपल्या चेहऱ्यावरचे आरोग्याचे आत्मविश्वासनचे आनंदचे उत्साहाचे तेज ग्लो & ग्लोरी Glow & Glory वाढत जाते

 दुसरे असे की दोन्ही बाजूला पाठ पिळली जात असल्यामुळे, आपल्या शरीरात, पुढच्या बाजूने असलेले, मोठे आतडे, पक्वाशय, लार्ज इंटेस्टाइन आहेत , यातून वहन होणारा मल पदार्थ = पुरीष =विष्ठा फीकल मटेरिअल व गॅसेस यांचे संचरण पुढे जाणे= पुरःसरण , हे सहजपणे होते. 


दुसरे असे की ...

उजव्या कुशीला यकृत, डाव्या कुशीला प्लीहा आणि पॅन्क्रियाज तसेच जठर =आमाशय =स्टमक या बाबी आहेत आणि संपूर्ण पोटामध्ये लहान आतडे, इंजिनिअरिंगची कमाल या अर्थाने चोपून चापून व्यवस्थित बसवलेले आहे ... या सर्व पचनसंस्थेची संबंधित असलेल्या अत्यंत महत्त्वपूर्ण अवयवांना योग्य त्या प्रकारचा ताण पडल्यामुळे आणि तो ताण दुष्परिणामकारक नसल्याने, सुरक्षित असल्याने, त्यांची कार्य कुशलता निश्चितपणे वाढते अर्थात स्पायनल ट्विस्ट चा व्यायाम हा त्यासाठी सातत्याने किमान सहा आठवडे केलेला असेल तर त्याचा अशा प्रकारचा लाभ दिसून येतो ... 


भूक न लागणे, पोट जड होणे, अन्न किंवा पित्त किंवा आंबट कडू तिखट वरती वरती छातीपर्यंत घशापर्यंत येणे, गॅसेस होऊन पोट गच्च होणे, पित्ताशयात खडे होणे, पोटामध्ये वारंवार दुखत राहणे, पोट साफ न होणे, पाळीच्या वेळी पोटामध्ये ओटी पोटामध्ये कमरेमध्ये क्राईम्प येणे, दुखणे कंबर धरणे, पाठीला उसण भरणे, खांदे दुखणे , दोन्ही हात वरती न जाणे, एक हातमागे न जाणे , फ्रोजन शोल्डर , सर्वायकल स्पाॅण्डिलोसिस लंबर स्पाॅण्डिलोसिस सायटिका डिस्क बल्ज एल फाईव्ह एस वन डी जनरेशन (L5 S1 Degeneration) अशा आतडे , आमाशय लिव्हर पक्वाशय,  मानेचे पाठीचे कमरेचे मणके, पाठीचा कणा, स्पाईन , शोल्डर गर्डल , पेल्विक गर्डल यांच्याशी संबंधित, बहुतेक प्राथमिक तक्रारी , स्पायनल ट्विस्ट केले असता, होत नाहीत...


सगळ्यात महत्त्वाचे की ...

माणूस गर्भावस्थेपासून तर मरेपर्यंत प्रायः, पुढे वाकून फॉरवर्ड सी C बेंडिंग या परिस्थितीत बसतो. मग ते कमोड वर बसणं असो, डायनिंग चेअर वर बसणं असो, जमिनीवर पाटावर जेवायला बसणं असो, डायनिंग टेबलवर चेअरवर बसणं, टू व्हीलर फोर व्हीलर मध्ये बसणं असो, रिक्षा बस मध्ये बसणं असो, आपल्या कॉलेज ऑफिस व्यवसायाची जागा येथे खुर्ची बेंच याच्यावर बसणं असो ... या सगळ्यांमध्ये माणूस फॉरवर्ड C सी बेंडिंग पुढे वाकणे पुढे झुकणे या स्थितीतच असतो !

त्यामुळे कंबर ते खांदा यातील पाठीचे स्नायू कधीच सहजपणे मागच्या दिशेने वाकत नाहीत, बॅकवर्ड बेंडिंग होत नाहीत, ते चांगल्या पद्धतीने सूर्यनमस्कारांमध्ये होते पण सूर्यनमस्कार करणे हा एक कौशल्याचा भाग आहे आणि ज्यांना मनगट कोपर खांदा पाठ कंबर गुडघा घोटा पाऊल या ठिकाणी वेदना सूज झिजणं असं आहे, त्यांना सूर्यनमस्कार करणे शक्य होत नाही! 


विशेषतः अलीकडच्या काळात डेंग्यू चिकनगुनिया नंतर या सर्वसांध्यांच्या बाबतीत वेदना , जखडल्यासारखे होणे अशा तक्रारी ज्यांना आहेत , त्यांना सूर्यनमस्कार करणे, इच्छा असून सुद्धा होत नाही! 

त्यामुळे कंबर ते खांदा (पेल्विक गर्डल ते शोल्डर गर्डल) यातील सर्व मसल्स , सर्व मणके , सर्व बरगड्या यांना उचित प्रकारचा व्यायाम व्हावा , बॅकवर्ड बेंडिंग नाही, तर ... किमान साईड टू साईड बेंडिंग तरी व्हावं , या दृष्टीने स्पायनल ट्विस्ट हा अतिशय चांगला व्यायाम आहे


त्यामुळे *स्पायनल ट्विस्ट आणि एअर सायकलिंग*, हे संपूर्ण शरीराच्या , सर्वांगीण व्यायामासाठी ,अतिशय सुरक्षित , घरातल्या घरात करता येण्याजोगे , अगदी झोपून किंवा बसून करता येण्याजोगे, कुठल्याही प्रकारची पळवाट एक्सक्युज निमित्त कारणे नखरे नाटकं न करता, प्रतिदिनी व्यायाम , घरच्या घरी नियमितपणे , निश्चितपणे लाभदायक रीत्या करता येईल यासाठी ही जोडी , *"एअर सायकलिंग + स्पायनल ट्विस्ट"* ही अतिशय उपयोगी आहे.


स्पायनल ट्विस्ट मध्ये कमरेच्या वरच्या भागाचा ( Upper Body Exercise) आणि एअर सायकलिंग मध्ये कमरेच्या खालच्या भागाचा (Lower Body Exercise)  असा शरीराच्या दोन अर्ध्या अर्ध्या भागांचा मिळून, संपूर्ण शरीराचा सर्वांगीण व्यायाम, पुरेशा प्रमाणात सुरक्षित रित्या निश्चितपणे होऊ शकतो ...


फक्त याला सातत्य हवे, किमान सहा आठवड्यांचा हा व्यायाम प्रतिदिनी , रोज शंभर सीटिंग = काऊंटिंग, इतक्या प्रमाणात केल्यास, त्याचे अतिशय चांगले, अपेक्षेपेक्षा अधिक लाभ देणारे , परिणाम प्रत्येकाला मिळू शकतात !!!

व्यायाम ... कोणत्या प्रकारचा? कुणी? कधी? ... करावा? आणि करू नये? व्यायामाविषयक विधी निषेध डूज डोन्ट्स फॉर एक्झरसाइज Do's & Don'ts for Exercise 

https://mhetreayurved.blogspot.com/2024/12/do-dont.html


लेखक : ©️ © Copyright 

वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

MhetreAyurved@gmail.com 

www.MhetreAyurveda.com

 www.YouTube.com/MhetreAyurved/