Thursday, 29 May 2025

सेक्स स्त्री संग मैथुन याबाबत नियम : काय टाळावे, काय वर्ज्य / त्याज्य आहे? काय योग्य आहे?

अष्टांगहृदय सद्वृत्त : भाग ५

26 12 2022



निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे ।

तव झालो प्रसंगी गुणातीत ॥

प्रसंग म्हणजे प्र खूप, संग जवळ समीप. प्रसंग म्हणजे एखाद्या गोष्टीच्या खूप जवळ येणे. 

पुण्यात शनिवार वाडा पाहायला आलोच आहे, तर तिथून अगदी जवळच (प्र संग खूप जवळ) लाल महाल , दगडू काय शेठ गणपती आहे त्याचेही दर्शन घेऊ या ...

प्रसंग म्हणजे स्मृतत्वे सति उपेक्षा अनर्हत्वम् ... आठवलं असता त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नव्हे


*अन्यथाकाम* म्हटलं तर, मग 'यथा' योग्य उचित काम म्हणजे काय असा प्रश्न येणारच. येथे थुंकू नये, असं का लिहावं लागतं, कारण तसा निषिद्ध व्यवहार/वागणूक होत असते इतरांकडून.


सेक्स स्त्री संग मैथुन याबाबत, पुढील नियम हे काय टाळावे, वर्ज्य / त्याज्य आहे, ते सांगतात, म्हणजेच काय योग्य आहे, ते आपोआपच कळेल.


जर स्त्रीसंग सेक्स मैथुन ही नैसर्गिक प्रेरणा असेल तर त्यावर सार्वजनिक व्यासपीठावर जाहीरपणे बोलण्याची काय अवश्यकता आहे? पशु पक्षी यांना शिकवावे लागते का? मागच्या पिढी पर्यंत यावर कुणी बोललं का असं मोठ्याने स्पष्टपणे?

बरोबर आहे. पण आहार मल मूत्र विसर्जन निद्रा चालणं पळणं याही नैसर्गिक प्रेरणा आहेत पण त्याच्यावर कितीतरी लिहिलं बोललं जातं! 


सेक्स मैथुन यातूनच गर्भ धारणा नवजीवन या बाबी होतात. गर्भ धारणा प्रसूती जन्म याही नैसर्गिक प्रेरणा घटना आहेत. गर्भ संस्कार चे कोर्स / पुस्तके सगळं उपलब्ध आहे. डोहाळजेवण हा कौतुक सोहळा किंवा अलीकडे बेबी बंप फोटोशूट करतात. मग या सगळ्याचा जो आरंभ आहे, त्या सेक्स मैथुन बद्दल शास्त्रीय आरोग्यकारक बोलणं , समजावून सांगणे, समजावून घेणे हे आवश्यक आहे.


ग्राम्यधर्मे त्यजेत् 


A.

नारीम् 

1.अनुत्तानां 

2.रजस्वलाम् 

3.अप्रियाम् 

4.अप्रियाचारां 

5.दुष्टसङ्कीर्णमेहनाम्

6.अतिस्थूलकृशां 

7.सूतां 

8.गर्भिणीम् 

9.अन्ययोषितम् 

10. वर्णिनीम् 

11. 11.अन्ययोनिं च ... 


B.

12.गुरुदेवनृपालयम् 

13.चैत्यश्मशानायतनचत्वाराम्बुचतुष्पथम् 

14.पर्वाणि 

15.अनङ्गं 

16.दिवसं 

17.शिरोहृदयताडनम् 

18.अत्याशितो

19. अधृतिः 

20. क्षुद्वान् 

21. दुःस्थिताङ्गः 

22. पिपासितः 

23. बालो 

24. वृद्धो

25. अन्यवेगार्त्तः

26. त्यजेद्रोगी च 

... मैथुनम् 


ग्राम्य धर्म म्हणजे स्त्रीसंग असे नको म्हणू या, कारण केवळ पुरुष हा स्त्रीच्यासंगतीत असतो, असे नसून ... स्त्री सुद्धा त्या पुरुषाच्या संगतीत असते, उभयतां परस्पर संग या स्थितीत असतात, म्हणून *मैथुन हा शब्द योग्य वाटतो*, सेक्स हा शब्द काहींना चीप cheap वाटण्याची शक्यता असते


कोणत्या प्रकारची स्त्री म्हणजे म्हणजे कोणत्या प्रकारचा स्त्री-देह म्हणजे कोणत्या प्रकारच्या शारीरिक स्थितीमध्ये स्त्रीसंग / मैथुन ही क्रिया करू नये हे *वर्णिनीम् अन्ययोनिं च* इथं पर्यंत सांगितलं आहे 

आणि त्या व्यतिरिक्त "*कोठे केव्हा कसे* हे मैथुन करू नये" हे निषेध नियम *गुरुदेवनृपालयम्* पासून पुढे सांगितले आहेत


होण्यासाठी पुढील शारीरिक स्थितीतली स्त्री वर्ज्य आहे 

1

*अनुत्ताना* : अन् उत्तान म्हणजे पोटावर झोपलेली, पालखी झोपलेली नसावी. याचाच अर्थ उत्तान म्हणजे पाठीवर झोपलेली, उताणी झोपलेली स्त्री ही शारीरिक स्थिती ही योग्य होय. म्हणूनच पॉर्न व्हिडिओ किंवा इंग्रजी चित्रपट किंवा काही वेब सिरीज यात दाखवल्या जाणार्‍या आचरट अवस्था या अयोग्य होत. Woman on Top हे शास्त्रीय/शारीरिक दृष्ट्या अयोग्य आहे. याविषयी अजून सविस्तर ॲनाटोमी शरीर रचना या दृष्टीने सांगता येईल पण आत्ता इतके पुरे. 


2

*रजस्वला* : प्रत्यक्ष रजस्राव मेंसेस पाळी ब्लीडिंग सुरू असताना मैथुन करू नये; कारण अशा रजस्राव सुरू असण्याच्या काळात, स्त्रीला रक्तस्राव होत असतो, त्यामुळे तिला विश्रांतीची गरज असते. साधी करंगळीला जखम झाली तरी, आपण त्या जखमेला करंगळीला खूप जपतो. येथे तर चार दिवस भळभळ रक्तस्राव होत असतो , त्यामुळे स्त्री ही, नाजूक अवयवाच्या ठिकाणी व्रणी म्हणजेच जखमी म्हणजे wounded असते, तर तिला त्यावेळी विश्रांती आवश्यक असते. म्हणूनच मागील पिढीपर्यंत शिवाशिव सोवळं शिवू नको पालथा तांब्या वगैरे रूढींनी तिला वेगळे ठेवले जात असे व तिच्यापर्यंत तिचे जेवणाचे ताट आयते पोहोचवले जात असे. या शिवाशिव सोवळे या निमित्ताने तिला महिन्यातील किमान तीन ते चार दिवस हक्काची विश्रांती लाभत होती. आताच्या स्त्रीमुक्ती बुद्धीप्रमाणे वादामध्ये तिचे ते हक्काचे तीन-चार दिवसही दर महिन्याचे काढून घेतले गेलेले आहेत. 12 ते 50 म्हणजे 38 वर्षे, 12 महिने , 4 दिवस म्हणजे 1824दिवस म्हणजे 5 वर्षे विश्रांती आता मिळत नाही, हीच 5 वर्षे मेनोपाॅज सिंड्रोम म्हणून स्त्री व तिच्या कुटुंबाला त्रास भोगावा लागतो. आजीच्या काळात पाळी कधी गेली हे कळत होते का? आजीच्या पिढीत दहा-बारा बाळंतपणे होत असत, तरी आजीची कंबर कधी खचली नाही. आताच्या पिढीत शून्य एक किंवा दोन बाळंतपणे होतात, पण तिसऱ्या चौथ्या महिन्यापासून स्त्री बेडरेस्टला असते आणि तिची कंबर खचते, सिझेरियन होते. या सगळ्याचा पाळीच्या काळात दरमहा चार दिवस मिळणाऱ्या विश्रांतीचा नक्कीच मोलाचा वाटा आहे. यावर समाजाने आणि स्त्रियांनी विचार करावा.


*स्त्री आणि पुरुष हे एकसमान नाहीतच आणि कधीच असू शकत नाहीत. दे आर नॉट इक्वल, दे आर कॉम्प्लिमेंटरी टू ईच आदर. ते परस्पर पूरक आहेत.*


थ्री पिनचा प्लग हा थ्री पिनच्या सॉकेटमध्ये बसू शकतो, पण थ्री पिनच्या प्लग मध्ये दुसरा थ्री पिनचा प्लग घालून इलेक्ट्रिसिटी चे वहन योग्य होऊ शकणार नाही. 


त्यामुळे *एकमेकांशी समान होण्यापेक्षा, एकमेकांना पूरक कॉम्प्लिमेंटरी होणं हे अधिक आवश्यक आहे*. समाजाच्या हितासाठी आणि निसर्गदत्त व्यवस्थेसाठी!!! *पाळीचे नियम असे का?* याविषयी एक सोपा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चैनल वर उपलब्ध आहे त्याची लिंक पुढीलप्रमाणे https://youtu.be/tgax3FQDt2w


3

*अप्रिय स्त्री आणि अप्रिय आचरण करणारी स्त्री*, याही मैथुन यासाठी वर्ज्य होत, कारण तिथे तेवढा भावोत्कट समर्पित असा प्रीती व्यवहार/प्रवाह/संगम असू शकत नाही. केवळ एक शारीरिक कृती असल्याने त्यात उभयतांना समाधान प्राप्त होऊ शकत नाही. जरी मैथुन ही क्रिया प्रजोत्पत्तीसाठी अपत्य लाभासाठी करणे योग्य आहे, तरीही ज्या अवयवांनी ही मैथुन क्रिया केली जाते, त्या अवयवांना शास्त्रामध्ये *उपस्थ* या नावाचं कर्मेंद्रिय म्हटलेलं आहे. आपण गणपतीची प्रतिष्ठापना करताना 11 इंद्रियांची नावे घेतो, त्यातील पहिली पाच ज्ञानेंद्रिय, पुढची पाच कर्मेंद्रिये आणि शेवटचं मन ... अशी ती 11 इंद्रिय होत. पाच कर्मेंद्रियांमध्ये हस्त पाय जिह्वा गुद आणि उपस्थ या पाचांचा समावेश होतो. पैकी उपस्थ म्हणजे जननेंद्रिय ज्याचे कर्म *आनंद* हे सांगितलेले आहे म्हणजे मैथुन क्रिया ही *आनंदासाठी होणे* आवश्यक आहे. त्यामुळे त्यामध्ये *अप्रिय अशा प्रकारची व्यक्ती किंवा अप्रिय अशा प्रकारचे आचरण करणारी व्यक्ती* ही "उभय बाजूंनी" वर्ज्य आहे. 


4

*दुष्ट संकीर्ण मेहना* : मेहन याचा अर्थ मूत्र करणारा अवयव त्याच अवयवाने किंवा त्या जवळील अवयवानेच मैथुन ही क्रिया होते तर हे मेहन म्हणजे मैथुन क्रियेचा अवयव, हा बिघडलेला असेल किंवा रोगग्रस्त असेल तर अशाही स्थितीत मैथुन वर्ज्य जाणावे. अनेकदा स्त्रियांना किंवा पुरुषांना काही संसर्गजन्य त्वचारोग किंवा काही जिवाणू विषाणू संसर्ग असू शकतात तर अशा वेळेला जोडीदारालाही ते होऊ नये, म्हणून मैथुन हे वर्ज्य जाणावे.


5

*अति स्थूल* या स्त्रीमध्ये अल्पेऽपि चेष्टिते श्वासन

म् म्हणजे अल्पशा शारीरिक कष्टांनीही दम लागणे अशी स्थिती होऊ शकते तर *अति कृश* स्त्रीला मैथुन ही क्रिया अबलत्वामुळे अशक्तपणामुळे सहनच होऊ शकत नाही.


6

*सूता* : सुता म्हणजे स्वतःची कन्या मुलगी. सूता याचा अर्थ सूतिका प्रसूती झालेली बाळंतीण, जिची नुकतीच डिलिव्हरी झालेली आहे. तर बाळाच्या जन्मापासून पुढे दीड महिना (45 दिवस) किमान किंवा तिची पुन्हा पाळी सुरू होईपर्यंत तिला सूता प्रसूता असे नाव आहे. तोपर्यंत तरी पुन्हा मैथुन करणे, हे लांबवावे टाळावे , कारण या काळात नवजात बालकाला वेळ देणे हे आवश्यक असते आणि मागील नऊ महिने गर्भाचे ओझे, गर्भाचे पोषण, प्रसूतीच्या काळात झालेल्या पराकोटीच्या वेदना, रक्तस्राव आणि तिथून पुढे प्रतिदिनी बाळाला स्तनपान करणे या सगळ्यांमध्ये त्या स्त्रीचा बलक्षय प्रतिदिनी होतच असतो. त्यातून तिला सावरण्यासाठी, रिकव्हर होण्यासाठी, पुन्हा मूळ सशक्त स्थितीला येण्यासाठी; विश्रांती व वेळ देणे आवश्यक असते. आताचा वेळ हा नवजात बालकासाठी आई म्हणून जास्त समर्पित होणे, नैसर्गिक स्वभाविक असते, म्हणून या काळात मैथुन हे टाळावे. 


7

*गर्भिणी* : गर्भिणी स्त्री ही आता नवीन जीवाला जन्म देणार असते, अशावेळी त्या आशयामध्ये अन्य प्रकारचा संसर्ग होऊ नये, म्हणून मैथुन टाळावे. तरीही एक महिना होईपर्यंत गर्भधारणा लक्षातच येत नाही आणि साधारणतः तीन महिन्यापर्यंत उदर वृद्धी दिसतच नाही आणि गर्भिणी किंवा होऊ घातलेली आई मदर टू बी बीइंग मदर या काळामध्ये नाजूक स्थितीत असते, म्हणून शक्यतो मैथुन ही क्रिया टाळणं हे प्रशस्त होय.


8

अन्य योषिता : अन्य दुसऱ्याची, योषिता स्त्री. परस्त्री हे मातेसमानच मानावी, हा आपला संस्कार आहे. मुळातच लग्न ही संस्था, समाजातील इतर स्त्रीवर दुसऱ्या पुरुषाचे अतिक्रमण होऊ नये, म्हणून सर्वांच्या साक्षीने केलेला समजूतीचा व्यवहार असतो. हे एकच नाते आपण निवडू शकतो आणि ते निवडताना समाजातील अनेकांच्या साक्षीने ते केले जाते. सर्वच पुरुष हे समर्थ नसतात तर दुर्बल पुरुषाची ही स्त्री सुरक्षित रहावी, त्याच्यासाठी राखीव राहावी, म्हणून अन्ययोषिता परस्त्री ही मैथुनासाठी वर्ज्य आहे किंवा परस्त्री ही मातेसमान असा सामाजिक संकेत आहे. 


9

वर्णिनी : काही कारणामुळे ब्रह्मचर्य स्वीकारून राहिलेल्या स्त्रीलाही मैथुनापासून वर्ज्य ठेवावे. जीवनात घडलेल्या काही प्रसंगांनी किंवा धार्मिक संस्कारामुळे किंवा काही व्रत धारणेमुळे आजन्म लग्न न करता राहणाऱ्या कितीतरी स्त्रिया, आज मी माझ्या वयाच्या पुढे मागे पाहत असतो. तर ज्या स्त्रियांनी असं अविवाहित राहणं किंवा ब्रह्मचर्य पालन करणे, हे मनापासून, समजून समजून स्वीकारलेलं आहे , त्या स्त्रिया मैथुनासाठी वर्ज्य आहेत.


10

अन्य योनी : ही ही सरळ सरळ विकृती आहे. अन्य योनी याचा अर्थ स्त्री वगळता अन्य प्राणी हे मैथुनासाठी उपयोगात आणणे. आपण अशा प्रकारच्या विकृत वार्ता वाचलेल्या असतात. गाय बकरी कुत्रा यांच्याशी मैथुन करणारे काही विकृत लोक समाजात असतात. हे सर्वत्र वर्ज्य आहे आणि कोणत्याही प्रकारे समर्थनीय नव्हेच नव्हे!


इथून पुढे काही सामाजिक संकेतानुसार काही स्थळे ही मैथुन क्रियेसाठी वर्ग सांगितलेली आहेत.


11

उदाहरणार्थ , गुरु आलय म्हणजे आपल्या गुरूंचे घर, देवालय म्हणजे मंदिर देऊळ, नृप म्हणजे आपल्या राजाचे घर किंवा आजच्या संदर्भानुसार शासक व्यक्तीचे, शासन करणाऱ्या व्यक्तीचे घर ... ह्या सर्व जागा या पवित्र मानण्याजोग्या किंवा त्यांचा आदर बाळगला पाहिजे , अशा आहेत तर अशा ठिकाणी शक्यतो मैथुन या क्रियेवरती निर्बंध संयम नियंत्रण असणे , हे सामाजिक संकेत म्हणून योग्य आहे.

चैत्य याचा अर्थ पवित्र वृक्ष किंवा बुद्धाचे स्थान असा घेतलेला आहे. स्मशान हे अप्रशस्त होय. आयतन म्हणजे कारागृह. चत्वर म्हणजेच चव्हाटा / तिकटी. चतुष्पथ म्हणजे चौक. अंबु याचा अर्थ नदी सरोवर तलाव तळं किंवा आजच्या काळात अगदी स्विमिंग टॅंक/पूल. ही सर्व ठिकाणे सार्वजनिक, अनेक लोक एकत्र येण्याची असल्यामुळे, तेथे एकांत मिळू शकत नाही, म्हणून अशा ठिकाणी मैथुन वर्ज्य सांगितले आहे.


12

पर्व : पर्व याचा अर्थ काही विशिष्ट मंगल शुभ दिवस जसे की साडेतीन मुहूर्त आषाढी महाशिवरात्र श्रावण गणपती नवरात्र 

किंवा 

पर्व याचा अर्थ दोन पक्ष एकत्र येतात ते दिवस म्हणजे अमावस्या पौर्णिमा , त्याच्या अलीकडची चतुर्दशी आणि त्याच्या पलीकडची प्रतिपदा, अष्टमी या तिथी पर्व या अर्थाने ओळखल्या जातात. अशा सर्व तिथींच्या वेळेला चंद्राची स्थिती बदलत असल्याने आणि चंद्र हा मनाचा कारक असल्यामुळे मनाचे चांचल्य अधिक होते आणि अशा वेळेला मैथुन ही क्रिया परस्पर समर्पण भावनेने होण्याची शक्यता नसते म्हणून पर्वकाळ टाळावा.


13

अनंग म्हणजे मैथुनासाठी दिलेला उपस्थ म्हणजे योनी हा अवयव वगळता, अन्य कुठल्याही शरीरछिद्रात, विशेषतः गुदमैथुन किंवा मुखमैथुन हे समाजात प्रचलित दिसतात. त्याला ॲनल सेक्स किंवा ओरल सेक्स असे म्हणतात. मुळात मैथुन या क्रियेचा उद्देश हा प्रजोत्पादन यापेक्षा, *आनंद* असल्याने अशा प्रकारचे विकल्प किंवा विकृती या समाजात दृढ मूल आहेत. पण हे फक्त आजच आहे असे नसून, अगदी चरक आणि सुश्रुत संहिता यातही मुखयोनी गुदयोनी नासायोनी या प्रकारची वर्णने आपल्याला सापडतात.

काही वेळा योनीगत मैथुन शक्य नसते, अशा वेळेला कडलिंग cudlling आलिंगन मिठी स्पर्शसुख यासाठी गुदयोनी किंवा मुखमैथुन हा पर्याय स्वीकारला जाऊ शकतो. कंडोम या , पूर्वी उपलब्ध नसलेल्या, परंतु आता अगदीच सहज उपलब्ध असलेल्या, साधनांमुळे अशा प्रकारच्या विकृत अनैसर्गिक मैथुनाचे शारीरिक दुष्परिणाम होणार नाहीत व विकृत का होईना, पण त्या दांपत्याला हवा असणारा आनंद, त्यातून मिळू शकतो.


14

मैथुनासाठी रात्र हा योग्य काळ आहे कारण त्याला एकांत असतो व मैथुन क्रिये नन्तर झालेले श्रम परिहार होण्यासाठी विश्रांती मिळणे रात्री शक्य असते. म्हणून दिवसा मैथुन शक्यतो टाळावे


15

मैथुन क्रियेच्या वेळी अत्यंत उद्दीपित स्टिम्युलेट एक्साइट झाल्यामुळे मारहाण करणे नखांनी बोचकारणे चावणे अशा क्रिया टाळाव्यात.


16

खूप तुडुंब पोटाला तडस लागेपर्यंत ज्याने जेवण केलेले आहे असा अत्याशित किंवा ज्याला भूक लागलेली आहे असा क्षुधित यांनी मैथुन टाळावे.


17

अधृति म्हणजे ज्याला धीर नाही, तो मैथुन क्रियेमध्ये लवकरच स्खलित स्रवित होत असल्यामुळे जोडीदाराला समाधान लाभत नाही, म्हणून त्याने मैथुन टाळावे.


18

दुस्थितांग वाकड्या तिकड्या स्थितीमध्ये मैथुन करू नये. पिपासित म्हणजे तहान लागली असताना मैथुन करू नये कारण मैथुन क्रियेमध्ये एका मृदु अवयवाला अत्यंत स्थिर कठीण अशा स्थितीत परिवर्तित करण्यासाठी शरीराला त्या अवयवामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर रक्त हे पुश push करायला लागते, त्यासाठी त्या काळापुरते हृदयाचे कार्य (बीपी) हे वाढते, म्हणून भूक लागलेली असताना, तहान लागलेली असताना, मुळातच बल हानी झालेली असताना, अशा प्रकारची पुन्हा शक्ती हानी करणारी क्रिया म्हणजे मैथुन हे करू नये.


19

बाल याचा अर्थ सोळा वर्षाच्या आधी, वृद्ध याचा अर्थ 60 ते 70 वर्षांच्या नंतर, मैथुन हे वर्ज्य जाणावे. अन्य वेग याचा अर्थ जसे तहानभूक त्याचप्रमाणे मूत्र मल याचे वेग विसर्जन करण्याची स्थिती call आलेली असताना मैथुन करू नये आणि रोगी म्हणज कुठलाही आजार असलेल्या स्थितीत, मुळातच बल हानी झालेली असते म्हणून मैथुनासारखा थकवणारा विधी (क्रिया) टाळावा


याच श्लोकांच्या बरोबरीने पुढील मुद्दे ही संक्षेपाने विचारात घेऊया ...

वाजीकरण अष्टांग आयुर्वेद , जसे अष्टांग योग हा आपल्याला माहिती असतो. तसेच आयुर्वेद हा सुद्धा अष्टांग आहे. त्यामध्ये काय बाल ग्रह ऊर्ध्वांग शल्य दंष्ट्रा जरा आणि वृष. वृष याचा अर्थ वाजीकरण. वाजीकरण याचा अर्थ मैथुन शक्ती वाढवण्यासाठीचे उपाय. मुळात वाजीकरणाची व्याख्या ही *वाजीकरणतन्त्रं नाम अल्पदुष्टक्षीणविशुष्करेतसाम् आप्यायनप्रसादोपचयजनननिमित्तं प्रहर्षजननार्थं च* अशी आलेली आहे म्हणजे प्रत्यक्षात अपत्य प्राप्तीसाठीचे जे बीज , त्या बीजाची स्थिती ही अधिकाधिक चांगली होण्यासाठीचे उपाय आणि त्याचबरोबरीने अपत्यप्राप्तीसाठी ही जी क्रिया त्या मैथुनाच्या क्रियेमध्ये सुद्धा सुलभता सुकरता आणि यशस्विता यावे, यासाठी उपाय ... असे एक स्वतंत्र अंग, ज्याला आपण स्पेशालिटी म्हणतो , तसे आयुर्वेदामध्ये पूर्वी होते.

योगरत्नाकर येथील अष्टविध मैथुन : स्मरणम् कीर्तनम् केली प्रेक्षण गुह्यभाषण संकल्प अध्यवसाय क्रियानिर्वृत्ती मैथुनम् 

पंचसायक अनंगरंग वात्स्यायन लिखित कामसूत्र खजुराहो येथील मंदिरात असलेल्या शिल्पाकृती : जेव्हा भारतात अतिशय राजकीय स्थैर्य हे प्रदीर्घ काळा करती होते, तेव्हा निर्माण झालेली आहेत. जेव्हा प्रदीर्घ काळ संघर्ष विरहित राजकीय स्थैर्य व शांतता समाजात असते, तेव्हा त्याचा संघर्षाचा पराक्रमाचा भाव हा हळूहळू लोप पावतो, मावळतो ... सगळं काही जेव्हा प्रचंड संपन्न स्थितीत उपलब्ध असतं , तेव्हा काहीतरी अपूर्ण आहे , म्हणून त्यासाठी करावे लागणारे प्रयत्न, त्यासाठी करावी लागणारी धडपड ही थांबते आणि मग कुठल्याच प्रकारची प्रेरणा स्टीम्युलेशन नसल्यामुळे, अहर्ष अनिच्छा ही सार्वत्रिक होते आणि म्हणून अशा वेळी शुक्र अहर्ष इरेक्टाईल डिस्फंक्षन नाॅन स्टिम्युलेशन अशा बाबी ह्या समाजात दिसू लागतात. कधीकाळी जेव्हा भारतीय राजे हे सम्राट होते, विश्वविजेते होते, तेव्हा येथील समाजात अशा प्रकारचा अहर्ष नॉनस्टीमिलेशन आले आणि म्हणून त्याकाळी कदाचित उद्दीपनासाठी या प्रकारचे साहित्य व शिल्प ही निर्माण झाली असावीत. आज याच प्रकारची प्रचंड संपन्नता ही अमेरिका युरोप ऑस्ट्रेलिया या समाजात प्रदीर्घकाळपर्यंत आहे होती. त्यामुळे आणि अगदी सहजपणे अल्पवस्त्रातील स्त्री देह दर्शन हे सुलभ झाल्यामुळे किंवा नित्याचे झाल्यामुळे त्याच्याकडे पाहून येऊ शकणारी शिरशिरी रोमांच हे नष्ट झाले आणि म्हणून तिथे व्हिडिओ पॉर्न या गोष्टी वाढीस लागल्या. त्याच प्रमाणे 4 क्लीब व 6 षंढ प्राचीन आयुर्वेद संहिता ग्रंथात वर्णन केलेले आहेत. सुशिक्षित समजूतदार आणि सुसंस्कृत समाजामध्ये जसे स्त्री विशिष्ट गायनॅकॉलॉजी माहिती असते तशीच पुरुष लैंगिक स्वास्थ्य व रोग विषयक अँड्रोलॉजी याबाबत शशांक सामक नवविवाहितांचे कामजीवन 40 नंतरचे कामजीवन या नावाने प्रदीर्घकाळ जाहीर कार्यक्रम प्रस्तुत केले. 


मैथुन क्रिया ही थंडीच्या काळात म्हणजे शिशिर व हेमंत ऋतू म्हणजे साधारणतः नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी या काळात अगदी मनाप्रमाणे कितीही वेळा आठवड्यातून करणे आरोग्य शास्त्रास आयुर्वेदास मान्य आहे. परंतु त्यासोबत योग्य ते वाजीकरण औषध घ्यावे वैद्याला विचारून.


वसंत आणि शरद या काळात म्हणजे मार्च एप्रिल आणि सप्टेंबर ऑक्टोबर हिट शरीराचे बल हे मध्यम असते, त्यामुळे आठवड्यातून तीन वेळा (alternate) म्हणजे दिवसाआड मैथुन क्रिया करणे हे योग्य ठरते तर ... 


ग्रीष्म आणि वर्षा म्हणजे साधारणतः मे जून जुलै ऑगस्ट या काळात पंधरा दिवसातून एखादे वेळेस मैथुन क्रिया करावी 


या विषयाचा अजूनही विस्तार हा शक्य व आवश्यक आहे, परंतु आता पुरते एवढे पुरेसे आहे.


आपली पत्नी हीच आपली सखी , हीच आपली प्रिया आहे ... ही भावना मनात ठेवली तर मैथुन ही क्रिया निरंतर व चिरंतन आनंददायक असू शकते ... उभयतांसाठी !!!


WIFE चा long form हा Worries Invited For Ever असा न करता ... WIFE is LIFE असे जाणून, जर वागणूक ठेवली तर, संसार प्रपंच हा आनंददायक होईल. लग्नाच्या सुरुवातीच्या वर्षातील, तू तू मै मै, द्वैत इथंपासून ... जसं जशी जशी वर्षे सरत जातील, जशी जशी पाच पाच दहा वर्षे पुढे जातील ... तसं तसं दो जिस्म मगर एक जान है हम असं साधता येतं आणि त्या क्रमाने झळो शारीरिक आकर्षण हे कमी होऊन जाते, मैथुन वारंवारता frequency घटते ...

आणि एक आश्वासक स्पर्श आणि न बोलताही मन समजून घेणे, हे दोन्ही व्यक्तींना एकमेकात विरघळवून अद्वैताकडे एकत्वाकडे घेऊन जाऊ शकतो


अवघाची संसार 

सुखाचा करीन 

आनंदे भरीन 

तिन्ही लोक


हे सर्व सद्वृत्त, हे तुमच्या आमच्या जीवनातल्या रोजच्या दैनंदिन व्यवहाराशी प्रॅक्टिकल बाबींशी निगडित आहे जोडलेले आहे , त्यामुळे यावर कितीही संवाद साधणं आणि कितीही विस्तार करणे हे शक्य आहे , म्हणूनच मागील दोन पोस्टमध्ये असे म्हटलेले होते ...

मनुष्य उतना कहता है 

जितना वो कह पाता है 

कहने को बहुत ज्यादा है 

अनकहा अधिक रह जाता है


उर्वरित सात पाप कर्मे (म्हणजे चार वाचिक आणि तीन मानसिक) याविषयी पुढील भागात ...


आपल्या संयम व सहकार्य आणि प्रतिसादाबद्दल निरंतर हार्दिक आभारी आहे 🙏🏼


आपल्या शंका सूचना प्रश्न अभिप्राय यांचे स्वागत आहे


त्वदीय वस्तु गोविंद 

तुभ्यम् एव समर्पये ।


तेरा तुझको अर्पण

क्या लागे मेरा ।


श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु ।


🙏🏼

वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे.

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

www.MhetreAyurveda.com

www.YouTube.com/MhetreAyurved/

_(डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.)_

Sunday, 25 May 2025

भोजनाची योग्य वेळ कोणती? पहिले आणि दुसरे भोजन घेण्याची योग्य वेळ कोणती??

भोजनाची योग्य वेळ कोणती? पहिले आणि दुसरे भोजन घेण्याची योग्य वेळ कोणती?? 40 वयानंतर सायंकाळचे / रात्रीचे भोजन कसे असावे? 


*अष्टांगहृदय सद्वृत्त : भाग 191*

26 मे 2025, सोमवार  

*उपविभाग 133*


✍️🏼 ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871


नमस्कार 🙏🏼💐


काले सात्म्यं लघु स्निग्धम् उष्णं क्षिप्रं द्रवोत्तरम् ।

बुभुक्षितो अन्नम् अश्नीयात् मात्रावद् विदितागमः ॥


आपण वरती उल्लेख केलेला श्लोक, जो भोजनविधीचा मूलाधार आहे, त्याविषयी सविस्तर पाहत होतो!


आहार संभवं वस्तु ... रोगाश्च आहार संभवाः


वस्तु म्हणजे आरोग्य संपन्न शरीर, हे आहारातूनच निर्माण होते अर्थात योग्य आहारातून ! ... आणि रोग सुद्धा आहारातूनच निर्माण होतात अर्थात चुकीच्या आहारातून !!


योग्य आहाराचा उत्तम नियम पुढीलप्रमाणे


काले सात्म्यं लघु स्निग्धमुष्णं क्षिप्रं द्रवोत्तरम् ।।

बुभुक्षितोऽन्नमश्नीयान्मात्रावद्विदितागमः ।


*काले* = 1. योग्य वेळी भोजन घेणे 2. अवेळी भोजन न घेणे


भोजनाची योग्य वेळ कोणती? 

1.

सर्वाधिक शास्त्रीय आणि नैसर्गिक उत्तर म्हणजे *"खरोखरीची" भूक लागेल तेव्हा* ...

घड्याळातील वेळेनुसार जेवणे, अन्न गार होईल म्हणून जेवणे, सगळेजण बसलेत म्हणून एकमेकांसोबत जेवणे, लंच टाईम झाला आहे म्हणून जेवण ... ही योग्य वेळ नसून ... "आता खाल्ले नाही, तर थकवा येईल, पोटात कलकल होईल, ती खरी भुकेची वेळ" ... खाण्याची इच्छा होणे म्हणजे भूक लागली, असे नाही. तरीही ...


2.

नैसर्गिक नियमानुसार मध्याह्न = सूर्य डोक्यावर आला असता = दुपारी 12 चे सुमारास जेवावे 


3.

याचा अर्थ सकाळी 10 ते दुपारी 2 हा पित्त दोषाचा म्हणजे पचनशक्ती चांगली असण्याचा काळ आहे.


या वेळात जेवणे हे चांगले त्यातही साडेदहा वाजता जेवले असता, दीड तासानंतर म्हणजे दुपारी बारा वाजता अर्थात पित्तदोषाचा सर्वोत्तम काळ असताना पचन उत्तम होते


4.

थंडीच्या दिवसात शक्यतो सकाळी दहा ते अकरा (10 ते 11) च्या सुमारास जेवावे. कारण या काळात भूक उत्तम स्ट्रॉंग असते


उन्हाळा पावसाळा ग्रीष्म वर्षा एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या काळात उशिरा म्हणजे दुपारी दीड दोन (130 ते 2) पर्यंत जेवावे कारण या काळात भूक खूप कमी असते 


वसंत शरद म्हणजे मार्च आणि ऑक्टोबर या काळात दुपारी सूर्य डोक्यावर असताना दुपारी बाराचे सुमारास जेवावे कारण या काळात भूक मध्यम असते 


5.

पहिल्या जेवणानंतर पुढे तीन तास काहीही खाऊ नये, कारण आधी घेतलेले अन्न अद्याप पचलेले नसते ... आणि सहा तासापेक्षा जास्त काळ शक्यतो उपाशी राहू नये कारण अधिक वेळ उपाशी राहिल्यास बलक्षय होऊन थकवा येतो 


6.

म्हणजेच दुसरे जेवण हे आदर्श रित्या सायंकाळी साडेचार पाच (4.30 ... 5) ते उशिरा उशिरा साडेसात आठ (730 ... 8) या वेळात करावे 


7.

रात्री आठ नंतर पुढे नऊ-साडेनऊ दहा-साडेदहा अकरा वाजता जेवणे, हे निश्चितपणे अन्नपचन व्यवस्थित न होणे आणि पोट पचन किंवा एकूणच सार्वदेहिक रोग होण्याचे कारण आहे


8.

सायंकाळचे किंवा रात्रीचे किंवा दुसरे जेवण, हे शक्यतो हलके म्हणजे पचायला हलके असावे (वजनाने हलके असा त्याचा अर्थ नाही) 


9.

म्हणून चाळीशी नंतर तरी, रात्रीच्या जेवणात, शक्यतो साळीच्या/ज्वारीच्या लाह्या (नुसत्या कोरड्या किंवा धने जिरे चटणी मीठ याची फोडणी देऊन) किंवा मुगाचे डाळीचे पिठाचे डोसे धिरडे किंवा शिजलेले हिरवे मूग किंवा अगदीच भूक भागत नसेल तर कमी तांदूळ आणि जास्त मुगाची डाळ या पद्धतीने केलेले मुगाची खिचडी; त्यासोबत चटणी मेतकूट पापड लोणचे इतकेच असावे!!!


10.

रात्रीचे जेवण हे पोळी भाजी वरण भात स्वीट डिश फळे दूध असे चारीठाव आणि पचायला जड अशा पद्धतीचे घेऊ नये


11.

रात्रीच्या जेवणानंतर माणूस पुढील सहा ते आठ तास झोपेमध्ये बेडवर काहीही हालचाल न करता पडू नसतो त्यामुळे चाळीशी नंतर रात्रीचे जेवण हे पोळी भाजी वरण भात असे चारी ठाव घेतले असता, त्यातून मिळणारी ऊर्जा शुगर याचा त्या वयात शरीराकडून वापर होत नसल्यामुळे, हळूहळू ते शरीरात साठत राहून स्थाव्य कोलेस्टेटॉल बीपी शुगर डायबिटीस ऍसिडिटी थायरॉईड असे आजार होऊ शकतात.


काले सात्म्यं लघु स्निग्धमुष्णं क्षिप्रं द्रवोत्तरम् ।।४६५।। 

बुभुक्षितोऽन्नमश्नीयान्मात्रावद्विदितागमः ।


नमस्कार आपण वरती उल्लेख केलेला श्लोक, जो भोजनविधीचा मूलाधार आहे, त्याविषयी सविस्तर पाहत आहोत! 


*देहवाक्चेतसां चेष्टाः प्राक् श्रमाद्विनिवर्तयेत्।* 


आणि


*न पीडयेत् इंद्रियाणि*


हे दोन्ही श्लोक आपण एकत्र पहात आहोत.


_(डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.)_


त्वदीय वस्तु गोविंद 

तुभ्यम् एव समर्पये ।


तेरा तुझको अर्पण

क्या लागे मेरा ।


श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु।

🙏🏼


सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved

Copyright कॉपीराइट ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

MhetreAyurved@gmail.com 

www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/

Friday, 23 May 2025

शारीरिक तीन पाप कर्मे : स्पष्टीकरण ... *हिंसास्तेयान्यथाकामं* ... हिंसा, स्तेय आणि अन्यथाकाम.

 *अष्टांगहृदय सद्वृत्त : भाग ४*


*हिंसास्तेयान्यथाकामं* पैशुन्यं परुषानृते॥२१॥ 

सम्भिन्नालापव्यापादमभिध्यां दृग्विपर्ययम्। 

*पापं कर्मेति दशधा (१० =) काय (३)* - वाङ् (४)- मनसै: (३) त्यजेत्॥२२॥ 

✍️🏼 वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे.

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

www.MhetreAyurveda.com

www.YouTube.com/MhetreAyurved/

आज, प्रथम *शारीरिक तीन पाप कर्मे*, या विषयी स्पष्टीकरण देऊया ... *हिंसास्तेयान्यथाकामं* ... हिंसा, स्तेय आणि अन्यथाकाम.


हिंसा = सजीवाचा प्राण नाश, मृत्युकारक पीडा.

स्तेय = चोरी, अपहार, लूट, दरोडा.

अन्यथाकाम = निषिद्ध किंवा विधिविरहित लैंगिक सौख्य.


हिंसा = पर उपघातन. हिंसा ही प्रत्येक वेळेला मृत्यूकारकच होईल असे नव्हे, तर हिंसा याचा अर्थ शारीरिक पीडा वेदना त्रास भय डिस्कम्फर्ट पेन होईल अशी कृती. 

अहिंसा परमो धर्मः , असं म्हटलेलं आहे. अहिंसा ही गीतेतील दैवी संपत् सद्गुणांमध्ये आलेली आहे.

हिंसा ही प्रायः क्रोधजन्य असते. क्रोध आणि काम हे षड् रिपु मधले अग्रेसर होत. बाकी लोभ मोह मद मत्सर यांचाही मानवी जीवनातील नैतिक अधःपतनामध्ये सहभाग असतोच. पण गीतेमध्ये काम आणि क्रोध यांना मात्र अधिक ठळकपणे उल्लेख करण्यात आलेले आहे.

*काम एष क्रोध एष ... विद्ध्येनमिह वैरिणम्।*

किंवा पहिल्या तीन म्हणजे काम क्रोध लोभ यांना अधिक महत्त्व दिलेले आहे म्हणजे त्यांचे उपद्रव मूल्य अत्यधिक आहे. 

त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः।

*कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत्।*

षड् रिपुं पैकी हेच तीन, शारीरिक त्रिविध पापकर्मांचे जनक आहेत. 

कामजन्य अन्यथा काम , क्रोधजन्य हिंसा आणि लोभजन्य स्तेय/चोरी.


जरी आध्यात्मिक तत्त्वज्ञान संत वाङ्मय या सगळ्यांमध्ये हिंसा / षड् रिपु हे वर्ज्य सांगितलेले असले तरी, व्यवहारात मात्र अनेकदा हिंसा ही संरक्षणासाठी (स्वतःच्या किंवा समूहाच्या) आवश्यक असते. हिंसेसाठी प्रवृत्त करणारा क्रोध, हाही त्यावेळेला आवश्यकच असतो. आपल्या कुटुंबीयांना कोणी विनाकारण शिवीगाळ करत असेल, त्रास देत असेल तर; त्याबद्दल आपल्याला क्रोध येणे व त्रास देणाऱ्या व्यक्तीला शासन करणे, इतपत सामर्थ्य आपल्याकडे असलंच पाहिजे. त्यासाठी आवश्यक ती हिंसा करणे, हे समर्थनीय आहेच. 

म्हणूनच काम क्रोध लोभ, हे अनेकदा लौकिक मानवी जीवनात, एका मर्यादित अर्थाने प्रेरणादायी सुद्धा असू शकतात.


*आपण या ग्रुपमध्ये जितके लोक आहोत, किंवा ज्या समूहांमध्ये पुढे इथल्या पोस्ट फॉरवर्ड होतील, त्याचेही वाचन करणारे लोक, हे प्रायः हिंसा आणि स्तेय या कर्मांपासून दूर असतात. हिंसा आणि स्तेय या बाबी आपल्यासारख्यांच्या जीवनात पांढरपेशा मध्यमवर्गीय मिडल क्लास माणसांमध्ये सहसा येत नाहीत ... पण काम किंवा स्त्री संग सेक्स हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा पण स्पष्टपणे न बोलला जाणारा नाजूक विषय असतो म्हणून आरोग्य शास्त्र आणि सामाजिक नीती नियम या दोघांनाही संमत असेल, अनुकूल होईल, अशा पद्धतीने त्याचे स्पष्टीकरण अष्टांग हृदय सूत्रस्थान 7 च्या आधारे समोर ठेवूया*


इथं व्यक्त करत असलेली माझी मते ही नेहमीच योग्य बरोबर उचित असतीलच, प्रत्येकाच्या मते / दृष्टीने असे नाही, पण एखाद्या श्लोकाच्या स्पष्टीकरणातील , एखादे विधान / एखादे मत हे एखाद्या व्यक्तीला न पटण्याजोगे, प्रस्थापित विचारांच्या विरोधी किंवा वेगळे असू शकते. तरीही पुढच्या एखाद्या श्लोकामधील स्पष्टीकरणातील एखादे विधान एखादे मत हे पटण्याजोगे असू शकते. कधीकधी मी व्यक्त केलेले मत , इथे लिहिलेले विधान , दिलेले स्पष्टीकरण हे सर्वांनाच व एखाद्या व्यक्तीला न पटण्याजोगे हे असू शकते पण त्यानिमित्ताने दिलेले वेगवेगळे संदर्भ किंवा इतर व्यक्तींच्या त्या विषयाबाबत आलेल्या पोस्ट ज्या आपण येथे पाठवतो त्या विचार प्रवर्तक लाभदायक असू शकतात. थोडंसं विलक्षण वेगळं बंडखोर असं मत मांडण्याचं वेड धाडस करण्याची वृत्ती आहे, जो सब करते है यारो वो हम तुम क्यू करे😇🙃 थोडं सोशली अन्करेक्ट राहण्याची रिस्क घेण्याची तयारी आहे! असो ... आयुष्य ही एक ST बस आहे असं आपण मागील पोस्ट मध्ये पाहिलं आहेच. योग असतात तोवर सहवास चालतो. शेष भगवंताची इच्छा!!!


गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा 

स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा 


काम = इच्छा आशा आकांक्षा ध्येय स्वप्न हे असतील तरच मनुष्य कार्यरत राहू शकतो. जो समाधानी आहे, तो थांबला. जो तृप्त आहे, तो प्राय: निष्क्रिय होतो. म्हणून स्टीव्ह जॉब म्हणतो स्टे हंग्री, स्टे फूलिश 


असेच अन्यायाविरुद्ध आपल्याला चीड क्रोध आलाच पाहिजे. तो आला तरच शिवाजी लोकमान्य टिळक ज्ञानेश्वर माऊली (? पुढे कधीतरी सांगू या) सावरकर भगतसिंग या व्यक्तींचा जन्म होऊ शकतो. म्हणून सदा सर्वकाळ पडती बाजू घेऊन, भिडस्तपणे दौर्बल्याकडे वाटचाल करू शकेल, अशी कामक्रोधादिंना त्याज्य ठरवण्याची वृत्ती, ही घातक होऊ शकते. त्याचप्रमाणे क्रोधजन्य हिंसा ही जर नष्ट झाली तर, अहिंसेचा अतिरेक हा केव्हाही मनुष्याला (आणि/किंवा त्याच्या समाजाला/समूहाला) दुर्बळ / सॉफ्ट टार्गेट या स्थितीला पोहोचवू शकतो. म्हणून अनुयायात् प्रतिपदम् सर्वधर्मेषु मध्यमाम् । कुठल्याही एका टोकाला जाऊ नये, एक्स्ट्रीमिटी गाठू नये, अहिंसेचा अतिरेक टाळावा; तसेच अनावश्यक हिंसेचे समर्थनही करू नये.

हिंसा म्हटलं की शाकाहार मांसाहार याही बाबी येतात ... पुढे त्याबाबत *आत्मवत् सततम् पश्येत अपि कीटपिपीलिकम्* या श्लोकामध्ये सविस्तर पाहूया.


आपण जर आध्यात्मिक किंवा तात्त्विक किंवा ब्रह्मज्ञान आत्मज्ञान किंवा निवृत्तीपरक अशी चर्चा करणारा उपक्रम चालवत असतो, तर निश्चितच हिंसेचे सर्वत्र वर्जन, अहिंसेचे ठाम समर्थन व षड्रिपुंना निंद्य/त्याज्य ठरवणं, हे आपण केलं असतं!

पण आपण व्यावहारिक लौकिक सामाजिक सदाचरण सद्वृत्त पाहत आहोत. त्यामुळे काही मर्यादेपर्यंत, जिथे आवश्यक तिथे, काम क्रोध हिंसा यांचं समर्थन, हे समाज धारणेसाठी आणि व्यक्तिगत सामर्थ्यासाठी आवश्यक असतेच. अन्यथा ...

अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च । 

अजापुत्रं बलिं दद्याद् देवो दुर्बल घातक:

अशी परिस्थिती ओढवू शकते. 


स्तेय म्हणजे चोरी करणे. परस्व हरण. पर म्हणजे दुसरा. स्व म्हणजे मालकीचे स्वामित्वाचे. हरण म्हणजे काढून घेणे, त्याच्या नकळत किंवा बळजबरीने! टॅक्स यासाठी राजस्व हा शब्द आहे, तो अनेकांना माहित नसतो.

नकळत काढून घेणे ही चोरी ... 

बलपूर्वक हिसकावून घेणे ही लूट / दरोडा.

जे आपलं नाही ते मिळवण्यासाठी चा प्रयत्न म्हणजे चौर्य होय. याच्यामध्ये धन व स्त्री यांची ओरबाडणी लुबाडणूक ही शतकानुशतके चालूच आहे. बळी तो कान पिळी, या न्यायाने दुर्बलांकडून त्यांचं धन किंवा त्यांचे स्त्री-धन हिसकावून घेणे हे चालूच आहे. बलपूर्वक शक्य नसेल तर, नकळत जाणवू न देता या गोष्टी लांबवणे पळवणे, असेही आपण शतकानुशतके पाहत आलो आहोत, त्यावर अधिक भाष्य करण्याची गरज नाही.

परंतु वशिला लावून ॲडमिशन किंवा नोकरी मिळवणे आणि ज्याचा त्या (पद जागा वेकन्सी) वर नैतिक हक्क आहे, त्याचा अधिकार स्वतः बळकावणे. 

दुसऱ्याच्या पार्किंग मध्ये गाडी लावणे, दुसऱ्याच्या जागेवर अतिक्रमण करणे, दुसऱ्याने लिहिलेले लेख गाणे कविता थिसिस पुस्तक किंवा बौद्धिक संपदा स्वतःच्या नावावर खपवणे, एडिट करून फॉरवर्ड करणे ... हेही चौर्य / स्तेय याच्यामध्ये येतात. ही डिजिटल चोरी soft steal हा आता नव्यानेच कळलेला प्रकार आहे. 

जे माझं आहे, तेही सोडून देण्याची तयारी म्हणजे रामायण!

आणि 

जे माझं नाही, तेही बळकवण्याची वृत्ती म्हणजे महाभारत!! 

जे माझं नाही ... त्याला मी हात लावणार नाही, त्याचा मी स्वीकार करणार नाही ... ही वृत्ती म्हणजे अस्तेय. 


अहिंसा अस्तेय हे अष्टांग योगातील यम या मध्ये समाविष्ट आहेत.

जसे हिंसा ही क्रोधजन्य आहे , तसेच चौर्य = स्तेय हे काम किंवा लोभजन्य आहे. म्हणून षड्रिपुं-वरती विजय मिळवणे, हे सदाचरणाचं सद्वृत्ताचं पहिलं पाऊल आहे.


अन्यथा काम ... इथे काम हा शब्द स्त्री संग, मैथुन, रतिक्रीडा, संभोग, सेक्षुअल प्लेजर या अर्थी आलेला आहे.

था हा प्रत्यय suffix , पद्धत रीत दर्शवतो, असं आपण पूर्वी पाहिलं आहे. जसे यथा तथा कथम् सर्वथा ... तसं अन्यथा!

अन्यथा म्हणजे जसं असायला हवं , त्यापेक्षा वेगळं विपरीत विलक्षण विसंगत विचित्र.

वस्तुतः ब्रह्मचर्य हेही यम या योग अंगात आलेलं आहेच.

याविषयी सविस्तर पुढील भागात पाहू या. 


अब्रह्मचर्य हे सरळ सरळ काम या षड्रिपु मुळेच असते. जन्मापासून पहिली आठ वर्षे पित्याच्या घरी, तिथून पुढची बारा वर्षे उपनयनानंतर गुरुगृही ... तेथे अध्ययन आणि मग 25 व्या वर्षी गृहस्थाश्रमात प्रवेश म्हणजे पहिली पंचवीस वर्षे ही ब्रह्मचर्याश्रम म्हणजे आयुष्यासाठी ज्ञान/कौशल्य रूपी पाया तयार करण्यासाठी, फाउंडेशन मेकिंग च्या ज्ञानार्जनासाठी, कौशल्य शिकण्यासाठी ... *एकाग्रतेने* द्यायची आहेत. त्या वयात काम / स्त्रीसंग अशा गोष्टींकडे मनाला धावू द्यायचे नाही, म्हणूनच ग्रामातून गृहातून , वनामध्ये गुरुगृहात शिकायला जाणे , अशी व्यवस्था त्यावेळी होती. 


विशेष म्हणजे 25 ते 50 हा गृहस्थाश्रम पूर्ण केल्यानंतर, वानप्रस्थाश्रम म्हणजे स्वेच्छा निवृत्ती! आता, हा संसार माझा नसून, माझ्या मुलाचा / सुनेचा आहे, हे वास्तव स्वीकारून, खुलेपणाने मनमोकळेपणाने आनंदाने सहजपणे , तो संसार सोडून, वनाकडे प्रस्थान करणे ... म्हणजे राहते घर सोडून , आसक्ती सोडून, खऱ्या अर्थाने विरक्त होऊन, स्वतःच्या पारलौकिक सद्गति साठी तत्त्वचिंतनासाठी आत्मकल्याणासाठी वनात जाऊन राहणे. इतकी ती सहज निवृत्तीची व्यवस्था, त्याकाळी समाजात होती.


आणि यदा कदाचित 50 ते 75 ही 25 वर्ष जिवंत राहणं जमलंच, तर 75 च्या पुढे वनातही न राहता, संन्यासाश्रम स्वीकारणे!!! 

संन्यास याचा अर्थ तीन दिवसांपेक्षा अधिक काळ एका जागी न राहणे. वानप्रस्थाश्रमात तुम्ही वनात का होईना, एखादी झोपडी / आश्रम बांधून दीर्घकाळ राहू शकत असता. पण संन्यासाश्रमामध्ये मात्र त्रि-रात्र झाल्यानंतर ते स्थान सोडून, अन्यत्र निघून जायचे असते. इतकी पराकोटीची अनासक्ती निःसंगता विरक्ती, ही आपल्या संस्कृतीने सदाचरण म्हणून स्वीकारलेली होती.

असो. 

आपण आता सध्या गृहस्थाश्रमातील विहित / मान्य अशा काम स्त्रीसंग ग्राम्यधर्म मैथुन अब्रह्मचर्य म्हणजे आज परिचित असलेल्या सेक्स या विषयाबाबत बोलूया.

ब्रह्मचर्य किंवा अब्रह्मचर्य हे आयुर्वेदामध्ये जीवनाच्या तीन उपस्तंभांपैकी एक आहेत. आहार निद्रा आणि ब्रह्मचर्य किंवा अब्रह्मचर्य , हे तीन जीवनाचे आधार pillars आहेत. 


*मध्येच एक साधा सरळ सोपा प्रश्न विचारतो.

Poll घेऊया.*

तिथे दिलेला विकल्प / ऑप्शन निवडावा.

*गृहस्थाश्रमामध्ये पती/पत्नी वगळता, सर्वात श्रेष्ठ वंदनीय असा अन्य नातेवाईक कोण कि, ज्यांच्या बद्दल सर्वाधिक कृतज्ञता असायला हवी ... असा/असे नातेवाईक कोण?*

या प्रश्नाचे उत्तर/प्रतिसाद म्हणून *कोण* यासोबतच, *का* असेही सांगावेसे किंवा इतरही अधिक काही सांगावेसे वाटले, तर वैयक्तिक पर्सनल व्हाट्सअप अकाउंट 9422016871 वर मला कळवा (प्रतिसाद सर्वांनी वाचण्यास योग्य आहे, असे वाटले तर, तो प्रतिसाद देणाऱ्याच्या अनुमतीने, तो इथे ग्रुप मध्ये नावासह किंवा नावाविना, जशी लिहिणाराची इच्छा असेल, त्यानुसार प्रसृत करूया)


काम म्हणजे लैंगिक आनंद हे गृहस्थाश्रमातील कर्तव्य आहे, आचरणीय आहे व ते समर्थनीयही आहे ... अर्थातच काही मर्यादेपर्यंत, काही नियमांच्या अधीन राहून!!! 

कुठल्याही गोष्टीत, अति तेथे माती, हे ठरलेलेच असते. *मन मारू नये आणि अति करू नये*, या स्पेक्ट्रम मध्ये, या आवाक्यामध्ये, कोणतीही गोष्ट, ही उचित ठरू शकते. 

*काम = लैंगिक आनंद ही प्रत्येक सजीवाची नैसर्गिक प्रेरणा व स्वाभाविक गरज आहे.*


काम असे म्हटल्यानंतर काम म्हणजे स्त्री संग = सेक्षुअल प्लेजर याचे, काहीतरी समाज मान्य व आरोग्यशास्त्र मान्य असे विधी / पद्धत / रीत / नियम / संकेत असायला हवेत. त्या नियमांच्या विपरीत जे , ते *अन्यथा काम* असे म्हणता येईल. 

काम या शब्दाला जसे संभोग मैथुन स्त्री संग शरीर सुख सेक्स असे शब्द परिचयाचे आहेत, तसाच थोडासा अपरिचित शब्द/संज्ञा म्हणजे *ग्राम्यधर्म* असा एक शब्द आहे. पूर्वी मनुष्य किंवा ऋषीमुनी किंवा तपाचरण करणारे किंवा विद्यार्थी हे ब्रह्मचर्याश्रमात वनात राहत असत. ज्याला आज आपण गावरान असे म्हणतो आणि सर्वसामान्य जन पौरजन हे पुरात, नागरिक म्हणजे नगरात म्हणजे ग्राम म्हणजे गावात राहत असत. म्हणून गावात ग्रामात समाजात समूहात समुदायात राहून करायचे, जे वर्तन ... तो ग्राम्य धर्म, असा त्याचा साधा सरळ अर्थ. ग्राम्य धर्माचे नियम पुढीलप्रमाणे आहेत ... या मध्ये... स्त्री विषयक आणि संभोग = सेक्षुअल ॲक्ट या *कृती बाबतचे*, हेय उपादेय, स्वीकार्य त्याज्य, ग्राह्य वर्ज्य असे नियम दिलेले आहेत. ते आपण क्रमशः पाहूया. 

*कारण, आपण या ग्रुपमध्ये जितके लोक आहोत, किंवा ज्या समूहांमध्ये पुढे इथल्या पोस्ट फॉरवर्ड होतील, त्याचेही वाचन करणारे लोक हे प्रायः हिंसा आणि स्तेय या कर्मांपासून दूर असतात. हिंसा आणि स्तेय या बाबी आपल्यासारख्यांच्या जीवनात पांढरपेशा मध्यमवर्गीय मिडल क्लास माणसांमध्ये सहसा येत नाहीत ... पण काम किंवा स्त्री संग सेक्स हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा पण स्पष्टपणे न बोलला जाणारा विषय असतो म्हणून आरोग्य शास्त्र आणि सामाजिक नीती नियम या दोघांनाही संमत असेल, अनुकूल होईल, अशा पद्धतीने त्याचे स्पष्टीकरण अष्टांग हृदय सूत्रस्थान 7 च्या आधारे समोर ठेवूया*


ग्राम्यधर्मे त्यजेन्नारीमनुत्तानां रजस्वलाम् अप्रियामप्रियाचारां दुष्टसङ्कीर्णमेहनाम् अतिस्थूलकृशां सूतां गर्भिणीमन्ययोषितम् वर्णिनीमन्ययोनिं च गुरुदेवनृपालयम् 

चैत्यश्मशानायतनचत्वाराम्बुचतुष्पथम् 

पर्वाण्यनङ्गं दिवसं शिरोहृदयताडनम् 

अत्याशितोऽधृतिः क्षुद्वान् दुःस्थिताङ्गः पिपासितः बालो वृद्धोऽन्यवेगार्त्तस्त्यजेद्रोगी च मैथुनम् 


याच श्लोकांच्या बरोबरीने पुढील मुद्दे ही संक्षेपाने विचारात घेऊया ...

वाजीकरण अष्टांग आयुर्वेद , योगरत्नाकर येथील अष्टविध मैथुन, पंचसायक अनंगरंग वात्स्यायन कामसूत्र खजुराहो राजकीय स्थैर्य शुक्र अहर्ष इरेक्टाईल डिस्फंक्षन नाॅन स्टिम्युलेशन व्हिडिओ पॉर्न क्लीब षंढ गायनॅकॉलॉजी अँड्रोलॉजी शशांक सामक नवविवाहितांचे कामजीवन 40 नंतरचे कामजीवन पत्नी सखी प्रिया ... आणि आणखी काही 🙂 पुढील भागात...


त्वदीय वस्तु गोविंद 

तुभ्यम् एव समर्पये ।


तेरा तुझको अर्पण

क्या लागे मेरा ।


श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु ।


🙏🏼

वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे.

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

www.MhetreAyurveda.com

www.YouTube.com/MhetreAyurved/


प्रिया संग सुरभी जंगम पद्मिनी 


दहा 10 प्रकारची पाप कर्मे = काया वाङ् मनस् म्हणजे काया वाचा मने

अष्टांग हृदय सदृत्त भाग 3

24.12.2022


हिंसास्तेयान्यथाकामं पैशुन्यं परुषानृते॥२१॥ 

सम्भिन्नालापव्यापादमभिध्यां दृग्विपर्ययम्। 

पापं कर्मेति दशधा कायवाङ्मनसैस्त्यजेत्॥२२॥ 


पापं कर्म इति दशधा ... दहा 10 प्रकारची ही पाप कर्मे आहेत. ती काया वाङ् मनस् म्हणजे काया वाचा मने त्यजावीत, वर्ज्य करावीत, सोडून द्यावीत, करू नयेत.


दहा पैकी प्रथम तीन ही शारीरिक पाप कर्मे, 

पुढील चार ही वाचिक पाप कर्मे,  

तर शेवटची तीन ही मानसिक पाप कर्मे आहेत.

3+4+3=10.

ही दहा पाप करणे अन्यही पंथांमध्ये ग्रंथांमध्ये या प्रकारे उल्लेख केलेली आहेत. या सर्वाचा विस्तार कितीही करता येईल, परंतु तो समजेल इतपतच आणि यथा शक्य संक्षेपाने येथे मांडूया. 


पाप पुण्य या कल्पना शिल्लक तरी राहतील की नाही पुढच्या पिढी नंतर, अशी शंका शक्यता वाटावी अशी गंभीर सामाजिक परिस्थिती संस्कारांची व जीवन मूल्यांची होत चाललेली आहे. 


पाप पुण्य किंवा कर्मफल किंवा अपूर्व ही मीमांसादर्शनातून आलेली संज्ञा होय.

कुठल्याही कर्माचे फळ मिळतेच पण ते तात्काळ मिळेल असे नसून , ते कालांतराने म्हणजे काही वर्षांनी किंवा पुढील जन्मी किंवा काही जन्मांनीही मिळू शकते, मग ते कर्म ... सत्कर्म असो अथवा दुष्कर्म ... त्याचे फल म्हणून सुखप्राप्ती असो किंवा दुःखप्राप्ती ... त्या कर्माचा विपाक (म्हणजे पिकलेपणा= मॅच्युरिटी) कधी होईल, हे कोणालाच ज्ञात नसते. पण *कर्मफल हे मिळतेच मिळते.*


नाभुक्तं क्षीयते कर्म कल्पकोटिशतैरपि। 

अवश्यमेव भोक्तव्यं कृतं कर्म शुभाशुभम् । 


केलेले कर्म ते त्याची फलप्राप्ती, याच्या मधल्या काळात ते कर्मफल कोणत्या स्वरूपात राहते?

याला शास्त्रीय दृष्ट्या 'अपूर्व' असे म्हटलेले आहे.

पण लौकिक भाषेमध्ये सुबोधपणे त्यालाच *पाप व पुण्य* अशा संज्ञा दिल्या गेल्या.


पाप आणि पुण्य ह्या दोन भारतीय जीवनाचे आधार असलेल्या संज्ञा आहेत.


मी इतकं चांगलं वागतो , मी कोणाचेही वाईट करत/केलेले नाही; तरीही माझ्या नशिबात हे दुःख हे कष्ट का बरे ? 


आणि अमुक तमुक समोरचा किती चुकीचं वागतो, किती दुष्कर्म करतो ; तरीही त्याचं काहीही बिघडत नाही , त्याला सर्व सुख प्राप्त होतात ... 


असे विरोधाभासात्मक अनुभव जगात / जन्मात प्रत्येकाला येतात. 


त्याचं समाधान हे पाप-पुण्य कर्मफल या तत्त्वज्ञानाच्या आधारे केले गेले असल्यामुळे, भारतीय मनुष्य हा मनाने खंबीर असतो. तो प्राप्त परिस्थितीला या तत्त्वज्ञानामुळे स्वीकारतो आणि तो सदाचरणाच्या मार्गावरतीच चालत राहतो. *तो सहसा/प्रायः/बहुधा पापभीरू असतो.* 


घडे भोगणे पाप ते कर्म खोटे।

मना सर्वथा पापबुद्धी नको रे॥ 


मना धर्मता नीति सोडूं नको हो।

जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें। 


जनीं वंद्य ते सर्व भावे करावे॥

मना पापसंकल्प सोडूनि द्यावा। 


मना सत्यसंकल्प जीवीं धरावा॥


हे संस्कार त्याच्यावर दृढपणे झालेले असतात.


मीच पूर्वजन्मी काहीतरी पापकर्म केलं असेल, म्हणून या जन्मी मला ही दुःख कष्ट दुरवस्था प्राप्त झाली, अशी त्याची धारणा/समजूत असते.


मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले। 

तयासारिखे भोगणें प्राप्त जाले ॥


म्हणून मी या जन्मात काहीही चुकीचे केले नाही, कुणाचेही वाईट केले नाही, तरी मला हे दुःख का प्राप्त झालं, याचं पूर्वजन्मी मीच केलेलं माझं कर्म माझी पापं, असं उत्तर त्याच्याकडे असतं!


आणि म्हणून तो समाधानी होतो. तो निराश विफल फ्रस्ट्रेट होत नाही. 


त्याचप्रमाणे समोरचा अमुक तमुक आज कितीतरी चुकीचं वागतोय, कुकर्म दुष्कर्म दुराचरण करतोय, तरी त्याचं काहीही बिघडत नाही, त्याला लौकिक सर्व सुखं प्राप्त आहेत; याची कारण मीमांसा भारतीय मनुष्य अशी करतो कि, कदाचित त्याने पूर्वजन्मी काहीतरी सत्कृत्य सत्कर्म पुण्य केलेलं असावं, म्हणून त्याला या जन्मी, असं चुकीचं वागूनही, सगळी सुखं प्राप्त आहेत आणि त्याला कुठलीही समस्या नाही.


घडें भोगणे सर्वही कर्मयोगे।


भारतीय मानसिकतेमधील हा पाप-पुण्याचा आधार काढून घेतला तर , आज जी ही परिस्थिती अनाकलनीय अशी समोर दिसते आहे , त्याचं उत्तर नष्ट होईल आणि आणि भारतीय मनुष्य नैराश्य वैफल्य यात ओढला जाऊन, तो व्यसन किंवा आत्महत्या याकडे प्रवृत्त होईल.


महर्षी व्यासांनी 18 पुराणं लिहिली, पण त्या अठराही पुराणांचं सार हे या दोनच शब्दांवर आधारलेलं आहे ...


*परोपकारः पुण्याय, पापाय परपीडनम्।*


हेच संतांनी अभंगात सांगितलेलं आहे ...

पुण्य पर उपकार ... पाप ते पर पीडा !


आज जर आम्ही बुद्धीप्रामाण्यवादाच्या नावाखाली 'पाप पुण्य कर्मफल' ही जीवनमूल्ये नाकारली, 

तर समोर येणाऱ्या प्रसंगांना तोंड देण्याची क्षमता नष्ट झाल्यामुळे सामाजिक सौहार्द आणि मानसिक स्थैर्य हे दोन्हीही नष्ट होईल. 


आणि आज आपण ते प्रायः सर्वत्र पाहत आहोतच. कधी नव्हे ते स्ट्रेस फियर फ्रस्ट्रेशन चांचल्य अस्थैर्य अविश्वास निष्ठेचा-अभाव असं हळूहळू का होईना, भारतीय समाजात भारतीय कुटुंबात भारतीय परिवारात सर्वत्र पाझरू लागलेलं आहे. 


आपल्याशी संबंध नसलेल्या आपल्याला ओळखत नसलेल्या आपल्याला समजून (कदाचित्) न घेऊ शकणाऱ्या अपरिचित अनोळखी त्रयस्थ माणसाकडून समुपदेशन कौन्सिलिंग करून घेणे, असला व्यवसाय / धंदा, कधी नव्हे ते, भारतीय समाजात मूळ धरू लागलेला आहे.

तो वाईट किंवा अनावश्यक आहे असे नव्हे, पण त्याची गरज भासावी /लागावी /पडावी , इतकी भारतीय कुटुंब व्यवस्था खिळखिळी दुबळी अक्षम असमर्थ झाली आहे, याचे ते द्योतक आहे.


जे पूर्वी आजी आजोबा नातेवाईक मित्र भजन कीर्तन वाचन अनौपचारिक गप्पा यातून होऊ शकत होतं , ते आज फी भरून प्रोफेशनली करावं लागत आहे, यापरते दुर्दैव ते काय?


म्हणून मूळ संस्कार / जीवन मूल्यांची प्रस्थापना ही बालपणापासून करताना, भले अपूर्व या मीमांसा शास्त्रातील संज्ञेनेच नव्हे, पण रूढ अशा लौकिक शब्दातून *पाप पुण्य कर्मफल* यातून ती होणं, हे समाजाच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक आहे. 


शेष 10 पाप कर्मे एकेक करून क्रमशः पुढील भागात पाहू या. 

म्हणूनच असे म्हणावेसे वाटते कि

मनुष्य उतना कहता है 

जितना वो कह पाता है 

कहने को बहुत ज्यादा है 

अनकहा अधिक रह जाता है


त्वदीय वस्तु गोविंद 

तुभ्यम् एव समर्पये ।


तेरा तुझको अर्पण

क्या लागे मेरा ।


श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु ।


🙏🏼

वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे.

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

www.MhetreAyurveda.com

www.YouTube.com/MhetreAyurved/

ज्ञानाज्ञानविशेषात्तु मार्गामार्गप्रवृत्तयः सुख धर्म भक्ति मित्र

अष्टांगहृदय सद्वृत्त भाग 2+

सद्वृत्त : माणसाने माणसाशी माणसासम वागणे

✍️🏼 वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे.

मनुष्य उतना कहता है 

जितना वो कह पाता है 

कहने को बहुत ज्यादा है 

अनकहा अधिक रह जाता है


सुख धर्म भक्ति मित्र ... असे चार मुख्यशब्द / की वर्ड्स आपण मागील दोन निरूपणात पाहिले.


धर्म हा सुखकारक आहे किंवा सुखासाठी धर्माचरण आवश्यक आहे 

आणि 

चांगल्या मित्राची भक्तीने उपासना करावी, जपणूक करावी 

असा त्याचा सारांश!


सुखार्थाः सर्वभूतानां मताः सर्वाः प्रवृत्तयः। 

सुखं च न विना धर्मात्तस्माद्धर्मपरो भवेत्॥


प्रस्तुत उपक्रमातील, प्रथम श्लोक, त्याचे प्रथम दोन चरण(पहिली ओळ) हे तसेच असले तरी , पुढील दोन चरणांचा (पुढील/दुसरी ओळ) त्याला "पाठभेद" आहे. पाठभेद याचा अर्थ अन्य / वेगळे शब्द.

जसे कि चरक संहिता सूत्रस्थान 28 मध्ये

सुखार्थाः सर्वभूतानां मताः सर्वाः प्रवृत्तयः ।

*ज्ञानाज्ञानविशेषात्तु मार्गामार्गप्रवृत्तयः ॥*

सुखप्राप्तीसाठीचा योग्य मार्ग कोणता, हे त्याविषयीचे ज्ञान असेल , तरच कळते.

अन्यथा अज्ञानापोटी यातून मला सुख लाभेल, असे मानून, अ-मार्ग / कुमार्ग / चुकीच्या मार्गाला प्रवर्तन होणे, सदाचरण न होणे, दुराचरण होणे, आचरण चुकणे च्युति किंवा स्खलन होणे ... हे संभवते.


म्हणजेच आचरणापूर्वी योग्य ते ज्ञान आणि त्यासाठीचा मार्गदर्शक उपलब्ध असणे, आवश्यक असते. 

अगदी श्रीरामासारखा मर्यादा पुरुषोत्तम किंवा विष्णूचा अवतार असलेल्या, परंतु आता मनुष्य देहात असलेल्या व्यक्तीलाही, अज्ञानामुळे अमार्ग प्रवृत्ती संभवते. या अज्ञानालाच "बुद्धीची मलीनता" असे म्हटलेले आहे आणि त्याचे उदाहरण म्हणून

असम्भवं हेममृगस्य जन्मः 

तथापि रामो लुलुभे मृगाय |

प्रायः समापन्न विपत्तिकाले 

धियोऽपि पुंसां मलिना भवन्ति ||

ही सुवर्णमृग कथा सगळ्यांनाच माहिती आहे. 


बुद्धीच्या मलीनतेलाच आयुर्वेदामध्ये "प्रज्ञापराध" असे म्हटलेले आहे


योग्य मार्ग = सन्मार्ग प्रवृत्त आचरण = सदाचरण म्हणजे धर्म. 

विहित कर्म जन्य धर्म! 


अ-मार्ग कुमार्ग प्रवृत्त दुराचरण म्हणजे अधर्म. 

निषिद्ध कर्म जन्य अधर्म!!


अष्टांग हृदय सदृत्त या उपक्रमाचा आरंभ, *सुख* या मंगल शुभ कल्याण अनुकूल हव्या हव्या अशा शब्दाने झालेला आहे.


भारतीय संस्कृती / सनातन धर्म याचे सर्वोच्च तत्त्वज्ञान श्रीमद्भगवद् गीता इथे आहे. श्रीमद् भगवद्गीतेचा प्रारंभ हा धर्म या शब्दाने झालेला आहे.


आणि "धर्म व सुख या दोन शब्दांचं परस्परावलंबित्व", हे आपण पहिल्याच श्लोकात पाहिलेले आहे.


जरी श्रीमद् भगवद्गीता "धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे" अशा शब्दांनी सुरू होत असली, तरी प्रत्यक्षात "भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून येणारे पहिले शब्द" हे थोडे ग्रामीण भाषेतील इरसाल / कोल्हापुरी अशा प्रकारचे आहेत, असे मला जाणवते 😇🙃🤔😳


*अष्टांग हृदय सदृत्त* या उपक्रमातील दुसरा श्लोक हा "कल्याणमित्र" याच्याविषयी आहे. 

भक्त्या कल्याणमित्राणि सेवेतेतरदूरगः। 


श्रीकृष्ण हा अर्जुनाला "कल्याणमित्र" या नात्याने सगळं सांगतोय, अशी श्रीमद्भगवद्गीतेची संवाद रूप शैली आहे.


मित्र मित्राशी बोलताना सहसा फॉर्मल शब्दात बोलत नाही, तो प्राय: इन्फॉर्मल शब्दात बोलतो! विशेषतः कोल्हापुरी इरसाल ग्रामीण भाषा ही प्रायः अशीच आहे.


भगवान श्रीकृष्णाचे गीतेमधलं पहिलं वाक्य, हे दुसऱ्या अध्यायात येतं.

कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् |

अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तिकरमर्जुन ||


क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते |

क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्तवोत्तिष्ठ परन्तप ||

 

*हे अगदी , "काय मर्दा (परंतप)! असं काय करायलायस" असं एक कोल्हापुरी मित्र दुसऱ्या मित्राला सांगतोय, असं वाटावं, इतकं हे नैसर्गिक असं, संवाद सूत्र आहे , असं मला वाटतं. अगदी यातील *क्लैब्यं क्षुद्रं हृदयदौर्बल्यं नैतत्त्वयि* ... हे शब्दही कोल्हापूरकडील कोणत्याही संवादाची सुरुवात तेथील ग्रामीण भाषेत इरसालपणे येणाऱ्या xxx xxxx पहिल्या दोन प्रसिद्ध शिव्यांप्रमाणे आहेत, अशी माझी (गैर)समजूत किंवा अल्पमती आहे.


गीता ही सर्वोच्च तत्वज्ञान म्हणून आपल्यासमोर मांडण्यात आलेली असली, तरी मूलतः ती *प्रवृत्तीपर* अशा "मित्र संवादातून" आलेली आहे, हे तिचं मूळ स्वरूप नेहमी स्मरणात असू द्यावे.


त्यात कितीही उच्च तत्त्वज्ञान असलं तरी, अर्जुन हा श्रीकृष्णाचा सखा होता आणि *सखा भक्तीने* (भक्त्या कल्याणमित्र सेवेत) त्याने हे सगळं प्राप्त करून घेतलेलं आहे! 


म्हणून *भक्त्या कल्याणमित्राणि सेवेत* याचा सोप्या भाषेतील अर्थ *"सखाभक्ती"* असाच होतो. 


_सुदैवाने आयुर्वेदातील माझं थोडंफार अस्तित्व हे माझा सखा सद्गुरु भगवंत *दिवंगत वैद्य अनिलशी* असलेली "सखा भक्ती" यामुळेच आहे. प्रत्यक्ष गुरुला, मित्राप्रमाणे "एकेरी संबोधन" करता येण्याचं सौभाग्य लाभलेला , मी एक "सखाभक्त" आहे._ 🙏🏼🪔🌸


त्वदीय वस्तु गोविंद 

तुभ्यम् एव समर्पये ।


तेरा तुझको अर्पण

क्या लागे मेरा ।


श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु ।

🙏🏼


✍️🏼 वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे.

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

www.MhetreAyurveda.com

www.YouTube.com/MhetreAyurved/



कल्याणमित्र सखाभक्ती

मूळ पोस्ट दिनांक 23.12.2022 ... 

ब्लॉग पोस्ट दिनांक 23.05.2025

अष्टांगहृदय सद्वृत्त ... श्लोक 2

23.12.2022


*भक्त्या कल्याणमित्राणि सेवेतेतरदूरगः।*


भक्त्या ... भक्तीने म्हणजे प्रेमाने आदराने आपुलकीने जिव्हाळ्याने ममत्वाने


कल्याणमित्राणि ... कल्याण म्हणजे शुभ चांगलं भलं चांगभलं मंगल हित आपल्या बाबतीत हे साधून देणारा किंवा आपल्या कल्याणचं रक्षण करणारा तो कल्याणमित्र


सेवेत ... सांभाळावा जपावा वागावे


इतरदूरगः। (स्यात् / भवेत्) ... इतर म्हणजे कल्याण अ-मित्र म्हणजेच कल्याणाचा शत्रू किंवा अकल्याणमित्र म्हणजे आपलं अहित करेल असा मित्र, अशी संगत , कुसंगती!


दूरगः ... ग म्हणजे जाणारा. जसे खग म्हणजे आकाशात जाणारा तो पक्षी, नग म्हणजे कुठेही न जाणारा तो पर्वत, दुर्ग म्हणजे जाण्यासाठी कठीण अवघड तो दुर्ग किल्ला गड! तसे दूर-गः म्हणजे अशा अकल्याणकारक शत्रुसमान संगती पासून दूर जावे, दूर राहावे, अंतर ठेवावे, जवळ येऊ देऊ नये, आपण जवळीक साधू नये.


गः असा प्रत्येक सफिक्स प्रत्यय असणारे सुश्रुत वचन हे विद्यार्थ्यांसाठी किंवा कोणत्याही विषयाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी खूप चांगल्या पद्धतीने आलेले आहे त्यात सहा सोपान स्टेप्स आहेत


वाक्सौष्ठवेऽर्थविज्ञाने प्रागल्भ्ये कर्मनैपुणे । 

तदभ्यासे च सिद्धौ च यतेत *अध्ययनान्तगः* ।


अध्ययनाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत ज्याला जायचे आहे त्यांनी या क्रमाने जावे असे सुश्रुताचार्य म्हणतात यातही *अध्ययन अन्त गः* असा शब्द आलेला आहे. या श्लोकाबद्दल खूप विस्ताराने सांगण्याजोगे आहे, पण ते पुन्हा कधीतरी!


*इतर दूर गः* "स्यात् / भवेत्" म्हणजे व्हावे राहावे असे क्रियापद अभिप्रेत आहे. जसे कल्याण मित्र *सेवेत* असे क्रियापद लिहिलेले आहे तसे येथे स्यात् किंवा भवेत् म्हणजे असावे किंवा व्हावे / राहावे, असे क्रियापद आहे असे मानावे जाणावे.


याला *वाक्यशेष* असे म्हणतात म्हणजे जे शब्द प्रत्यक्षात लिहिलेले बोललेले नाहीत, ते अध्याहृत गृहीत धरणे. 


जसे ॐ नमः शिवाय, श्री गणेशाय नमः याच्यामध्ये *अस्तु* हा शब्द गृहीत आहे. त्याला वाक्यशेष म्हणावे. म्हणून नमोऽस्तु तस्मै। यामध्ये *अस्तु* हे क्रियापद प्रत्यक्षात आहे.


जरी आपणास तत्त्वज्ञान अध्यात्म यात *जे जे भेटे भूत, ते ते मानिजे भगवंत!* किंवा सगळं ब्रह्म विश्व आपणच आहोत , असं शिकवलेलं असलं तरी , व्यवहारात प्रॅक्टिकली हे अवघड आणि अशक्य असतं!


संतांना अभिप्रेत वसुधैव कुटुम्बकम् किंवा जगातील प्रत्येक व्यक्ती ही एक सारखीच आहे, सर्व समभाव असं प्रत्यक्षात असतं तर, सीमा सैन्य पासपोर्ट यांची आवश्यकताच राहिली नसती!


पण व्यवहारांमध्ये *आपपरभाव* हा असतोच, म्हणूनच *अष्टांग हृदय सद्वृत्त* हा उपक्रम अलौकिक तत्त्वज्ञान, अव्यवहार्य म्हणजे इम्पॅक्टिकल बोजड तत्त्वज्ञान न सांगता ... व्यवहार कुशलता सांगतो!


आमच्या बालपणी आमच्या एका मित्राचे वडील त्याला रागावताना म्हणायचे , "अरे, जरा चांगले *मित्र पाळ!"* ... आता मित्र हा काय कुत्रा मांजर गाय घोडा आहे का, की ज्याचा ज्याला 'पाळायचे' आहे!?


परंतु पाळणे याचा अर्थ जोडणे सांभाळणे, असा त्यांना अभिप्रेत होता 

म्हणजे संगती मैत्री ही चांगल्या कल्याणकारक हितैषी लोकांशी असावी, असा त्यातील भावार्थ!


कल्याण मित्राला भक्तिने जपणे आणि इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवणे याचा अर्थ *त्या त्या व्यक्तीच्या, आपल्या जीवनात असणाऱ्या मूल्या प्रमाणे* आपण त्याला कुठल्या कक्षेत इयत्तेत / ऑर्बिट मध्ये ठेवायचे, हे ठरवावे.

प्रत्येकाला जर आपण तितक्याच एकसारख्याच जवळीकेने पाहिलं, तर ते उचित होत नाही आणि अनेकदा आपला अपेक्षाभंग मनोभंग होतो.


आपण समोरच्याशी कितीही चांगलं वागलं तरी, तो कदाचित आपल्याला टेकन फोर ग्रांटेड taken for granted गृहीत धरणे, वापरून घेणे, एक्सप्लाॅयटेशन exploitation करणे अशा दृष्टीने पहात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.


आपणही *गळे पडू पणा* शक्यतो टाळावा. अन्यथा *अतिपरिचयात् अवज्ञा* असे होते.


आपण कुणाच्या कुठल्या ऑर्बिट मध्ये म्हणजे किती जवळ किंवा लांब आहोत 

आणि

आपण कुणाला आपल्या किती ऑर्बिट मध्ये आत येऊ द्यायचं किंवा बाहेरच्या कक्षेत ठेवायचं,

हे ठरवणं हे खरोखरच कौशल्याचं ... 

खरं तर जुगाराचं गॅम्बलिंगचं काम आहे.


ते कधी कधी जमतं साधतं आणि अनेकदा फसतंही !!


वेळ निघून गेल्यानंतर त्यातला खरा भाव लक्षात येतो, तेव्हा नैराश्य वैफल्य याशिवाय काहीच हाती उरत नाही.


कधी कधी नकळतपणे खूप चांगली माणसं ही आयुष्याला जोडली जातात, तो आपल्या सुकृताचा गुरुकृपेचा ईश्वरीवरदानाचा भाग समजावा.


प्रेम आदर भक्ती ही भावना/नातं हे mutual नसतं म्हणजे mutually equal म्हणजे परस्पर सममूल्य नसते


मला तेंडुलकर बद्दल प्रेम आहे म्हणजे तेंडुलकरला माझ्याबद्दल प्रेम असेलच असं नाही ... असलंच पाहिजे, असंही नाही!


अगदी 2 घट्ट मित्रांचंही परस्पर मैत्र हे सममूल्य same inensity affinity level ला असेल, असं नाही.


हे सर्व नात्यांबाबतीत असतं ...

अगदी मायलेक पितापुत्र गुरुशिष्य पतिपत्नी मित्र या सर्वच नात्यांबाबत !!!


मला एखाद्याबद्दल जितकं प्रेम आदर भक्ती आपुलकी जिव्हाळा सॉफ्ट कॉर्नर वाटतो ... 

"तेवढाच , तितक्याच" उत्कटतेने intensely समोरच्याला माझ्याबद्दल असेल / असेलच , असं नाही. 


"मी ते समोरचा (मी 👉🏼 समोरचा)" हे नातं जितकं उत्कट/intense किंवा उथळ/paleअसेल , 

तितकंच "समोरचा ते मी (समोरचा 👉🏼 मी)" हे नातं तसंच reciprocate असेल, असं नाही.


हे परस्पर mutual नातं हे reciprocative असेलच असं नसतं ... 


ते शून्य ते अनंत , 0 ते ∞ , zero to infinity अशा कोणत्याही उत्कटतेचं intensity चं असू शकतं !!!


नातं हे ... "नूर की बूँद है, सदियों से बहा करती है ...

सिर्फ़ एहसास है ये, रूह से महसूस करो" असं असतं ... 


नातं हे ... "स्वसंवेद्या आत्मरूपा" असं असतं !!!


नातं कधीच

Mutual परस्परसापेक्ष

Reciprocative

Two way

नसतं


ते नेहमीच एकमार्गी one way स्वसापेक्ष असतं


म्हणून परतफेड सममूल्यता expectation अपेक्षा आसक्ती आस आशा ठेवू नये

🌹🪔❤️


आयुष्य ही एक विदाऊट कंडक्टर (विनावाहक) ST बस आहे 🚌


आपण ड्रायव्हर आहोत ... गाडी ST Bus हे जीवन आयुष्य आहे!


काही प्रवासी प्रथमपासून पण मधल्या कुठल्या तरी स्टेशन पर्यंतच : आई वडील


काही प्रवासी मधूनच, पण शेवटपर्यंत : बायको मुलं


बाकीचे अधेमधे चढ उतार करणारे : मित्र शेजारी नातेवाईक गणगोत सहकर्मी 


प्रवास संपला ... की ST बस गाडी डेपो मध्ये लावायची म्हणजे देहाचं विसर्जन करायचं आणि आपल्या घरी जायचं म्हणजे आत्मतत्त्व ब्रह्मतत्त्व यात वुलीन होऊन जायचं!


वो घर मेरे बाबुल का घर (म्हणजे माहेर / घर) ... 

ये दुनिया ससुराल


अपेक्षा कशी असावी प्रेमात ?.. 

समजुन घ्यावं लागतंय म्हणजे 

माझ्या अपेक्षेनुसार (मला हवं तसं) नसूनही,

मान्य करावं लागतंय ... 


आणि प्रेमाची व्याख्याच आहे की ..


Unconditional *Uni-lateral* declaration that, 'I' Love you ... 


same is for any/every relationship ... ... 

Unconditional *Uni-lateral* declaration that I *Relate* (myself with) you....


😊😊😊😊


त्वदीय वस्तु गोविंद 

तुभ्यम् एव समर्पये ।


तेरा तुझको अर्पण

क्या लागे मेरा ।


श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु ।


🙏🏼

वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे.

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

www.MhetreAyurveda.com

www.YouTube.com/MhetreAyurved/





Wednesday, 14 May 2025

इंग्लिश मीडियम आणि आयुर्वेद

इंग्लिश मीडियम आणि आयुर्वेद ... आणि शेवटी एक साधा सोपा सरळ प्रश्न

प्रस्तुतकर्ता :

वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871



इंग्लिश मीडियम शाळेत कसं असतं की, मराठीत बोलायचं नाही आणि बहुतांश जणांना, विद्यार्थी असोत, शिक्षक असो , अन्य स्टाफ असो ... इंग्रजी तितकं उत्स्फूर्त आणि ओघवतं (spontaneous & fluent) बोलता येत नाही, त्यामुळे मग मराठीत बोलायचं नाही ... & इंग्रजी तर येत नाही!!! म्हणून मग "हिंदीमध्ये" संवाद सुरू होतो. बहुतेक मुलं घरी हिंदी भाषेतलंच कार्टून बघत असतात. (मराठी माणसाला कधी असं वाटलं नाही की, जसं तमिळ तेलगू या भाषांमध्ये कार्टून भाषांतरीत व्हर्जन उपलब्ध आहे , तसं मराठीतही असावं, यासाठी दबाव प्रेशर या चॅनल वरती निर्माण केलं पाहिजे! असो तो मुद्दा वेगळा) ...


तर इंग्लिश मीडियम शाळांमध्ये, मराठी तर बोलायचं नाही असं नियम आहे आणि इंग्रजी तर येत नाही, त्यामुळे "हिंदीत" बोललं जातं, असं आपणा सर्वांनाच माहिती आहे !!!


तसं "शुद्ध" आयुर्वेदाची प्रॅक्टिस त्याचा अर्थ "मॉडर्न मेडिसिन न वापरता केलेली प्रॅक्टिस" असा सोयीस्करपणे केला जातो!!! 


मग मॉडर्न मेडिसिन वापरत नाही, तो आयुर्वेदाची प्रॅक्टिस करतो, असं रूढ अर्थाने "म्हटलं जातं!" ... 


पण जो आयुर्वेदाची तथाकथित "शुद्ध" प्रॅक्टिस करतो, तो आयुर्वेद नावाच्या शास्त्रातील संहितांमध्ये लिहिलेल्या तत्त्वांनुसार प्रॅक्टिस करतोच असे नाही ... 


तर तो मॉडर्न मेडिसिन नाही , अशा "कोणत्याही आणि सगळ्या" गोष्टींची प्रॅक्टिस करतो आणि स्वतःला मी आयुर्वेदाची "शुद्ध" प्रॅक्टिस करतोय असं "मिरवतो, समजतो किंवा स्वतःला समाधान देतो"! 


म्हणजे संहितोक्त तत्वांनुसार आणि संहितोक्त औषधी स्कंधातील कल्पांच्या "व्यतिरिक्त" ...

1. आयुर्वेदीय पंचविध कषाय कल्पना या भैषज्य कल्पनेशी अत्यंत विसंगत आणि विपरीत असलेली,  अशी भयंकर भैषज्य कल्पना असणारे रसकल्प वापरणे, 

2. आयुर्वेद संहितांमध्ये कुठेही वर्णन न केलेली आणि दोष धातू मल यांच्याशी संबंध नसलेली नाडी परीक्षा वापरणे, 

3. योगा, 

4. मंत्र, 

5. गर्भसंस्कार,

6. दोन बिंदु वाला सुवर्ण प्राशन, 

7. मूर्धेवर न करता, कपाळावर केलेली "शिरोधारा" 

8. अभ्यंगाच्या "ऐवजी", विनाकारण सर्वांगाला केलेलं मर्दन मालिश मसाज अशी अनावश्यक पण रोजचं मीटर चालू ठेवणारी फील गुड हॅपनिंग ट्रीटमेंट 

9. वेदनाशमन (आणि आता तर जगातल्या कुठल्याही व्याधी) साठी अग्नि कर्म (की ज्याचा दोष रस गुण महाभूत या दृष्टीने कुठल्याही प्रकारची सुसंगती why & how परिणाम सांगता येत नाही!) 

10. Modern medicine मधील cosmetology and trichology यांची भ्रष्ट संधीसाधू ऑपॉर्च्युनिस्टिक नक्कल = सौंदर्य चिकित्सा केश चिकित्सा = गाल और बाल की चिकित्सा 

11. रिसॉर्ट वेलनेस सेंटर 

12. जिह्वा परीक्षा (की जी योग रत्नाकरातील 8विध परीक्षा पेक्षा खूप वेगळी आहे), 

13. सिद्ध मधलं वर्म नामांतर करून मर्म,

14. ॲक्युपंक्चरची भ्रष्ट नकल असलेलं विद्धकर्म ...


असं जे जे मॉडर्न मेडिसिन नाही (किंवा मॉडर्न मेडिसिन मधलंच भ्रष्ट रूपांतरण करून), ते सगळं"च" आयुर्वेद"च" आहे असं "मानून भासवून घुसडून" एक "सगळोपॅथी/ पाॅलिपॅथी/ गोधडी/ गाठोडं" अशी "ट्रीटमेंट/रेटमेंट" करायची आणि त्याला म्हणायचं की मी "शुद्ध" आयुर्वेदाची प्रॅक्टिस करतो!!! 


15. 

याच बरोबरीने मग ... उटणं विकणे, शतावरी कल्प विकणे, च्यवनप्राश खपवणे, काहीतरी औषधं उकळून केश्य तेल खपवणे, केस रंगवण्याचे हर्बल डाय विकणे, दिवाळीच्या वेळेला अभ्यंग तेल नावाचं सुगंधी तेल पेशंटच्या गळ्यात मारणे, असे *पोटभरू कुटिरोद्योगही* चालतात!!! 


एक प्रश्न स्वतःला विचारून पहावा की ...

एक साधासुधा ग्रॅज्युएट एमबीबीएस डॉक्टर, त्याला जे शिकवलेय, त्याच्या अधिकारात आहे, त्याच्या शास्त्रात आहे, ते "सोडून" अन्य कुठले उपचार खरंच कधी करतो का 🤔⁉️


... आणि ते न करताही त्या mbbs ची प्रॅक्टिस कुठल्याही सर्वसामान्य ते आत्यंतिक यशस्वी अशा आयुर्वेदाच्या वैद्या पेक्षा साधारण दुप्पट तरी असतेच, रोजची ओपीडी पेशंटची संख्या मोजली तर!!! 

मग आपल्याच क्षेत्रातील लोकांना , संहितोक्त तत्त्वांनुसार आणि आयुर्वेद संहितातील चिकित्सा स्थानातील औषध स्कंधातील औषधे वापरून आयुर्वेदाची प्रॅक्टिस करायची सोडून, आयुर्वेदाच्या नावाखाली आयुर्वेदाच्या बाहेरचं, आयुर्वेदाशी विसंगत असलेलं , आयुर्वेदाच्या तत्त्वांशी आणि भैषज्य कल्पनेशी अत्यंत विपरीत असलेलं असं काहीबाही काहीतरी वापरावं, असं का बरं वाटतं 🤔⁉️

त्यामुळे ही शास्त्रनिष्ठा, कट्टरता आणि चरक म्हणतो तसं "पराधिकारेषु न विस्तरोक्तिः & तत्र धान्वन्तरीयाणाम् अधिकारः" या गोष्टींना आपण कधी फॉलो करणार ???

की unendingly स्वतःला पेशंटला समाजाला आप्तांना संहितांना शास्त्राला ईश्वराला आणि स्वतःच्याच अंतरात्म्याला असं सगळ्यांना फसवत राहणार??? 

बघा 👀, 

या प्रश्नाचे उत्तर स्वतःला काय मिळतंय ते 👁👁? 

मग , त्यानुसार आचरण करा ... जमलं तर सुधारा !

नाहीतर मग आहेच ...

आयुर्वेद के नाम पर कुछ भी "बेचने" की होड लगी है सभी तरफ ...

किंतु, आयुर्वेद को शास्त्र के रूप मे "सोचने" की किसी के पास फुरसत और आवश्यकता दोनो नही है!!!

सौ में से 99 अनजान ... फिर भी मेरा आयुर्वेद महान !!!

आजचे आयुर्वेद क्षेत्र म्हणजे अनेक जणांनी अनेक प्रकारे अनेक वेळा अनेक लोकांना "फसवण्याचे लुटण्याचे लुबाडण्याचे" नजरबंदी करणारे जादुगिरीचे उद्योग!

डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.

Disclaimer: The author does not represent that the views expressed in this activity are always correct or infallible. Since this article is a personal opinion and understanding, it is possible that there may be some shortcomings, errors and defects in this article.