Thursday, 24 April 2025

धर्माविना सुख नाही, धर्मामुळेच सुखप्राप्ती शक्य आहे; म्हणून धर्मपर असावे

धर्माविना सुख नाही, धर्मामुळेच सुखप्राप्ती शक्य आहे; म्हणून धर्मपर असावे



लेख लिहिण्याचा व व्हाट्सअप ग्रुप मध्ये प्रथम प्रसिद्धि प्रकाशन दि. 22 डिसेंबर 2022, इथे ब्लाॅग पब्लिकेशन दिनांक 24 एप्रिल 2025

अष्टांगहृदय सद्वृत्त 

सूत्रस्थान अध्याय 2 श्लोक 20 ते 48

सुखार्थाः सर्वभूतानां मताः सर्वाः प्रवृत्तयः। 

सुखं च न विना धर्मात्तस्माद्धर्मपरो भवेत्॥२०॥ 


सुखार्थाः म्हणजे सुखासाठी, सुख प्राप्तीसाठी, सुख मिळवण्यासाठी.

सर्वभूतानां म्हणजे सर्व सजीवांचे. भूत म्हणजे अस्तित्वात असलेले. भू म्हणजे सत्ता म्हणजे to be.

मताः म्हणजे जाणाव्यात, असतात. 

प्रवृत्तयः म्हणजे कृती हालचाली प्रयत्न. 


सर्व सजीवांचे सर्व प्रयत्न हे सदैव सुख मिळवण्यासाठीच सुरू असतात चाललेले असतात आणि ते स्वाभाविक नैसर्गिक ही आहे.

आपण पाहणार असलेले हे अष्टांग हृदय सूत्रस्थान द्वितीय अध्याय यातील सद्वृत्ता चे 29 श्लोक (20 ते 48) आहेत. 

यातील हा प्रारंभीचा श्लोक *सुख* या शब्दाने सुरू होतो ...म्हणजे जणू हे मंगलाचरण शुभसूचक आहे! महान व्याकरणकार पाणिनि याने अष्टाध्यायीची सुरुवात *वृद्धिः* या शब्दाने केलेली आहे. एक एक अक्षर वाचवण्यासाठी महत् प्रयत्न करणाऱ्या पाणिनिने मंगलाचरण म्हणून पहिले सूत्र वृद्धिः आदैच् म्हणजे *वृद्धि* या "वाढ होणाऱ्या" मंगलवाचक शब्दाने केली आहे! त्याचप्रमाणे श्रीमद् वाग्भटाचार्यांनी सद्वृत्ताचा आरंभ *सुख* या मंगलवाचक शुभसूचक सर्वांना हव्याहव्याशा वाटणाऱ्या शब्दाने केला आहे. हेच वाग्भटांचं वाग्भटत्व आहे! वाग्भट म्हणजे काय/कोण, हे सविस्तर पुढे केव्हातरी सांगूया! खरंतर ... अष्टांग, अष्टांग हृदय, सूत्रस्थान, दिनचर्या व सदृत्त या सर्व शब्दांचे ही स्पष्टीकरण करणे अपेक्षित, आवश्यक व उद्बोधक असणार आहे! पण प्रारंभीचा श्लोक हा *सुख* या जिव्हाळ्याच्या विषयाबद्दल आहे, म्हणून या अन्य शब्दांचे स्पष्टीकरण पुढे केव्हा तरी करूया.


... तर सर्व सजीवांचे सर्व प्रयत्न हे सुख मिळवण्यासाठीच असतात.

सुख हे दोन प्रकारचे असते ... एक आत्यंतिक सुख म्हणजे मोक्ष! कि ज्याविषयी आपण मागील दोन उपक्रमांमध्ये म्हणजे भज गोविंदम् आणि गुरुपादुकाष्टक यामध्ये सविस्तरपणे पाहिले आहे. त्यातल्या त्यात भज गोविंदम् तर मोक्षसमीप किंवा मृत्यू काल जवळ आलेला असताना एका जराजर्जर व्याकरणविद्यार्थ्याला, आदि शंकराचार्यांनी केलेला उपदेश आहे. त्यामुळे तो तर अधिकच मोक्ष या विषयाशी जवळीक साधणारा आहे. तसेच गुरु पादुका अष्टक हे ही तात्त्विक अलौकिक ब्रह्मज्ञान आत्मज्ञान अशा विषयांकडे जाणारे होते. तरीही त्या उभय उपक्रमांमध्ये ही आपण त्यातील श्लोकांचे स्पष्टीकरण हे *लौकिक व्यावहारिक प्रॅक्टिकल दैनंदिन उपयोगाचे* कसे होईल, अशा पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला. हे आताच पोस्ट केलेल्या म्हणजे भज गोविंदम् व गुरुपादुकाष्टक यातील सर्व पोस्ट वाचल्यानंतर नव्याने जॉईन झालेल्या सदस्यांना लक्षात येईलच.

अष्टांग हृदय कार श्रीमद् वाग्भटाचार्य यांनी हे सदृत्त लिहिताना तर हे *अधिकाधिक लौकिक व्यावहारिक प्रॅक्टिकल दैनंदिन उपयोगाचे* कसे होईल अशाच प्रकारे लिहिले आहे ... त्यामुळे इथं थोडंसं त्याचं अलौकिकत्व तत्त्वज्ञान ब्रह्मज्ञानाकडे जाणारं सुद्धा अंग लक्षात आणून देण्याचा अल्प प्रयत्न आहे ... म्हणजे राऊंड द वे round the way 🙃


... तर सुख दोन प्रकारचं असतं, आत्यंतिक आणि तादात्विक!!

आत्यंतिक सुख म्हणजे मोक्ष! अत्यंत म्हणजे असे सुख की जे सुख एकदा प्राप्त झाले की ते कधीही नष्ट होत नाही, ते शाश्वत निरंतर चिरंतन असते! त्या सुखप्राप्तीनंतर अन्य इतर कोणत्याही सुखाची लालसा अपेक्षा शेष राहत नाही. 


पण आपण सर्वजण तर संसारी प्रापंचिक माणसे आहोत, त्यामुळे सुख या शब्दाने आपल्याला आत्यंतिक सुख अशा स्वरूपातील मोक्ष यापेक्षा, तादात्विक म्हणजे तात्कालिक सुख म्हणजे *काम* हेच अधिक अभिप्रेत अपेक्षित असते! 

*काम* याचा अर्थ प्रत्येक वेळेला स्त्री सहवास किंवा लैंगिक सुख Sexual pleasure असाच होत नाही तर ... काम याचा अर्थ काम म्हणजे सर्व प्रकारच्या इच्छा अपेक्षा अशा आकांक्षा वासना!!! ... आणि त्याचबरोबर जीवनातील सर्व प्रकारच्या महत्त्वाकांक्षा ध्येय स्वप्नं Goal Aim Achievables.


हे दोन्ही प्रकारचे सुख म्हणजे आत्यंतिक सुख अर्थात मोक्ष व तादात्विक तात्कालिक सुख अर्थात काम किंवा सर्व प्रकारच्या इच्छा अपेक्षा आशा आकांक्षा हे सर्वच धर्म या गोष्टीशी निगडित/अवलंबून असते.


म्हणून पुढील वाक्य ... *सुखं च न विना धर्मात्* असे आलेले आहे. *न विना* असे दोन नकार एकत्र आलेत. दोन नकारांचा छेद जातो. Two negatives make one Affirmative! 


*न विना* म्हणजे धर्माविना नाही अर्थात *धर्मासहितच!!!* 


*धर्मामुळेच सुखप्राप्ती शक्य आहे,* असे ठामपणे म्हटलेले आहे.

होकारात्मक सकारात्मक अन्वयाने एखादे विधान करण्यापेक्षा, जर ते व्यतिरेकाने केले तर, ते अधिक परिणामकारक किंवा ठसठशीत दिसते. *नॉट विदाऊट* माय डॉटर या नावाची कादंबरी अनेकांना ज्ञात असेलच. *विथ* माय डॉटर या शीर्षकापेक्षा *नॉट विदाऊट* माय डॉटर, असं डबल निगेटिव्ह, दोन नकार असलेले शीर्षक हे अधिक लक्षवेधी ठरतं! तसं इथे *न विना धर्मात् = धर्माविना नाही* असे म्हणून धर्माच्या आचरणाचे महत्त्व सुखप्राप्तीसाठी अत्यधिक आहे असे ठसवले आहे.


धर्मा विना सुख नाही, म्हणून धर्माचे आचरण करावे, धर्मपर असावे असे पुढे सिद्धांत म्हणून विधी म्हणून आचरण मार्ग म्हणून सांगतात.

*तस्माद्धर्मपरो भवेत्॥*

धर्म याचा आज आपण जो अर्थ घेतो, तसा रिलीजन हिंदू जैन शेख बौद्ध असा पूर्वाचार्यांना अभिप्रेत नाही, हे निश्चित! कारण या प्रकारचे रिलीजन वाचक पंथ किंवा संप्रदाय अस्तित्वात येण्यापूर्वी कितीतरी शतके, धर्म हा शब्द व्यवहारात उपयोगात होता.


धर्म याचे लक्षण म्हणजे डेफिनिशन व्याख्या ही *यतो अभ्युदय नि:श्रेयससिद्धिः स धर्म* अशी आहे. म्हणजे ज्या प्रकारच्या आचरणाने निःश्रेयस (म्हणजे मोक्ष) ... आणि अभ्युदय (म्हणजे लौकिक उन्नती प्रगती समृद्धी) होऊ शकते, ते आचरण म्हणजे धर्म!


धारणात् धर्मः !! समाजाचे धारण, समाज व्यवस्था टिकण्याचे आचरणाचे नियम म्हणजे धर्म!


धर्म याचा सर्वात सोपा सहज समजेल असा अर्थ तर्कसंग्रह येथे श्री अन्नंभट्ट यांनी दिला आहे ...

विहित कर्मजन्य धर्मः 

आणि 

निषिद्ध कर्म जन्यः अधर्मः 


हा श्रीमद् भगवद्गीता यामध्ये भगवान श्रीकृष्ण स्वतः तेच सांगतो ... नियतम् कुरु कर्म त्वम् !!!

नियत कर्म म्हणजे विहित कर्म म्हणजे नेमून दिलेले काम किंवा स्वीकारलेले काम म्हणजे अपॉइंटेड असाईन्ड जॉब

जे काम आपल्याला नेमून दिलेले आहे किंवा जे काम आपण स्वीकारलेले आहे, ते आपलं *नियत कर्म* प्रामाणिकपणे करणे म्हणजे धर्म ✅️ !!! 


अर्थमूलौ हि धर्म कामौ ... असं चाणक्य कौटिलीय अर्थशास्त्रात म्हणतो. 


धर्म म्हणजे आपले नियत/विहित/स्वीकृत कर्म केल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून आपल्याला अर्थप्राप्ती होते आणि त्या अर्थप्राप्तीतून म्हणजे धनार्जनातून आपण आपले *काम* म्हणजे कामना इच्छा आशा आकांक्षा पूर्ण करू शकतो. म्हणजेच धर्माचे प्रयोजन हे एका बाजूने अर्थार्जन / मोबदला प्राप्त करणे, असेही असू शकते किंवा अर्थ हा प्रत्येक वेळेला धनस्वरूपच असेल असे नसून, विनियोगाचे साधन असेही त्याचे पूर्वी बलुतेदारीमध्ये बार्टर सिस्टीम मध्ये स्वरूप होते. 


धर्म अनेकदा अर्थप्राप्ती किंवा कुठलेच मोबदला विनीयोग साधन कदाचित उत्पन्न प्राप्त करून देणारही नाही ... पण मी 100% प्रामाणिकपणे प्रयत्न / माझे नेमून दिलेले काम केले ... असे समाधान तर निश्चितच देत असतो!!


धर्म म्हणजे सदाचरण , चांगलं वागणं , आपलं काम प्रामाणिकपणे करण्याचे समाधान हे निश्चितच सुखकारक असते!!!


विशेषतः दिव्यांग अपत्य असलेले पालक 🙏🏼 त्या अपत्याचे पालनपोषण करत असताना, त्यांना हे निश्चितपणे माहीत असते की, या अपंगत्वातून या आपल्या अपत्याची या जन्मात बहुदा सुटका होणार नाही. तरीही त्या अपंग / दिव्यांग अपत्याचे पालनपोषण करणे, शंभर टक्के प्रामाणिकपणे समर्पित वृत्तीने करणे, हे त्यांनी *स्वीकारलेले कर्म म्हणजे नियत कर्म* असतं आणि ते करत असताना आपण हे भगवंताने दिलेले काम प्रामाणिकपणे केले, या समर्पित प्रयत्नांचे *समाधान* त्यांना नक्कीच असतं!!! आणि समाधान हेच मानवी जीवनातील सर्वोच्च सुख आहे !!!


आपण अशा प्रकारचे हे दिव्यांग / अपंग अपत्य सांभाळू शकतो , असा भगवंताला आपल्यावर विश्वास असल्यामुळे, त्याने हे अपत्य आपल्याला सोपवलेले आहे पालनपोषणासाठी, अशी नितांत उदात्त भावना 🪔🙏🏼 त्याच्यामागे असते!! 


त्यामुळे धर्म हा प्रत्येक वेळेला अर्थ/धन किंवा लौकिक काहीतरी प्राप्ती करून देईल असे नसून ... तो अलौकिक आत्मिक अशी समाधानाची, सुविधाजन्य सुखाच्या वरची अनुभूती प्राप्त करून देऊ शकतो.


धर्म याचा दुसरा अर्थ माझं रोजचं नेमून दिलेलं किंवा स्वीकारलेलं काम ... मग जी गृहिणी दिवसभर राबून घरातला स्वयंपाक आवरावर करते, ती धर्मपालनच करत असते. प्रत्येक जण मग तो शिक्षक ड्रायव्हर शेतकरी व्यापारी इंजिनियर वैद्य डाॅक्टर कोणीही असो, नेमून दिलेलं काम प्रामाणिकपणे करणे, हा धर्म !!!


त्या धर्मपालनातून दोन प्रकारचे सुख उत्पन्न होते ... 

एक वैयक्तिक की जे अनेकदा नेमून दिलेल्या कामाचा मोबदला म्हणून मिळणारा नफा किंवा वेतन सॅलरी या अर्थी धनार्जन अशा स्वरूपात किंवा मगाशी म्हटलं त्याप्रमाणे प्रयत्न केल्याचं समाधान याअर्थी असतो!!!


धर्म याचा सार्वजनिक सामुदायिक सामाजिक सुख प्राप्तीसाठी असा उपयोग होतो की, आपण आपले काम म्हणजे प्रत्येकाने आपले काम, नेमून दिलेले काम / नियत विहित/स्वीकृत कर्म शंभर टक्के प्रामाणिकपणे समर्पित वृत्तीने केले ... तर त्या कामापासून लाभान्वित होणारे समाजातील सर्वजण हे सुखी होतात !!!

नेमून दिलेलं काम जर योग्य पद्धतीने केले नाही, प्रामाणिकपणे केले नाही, तर त्या कामाशी निगडित संबंधित लाभान्वित होऊ शकणारी समाजातील माणसेही सुखी होऊ शकत नाहीत, त्यांना समस्या येतात, अडचणी येतात.


म्हणजेच अधर्म हा वैयक्तिक आणि सामाजिक उभय प्रकारच्या सुखांची हानी करतो.

म्हणून *सुखं च न विना धर्मात्* असं म्हटलं आहे.


प्रत्येकाने आपला धर्म = कर्तव्य ड्युटी जॉब हा समर्पित वृत्तीने प्रामाणिकपणे केला तर, वैयक्तिक सुखप्राप्ती आणि सामाजिक सौहार्द सौख्य हे निरंतर टिकून राहील. म्हणून *तस्माद् धर्मपरो भवेत्॥* म्हणजेच आपले काम प्रामाणिकपणे करत राहणे हा स्वतःच्या आणि सर्वांच्या सुखाचा मार्ग आहे असे येथे सांगितले आहे.


त्वदीय वस्तु गोविंद 

तुभ्यम् एव समर्पये ।


तेरा तुझको अर्पण

क्या लागे मेरा ।


श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु ।

👆🏼

पटलं तर हो म्हणा ...


जनसामान्यांचे आरोग्य औषधाविना उत्तम राहावे 

आणि 

वारंवार होऊ शकणाऱ्या आजारांना टाळता यावे,

यासाठी सामाजिक आरोग्य नियमांचे प्रकाशन करणारा हा उपक्रम, म्हेत्रेआयुर्वेद MhetreAyurveda यांच्याद्वारे, Non-Profit नॉन प्रॉफिट या स्वरूपात,

*समाज पुरुषाप्रति निरपेक्ष समर्पण*,

याअर्थी चालवला जातो.


यात सहभागी होण्याची ज्यांना इच्छा आहे,

त्यांनी खालीलपैकी कोणत्याही एका लिंक चा उपयोग करून,

या उपक्रमामध्ये प्रवेश घ्यावा.


अष्टांगहृदय सद्वृत्त व्हाट्सअप ग्रुप 

👇🏼

https://chat.whatsapp.com/FltDg6ynFSU2RfkLPrs5Ev


Or you may join ...

म्हेत्रेआयुर्वेद व्हाट्सअप चॅनल 

👇🏼

https://whatsapp.com/channel/0029VaCO8i48qIzkykb9pe0E


आरोग्य संपन्न आनंदी आयुष्याच्या सन्मार्गावर आपले हार्दिक स्वागत आहे

✨ वरील मेसेज/ पोस्ट,

आपण आपल्या सन्मित्रांना, आप्तेष्टांना, हितचिंतकांना ...

तसेच अन्य ग्रुप मध्ये व आपल्या अन्य सोशल मीडियामध्ये फॉरवर्ड करू शकता, योग्य वाटल्यास ... ! 

🙏🏼

चांगल्या उपक्रमाचा लाभ अनेकांना व्हावा, या सद्विचाराने प्रस्तुत पोस्ट प्रस्तुत केलेली आहे.

आपण ऑलरेडी *अष्टांगहृदय सद्वृत्त च्या 1 ते 4 या पैकी कुठल्याही ग्रुप मध्ये असाल, तर पुन्हा जॉईन होण्याची आवश्यकता नाही* 


या चारही ग्रुपमध्ये नव्याने येणाऱ्या सर्व पोस्ट पाठवल्या जाणारच आहेत

लेख लिहिण्याचा व व्हाट्सअप ग्रुप मध्ये प्रथम प्रसिद्धि प्रकाशन दि. 22 डिसेंबर 2022

🙏🏼

वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे.

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

www.MhetreAyurveda.com

www.YouTube.com/MhetreAyurved/

Thursday, 17 April 2025

डान्स🕺🏽💃 & आयुर्वेद 📜📚 !!!

 डान्स & आयुर्वेद !!!



1.

भारत मे सुप्रसिद्ध शास्त्रीय नृत्य भरतनाट्यम् कथक कथकली कुचीपुडी ये है.


2.

 इससे भी थोडे अलग .. शास्त्रीय नृत्य तो नही ... अपितु लोकनृत्य कहा जाता है ऐसे कई नृत्य है इसमे भांगडा गरबा बीहू ... (कुछ लोग महाराष्ट्र का लोकनृत्य लावणी कहते है, लेकिन वो सत्य नही है ... वो लोक नृत्य न होकर किसी अन्य उद्देश्य से प्रस्तुत होने वाला नृत्य है)


3.

आज कल जो नये से आ गया है, जिसे बॉलीवूड डान्स कहा जाता है और उससे भी अलग अभी जो रियालिटी(?) शो में किया जाता है, जिसमे नृत्य की जगह, अनेक प्रकार के शारीरिक कसरत किये जाते है , जो नृत्य न होकर कुछ चित्र विचित्र पोझिशन्स होते है 


4.

इन से भी अलग विवाह के समय ऐसे नृत्य होते है, जिसमे एक या दो हाथ दो पर उठाकर शरीर को लटके झटके दिये जाते है ... 


5.

इन सबसे हीन, दारू पीकर, जमीन पर रेंगते हुए, एक नागिन डान्स भी किया जाता है, लोक उसे भी नृत्य समझते है.


6.

किंतु ... 

a) गुणवत्ता ( = दर्जा क्वाॅलिटी) & 

b) अभिरुची 

इस प्रकार से ग्रेडेशन किया जाये ...


तो इसमे सबसे ऊपर भरतनाट्यम् कथक कथकली कुचीपुडी इतने ही नृत्य है


7.

जिसे dance कहा जाता है , ऐसे बाकी सारे या तो लोकनृत्य है ... वे कम से कम प्रेक्षणीय तो है, किंतु...


8.

आजकल के जो अत्यंत गलिच्छ हीन इस प्रकार के बॉलीवूड या रियालिटी शो में किये जाते है, वे तो गर्हणीय है, आक्षेपार्ह है 


9.

विचित्र बात यह है, की सर्वसामान्य समाज इन सभी को नृत्य डान्स ही कहता / समझता है 


10.

सीधा खडा रहना या सीधा चलना इसके अलावा, जो भी शरीर को लटके झटके दिये जाते है , उसको सामान्य तौर पर डान्स ही कहा जाता है


11.

किंतु वस्तुस्थिति में नृत्य तो मात्र शास्त्रीय नृत्य ही होता है या शास्त्रीय नृत्य को ही वह "प्रतिष्ठा" प्राप्त है 


12.

ये बात अलग है कि "लोकप्रियता" की दृष्टि से लोकनृत्य और आज कल के बॉलीवूड या रियालिटी शोज के या शादी के समय रस्ते पर किया जाने वाला डान्स अधिक हो रहा है... क्योंकि वह लोकप्रिय तथा आसान है ... उसके लिए प्रशिक्षण या तपश्चर्या स्वरूप प्रयत्न की आवश्यकता नही होती है. ऐसे बाजारू सस्ते चीप डान्स कोई भी ऐरा गैरा कर सकता है


13.

"लोकप्रियता और शास्त्रीयता" इनमे महदंतर होता है .. भूमी से आकाश जितना अंतर होता है! 


वैसेही ... coming to the point👇🏼


14.

आयुर्वेद के नाम पर लोक "कुछ भी" करते है, वे "जो भी" करते है, उसे आयुर्वेद "कहते है या समझते" है


15.

आयुर्वेद एक ऐसी गाय है ... आप उसके गोबर का व्यवहार करो या दूध का ... चमडी का करो या मांस का ... हरेक का कल्याण या आर्थिक फायदा तो होता ही है!!! 

किंतु, इसमे से क्या नैतिक है / क्या नही है, ये सब को पता है


16.

वस्तुतः स्वरूप में नैतिक दृष्टी से योग्य आयुर्वेद आचरण वही है, जो आयुर्वेद की मूल संहिता ग्रंथो मे लिखे हुए "तत्त्वों के अनुसार" निदान = रोगनिश्चिती एवं उपचार = औषध निश्चिती करता है ...

तथा 

... जो उपचार करने के लिए औषधी निर्माण या ग्रहण आयुर्वेद संहिता ग्रंथ मे लिखे हुए "भैषज्य कल्पना के तत्वों" के अनुसार ही करता है 


✨️हम आयुर्वेद संहिता "ग्रंथ" के अनुसार ऐसा नही कह रहे है, आयुर्वेद संहिता "ग्रंथो मे लिखे हुए तत्वों" के अनुसार ऐसा कह रहे !✨️


17.

उपरोक्त विधी को छोडकर,

बाकी जो भी किया जाता है ...

वो आयुर्वेद के नाम पर दुर्व्यवहार है = अशास्त्रीय व्यवहार है , वस्तुतः देखा जाये तो त्याज्य = निषेधार्ह है


18.

... कोई इसे झट से मानेगा नही, इसलिये मैने पहले ही लिखा की नृत्य/डान्स तो "सभी" है, लेकिन जिसे अभिरुची या गुणवत्ता की दृष्टि से देखा जाये तो केवल प्रथम चार है : भरतनाट्य कथकली कथक और कुचिपुडी! ( यह स्टेटमेंट उदाहरण के लिए है, भारतीय संगीत नाटक ॲकॅडमी, 9 नृत्यों को शास्त्रीय नृत्य , अधिकृत रूप से मानती है )


19.

आयुर्वेद के मूल "संहिता ग्रंथो मे लिखे हुए *तत्वों के अनुसार*, अर्थात 'दोष रस गुण महाभूत' इन तत्त्वों के अनुसार", जिसका "निदान = हेतु + लक्षण का आकलन" किया जाये और आयुर्वेद के मूल संहिताओ मे निर्देशित "भैषज्य कल्पना के तत्वों के अनुसार" उस निदान के लिए योग्य प्रकार का "औषध उपयोजन" किया जाये, यही आयुर्वेद की "शास्त्रीय एवं अधिकृत तथा शुद्ध प्रॅक्टिस" है!!!


20.

बाकी , आयुर्वेद के "नाम पर", घुसेडकर मरोडकर जो "कुछ भी" किया जाता है ... वह व्यापार है, धंदा है, व्यवसाय है, दुकानदारी है, ट्रेडिंग है, बिजनेस है ...*शास्त्र नही है, शास्त्र की प्रॅक्टिस नहीं है* 


21.

उसी प्रकार से आयुर्वेद के मूल संहिता ग्रंथो मे लिखे हुए भैषज्य कल्पना के तत्त्वों के अनुसार जो औषधी या उपचार नही है, वे भी आयुर्वेद की औषधियां नही है ... उसे आप "हर्बल मेडिसिन" कह सकते है , किंतु "आयुर्वेदीय औषध" *नही*!!! 


22.

... इसमे सर्वप्रथम रसकल्प, नाडी परीक्षण, योगा, मंत्र , गर्भसंस्कार, विद्ध, अग्निकर्म ... (आयुर्वेद के कुछ ग्रंथो मे लिखा हुआ होने के बावजूद ... रक्त मोक्षण सिरावेध भी), तथा शिरोधारा(?) नही नही ... ललाट धारा , सर्वांग अभ्यंग अर्थात शास्त्र मे नही लिखा है ऐसा मालिश मसाज , सुवर्ण प्राशन , वर्म/ मर्म चिकित्सा , सौंदर्यशास्त्र केश चिकित्सा अर्थात गालों के और बालों के उपचार, कई तरह के स्थान बस्ति(?) जिसमे जानुबस्ति हृद्बस्ती मन्या बस्ति कटी बस्ति, शास्त्र के इंडिकेशन को छोडकर किया जाने वाला पंचकर्म = Showधन उपचार ... यद्यपि इन सभी उपचारों से पेशंट को "ठीक लगता है", तथापि ये सारे आयुर्वेद के नाम पर किये जाने वाले "धंदे है", शास्त्र नहीं !!!


23.

लोकप्रियता की दृष्टि से आप इसे आयुर्वेद "कहते/समझते/मानते" *जरूर* है ... लेकिन ये आयुर्वेद "नही है" यह प्रामाणिक नैतिक रूप से आपको भी ज्ञात है स्वीकार्य है मान्य है !!! ❌️🚫⛔️👎🏼 


24.

... जैसे सीधे चलने से सीधे खडे रहने की बजाय ,

किसी भी प्रकार से आप अपने शरीर को लटके झटके दे देंगे तो उसे कुछ लोग नृत्य "कहते" है ... लेकिन नृत्य तो केवल अभिरुची और गुणवत्ता की दृष्टि से भरतनाट्यम् कथ्थक कथकली और कुचीपुडी इतने ही है!!!


25.

अर्थात यह मेरा वैयक्तिक मत है ...

आपको किसे नृत्य कहना है और किसे आयुर्वेद कहना है, ये आपका अपना मत !!!


किसी हट्टाग्रह की बात नही है ... लेकिन "सोचिये" अवश्य!!!


आयुर्वेद केवल "बेचने" की बात नही है ...

ये पेशंट के हित मे "सोचने" की भी बात है


Disclaimer/अस्वीकरण: लेखक यह नहीं दर्शाता है, कि इस गतिविधि में व्यक्त किए गए विचार हमेशा सही या अचूक होते हैं। चूँकि यह लेख एक व्यक्तिगत राय एवं समझ है, इसलिए संभव है कि इस लेख में कुछ कमियाँ, दोष एवं त्रुटियां हो सकती हैं। भाषा की दृष्टी से, इस लेखके अंत मे मराठी भाषा में लिखा हुआ/ लिखित डिस्क्लेमर ग्राह्य है




डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.




Disclaimer: The author does not represent that the views expressed in this activity are always correct or infallible. Since this article is a personal opinion and understanding, it is possible that there may be some shortcomings, errors and defects in this article.





Thursday, 10 April 2025

अन्न पचन न होण्याची, वैचारिक 🧠 बौद्धिक 😭😖👺😡भावनिक कारणे

अन्न पचन न होण्याची, वैचारिक 🧠 बौद्धिक 😭😖👺😡भावनिक कारणे



ईर्ष्याभयक्रोधपरिक्षतेन लुब्धेन शुग्दैन्यनिपीडितेन । 

प्रद्वेषयुक्तेन च सेव्यमानमन्नं न सम्यक् परिणाममेति ।।


*अष्टांगहृदय सद्वृत्त : भाग 189*

11 एप्रिल 2025, शुक्रवार  

*उपविभाग 131*


सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved

Copyright कॉपीराइट ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

MhetreAyurved@gmail.com 

www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/


नमस्कार 🙏🏼💐


काले सात्म्यं लघु स्निग्धम् उष्णं क्षिप्रं द्रवोत्तरम् ।

बुभुक्षितो अन्नम् अश्नीयात् मात्रावद् विदितागमः ॥


आपण वरती उल्लेख केलेला श्लोक, जो भोजनविधीचा मूलाधार आहे, त्याविषयी सविस्तर पाहत होतो!


प्रदीर्घ कालावधीनंतर आपण हा उपक्रम पुन्हा सुरू करत आहोत, तर वरील श्लोकाच्या अनुषंगाने पूर्वी पोस्ट केलेल्या सर्व लेखांच्या लिंक, या लेखाच्या शेवटी दिल्या आहेत. त्या क्रमशः वाचून घ्याव्यात... ते वाचून झाल्यानंतर आपण पुन्हा याच श्लोकाकडे परत येऊया ... म्हणजे विषयाची सुसंगती लागेल !!!


ईर्ष्या, भय, क्रोध, लोभ, शोक, दैन्य, द्वेष या आणि अशाच प्रकारच्या इतर भावनांमुळे किंवा विचारांमुळे अन्नाचे पचन योग्य प्रकारे होत नाही ...या श्लोकात दिलेल्या वरील सात दुर्भावना किंवा वैचारिक दोषांबरोबरच, मत्सर असूया चिंता यांचाही त्यात समावेश होतो


परोत्कर्षासहनम् ईर्ष्या ... दुसऱ्याचा उत्कर्ष प्रगती यश समृद्धी हे आपल्याला सहन न होणे म्हणजे ईर्ष्या ... 


ईर्ष्या याचा दुसरा अर्थ स्पर्धा करणे ... दुसरा कोणीही,आपल्यापेक्षा पुढे जाता कामा नये, यासाठी विचार आणि प्रयत्न करत राहणे.

ईर्ष्या नावाचा एक जुना मराठी चित्रपट यानिमित्ताने आवर्जून पाहण्याजोगा आहे


ईर्ष्येच्याच दोन छटा = शेड्स म्हणजे मत्सर असूया ज्याला जेलसी असे इंग्लिश मध्ये म्हणतात ... याचा अर्थ माझ्यापेक्षा सरस कोणी होऊ नये, यासाठी प्रयत्न करणे किंवा तसे विचार असणे! हे आपल्याला व्यवहारात पदोपदी जाणवते. साधं आपण ड्रायव्हिंग करत असताना, आपल्याला कोणी ओव्हरटेक करू नये आणि समोर जी गाडी दिसेल, तिला ओव्हरटेक करून आपण पुढे जावे, असे आपल्याला वाटते ! या स्पर्धेमध्ये दुसऱ्या माणसाला आपण त्याच्याशी स्पर्ध करत आहोत हेच माहिती नसते, तरीही आपण जीव तोडून "जिंकण्यासाठी" प्रयत्न करत असतो. यामध्ये स्वतःचीच शारीरिक वैचारिक बौद्धिक भावनिक दमछाक होते!


ईर्ष्या मत्सर जेलसी हे अम्लपित्त ॲसिडिटी होण्याचे मुख्य कारण आहे ... कारण या भावना, हे विचार असताना ... सतत काहीतरी जळत असतं ... त्यामुळे शरीरामध्ये पित्ताची उष्णतेची अग्नीची वृद्धी होते... रक्ताचा विदाह होतो ... मॉडर्न सायन्सच्या परिभाषेत कॉर्टिसोल लेवल्स वरती जातात... त्यामुळे अन्नपचन नीट होत नाही. ते एकाच जागी अडकलेले राहते... हँग होते ... आणि त्यातून जशी विचारांमध्ये भावनेमध्ये जळजळ असते, तीच आपल्या पोटामध्ये अन्नपचन संस्थेमध्ये प्रतिबिंबित होते ,व्यक्त होते! म्हणून पोटात जळजळ मळमळ आंबट कडू तिखट छातीत जळजळ घशात जळजळ क्वचित उलटी पित्ताची कडू उलटी डोकं कानशिलाच्या जवळ दुखणे आणि उलटी झाली की बरं वाटणे ... जसं हे शरीरात साठलेलं पित्त बाहेर पडलं की बरं वाटतं डोकं दुखायचं थांबतं! 


तसं मनातील ईर्ष्या मत्सर असूया यापोटी जो वैचारिक भावनिक गोंधळ होतो , तो इतर कोणाशी शेअर केला आणि त्या निमित्ताने संवाद झाला, तर एक प्रकारची सांत्वना=कौन्सिलिंग मिळून विचारातली भावनातली जळजळ दाह भडका निश्चितपणे कमी होतो!


ईर्ष्या ही भावना किंवा विचार , माणसाला अकारण पळापळ करायला लावणारे , श्रम करायला लावणारे गमावणारे असे असते. त्यामुळे या भावना किंवा हे विचार, माणसाच्या हृदयाची गती वाढवतात... त्यामुळे छातीत धडधडणे, पाल्पिटेशन होणे , हे सुद्धा ईर्ष्या मत्सर असूया स्पर्धा, हे मिळवलंच पाहिजे ... अशा ताणामुळे टेन्शनमुळे स्ट्रेसमुळे , आज अगदी लहान विद्यार्थ्यांपासून तर रिटायरमेंटला आलेल्या माणसापर्यंत, सर्वांच्या बाबतीत घडते !! नोकरी व्यवसायात नसलेल्या , गृहिणींच्या बाबतीत सुद्धा , इतर गृहिणींची इतरांच्या घरातील सुख सुविधांशी केलेल्या तुलनेमुळे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या विचारांमुळे लादलेल्या भावनांमुळे, निर्माण होणाऱ्या स्पर्धेमुळे जी तगमग होते, ती सुद्धा हृदयाची धडधड पाल्पिटेशन वाढवण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे आपण नको त्या स्पर्धेत भाग घ्यायचा ... की नाही घ्यायचा ... की फक्त स्पर्धेत भाग घेण्याचा आनंद मिळवायचा ... जिंकण्यासाठी उरफाटेस्तोवर पळत राहायचे नाही , याचा समाधानकारक संतोष कारक, म्हटलं तर अल्पसंतुष्टीकारक असा निर्णय , स्वतःपुरता आणि स्वतःच्या कुटुंबापुरता घ्यावा !!!


अन्यथा गीता अध्याय सोळा दैवासुर संपद् विभाग योग, इथे ज्याप्रमाणे आसुरी संपद् सांगितलेली आहे, तसे प्रत्येकाचे त्याच्या त्याच्या क्षेत्राबाबत किंवा त्याने इतरांच्या नकळत स्वतःवर लादलेल्या स्पर्धेच्या विषयाबाबत होते ... जसे की मी हे मिळवले आहे , आता ते मिळविणे आहे ... या पळापळीला धडपडीला अंत नसतो !

आणि यामुळे अशा विचारांमुळे भावनांमुळे, आपले जीवन ज्या अन्नावर ती चालते , त्या अन्नाकडे ... अन्न खाण्याकडे, आपण काय खातोय , किती खातोय , किती वेगाने खातोय ... या सगळ्याकडे दुर्लक्ष होते ... आणि केवळ उदरभरण चालते , की जे प्रत्यक्षात यज्ञ कर्म समजून तन्मना भुञ्जीत म्हणजे संपूर्ण लक्ष हे अन्नाकडे देऊन भोजन केले पाहिजे ... ते नेमके विसरते! बाजूला पडते दुय्यम होते साईड ट्रॅकिंगला जाते!!! अन्नासाठी दाही दिशा ... ही वस्तुस्थिती असताना , अन्न वस्त्र निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा असताना , आज माणूस ... "मी जॉब साठी आहे की ... जॉब माझ्यासाठी आहे" या सारासार विचाराला सदसद्विवेक बुद्धिला हरवून बसला आहे! त्यामुळे तो त्याच्या कामाचा, त्याच्या वेळेचा , त्याच्या अनावश्यक स्पर्धात्मक नकारात्मक भावनांचा दुर्विचारांचा "दास गुलाम स्लेव" झालेला आहे!!! 


जसे हे ईर्ष्या मत्सर असूया हेवे दावे या विचारांबाबत भावनांबाबत आहे ... 


अगदी तसेच , थोड्याफार फरकाने , कमी अधिक छटा नुसार ... भीती क्रोध लोभ शोक दैन्य द्वेष , या भावना आणि विचार माणसाच्या अन्नपचनाला = आरोग्याला, बौद्धिक शांतीला समाधानाला संतोषाला नष्ट करणारे असतात !!!


भीती ही गोष्ट मानवी जीवनातील सर्वात हीन भावना होय , तर प्रेम ही मानवी जीवनातील सर्वोच्च भावना आहे , सर्वश्रेष्ठ विचार आहे !!!


भीती असेल तर तुम्हाला कितीही चांगलं खायला घातलं, तरी त्याचा शरीराला काडीमात्र उपयोग होत नाही ... बिरबलाने शेळीच्या समोर वाघ बांधून ठेवला आणि त्या शेळीला भरपूर कोवळा हिरवा चारा खायला दिला , पण त्या शेळीचे वजन वाढू शकले नाही ... कारण सतत मरणाची भीती तिच्यासमोर बांधलेली होती. 


आज आपण प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या भीतीमध्ये, इनसिक्युरिटी मध्ये , अनिश्चितते मध्ये वावरत असतो ... असे झाले तर , तसे नाही झाले तर; या शंकांमध्ये एक भयग्रस्त वातावरण आपल्या विचारांमध्ये भावनांमध्ये नांदत असल्याने , आपली बुद्धी त्या पद्धतीने विकल क्षीण अबल दुर्बल होत जाते!!! 


जरी प्रतिदिनी आपण सकाळी उठल्यानंतर, निःशंक निर्भय हो ... अशी प्रार्थना करत असलो , तरी तशी समर्पणाची वृत्ती, आपल्या विचारांमध्ये भावनांमध्ये नसते !!!


आपल्याला सतत कुठली ना कुठली भीती असल्यामुळे, त्या अनुषंगाने अनेक शंका आपल्या मनात सतत घोंगावत असतात !!!


भीती ही भावना वातदोषाची वाढ करते, तर क्रोध ही भावना पित्तदोषाला वाढवते ...


क्रोधामुळे (=चिडचिड संताप त्रागा आंधळापट आत्मकलेश इरिटेबिलिटी annoyance), शरीरातील उष्णता पित्त अग्नी = इंग्रजी भाषेमध्ये हीट 🔥वाढवण्यास कारणीभूत ठरते !


क्रोध ही गोष्ट म्हणजे आपल्या अपेक्षेप्रमाणे एखादी घटना न घडल्यामुळे आणि तशी ती घटना घडवण्यासाठी आपले सामर्थ्य कमी पडत असल्यामुळे, आपणच आपल्याला केलेली शिक्षा आहे !!!


या झटापटीमध्ये या ससेहोलपट्टीमध्ये आपल्या विचारांचा भावनांचा बुद्धीचा होरपळ होतो आणि त्याचेच परिणाम अन्नपचन शरीर यकृत यावर कालांतराने निश्चितपणे दिसतात ...

अशा व्यक्ती सायलेंट ब्लीडिंग म्हणजे नकळत होणारा अन्नपचनसंस्थेतील रक्तस्राव अल्सर कोलाइटिस संडासवाटे रक्त पडणे, संडासला काळी होणे लिव्हर विषयक विविध प्रकारचे प्रॉब्लेम निर्माण होणे , अशा समस्यांना सामोरे जाण्याची शक्यता असते !!!


त्यामुळे क्रोध टाळण्याचा सर्वात चांगला उपाय म्हणजे फर्गेट फर्गिव्ह इग्नोअर यालाच काहीजण लेट गो = जाऊद्या = सोडून द्या , अशी विचारसरणी म्हणतात! 


अर्थात हे सांगणं कितीही सोपं असलं तरी, त्या क्षणी फर्गेट फर्गिव्ह इग्नोअर या तीन विकल्पां पैकी कोणताच विकल्प न स्वीकारता , माणूस "आक्रमकपणे तुटून पडतो" आणि यातच त्याचा दीर्घकालीन दुष्परिणाम देणारा पराभव होतो !


याच पराभवाची पुढची पायरी म्हणजे शोक !

शोक ही भावना पराभवानंतर , एखादी गोष्ट गमावल्यानंतर , ती आपल्याला "कधीच मिळणार नाही" या feeling of being LOST अशा वैफल्यातून नैराश्यातून येते!!! शोकाचा फार मोठा दुष्परिणाम हा अन्नपचन संस्थेवर होतो. शोक व्यक्त करण्यासाठी जर पुरेशा प्रमाणात "अश्रूंचा निचरा" झाला नाही, तर अन्नपचन संस्थेमध्ये रक्तस्राव होणे ... असे घडू शकते !!!

अगदी लाल चुटुक गुंजां सारखे रक्त संडासासोबत पडते, असे आयुर्वेदिक संहिता ग्रंथात लिहून ठेवलेले आहे!


म्हणून शोक झाला तरी ... ती जीवनातील अपरिहार्य घटना आहे, असे स्वतःला समजावून सांगून किंवा इतरांकडून समजावून घेऊन, त्यातून शक्य तितक्या लवकर बाहेर पडून , "वस्तुस्थितीचा स्वीकार करणे" आणि प्राप्त वर्तमानाचा उपयोग करून, पुन्हा असा पराभवाचा प्रसंग येणार नाही, यासाठी भविष्याची सुरक्षा करणे , हेच मानवी जीवनाचे सार्थक आहे !


वि स खांडेकरांच्या *अमृतवेल* यातील अतिशय प्रसिद्ध उतारा म्हणजे "भग्न स्वप्नांच्या काचांवरून रक्ताळलेल्या पायांनी स्वप्नाकडे धावत राहणे" हेच जीवनाचे सार्थक आहे , हे त्रिवार सत्य आहे !!!


भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. मानवाचे मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचून बांधून ठेवता येत नाही. त्याला भविष्याच्या गरुडपंखांचं वरदानही लाभला आहे. एखादं स्वप्न पाहणं, ते फुलवणं, ते सत्यसृष्टीत उतरावं म्हणून धडपडणं, त्या धडपडीतला आनंद लुटणं आणि दुर्दैवानं ते सत्य भंग पावलं, तरी त्याच्या तुकड्यांवरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामागनं धावणं, हा मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो, तो यामुळं!


शोकाच्या पुढची भावना म्हणजे दैन्य !!!

शोक ही पराभवाची भावना असते आणि पराभवानंतर आता मला या प्रकारचा विजय मिळवण्यासाठी "कधीही सामर्थ्य लाभणार नाही", अशी निश्चित पराभूत give up = "हाराकिरीची" वैचारिक भावनिक स्थिती म्हणजे दैन्य म्हणजे दीनपणा म्हणजे सामर्थ्याच्या अगदी विरुद्ध दीन पणा असतो ...

म्हणून भगवंताला "दीननाथ" असे म्हटलेले आहे! म्हणून पराक्रमी हनुमानाच्या भीमरूपी स्तोत्रामध्ये त्याला "दीननाथा" असा शब्द आलेला आहे !


दीनानाथ नसतं ... *दीननाथ* असंच असतं ... पण काही शब्द "रूढ" होऊन जातात, रूढिर्योगाद् अपि बलीयसी! प्रत्यक्ष शास्त्रशुद्ध शब्दांपेक्षा , कधी कधी लोक रुढीने काही शब्द हे व्यवहारात रुजून जातात... तसा "दीनानाथ" हा शब्द रुजलेला आहे ... परंतु तो शास्त्रीय दृष्टी चुकीचा असून, तो "दीननाथ" असाच योग्य होतो ... कारण दीनानाथ या शब्दाची फोड ... *दीन आणि अनाथ* अशी होते , तर प्रत्यक्ष जो योग्य शब्द आहे दीननाथ ! त्याचा अर्थ "दीनांचा नाथ" असा होतो ... असो !


... तर दैन्य ही पराभूत वैचारिक भावनिक परिस्थिती आहे , म्हणूनच जी प्रसिद्ध प्रार्थना आहे, त्याच्यामध्ये शारीरिक वैचारिक बौद्धिक आर्थिक सामाजिक कौटुंबिक अशा कुठल्याही प्रकारची दुर्बलता म्हणजेच दीनवाणेपणा आपल्या जीवनात असू नये, यासाठी मानवाने 1.आपले स्वतःचे प्रयत्न आणि त्याच्याबरोबरच 2.आपले गुरु यांचे आशीर्वाद , 3.आई-वडिलांची पुण्याई , 4.आपल्या मित्रमंडळी परिवाराच्या शुभेच्छा आणि 5.भगवंताची कृपा ... यासाठी योग्य त्या उपासना करणं , हे योग्य आहे , आवश्यक आहे!!!


दैन्य नंतरचा ... अगदी obvious स्वाभाविक परिणाम कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे द्वेष !!!

एखादी गोष्ट आपल्याला मिळणार नाही, ते मिळवण्याची आपली क्षमता नाही, असे एकदा आपल्याला निश्चितपणे समजले/ कळाले ...

की मग ती वस्तू ज्याच्याकडे आहे त्या व्यक्तीबद्दल किंवा त्या वस्तूबद्दल आपल्याला द्वेष निर्माण होतो !!!


आधी ती वस्तू आपल्याला हवी असते, त्या वस्तूबद्दल आपल्याला प्रेम लोभ लालसा इच्छा वांछा कामना वासना असं सगळं असतं ... पण एकदा आपली योग्यता क्षमता बल लायकी, ही ती वस्तू मिळवणे इतकी नाही ... असे माणसाला निश्चितपणे कळाले ... की मग तो आधी चिडतो , त्याला क्रोध येतो , मग तो निराश विफल होतो , मग त्याला शोक होतो ... मग त्याला स्वतःच्या कमी सामर्थ्याची जाणीव आणि स्वीकृती होते, म्हणून मग त्याला दैन्य येते ... आणि सगळ्यात शेवटी हे आपल्याला कधीच मिळवता येणार नाही, असे झाले की मग त्या वस्तूबद्दल आणि त्या वस्तूचा स्वामी असलेल्या व्यक्तीबद्दल... द्वेष निर्माण होतो!!! 


म्हणून या सर्व दुर्भावना, हे सर्व दुर्विचार एकमेकांवरती अवलंबून आहेत ... विशेषतः काम (म्हणजे कामना म्हणजे इच्छा अपेक्षा तृष्णा वासना आशा आकांक्षा) या भावनेच्या नकारात्मक प्रवासाचा शेवट हा क्रोध या ठिकाणी होतो आणि म्हणून भगवान् श्रीकृष्ण 

काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः। 

महाशनो महापाप्मा विद्ध्येनमिह वैरिणम्।।

त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः।

कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत्।। असं म्हणतात 

याच्यामध्ये लोभ याचाही समावेश केलेला आहे. लोभ हा हव्यास आहे आणि त्याची पूर्तता नाही झाली की क्रमशः क्रोध ईर्ष्या असूया मत्सर शोक दैन्य द्वेष हे ओघाने येतातच


त्यामुळे अन्न सेवन करताना आणि त्याच्या आधी आणि नंतर सुद्धा, प्रसन्न वृत्तीने आणि चांगल्या विचारांनी चांगल्या भावनांनी युक्त असणे, हे अन्नपचन आणि एकूणच शारीरिक आरोग्य आणि वैचारिक समृद्धी यासाठी आवश्यक आहे!!


अन्नपचन हे शरीरातील पित्तामुळे होते ...

किंबहुना "जगातील सर्वच पचन म्हणजेच रूपांतर म्हणजेच ट्रान्सफॉर्मेशन हे पित्तामुळे अर्थात अग्नीमुळे होते" ... जसे अन्न पाणी या स्वरूपात तोंडावाटे पोटात गेलेल्या पदार्थांचे पचन रूपांतरण शरीर धातूंमध्ये परिणमन हे पाचक पित्तामुळे होते ...


... तसेच , "आपल्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचे पचन , त्याचा आपल्या विचार भावना बुद्धी आणि एकूणच जीवन यावर होणारा परिणाम सुद्धा , पित्तामुळेच होतो !"


अन्नाचे पचन करणाऱ्या पित्ताला "पाचक" पित्त असे म्हणतात तर ...

"जीवनातील घटनांचे पचन" करून त्याचे आपल्याला अनुकूल प्रतिकूल प्रीतीयुक्त द्वेषयुक्त अशा सकारात्मक होकारात्मक विधायक विध्वंस अशा प्रकारच्या "विविध अनुभवांमध्ये त्याचं रूपांतरण" करणे , विविध विचार बुद्धी भावना यामध्ये त्यांचं वर्गीकरण किंवा साठवणूक करणे , हे काम "साधक" पित्त करते !


1.आपली बुद्धी म्हणजे जाणीव , 

2.आपली मेधा म्हणजे समजून घेण्याची क्षमता आकलन शक्ती आणि 

3.आपला अभिमान म्हणजे आपला अहंकार = आपला जीवनाकडे जीवनातील घटनांकडे व्यक्तींकडे वस्तूंकडे बघण्याचा आपला स्वतःचा संदर्भ किंवा दृष्टिकोन ...

या तीन बाबींवरती आपण आपल्या "जीवनात घडणाऱ्या घटनांचे कसे पचन" करतो ते ठरते! 


या साधक पित्त बाबत एक विस्तृत व्याख्यान ऑनलाइन उपलब्ध आहे, त्याची लिंक सोबत दिलेली आहे ... 


हे व्याख्यान प्रबोधन करणारे तर आहेच परंतु त्याच बरोबर ते "मनोरंजक सुद्धा आहे" ... ज्यांना उत्सुकता जिज्ञासा कुतूहल स्वारस्य इंटरेस्ट असेल , त्यांनी खाली दिलेल्या लिंक चा उपयोग करून , ते व्याख्यान मुळातून ऐकावे !!!


ऐकण्यासाठी = ऑडिओ 

👇🏼

https://www.mixcloud.com/MhetreAyurved/mhetreayurved-saadhaka-pitta-ashtaanga-hrudayam-sootra-12-doshabhedeeya-gurukul-july-2014/

👆🏼 वरील लिंक क्लिक होत नसेल ओपन होत नसेल तर लिंक कॉपी करून गुगल क्रोम मध्ये पेस्ट करावे किंवा नुसती सिलेक्ट केली तरी त्याच्यावरती open असा ऑप्शन येतो


व्हिडिओ = पाहणयासाठी

👇🏼

https://youtu.be/aV3t6yyrgi0?si=iy4DbNPWwjGGwU3h

👆🏼 वरील लिंक क्लिक होत नसेल ओपन होत नसेल तर लिंक कॉपी करून गुगल क्रोम मध्ये पेस्ट करावे किंवा नुसती सिलेक्ट केली तरी त्याच्यावरती open असा ऑप्शन येतो

दुर्विचार आणि दुर्भावना म्हणजे ईर्ष्या भय क्रोध दैन्य शोक द्वेष यांचा परिणाम अन्नपचनावरती कसा होतो ... हे समजून घेण्यासाठी एक छोटसं उदाहरण आपण घेऊ या!


समजा अशी बातमी आली की भारतातील अमुक अमुक ठिकाणी भूकंप झाला आणि 6 लोकांची प्राणहानी झाली, तर आपल्याला निश्चितपणे दुःख होते, वाईट वाटते ...

परंतु दुसऱ्या दिवशी पुन्हा बातमी आली की पाकिस्तानात भूकंप झाला आणि 6000 लोक ठार झाले ...

तर आपल्याला असा प्रश्न पडतो की 6000च ठार झाले !? सहा लाख का नाही ठार झाले🤔⁉️ 


तर घटना भूकंप नावाची तीच असते , याच्यामध्ये जीवित हानी ही दुःखदच असते ... असे असतानाही भारतात 6 लोक ठार झाले तरी वाईट वाटतं ... आणि पाकिस्तानात 6000 ठार झाले तरी सहा लाख का नाही ठार झाले ? असे वाटते !!!


याचे कारण बुद्धी म्हणजे भूकंपाबाबत आपली असलेली "जाणीव" (= ज्ञान माहिती इन्फॉर्मेशन), मेधा म्हणजे भूकंपाने होणारे नुकसान समजून घेण्याची आपली आकलन क्षमता; ही जगाच्या पाठीवर प्रत्येक माणसाच्या बाबतीत जवळपास एकसारखीच असते!!! 


परंतु ... त्या भूकंपाशी आणि त्या भूकंपाच्या जागेशी आणि त्या ठिकाणी होणाऱ्या जीवित हानीशी आपला "अभिमान" आपला अहंकार आपलं नातं आपला दृष्टिकोन आपला "संदर्भ" हा त्या भूकंपाच्या दुष्परिणामांच "मूल्यमापन" वेगवेगळ्या प्रकारे करतो ... म्हणून भारतातल्या भूकंपाने अल्पजीवित हानी होऊनही आपल्या दुःख होते ... पण पाकिस्तानात त्याच भूकंपाने शेकडोंच्या संख्येत जीवित हानी होऊनही आपल्याला असं वाटतं अजून दसपटीने का नाही मेले!? ... तर हा बुद्धी मेधा यांच्या पलीकडे जाऊन "अभिमान अहंकार माझा संदर्भ" यामुळे होणारा बदल किंवा वैविध्य आहे! 


आपण रस्त्यावरून टू व्हीलर ने जात असताना रस्त्याच्या कडेला एक मुलगी पडलेली आहे तिच्या गुडघ्याला लागलेलं आहे, त्यातून रक्त येत आहे ... असं आपण पाहिलं तरी , ती मुलगी आपल्या ओळखीची नसेल तर आपल्याला फक्त वाईट वाटतं , तोंडाने आपण चुक् चुक् करतो आणि पुढे जातो.


 पण तीच मुलगी जर आपल्या ओळखीची आपल्या सोसायटीतील शेजारच्या काकांची मुलगी असेल, तर आपण आता चुक् चुक् करून वाईट वाटतं ... असं म्हणून पुढे जात नाही, तर आपण टू व्हीलर थांबवतो, स्टॅन्ड वर लावतो आणि आपल्या ओळखीच्या शेजारी राहणाऱ्या काकांच्या मुलीकडे धावत जातो आणि तिला काही मदत हवी आहे का ते विचारतो, त्यासाठी प्रयत्न करतो, काकांना फोन लावून झालेली घटना कळवतो...


 पण समजा तीच पडलेली मुलगी ही अनोळखी किंवा शेजारच्या काकांच्या ओळखीची मुलगी नसून, ती प्रत्यक्षात आपलीच धाकटी बहीण असेल, तर मग मात्र आपण पुढे तसेच जात नाही , टू व्हीलर स्टँड वर लावत नाही ... तर टू व्हीलर हातातून सोडून फेकून देतो ..

 आणि लांब लांब ढांगा टाकत झेपावत आपल्या प्रिय बहिणीकडे झटकन पोहोचतो ... आपलाही धीर सुटतो, आपल्या चेहरा रडवेला होतो , आपल्याला खूप दुःख होतं ... असं का होतं??? 


मुलगीच असते, पडलेलीच असते, जखमच असते , रक्तच येत असतं ... तरीही तीन वेगळ्यावेगळ्या संदर्भांनी , आपला त्या घटनेला येणारा प्रतिसाद, हा वेगळा वेगळा असतो !!!


याचाच अर्थ जरी बुद्धी आणि मेधा यादृष्टीने आपल्याला समजणारी घटना ही एक सारखीच असली, तरी त्याचं "मूल्यमापन म्हणजेच त्याचं पचन", आपल्या अहंकारानुसार "संदर्भा"नुसार , आपलं "साधक पित्त" वेगळ्यावेगळ्या प्रकारे करतं ... त्या घटनेचा अनुभव म्हणून आपल्या विचारात बुद्धीत भावनेत होणारा परिणाम = नोंदणी ही वेगळी वेगळी असते ... म्हणून त्यावर येणारा आपला प्रतिसादही भिन्न भिन्न असतो, यालाच "जीवनातल्या घटनांचं साधक पित्ताने केलेलं पचन" असं म्हणतात ... समजतंय का ... कळतंय का ... पटतंय का?

एखादी गोष्ट आपल्याला हवी असताना, ती "न मिळणे" किंवा आपली तितकी क्षमता नसल्यामुळे, आपल्याला हवी असलेली गोष्ट, आपल्याला "न मिळवता येणे" ... याबाबतीत "कोल्ह्याला द्राक्षे आंबट" अशी परिस्थिती होऊन , हळूहळू माणूस क्रोध मत्सर असूया ईर्ष्या भय शोक दैन्य आणि शेवटी द्वेष ... या मार्गाने या वस्तूकडे / त्या घटनेकडे पाहत जातो.


जसे उत्तम पचनक्षमता असेल तर कोणत्याही प्रकारचे अन्न पचवता येते, परंतु पचनक्षमता कमी झाली, की ॲसिडिटी होते जळजळ मळमळ होते ... तसे साधक पित्ताची , घटना समजून घेण्याची, घटनांचे पचन करण्याची क्षमता झाली ... की पुन्हा जळजळच होते, ती जळफळाट जेलसी मत्सर असूया या स्वरूपात दिसते.


पचनक्षमता खूपच कमी झाली तर थोडं सुद्धा अन्न पचवण्याची क्षमता राहत नाही ...

तसंच साधक पित्ताची क्षमता खूपच कमी झाली, तर जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा, वैफल्य नैराश्य भय अशोक दैन्य क्रोध असे परिणाम घडतात आणि मग यातून सुटका करण्याची क्षमता सामर्थ्य नसल्यामुळे, साधक पित्ताच्या या हीनदीन अवस्थेतील माणसं, "व्यसनाला बळी पडतात ... ते तंबाखू सिगरेट दारू, क्वचित अमली पदार्थ यामध्ये अडकतात".


कारण ते आपली क्षमता वाढवू शकत नाहीत आणि मिळालेलं अपयश किंवा झालेला पराभव सहन करू शकत नाहीत ... म्हणून ते "विसरण्यासाठी" ते नशा करतात 


आणि जेव्हा अन्नपचनाची क्षमता म्हणजे अग्नीची क्षमता पूर्णपणे नाहीशी होते , तेव्हा मनुष्य मृत्युपंथाला लागतो ... त्याच्या पोटात पाणी होते त्याला , अन्न जात नाही, त्याला उलट्या होतात, अंगावर सूज येते, श्वास लागतो उचकी लागते ... अशा बऱ्याच गोष्टी होतात! त्याला "शांते अग्नौ म्रियते = अग्नि शांत झाला की जीवन हे मरणाच्या दिशेने जातं , असं म्हणतात!!


तोच प्रकार , "साधक पित्त जेव्हा अशा अत्यंत क्षीण" अशा , जणूकाही शांत होण्याच्या परिस्थितीत येते, तेव्हा माणूस "आत्महत्या करण्याची शक्यता" असते .


म्हणूनच केवळ अन्नपचनच नव्हे , तर जीवनातील प्रत्येक घटनेचे पचन हे सक्षमपणे समर्थपणे धीरोदात्तपणे करता येण्यासाठी ,

ईर्ष्या क्रोध भय शोक दैन्य द्वेष या दुर्भावना आणि दुर्विचार यांच्यावर नियंत्रण ... आणि खरंतर विजय मिळवता आला पाहिजे !!!


तरच केवळ जीवनातील घटनाच नव्हे तर अगदी रोज खाल्लेल्या अन्नाचं पचन सुद्धा, प्रसन्न विचार व भावना यामुळे योग्य प्रकारे होत जाते !!!


अनेक सरदार पुत्र हे एकाच प्रकारचे जीवन जगत होते, त्यांच्याकडे अधिकार सत्ता श्रीमंती सगळं होतं!!! फक्त त्यांना बादशहाला जाऊन कुर्निसात करावा लागत असे!! परंतु एका सरदार पुत्राने असं त्याला लाभलेले जीवन, वेगळ्या प्रकारे "पचवलं", कारण त्याचं साधक पित्त हे अतिशय तीक्ष्ण सक्षम बलवान होतं ... म्हणून त्या सरदार पुत्राच्या वाट्याला आलेले जीवन हे त्याच्या साधक पित्ताने वेगळ्या प्रकारे पचवलं आणि त्यातून निर्माण झाले ... त्रिकाल वंद्य साक्षात् शिवस्वरूप भगवंत "छत्रपती शिवाजी महाराज" 🙏🏼


एका ब्राह्मण पुत्राला केवळ संन्याशाचे पोर आहे, म्हणून उपनय संस्कार आणि पुढील सर्व ज्ञानसाधना करता आली नाही ... पदोपदी त्याची अवहेलना निर्भर्त्सना हेटाळणी झाली , वाळीत टाकले गेले ... असे अत्यंत तिरस्काराचे जीवन सुद्धा त्या ब्राह्मण पुत्राने त्याच्या साधक पित्ताने वेगळ्या प्रकारे "पचवले". 


खरंतर त्याच्याही साधक पित्ताने केव्हातरी हार मानली होती , म्हणून त्यांनी स्वतःला बंद करून घेतले होते ... परंतु त्याच्या बहिणीने त्याच्या साधक पित्ताची पुन्हा प्रज्वल उज्वल अशी परिस्थिती तयार केली आणि ताटी उघडून बाहेर आला ... तो आत गेलेला ब्राह्मण पुत्र नव्हता , निराश झालेला कोवळा तरुण नव्हता ... तर ताटी बंद केल्यानंतर पुन्हा ताटी उघडून बाहेर आलेला तो जगन्माऊली शाश्वत वंदनीय "श्री संत ज्ञानेश्वर" होते. 


अवघ्या 32 व्या वर्षी भारताच्या चारही कोपऱ्यांमध्ये, दळणवळणाची संपर्काची कोणती साधनं नसताना, बौद्ध धर्माचा प्रचंड प्रभाव व त्याला लोकाश्रय राजाश्रय असतानाही, सनातन धर्माची पुनःप्रतिष्ठापना करण्याइतपत प्रचंड कर्तृत्व श्री आदि शंकराचार्य हे दाखवू शकले ... कारण त्यांनी त्यांच्या वाटेला आलेले जीवन हे त्यांच्या साधक पित्ताच्या क्षमतेने वेगळ्या प्रकारे "पचवले". 


हिटलरचंही साधक पित्त हे उत्तम प्रकारचं होतं ... परंतु त्याने "जीवन पचवताना", ते भस्मक रोगाप्रमाणे , अत्यंत तीक्ष्ण अग्नि = वणव्याच्या आगी प्रमाणे पचवले ... म्हणून तो गीता अध्याय 16 दैवासुर संपद् विभाग यात वर्णिलेल्या इदम् अद्य मया लब्धं ... या मार्गाने जात जात, शेवटी समाप्त झाला !!!


म्हणून अग्नीची क्षमता ही अतिशय प्रमाणात वाढणं, हेही घातक आहे आणि 

अग्नि मंद किंवा बंद होत जाणं , हेही जीवनाला घातकच आहे ...


म्हणून आपला अग्नि, मग तो "पाचक" पित्त स्वरूपातला "अन्नपचन" करणारा असो किंवा "साधक" पित्त स्वरूपातला , "जीवनातील घटनांचे पचन" करणारा असो ... तो सम्यक् राहील संतुलित राहील उत्तम राहील सक्षम राहील समर्थ राहील ... यासाठी आपले विचार आपली बुद्धी आपल्या भावना या मंगल उदात्त पवित्र उत्तम चांगल्या सद्गुणी राहतील , असा प्रयत्न पदोपदी आणि क्षणोक्षणी करायला हवा ...


आणि म्हणून त्यासाठीच ईर्ष्या क्रोध भय शोक दैन्य द्वेष या दुर्भावनांचा आणि दुर्विचारांचा दुर्बुद्धीचा त्याग करायला हवा ...


सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved

Copyright कॉपीराइट ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

MhetreAyurved@gmail.com 

www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/


नमस्कार आपण वरती उल्लेख केलेला श्लोक, जो भोजनविधीचा मूलाधार आहे, त्याविषयी सविस्तर पाहत होतो! आज प्रदीर्घ कालावधीनंतर आपण हा उपक्रम पुन्हा सुरू करत आहोत, तर वरील श्लोकाच्या अनुषंगाने पूर्वी पोस्ट केलेल्या सर्व लेखांच्या लिंक, आजच्या लेखाच्या शेवटी दिल्या आहेत. त्या क्रमशः वाचून घ्याव्यात... ते वाचून झाल्यानंतर आपण पुन्हा याच श्लोकाकडे परत येऊया ... म्हणजे विषयाची सुसंगती लागेल !!!तोपर्यंत ...

भोजन विधीशी संबंधित ,

पूर्वप्रकाशित लेख , खालील दिलेल्या लिंक चा उपयोग करून , हळूहळू वाचून घ्या ... जेणेकरून मूळच्या श्लोकाची संगती लक्षात येईल🙏🏼


*देहवाक्चेतसां चेष्टाः प्राक् श्रमाद्विनिवर्तयेत्।* 


आणि


*न पीडयेत् इंद्रियाणि*


हे दोन्ही श्लोक आपण एकत्र पहात आहोत.


_(डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.)_


त्वदीय वस्तु गोविंद 

तुभ्यम् एव समर्पये ।


तेरा तुझको अर्पण

क्या लागे मेरा ।


श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु।

🙏🏼


सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved

Copyright कॉपीराइट ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

MhetreAyurved@gmail.com 

www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/



Wednesday, 9 April 2025

कॉन्स्टिपेशन🚽 ॲसिडिटी 🔥होण्याची अन्नपचन न होण्याची खूप जास्त पाणी 🌧पिणे अवेळी ⌚️खाणे आणि इतर कारणे

कॉन्स्टिपेशन🚽 ॲसिडिटी 🔥होण्याची अन्नपचन न होण्याची खूप जास्त पाणी 🌧पिणे अवेळी ⌚️खाणे आणि इतर कारणे




अत्यम्बुपानाद्विषमाशनाद्वा सन्धारणात् स्वप्नविपर्ययाच्च । 

कालेऽपि सात्म्यं लघु चापि भुक्तमन्नं न पाकं भजते नरस्य ।।

ईर्ष्याभयक्रोधपरिक्षतेन लुब्धेन शुग्दैन्यनिपीडितेन । 

प्रद्वेषयुक्तेन च सेव्यमानमन्नं न सम्यक् परिणाममेति ।।


*अष्टांगहृदय सद्वृत्त : भाग 188*

9 एप्रिल 2025, सोमवार  

*उपविभाग 130*


सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved

Copyright कॉपीराइट ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

MhetreAyurved@gmail.com 

www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/


नमस्कार 🙏🏼💐


काले सात्म्यं लघु स्निग्धम् उष्णं क्षिप्रं द्रवोत्तरम् ।

बुभुक्षितो अन्नम् अश्नीयात् मात्रावद् विदितागमः ॥


आपण वरती उल्लेख केलेला श्लोक, जो भोजनविधीचा मूलाधार आहे, त्याविषयी सविस्तर पाहत होतो!


प्रदीर्घ कालावधीनंतर आपण हा उपक्रम पुन्हा सुरू करत आहोत, तर वरील श्लोकाच्या अनुषंगाने पूर्वी पोस्ट केलेल्या सर्व लेखांच्या लिंक, आजच्या लेखाच्या शेवटी दिल्या आहेत. त्या क्रमशः वाचून घ्याव्यात... ते वाचून झाल्यानंतर आपण पुन्हा याच श्लोकाकडे परत येऊया ... म्हणजे विषयाची सुसंगती लागेल !!!


पाणी कधी कसे किती प्यावे याबाबत आपण शास्त्रीय संदर्भानुसार मागील लेखात सविस्तर पाहिले 


https://mhetreayurved.blogspot.com/2025/03/blog-post_2.html


आणि ते अतिशय सुबोध आणि व्यावहारिक म्हणजे सहज कळण्याजोगे आणि प्रॅक्टिकली आचरणात आणण्याजोगी आहे प्रत्येकासाठी प्रतिदिनी


खूप पाणी प्यावे, वॉटर थेरपी, सारखे सारखे पाणी प्यावे, दिवसभरात सात-आठ लिटर पाणी प्यावे ... असेही अपसमज समाजात दृढ आहेत


परंतु पाणी खूप अधिक प्रमाणात, गरजेपेक्षा जास्त प्रमाणात पिल्याने सुद्धा, अन्नाचे पचन होत नाही !!! 


अगदी मग ते अन्न सर्व नियम पाळून, योग्य वेळी, सवयीचे सात्म्य असलेले , पचायला हलके ... असे अगदी अनुकूल असले ... तरीही "आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी पिल्यास" अन्न पचत नाही ...


कारण जल 🌧 हे अग्नीच्या 🔥विरुद्ध आहे, त्यामुळे आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी, हे अग्नी = पचनक्षमता यांची बलहानी करते , त्यांची क्षमता कमी करते!


मॉडर्न सायन्सच्या नुसार अन्नपचन जेथे होते तेथे दोन पीएच हायड्रोक्लोरिक ॲसिड (2pH HCl) म्हणजे अत्यंत तीव्र तीक्ष्ण करोजिव्ह असे ॲसिड असते !


जर पाणी आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात पिले गेले तर हे ॲसिड डायल्युट होते, त्याचे कॉन्सन्ट्रेशन कमी होते त्यामुळे अन्नपचन हे मंदावते ... म्हणून गरजेपेक्षा जास्त पाणी पिऊ नये आणि आवश्यकतेपेक्षा कमीही पाणी पिऊ नये 


म्हणूनच मागील लेखात ...


https://mhetreayurved.blogspot.com/2025/03/blog-post_2.html


दर चार-पाच घासांनंतर, आपले तोंड धुतले जाईल, जिभेवरचा अन्नलेप निघून जाईल, तोंड रिंझ होईल इतपतच, घोट घोटभर पाणी, मध्ये मध्ये पीत राहावे आणि "जेवण झाल्यानंतर सुद्धा" युक्तीपूर्वक म्हणजे योग्य प्रकारे, आवश्यक तेवढेच पाणी "पुन्हा प्यावे" हे आचरणात आणण्यास सगळ्यात सोपे आणि आरोग्य टिकवण्यासाठी उपयोगी आहे. ✅️


खूप पाणी पिल्यामुळे जसे अन्नपचन होत नाही ...


तसेच इतरही काही कारणे यासोबतच या श्लोकात सांगितलेली आहेत ... त्यातील पहिले म्हणजे 


1.

विषम अशन = विषमाशन = म्हणजे "अकाले बहु च अल्पं वा" म्हणजे a)भूक लागलेली नसताना किंवा b)भूक लागलेली असताना सुद्धा खूप जास्त प्रमाणात आवश्यकतेपेक्षा अधिक किंवा c) खूप कमी प्रमाणात म्हणजे भुकेपेक्षा खूप कमी ... 

असे अन्नग्रहण करणे म्हणजे विषमअशन 


अकाल याचा अर्थ भूक लागलेले नसताना खाणे ...


 म्हणजे वेळ झाली आहे, लंच टाईम आहे, शाळेत जायचं आहे, ऑफिसला जायचं आहे, ड्युटीवर जायचं आहे ... अशा "घड्याळाला बांधलेल्या वेळेला अन्न खाणे" की ज्यावेळेला तुमचे "जैविक घड्याळ = बायोलॉजिकल क्लॉक, भूक लागलेली आहे असे सांगत नसते" ... तेव्हा खाणे हे, अन्नपचन न होण्यासाठी मुख्य कारण आहे 


आणि आज सर्रास सगळीकडेच हे घडताना दिसते की भूक लागलेली आहे , त्यावेळेला अन्न खाण्यापेक्षा ... सोयीच्या वेळेला "पोट भरणे / पोटात काहीतरी कसेबसे ढकलणे" असे सर्वत्र चालते 


आणि त्यामुळेच आज 90 टक्के लोकांना ज्या पचनविषयक तक्रारी असतात त्या म्हणजे ॲसिडिटी कॉन्स्टिपेशन ... जळजळ मळमळ आंबट कडू तिखट कोरडे ढेकर घशात जळजळ छातीत जळजळ पोटात जळजळ गॅस साठणे गॅस पास न होणे संडासला चिकट होणे संडासला दोन-तीन वेळा जाऊन सुद्धा समाधान न मिळणे संडास खूप कठीण खडे होणे खूप प्रेशर द्यायला लागणे किंवा बोटाने काढावे लागणे संडासच्या जागी खूप आग होणे दुखणे सुजणे बसायला चालायला अवघड होणे , ब्लोटिंग ... या सर्व तक्रारींचे मुख्य कारण म्हणजे "जैविक घड्याळ = बायोलॉजिकल क्लॉक", आपलं शरीर जेव्हा "भुकेचा कॉल" देतं, तेव्हा न खाता ... आपल्या "सोयीनुसार", घड्याळाच्या वेळेनुसार , नैसर्गिक भुकेच्या आधी किंवा नंतर, खूप वेळ अंतर राखून खाणे , हे विषम अशन = अन्नपचन न होण्याचे , आजच्या व्यवहारातले सर्वात प्रमुख कारण आहे ...


दुसरे वेळेवर जेवून सुद्धा ...

जर ते गरजेपेक्षा खूप जास्त प्रमाणात, "जे जे फुकट , ते पौष्टिक" असे म्हणून, लग्नामध्ये रिसेप्शनमध्ये पार्टीमध्ये "आवश्यकतेपेक्षा जास्त अन्न खाणे कोंबणे, ठूंसना" हे अन्नपचन न होण्याचं अजून एक कारण आहे 


याच्यामध्ये मोह आवरता न येणे , हा असंयम किंवा धीर धैर्य नसणे हे मुख्य कारण आहे !


त्यामुळे आवडते ती गोष्ट, प्रमाणापेक्षा जास्त खाणे ... यापेक्षा भूक लागलेली असताना आवडणारी गोष्ट सुद्धा, इच्छे पेक्षा "दोन घास कमी खाणे" हे आरोग्य टिकवण्यासाठी उपयोगी आहे !!!


दुसरा प्रकार म्हणजे भूक लागलेली असताना जेवले परंतु ...


शरीराच्या आवश्यकतेपेक्षा खूप कमी प्रमाणात जेवणे , हे अनेक गृहिणींच्या बाबतीत किंवा अत्यंत बिझी असलेल्या विशेषतः फिरतीचा व्यवसाय असलेल्या लोकांच्या बाबतीत घडते !!!


पोळी भाजी वरण-भात असं सर्व पोषणमूल्य असणारा आहार घेण्याऐवजी , वडापाव सामोसा मोमोज सँडविच रोल कोल्ड्रिंक चहा बिस्कीट क्रीम रोल भेळ पाणीपुरी चाट ... अशा प्रकारचे "अल्पमात्रेतले फास्ट फूड जंक फूड खाणे", हेही पुन्हा "भुकेपेक्षा कमी" प्रमाणात खाल्ले जात असल्यामुळे, अन्नपचन न होण्यासाठी मुख्य कारण ठरते आणि पुन्हा कॉन्स्टिपेशन ते ऍसिडिटी व्हाया ब्लोटिंग अशा अनेक तक्रारी उद्भवतात!


अपचन होण्याची तिसरे मुख्य कारण म्हणजे वेग धारण आपण सध्या जे लेख पाहतो आहोत वाचतो आहोत लिहितो आहोत ते वेग ह्या विषयाशी सुसंगतच आहेत आपण पूर्वी वात अधोवात गॅसेस पुरुष संडास मूत्र लघवी रज मेंसेस या वेगान विषयी नॅचरल कॉल अर्जस याविषयी पाहून सविस्तर झालेले आहे याच तेरा वेगांच्या मालिकेमध्ये आपण शोधा या वेगाच्या अंतर्गत हे सर्व अन्न आहार पचन याविषयीचे लेख वाचत आहोत


2.

अत्यंबुपान = खूप जास्त पाणी पिणे आणि विषमाशन = अवेळी खूप कमी खूप जास्त खाणे ... या दोघांच्या नंतर,

अन्न पचन न होण्याचे तिसरे मुख्य कारण म्हणजे ...

वेग धारण !!!


त्यातही विशेषतः संडास लघवी अधोवात म्हणजे पुरीष मूत्र गॅसेस यांचे नॅचरल कॉल्स अडवणे, 

त्याचबरोबर ...


क्षुधा = भूक या वेगाचे धारण करणे म्हणजे भूक लागलेली असताना वेळेवर न जेवणे आणि 


क्षुधा या वेगाचे उदीरण करणे म्हणजे भूक लागलेली नसताना सुद्धा उगीचच काहीतरी खात राहणे मंचिंग करणे चघळणे गिळणे ...


या चार वेगांच्या धारणामुळे किंवा उदीरणामुळे म्हणजे त्या वेग = नॅचरल अर्जेस / नॅचरल कॉल चे योग्य प्रतिसाद न दिल्यामुळे, याच अन्नमार्गाशी संबंधित असलेल्या अन्नपचनांमध्ये अडथळे येतात ...


अर्थात या व्यतिरिक्त सुद्धा जे वेग आहेत, त्यामध्ये छर्दी म्हणजे उलटी , शुक्र म्हणजे वीर्य सेक्स , क्षवथु म्हणजे शिंक , कास म्हणजे खोकला , उचकी म्हणजे हिक्का, निद्रा म्हणजे झोप, थकल्यानंतर येणारा श्वास सुस्कारा, अश्रू , जांभई म्हणजे जृम्भा ... याही वेगांच्या धारणामुळे किंवा उदीरणामुळे "अन्नपचन नीट होत नाही" ...


अर्थात या वेगां विषयी आपण पुढे सविस्तर पाहूया ... भविष्यात !!!


3.

अन्नपचन न होण्याचे अजून एक मुख्य कारण, जे व्यवहारात आजकाल प्रायः सर्वांच्या बाबतीत आढळते ते म्हणजे *"स्वप्न विपर्यय*' ...


अर्थात , "जेव्हा झोपायला हवे तेव्हा जागरण करणे" म्हणजे रात्री उशिरापर्यंत साडेबारा एक ही तर सध्या सगळ्यांची जणू संध्याकाळची वेळ झालेली आहे व तिथून पुढे दीड दोन अडीच तीन पर्यंत जागरण करत, रील फेसबुक इन्स्टा नेटफ्लिक्स किंवा ओटीटी वरील वेब सिरीज पाहणे ... हे अनेकांच्या बाबतीत सध्या घडत असते 


दुसरं म्हणजे "दिवसा झोपणे" ... दिवस हा खरंतर जागं राहून सक्रियपणे विविध उद्योग करणे यासाठी नैसर्गिकपणे योजलेला आहे ... 

तरीही आळसामुळे ज्यांना संधी मिळते, ते लोक "दिवसा सुद्धा", दहा-पंधरा मिनिटांच्या "पाॅवर नॅप" पासून तर दोन-तीन तासाची चांगली "ताणून देण्यापर्यंत", झोप घेतात.


दिवसा झोपल्यामुळे शरीरातील सर्व प्रकारच्या क्रिया मंदावतात ... मेटाबोलिक रेट खाली येतो !


त्याच पद्धतीने पचनाची गती सुद्धा मंदावते ... कारण सर्व वाहिन्या ह्या थोड्याफार प्रमाणात संकोच पावतात.


म्हणून,

रात्री जागून वात आणि पित्त वाढवून अन्नपचन बिघडवणे 

किंवा 

दिवसा कारण नसताना झोपून कफ पित्त वाढवून अन्नपचन बिघडवणे ,

असे होत असते ... म्हणून रात्री जागरण आणि दिवसा झोपणे , या दोन्ही बाबी कसोशीने टाळायला हव्यात


आजच्या लेखाच्या प्रारंभी दिलेल्या श्लोकातील पूर्वार्धामध्ये अन्नपचन न होण्याची ही काही शारीरिक कारणे आपण पाहिली ... ही कारणे जरी अन्नाचे सेवन हे योग्य वेळी, सवयीच्या सात्म्य असणाऱ्या, पचायला हलके असणाऱ्या अन्नाचे केलेले असले ... तरीही अन्नपचन बिघडवतात


याच प्रस्तुत श्लोकाचा उत्तरार्ध ...

अन्नपचन न होण्याची , वैचारिक बौद्धिक भावनिक कारणे स्पष्ट करतो ...

त्याबाबत पुढील लेखात सविस्तरपणे पाहूया


सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved

Copyright कॉपीराइट ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

MhetreAyurved@gmail.com 

www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/


नमस्कार आपण वरती उल्लेख केलेला श्लोक, जो भोजनविधीचा मूलाधार आहे, त्याविषयी सविस्तर पाहत होतो! आज प्रदीर्घ कालावधीनंतर आपण हा उपक्रम पुन्हा सुरू करत आहोत, तर वरील श्लोकाच्या अनुषंगाने पूर्वी पोस्ट केलेल्या सर्व लेखांच्या लिंक, आजच्या लेखाच्या शेवटी दिल्या आहेत. त्या क्रमशः वाचून घ्याव्यात... ते वाचून झाल्यानंतर आपण पुन्हा याच श्लोकाकडे परत येऊया ... म्हणजे विषयाची सुसंगती लागेल !!!तोपर्यंत ...

भोजन विधीशी संबंधित ,

पूर्वप्रकाशित लेख , खालील दिलेल्या लिंक चा उपयोग करून , हळूहळू वाचून घ्या ... जेणेकरून मूळच्या श्लोकाची संगती लक्षात येईल🙏🏼


*देहवाक्चेतसां चेष्टाः प्राक् श्रमाद्विनिवर्तयेत्।* 


आणि


*न पीडयेत् इंद्रियाणि*


हे दोन्ही श्लोक आपण एकत्र पहात आहोत.


_(डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.)_


त्वदीय वस्तु गोविंद 

तुभ्यम् एव समर्पये ।


तेरा तुझको अर्पण

क्या लागे मेरा ।


श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु।

🙏🏼


सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved

Copyright कॉपीराइट ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

MhetreAyurved@gmail.com 

www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/

Monday, 7 April 2025

Chaya Prakopa Prashama = Reconsideration Reorganization ... in accordance with the actual status the respective seasons = rutu-s and unique specific reference from Ashtanga Sangraha

Chaya Prakopa Prashama = Reconsideration Reorganization ... in accordance with the actual status the respective seasons = rutu-s and unique specific reference from Ashtanga Sangraha

Author: Vaidya Hrishikesh Balkrishna Mhetre. MD Ayurveda, MA Sanskrit. Ayurveda Clinics @Pune & Nashik. 9422016871 MhetreAyurved@gmail.com



The adhyaaya=chapter on *Doshopakramaneeya* is well-known to many. It is described in the 13th chapter of the Sutrasthana of Ashtanga Hridaya... Its origin is in the Charaka Vimana, where its prose is converted into verse in Ashtanga Hridaya.


However, there is one specific thing that is absent in both Charaka and Ashtanga Hridaya, and that is included under *Doshopakramaneeya* in the 21st chapter of the Ashtanga Sangraha Sutrasthana, and that is...


✨ The Upakrama of Kapha is described as being like the Vasanta rutu... meaning, since the prakopa=aggravation of Kapha occurs during the Vasanta rutu=Spring season, it is natural and easily understandable that the upakrama=process of Kapha would resemble the Vasanta rutu=Spring season.

1️⃣

However, even though Vata’s prakopa=aggravation occurs in the varsha rutu= Monsoon season, the upakrma=process of Vata is described as being similar to Hemanta rutu=season.

2️⃣

And though Pitta’s prakopa=aggravation occurs in the Sharad rutu=season, its upakrama=process is described as similar to the Greeshma Rutu = Summer season.

3️⃣

In reality, Greeshma = Summer is a season of ushna teekshna = intense heat, so it should logically be the season for Pitta prakopa = aggravation... because even the prior season = vasant rutu already brings some heat ushna, and after that, the varsha rutu = Monsoon season, being jala pradhana = water-dominated 🌧️, will definitely shamana = calm down the agni🔥pradhana fiery Pitta!


4️⃣

Similarly, the Hemanta (and Shishira) season is rooksha sheeta = cold and dry, so it is certainly possible for Vata to prakopa = aggravate in that season, and then the arrival of the vasanta rutu = Spring season, which brings ushnata = warmth, will naturally shamana = pacify the Vata.


5️⃣

Thus, the relationships between the Doshas, their prakopa = aggravation, prashama = pacification, and the seasons described in Ayurveda deserve a *"reconsideration and re-evaluation"*... based on the practical, innovative, and unique context provided in the Ashtanga Sangraha, and also based on the experiences of each vaidya=physician regarding the patients who arrive during different seasons throughout the year.

All rights reserved 

Copyright 

Copyright © Author: Vaidya Hrishikesh Balkrishna Mhetre. MD Ayurveda, MA Sanskrit. 

Ayurveda Clinics @Pune & Nashik. 

9422016871 

MhetreAyurved@gmail.com www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/

Disclaimer/अस्वीकरण: लेखक यह नहीं दर्शाता है, कि इस गतिविधि में व्यक्त किए गए विचार हमेशा सही या अचूक होते हैं। चूँकि यह लेख एक व्यक्तिगत राय एवं समझ है, इसलिए संभव है कि इस लेख में कुछ कमियाँ, दोष एवं त्रुटियां हो सकती हैं। भाषा की दृष्टी से, इस लेखके अंत मे मराठी भाषा में लिखा हुआ/ लिखित डिस्क्लेमर ग्राह्य है


डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.


Disclaimer: The author does not represent that the views expressed in this activity are always correct or infallible. Since this article is a personal opinion and understanding, it is possible that there may be some shortcomings, errors and defects in this article.



हिंदी: चय प्रकोप प्रशम = पुनर्विचार पुनर्मांडणी ... दोष संबंधित ऋतू एवं अष्टांग संग्रहोक्त विशिष्ट संदर्भ के अनुषंग में

चय प्रकोप प्रशम = पुनर्विचार पुनर्मांडणी ... दोष संबंधित ऋतू एवं अष्टांग संग्रहोक्त विशिष्ट संदर्भ के अनुषंग में



लेखक : वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

MhetreAyurved@gmail.com

दोषोपक्रमणीय यह अध्याय बहुत लोगों को ज्ञात होता है। यह अष्टांग हृदय सूत्रस्थान के 13वें अध्याय में वर्णित है... इसका मूल उद्गम स्थान चरक विमान में है, जहाँ इसका गद्य रूप अष्टांग हृदय में पद्य रूप में रूपांतरित हुआ है।


लेकिन चरक और अष्टांग हृदय दोनों में एक विशेष बात जो नहीं है, वह अष्टांग संग्रह के सूत्र स्थान के 21वें अध्याय में दोषोपक्रमणीय के अंतर्गत आती है, और वह यह है...


✨ कफ का उपक्रम वसंत ऋतु के समान बताया गया है... अर्थात कफ का प्रकोप वसंत ऋतु में होता है, इसलिए कफ दोष का उपक्रम वसंत ऋतु के समान होना स्वाभाविक और सुबोध है।

1️⃣

लेकिन वात का प्रकोप वर्षा ऋतु में होता है, इसके बावजूद वात का उपक्रम हेमंत ऋतुचर्या के समान बताया गया है।

2️⃣

और पित्त का प्रकोप शरद ऋतु में होता है, इसके बावजूद पित्त का उपक्रम ग्रीष्म ऋतुचर्या के समान बताया गया है।

3️⃣

वस्तुतः, ग्रीष्म ऋतु तीव्र उष्ण तीक्ष्ण गुण युक्त ऋतु है, इसलिए यह पित्त प्रकोप का ऋतु होना चाहिए था... क्योंकि उससे पहले वसंत ऋतु में भी उष्णता बढ़ी हुई ही रहती है और ग्रीष्म के बाद आने वाली वर्षा ऋतु जलप्रधान 🌧️ होती है, जिससे अग्नि🔥 प्रधान पित्त का शमन निश्चित रूप से होगा!


4️⃣

इसी प्रकार, हेमंत (और शिशिर) ऋतु शीत रूक्ष होने के कारण इसमें वात का प्रकोप होना निश्चित रूप से संभव है, और फिर उसके बाद वसंत ऋतु का आगमन उष्णता लेकर होने के कारण वात का शमन होना पूरी तरह सही है।


5️⃣

इस प्रकार आयुर्वेद में वर्णित दोषों के चय, प्रकोप, शमन और ऋतुओं के संबंध पर एक बार पुनर्विचार और पुनः विश्लेषण किया जाना चाहिए... अष्टांग संग्रह के व्यावहारिक, अभिनव और विलक्षण संदर्भ के आधार पर, और वास्तविक जीवन में वैद्य के पास वर्ष भर में ऋतु अनुसार जो रोगी आते हैं, उनके अनुभव के आधार पर भी।

सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved


Copyright कॉपीराइट © लेखक : वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 


एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.


आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.


9422016871


MhetreAyurved@gmail.com 


www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/

Disclaimer/अस्वीकरण: लेखक यह नहीं दर्शाता है, कि इस गतिविधि में व्यक्त किए गए विचार हमेशा सही या अचूक होते हैं। चूँकि यह लेख एक व्यक्तिगत राय एवं समझ है, इसलिए संभव है कि इस लेख में कुछ कमियाँ, दोष एवं त्रुटियां हो सकती हैं। भाषा की दृष्टी से, इस लेखके अंत मे मराठी भाषा में लिखा हुआ/ लिखित डिस्क्लेमर ग्राह्य है


डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.


Disclaimer: The author does not represent that the views expressed in this activity are always correct or infallible. Since this article is a personal opinion and understanding, it is possible that there may be some shortcomings, errors and defects in this article.






चय प्रकोप प्रशम = पुनर्विचार पुनर्मांडणी ... दोष संबंधित ऋतू आणि अष्टांग संग्रहातील विशिष्ट संदर्भ या अनुषंगाने

चय प्रकोप प्रशम = पुनर्विचार पुनर्मांडणी ... दोष संबंधित ऋतू आणि अष्टांग संग्रहातील विशिष्ट संदर्भ या अनुषंगाने

लेखक : वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

MhetreAyurved@gmail.com

🤔⁉️





दोषोपक्रमणीय हा अध्याय अनेकांना माहिती असतो. हा अष्टांग हृदय सूत्रस्थान 13 येथे वर्णन गेला आहे ... याचे मूळ उगमस्थान चरक विमान मध्ये आहे तेथील गद्य परिच्छेदाचे अष्टांग हृदयामध्ये पद्य रूपांतर झालेले आहे 


परंतु चरक आणि अष्टांगहृदय या दोन्ही मध्ये नसलेली *एक विशेष गोष्ट* अष्टांग संग्रहाच्या सूत्र स्थानाच्या 21व्या अध्यायात दोषोपक्रमणीय या अंतर्गत येते ती म्हणजे ...


✨ कफाचा उपक्रम वसंत ऋतूप्रमाणे सांगितलेला आहे ... अर्थात कफाचा प्रकोप वसंत ऋतूत होत असल्यामुळे कफदोषाचा उपक्रम वसंत ऋतूप्रमाणे असणे हे स्वाभाविक आणि सुबोध आहे 

1️⃣

परंतु वाताचा प्रकोप वर्षा ऋतूत होतो असे असूनही, वाताचा उपक्रम हा हेमंत ऋतुचर्यप्रमाणे सांगितलेला आहे

2️⃣

आणि पित्ताचा प्रकोप शरद ऋतूत होतो, असे असूनही ... पित्ताचा उपक्रम ग्रीष्म ऋतुचर्येप्रमाणे सांगितलेला आहे

3️⃣

खरं पाहता ग्रीष्म हा तीक्ष्ण उष्ण अशा गुणांचा ऋतू असल्यामुळे तोच खरंतर पित्तप्रकोपाचा ऋतू असायला हवा ...

कारण त्याच्या आधीही वसंत ऋतूत उष्णता वाढलेलीच असते आणि ग्रीष्मानंतर येणारा वर्षा ऋतू हा जलप्रधान 🌧️असल्याने तो अग्नि🔥 प्रधान पित्ताचे निश्चितपणे शमन करेलच!


4️⃣

 त्याचप्रमाणे हेमंत (व शिशिर) ऋतू हा शीत रूक्ष असल्याने त्यात वाताचा प्रकोप होणे निश्चितपणे शक्य आहे आणि त्यानंतर येणारा वसंत ऋतू हा उष्ण असल्याने त्यात वात शमन होणे, हे अगदीच योग्य आहे 


5️⃣

तर आयुर्वेदात वर्णन केलेले दोषांचे चयप्रकोप्रशम आणि ऋतू यांचा संबंध एकदा पुनर्विचार आणि पुनर्मांडणी करण्याजोगा आहे ... 

अष्टांग संग्रहातील व्यावहारिक अभिनव आणि विलक्षण संदर्भाच्या आधारे 

आणि प्रत्यक्ष वर्षभरात ऋतूनुसार जे पेशंट येतात त्यानुसार प्रत्येक वैद्याला येणाऱ्या अनुभवानुसार सुद्धा!


सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved


Copyright कॉपीराइट © लेखक : वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 


एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.


आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.


9422016871


MhetreAyurved@gmail.com 


www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/


Disclaimer/अस्वीकरण: लेखक यह नहीं दर्शाता है, कि इस गतिविधि में व्यक्त किए गए विचार हमेशा सही या अचूक होते हैं। चूँकि यह लेख एक व्यक्तिगत राय एवं समझ है, इसलिए संभव है कि इस लेख में कुछ कमियाँ, दोष एवं त्रुटियां हो सकती हैं। भाषा की दृष्टी से, इस लेखके अंत मे मराठी भाषा में लिखा हुआ/ लिखित डिस्क्लेमर ग्राह्य है


डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.


Disclaimer: The author does not represent that the views expressed in this activity are always correct or infallible. Since this article is a personal opinion and understanding, it is possible that there may be some shortcomings, errors and defects in this article.