Saturday, 14 October 2023
वेदनाशामक आयुर्वेदीय पेन किलर टॅबलेट : झटपट रिझल्ट, इन्स्टंट परिणाम
Friday, 26 May 2023
गुरुपादुकाष्टक भाग एक
Thursday, 25 May 2023
गुरुपादुकाष्टक निरूपण प्रारंभ प्रस्तावना
Saturday, 8 October 2022
: *सण कशासाठी ? ... ~कोजागिरी~ कोजागरी पौर्णिमा !* :
“हाय स्वीटी, अगं कोजागिरीची 'नाईट पार्टीये आमच्याकडे उद्या सोसायटीच्या टेरेसवर समोसे पावभाजी मिल्कशेक कोल्ड्रींक हं...
गणपती सुटले, दुर्गेला वेठीला धरून झालं, आता कोजागरी नुसती मजा करायला निमित्तं पाहिजेत.
जुनी मंडळी म्हणणार “अगं पोरींनो , कोजागिरीच्या रात्री लक्ष्मी रस्त्याने फिरत 'को जागर्ति कोण जागं आहे असं विचारते"
(अरे हो... 'को जागर्ति? ' म्हणून 'कोजागरी' बरं का, 'कोजागिरी' नव्हे...
~कोजागिरी~ ❌
*कोजागरी* ✅
दादागिरी भाईगिरी गांधीगिरी वगैरे ठीक आहे हो...)
बेपर्वा सेलेब्रेशन्स व पौराणिक गोष्टी अशा या दोन टोकांमध्ये खरंच लॉजिकल बुद्धिला
पटेल असं काही शास्त्रीय कोजागरीत असेल?! ...
आहे ✅
समाजाच्या आरोग्याची आयुर्वेदीय तत्त्वांशी सांगड घालून पूर्वजांनी धार्मिक सण रूढी सण स्थापल्यात!
कोजागरी पौर्णिमेला चांदण्या रात्री थंड दूध का प्यायचे
🤔❓
कोजागरी पौर्णिमा म्हणजे शरद् ऋतु म्हणजे ऑक्टोबर हीट ! दिवसा उकाडा, रात्री गारवा !
आधीच्या पावसाळ्यात कुंद दमट हवा , भूक नाही यांनी 'अम्ल विपाक' होऊन पित्त साठलेले असते. त्या साठलेल्या पित्ताचा शरदाच्या ऊन्हाच्या तडाख्याने 'प्रकोप' होतो, पित्त वाढते, रक्त बिघडते.
उष्णता-पित्त-रक्त यांचे विकार संभवतात. कावीळ, टायफॉईड, गोवर, तोंड - डोळे येणे, नागीण/धावरं/हर्पिस, कांजिण्या, नाक / संडासवाटे रक्त पडणे, अम्लपित्त, गळू, रॅश, जळजळ, मळमळ इ. रोग संभवतात.
या वाढलेल्या पित्ताला म्हणजेच 'अग्नि' महाभूताला कमी करणेसाठी मधुर ( पृथ्वी जल महाभूत ) गोड, तिक्त(वायुआकाश)कडू, कषाय ( वायुपृथ्वी ) तुरट चवीचे पदार्थ उपयुक्त असतात. तसेच 'शीत' गुणाची आवश्यकता असते.
'विरेचन' या शोधन कर्म उपायानेही प्रकुपित (वाढलेले) पित्त 'बाहेर काढावे' व बिघडलेले रक्त 'रक्तमोक्षण' करून 'बाहेर काढावे' असा शास्त्रादेश आहे. म्हणूनच या
काळात 'शारदीय पंचकर्म उत्सव' म्हणून 'विरेचन व रक्तमोक्षण प्रकल्प' आयोजित केला जातो. याचा लाभ घेतल्यास उष्णता-पित्त-रक्त यांचे विकार 'कायमचे व मुळापासून नष्ट होतात
पण संपूर्ण समाजापर्यन्त 'शरद ऋतुचर्या म्हणजे 'पित्तशामक उपाय' पोहोचावा कसा?!
म्हणून मग 'कोजागरी' पौर्णिमा!!
'चांदण्या रात्री थंड दूध प्यावे' ही रूढी !! शरदातील चांदणी रात्र व दूध हे दोन्हीही 'शीत' गुणाचे!!
दूध मधुर म्हणजे गोड चवीचे!
मधुर रस म्हणजे पृथ्वी व जल महाभूत आजही आग विझवणेसाठी पाणी व वाळू हेच प्राथमिक साधन होय. म्हणून पित्त म्हणजे अग्निप्रशमनार्थ मधुररस !!
दूधच का?? विरेचन हे पित्ताचे परमौषध होय. दूध हे रक्तप्रसादक आहे म्हणून कोजागरी च्या रात्री थंड गोड दूध प्यायचे ✅
समोसे, पावभाजी यांनी पित्त कमी होईल का वाढेल?
मिल्क शेक / फूटसॅलड हा एक 'विचित्र संयाग' होय. याला 'विरूद्धान्न' म्हणतात .
जे दोन पदार्थ स्वतंत्र एकेकटे चांगले असू शकतील पण एकत्र केले तर बऱ्याचदा ते शरीरात सात्म्य होतातच असे नाही.
दूध, केळी, मीठ एकेकटे चांगले आहेत पण दूध + मीठ, दूध + केळे (कोणतेही फळ) हे ‘विरूद्धान्नसंयोग' होत.
'मीठ आणि साखरेचं रूप जरी गोरं, एक होई गोड एक होई खारं ! दुधासंगं दोघांचाबी धर्म येगळा रं.' 'विरूद्धान्न' ही एक आरोग्यनाशक गंभीर बाब होय.
'कोल्ड्रींक' ?❓ शीतगुणाची गरज आहे पण कोल्ड्रींकची नक्कीच नाही. कोल्ड्रींकमध्ये दात (काढलेला) टाकून ठेवला तर ३-४ दिवसात विरघळतो !! विचार करा.
बरे, ते स्पर्शाला शीत असलं तरी गुणकर्मानी शीत नसतं. शिवाय, कोल्ड्रींक चहा ही जीवनावश्यक पेये नव्हेत
अन् दुसरी बाब म्हणजे कोल्डींकच्या एका बाटलीला दिलेल्या 20 रू. पैकी 5रू. भारतात आणि बाकी 15रू. अमेरिकेत जातात. किती दिवस देश विकायचा? 'कोल्ड ड्रिंक' प्यायचंच असेल तर
डाळिंबाचा रस, आवळा सरबत घ्यावे ही दोन आंबट असली तरी शीत व पित्तशामक होत. खास
'आंबटशौकिनांसाठी' हं!
काळया मनुका, मोरावळा (डाळिंबाच्या रसात पत्री खडीसाखर घालून
केलेला) हे आणखी पर्याय सोललेल्या उसाचे तुकडे (करवे), वाळा किंवा फिल्टर किंवा माठात टाकून ठेवणे हा सोपा स्वस्त मार्ग .
तिक्त (कडू) रस (चव) हाही पित्तशामक होय म्हणूनच गणपती : 21 पत्री, गौरी : २१ भाज्या, अनंत चतुर्दशी : १४ भाज्या, पितृपक्ष : विविध भाज्या अशी योजना असते. कारण या सर्व भाज्या प्राय तिक्तरसाच्या होत.
लेखक : © वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे
एम डी आयुर्वेद एम ए संस्कृत आयुर्वेद क्लिनिक @ पुणे व नाशिक 9422016871 www.MhetreAyurveda.com
www.YouTube.com/MhetreAyurved/
'आवळीभोजन' हाही या काळातला प्रकार आवळा शीत (पित्तशामक) होय. त्यात लवण (खारट) वगळता ५ ही रस चवी आहेत. आज बाजारात आवळ्याचे अनेक तयार प्रकार मिळतात. त्यातही डाळिंबरस व पत्री खडीसाखर युक्त मोरावळा सर्वोत्तम! च्यवनप्राशचाही मुख्य घटक आवळाच.
घृत (तूप) हे पित्तशामक परमौषध ! 'आयु: घृतम्' असे वचन आहे . तुपाने कोलेस्टेरॉल नाही वाढत.
नाकात रोज तूप सोडा ४२ दिवस सलग! 42 दिवसानंतर केस, डोळे, कान, नाक, डोके, दात, स्मृति, एकाग्रता, मान, निद्रा या 'उत्तमांग' (खांद्याच्या वरील भाग) प्रदेशातील एकही समस्या शिल्लक
राहणार नाही.
'हंसोदक' = पाश्चरायझेशन ( उकळून गार करणे = क्वथितशीतलम्) असे पाणी पित्तशामक होय.
काल गार केलेले पाणी ( एक रात्र उलटल्यावर) आज वापरू नये. उकळताना तिक्त, मधुर, कषाय (आवळा, गुलाबपाकळी, मोगरा, नागरमोथा, वाळा, लाजा, अनंता इ. ) असे पदार्थ पाण्यात टाकणे अधिकच चांगले. शरदात दिवसा ऊन व रात्री थंड यांनी पावसाळ्यातले जलसाठे आपोआपच उकळून गार होतात! तेही 'अगस्ती' ताऱ्याचे उदयाने निर्विष
होतात. हेच हंसोदक होय. 'ह' म्हणजे सूर्य उष्ण. 'स' म्हणजे सोम शीत! लहान मुले नाही का 'हा
हा आहे' असं गरम बाबींना म्हणतात. इंग्रजीत हॉट म्हणजे उष्ण . योगशास्त्रात सीत्कारी हा शीतलता देतो.
...मग या कोजागरीला काय बेत?
गुलाबपाकळ्या, मोगरीच्या कळ्या, वाळा घातलेलं
सुगंधी पाणी ; डाळिंबाचे दाणे टाकलेलं आवळा सरबत, धणे-जिरे- तुपाची फोडणी दिलेल्या
साळीच्या लाह्या, पत्री खडीसाखर घातलेलं गोड थंड दूध अन् जोडीला चंद्रचांदण्याची
शृंगारिक गाणी ... शारदसुंदर चंदेरी राती, स्वप्नांचा झुलत झुला ... थंड या हवेत ...
लेखक : © वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे
एम डी आयुर्वेद एम ए संस्कृत आयुर्वेद क्लिनिक @ पुणे व नाशिक 9422016871
कोजागरी पौर्णिमा बद्दल युट्यूब व्हिडिओ
👇🏼
https://youtu.be/yIB6Le5mOSA
ज्यांना मोबाईल स्क्रीनला चिकटून न राहता नुसतं ऐकायचं आहे त्यांच्यासाठी
कोजागरी पौर्णिमा बद्दल ऑडिओ
👇🏼
https://www.mixcloud.com/MhetreAyurved/mhetreayurved-kojagaree-paurnima-san-kashasathi-te-samajun-ghya-18-oct-2013/
ज्यांना कोजागरी बद्दलचा छोटासा लेख हवाय त्यांच्यासाठी pdf डाउनलोड करण्यासाठी लिंक
👇🏼
https://www.mhetreayurveda.com/articles.php
इथे 👆🏼इतरही अनेक लेख उपलब्ध आहेत
www.MhetreAyurveda.com
www.YouTube.com/MhetreAyurved/
Thursday, 16 January 2020
मकर संक्रांती : तिळगूळ घ्या ... बोला गोड ! आरोग्याला द्या ... संस्कारांची जोड !!
तिळगूळ घ्या ... बोला गोड !
आरोग्याला द्या ... संस्कारांची जोड !!
थंडीची सुरूवात होऊन आता दीडएक महिना झालाय. आताशा थंडीचा 'गुलाबीपणा' जाऊन ती आता 'बोचरी' होत चाललीये. हातपायचेहरा इथली त्वचा आणि ओठ फुटलेत. झाडंसुद्धा पानगळतीने उघडीबोडकी दिसताहेत. हाच तो 'शिशिर ऋतु'.
आयुर्वेदानुसार माघ व फाल्गुन महिने हे शिशिर ऋतुचे होत तर ज्योति:शास्त्रानुसार सूर्य जेव्हा मकर व कुंभ राशीत असतो तेव्हा शिशिर ऋतु होय. शिशिर हा उत्तरायणाचा आरंभ होय. कारण या काळात मकर संक्रांत येते म्हणजे सूर्य मकरवृत्त ओलांडून दक्षिणेकडून पुनः उत्तरेकडे येऊ लागतो. दिवस मोठा होऊ लागतो. भारतापासून ( उत्तरगोलार्ध) अधिकाधिक दूर दक्षिणेकडे गेलेला सूर्य या ऋतूत पुनः जवळ यायला आरंभ होतो. पण तूर्त तरी सूर्य खूप दूर असलेने आपल्याकडे मात्र कडाक्याची थंडी असते. आणि म्हणूनच ती बोचरी ठरते. थोडक्यात वातावरण कमालीचे 'शीत व रूक्ष' असते. आणि म्हणूनच याचे दुष्परिणाम टाळणेसाठी बरोबर याच्या विरूद्ध म्हणजे 'उष्ण व स्निग्ध' गुणांची गरज असते. आणि त्याचसाठी आपल्या पूर्वजांनी या ऋतूत आयोजिला सण मकर संक्रांतीचा अर्थात् 'तिळगूळ घ्या , गोड बोला'
तिळगूळच का?
तर तीळ हे 'उष्ण व स्निग्ध' आहेत आणि गूळ हा 'स्निग्ध गुरू व मधुर' होय.
शीत व रूक्ष वातावरणात शरीरातील वातदोष वाढतो. म्हणजे वायु व आकाश महाभूतप्रधान घटक. त्यामुळे धातुंची म्हणजे शरीरघटकांची झीज संभवते. पृथ्वी व जल महाभूते घटतात. ती भरून काढणेसाठीच थंडीत भूक अधिक लागते.म्हणूनच वायु आकाश कमी होऊन पृथ्वी जल महाभूते वाढतील अशा पदार्थाचे सेवन इष्ट ठरते. शिवाय वातदोष शीत व लघु गुणांचा आहे ग्हणून त्याला नियंत्रित ठेवण्यासाठी उष्ण व गुरू गुणांची गरज असते. अशा प्रकारे उष्ण स्निग्ध गुरू मधुर पृथ्वी जल यांचा पुरवठा व्हावा म्हणूनच समाजातील सर्व आर्थिक थरांत सहज उपलब्ध होतील अशा पदार्थाची निवड करून त्यांची धार्मिक रूढींशी सांगड घातली गेली. ते दोन पदार्थ म्हणजेच तिळगूळ घ्या ....गोड बोला.
शिवाय जसे कफासाठी मध, पित्तासाठी घृत ( तूप ) , तसे वातासाठी तिलतैल हे परमौषध म्हणजे सर्वश्रेष्ठ उपाय होय.
गूळ हा उसापासून बनणारा पदार्थ म्हणून संक्रांतीच्या आदले दिवशी भोगीच्या भाजीत उसाचे तुकडे असतात.
अशा प्रकारे शिशिर ऋतूतील अत्यधिक शीतता व रूक्षता यांनी वातप्रकोप होऊन शरीरावर त्याचा दुष्परिणाम होऊ नये म्हणून वातनाशक अशा तिळ व गूळ यांचा सणरूढींत समावेश आहे.
सध्या काही सुगृहिणी (सुगरण हा अपभ्रंश होय ) स्त्रिया तिळगुळाच्या वङ्या किंवा लाडू करताना त्यांत खोबरे घालतात, तेही योग्यच होय कारण नारळ हाही मधुर गुरू स्निग्ध याअर्थी वातशामक होय.
पण सध्या सणांचे बाजारीकरण होत असताना शास्त्रीय परंपरांपेक्षा 'उरकून टाकू उपचार रूढी असा भाग अधिक आहे, म्हणूनच तिळ व गूळ यांच्या वड्या करण्याऐवजी 'सोय व सुटसुटीत' म्हणून काटेरी पांढरा हलवा वापरला जातो. त्यात गूळ नसून साखर वापरली जाते, जी सध्या तरी कारखान्यात तयार होणारी म्हणजे रसायनयुक्त असू शकते. त्यामुळे रूढीतला मूळ शास्त्रीय उद्देश हरवून जातो.
संक्रांतीचे वेळी तिळाचा वापर हा फक्त तिळगूळ किंवा भोगीच्या भाकरीपुरता नसून तो तिलतैलाचा अभ्यंग व तिळाचे उद्वर्तन उटणे याअर्थीही करायचाय. तोही फक्त २ दिवस नव्हे तर थंडी व रूक्षता जोवर वातावरणात आहे तोवर अर्थात् पुढचा सण येईपर्यन्त म्हणजे होळी जळाली थंडी पळाली इथपर्यन्त!
...कारण त्या त्या सणांच्या रूढी, या त्या दिवसापुरत्या नसून, ते त्या संपूर्णऋतूचे आरोग्यनियम होत.
तिळगुळाला फक्त शारीरिक आरोग्यापुरते महत्त्व आहे असे नसून कौटुम्बिक सामाजिक आरोग्यदृष्ट्याही महत्त्व आहे.
'तिळगूळ घ्या ... गोड बोला' हा एकमेकांस देण्याचा संदेश म्हणून तर पिढ्यानुपिढ्या चालत आला आहे. जशी शिशिरामध्ये वातावरणात थंडपणा व रूक्षता येते , तशी ती आता समाजमनातही शिरून मूळ धरू लागली आहे. एक संवेदनाशून्य थंडपणा की षंढपणा आणि 'मला काय त्याचं' असा अलिप्त कोरडेपणा दिसतोय. कुणी विचारवंत म्हणाले होते... 'Men build walls instead of bridges ; so they became Miserable' ... माणसं सेतू बांधायचे सोडून भिंती बांधतात आणि म्हणूनच जीवन केविलवाणे होते.
हे सण "साजरं" करण्याचं वेड भारतीय माणसात उत्सवप्रियतेमुळं आहे का? की परंपरापालनाचा पगडा म्हणून?
की आज खरंच सणांना काही अर्थ राहीलाय का ?
की Just time pass? ...fun fair......?
खरं सांगू, धर्म ही अफूची गोळी आहे. म्हणूनच आपल्या 'शहाण्यासुरत्या' पूर्वजांनी अज्ञानी जनतेला सणांची शास्त्रीयता उलगडून सांगण्यापेक्षा, शास्त्रीय आरोग्यनियमांचे पालन सणांद्वारे कसे होईल, ते पाहीले. उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ ! धार्मिक नियम म्हणून का होईना , पण आरोग्यनियम पाळले गेले सणांद्वारे. आपले पूर्वज खरंच थोर होते.
आपल्या प्रत्येक सणाला वास्तव शास्त्रीय अधिष्ठान आहे आणि म्हणूनच आज बुद्धिप्रामाण्यवाद, तथाकथित वैज्ञानिक दृष्टीकोण, नास्तिकता, 'जुनं ते फेकून द्या', इन्स्टंट जमाना वगैरेंच्या धुरळ्यात सणांची शास्त्रीयता मांडणे योग्य ठरेल. धर्माशी आयुर्वेदाची आरोग्यशास्त्राची सांगड आहे. रूढी समजावून घ्या. त्या केवळ परंपरा नसून शास्त्रशुद्ध आरोग्यनियम होत.
आपले पूर्वज हे खरोखर शहाणे होते. "They were really BAAP"! त्यांना नावं ठेवणं सोपं आहे, पण नाव कमावणे खूप अवघड आहे.
आपल्या संस्कृतीने मनामनातला हा कोरडेपणा रूक्षता थंडपणा जावा म्हणूनच संक्रांतीची योजना केलीये की ज्यामुळे परस्परांबद्दल 'स्नेह' वाढून एकोपा राहील. मायेचा ओलावा (म्हणजेच 'स्नेहन' ) व आपुलकीची ऊब (म्हणजेच 'स्वेदन') हेच समाजाच्या आरोग्याचे मूलमंत्र होत. ज्या संस्कृतीने व्यक्तिच्या शारीरिक कौटुंबिक सामजिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी स्नेहाचे गोडी तिळगुळाचे सुसंस्कृत सण योजिले, त्याच समाजाला मनगटावर पट्टे बांधण्याचे 'फ्रेंडशिप डे' अधिक आवडावेत हे आमच्या मानसिक गुलामगिरीचे फळ आहे. पाश्चात्यांचे अंधानुकरण न करता आपण आपल्या सण उत्सव रूढी' यांकडे कधी शास्त्रीय व विधायक डोळस वृत्तीने पाहणार आहोत काय ? आपल्या पिढीचे सोडा पण उमलत्या निरागस पिढीच्या हाती आपण कोणता सांस्कृतिक ठेवा सोपवणार आहोत ? विस्मृतीत चाललेल्या सात्त्विक परंपरा की विकृत उथळ चवचाल पाश्चात्य फॅड फॅशन ?
आशा आहे ...
तिळगूळ घेऊन बोलू गोड
आरोग्याला देऊ संस्कारांची जोड ...
वैद्य हृषीकेश म्हेत्रे
एम डी आयुर्वेद , एम ए संस्कृत
पुणे (प्रत्येक रविवारी) , नाशिक (मंगळ ते शुक्र)
आरोग्यसम्पन्न आनंदी आयुष्यासाठी आश्वासक आयुर्वेदीय उपचार
Wednesday, 23 October 2019
Tuesday, 1 October 2019
सण उत्सव रूढी कशासाठी? उपास ? की उपवास? कशासाठी ? Upas or upvas ? Fasting ... Whats the purpose
© www.MhetreAyurved.com, 9422016871
उपास ? की उपवास? कशासाठी ?
"एकादशी आणि दुप्पट खाशी"...
“आज माझं वरत (व्रत) आन् दिवसभर चरत”.
खिचडी, वेफर्स, तळण, गुडदाणी हे खायला मिळतं म्हणून उपास करणारे अनेक आहेत.
सुटी कशासाठी? तर काम करून थकलेल्या शरीराला विसावा मिळावा, पुन: ताजंतवानं होता यावं म्हणून
किंवा राहिलेली काम पूर्ण करता यावी म्हणून !
( अनुशेष भरून काढणे) !
तसेच उपास कशासाठी ... तर पचनसंस्थेला विश्रांती मिळावी किंवा शरीरात असलेल्या अनेक अपाचित (न पचलेल्या) गोष्टींचे पचन पूर्ण करता यावे म्हणून . लंघनाने अनेक विकार बरे होऊ शकतात . उपास करणारे किती लोक हा उद्देश सफल होऊ देतात ? मुळात अनेकांना उपास / भूक सहन होत नाही. बाकीचे खिचडीसाठी ... ... ... तर उरलेले रूढी धार्मिक नियम म्हणून .
वैद्य हृषीकेश म्हेत्रे Vaidya Hrishikesh B. Mhetre
© www.MhetreAyurved.com, 9422016871
खरंतर 'उपास' हा शब्द नव्हे . तो ‘उपाशन = उप अशन' हवा . म्हणजे मुख्य नेहमीचे जेवण सोडून काही उपपदार्थ खाणे . यालाच 'उप + आहार = उपाहार' म्हणावे .
म्हणून पूर्वी एस् . टी . स्टॅण्डवर 'उपाहारगृह' असायचे त्याचे बहुतेक सर्वत्र 'उपहारगृह' झाले . इंग्लीश स्पेलींग आम्ही कधीच चुकत नाही पण मराठी शब्द मात्र चुकूनही 'शुद्ध' लिहीत नाही . पहिलीपासून इंग्रजी ! व्वा!!
'उपाशन' चे 'उपोषण' झाले आणि 'उपास' बहुधा 'उपवास'चे अपभष्ट रूप होय .
उप = जवळ , वास = राहणे . देव संत सज्जन यांचा सहवास
म्हणजे उपवास . सत्संग!
श्रीचक्रपाणि (श्रीचरकसंहितेचे टीकाकार) म्हणतात ...
'उपावृतस्य/अपावृतस्य पापेभ्य:
सहवासो गुणैः हि यः
उपवासः स विज्ञेयः
न शरीरस्य शोषणम्'
अर्थात् पापांपासून दूर होऊन सदगुणांचा सहवास करणे म्हणजे उपवास होय . भुकेले राहून शरीराचे शोषण करणे हा उपवास नव्हे . धर्मशास्त्रात उपवासाचे वेळी दूध, तूप, मध, पाणी
यांनाच मान्यता आहे . फळे कंदमुळे नंतर घुसलेत. पचायला हलका, सत्त्वगुणपधान आहार हवा . दही, केळी, रताळी यांनी तमोगुणी सुस्तीच येणार .बरे आजचे 'उपासाचे पदार्थ ही
पळवाट,फसवणूक, सोय किंवा विनोद होय .
वैद्य हृषीकेश म्हेत्रे Vaidya Hrishikesh B. Mhetre
© www.MhetreAyurved.com, 9422016871
आज आम्ही साबुदाणा, बटाटा, शेंगदाणे, वनस्पती तूप, मिरची, चहा या बाबी खिचडी, वेफर्स या स्वरूपात 'उपासाचे पदार्थ म्हणून खातो . पण हे सारे पदार्थ भारतीय नव्हेतच .ते ब्रिटीशांनी आणलेत. पूर्वी विहीरीत ब्रेडचा तुकडा टाकून धर्म बाटत असे ! आणि आज हे सारे पदार्थ आमच्या धार्मिक उपासाचा आहार!!! बरे हे सर्व पदार्थ इतके जड व पित्तकर आहेत की पुढे २ दिवस पचनसंस्थेची वाट लागते! अम्लपित्त होते! गॅसेस होतात! पण इथे पोटासाठी खातो कोण?! सारे काही ओठासाठी! जिभेचे चोजले!?
जगण्यासाठी खात नाही, खाण्यासाठी जगतो!? ...... पौरूषाकडून पशुत्वाकडे!?!?
साबुदाणा हा स्टार्च होय . कपडे स्टार्चने कसे 'कडक होतात तसे आतडयांचे होते. आतडयांना याचा 'रबरी लेप' बसतो . मग ते पचवेपर्यन्त दमतात आतडी . कशाची भूक लागणार? साबुदाण्याचे पांढरे शुभ दाणे; दलदलीत उगवणारया कंदाच्या लगद्यापासून कसे तयार करतात ते सविस्तर सांगितले तर पुनखायची इच्छा होणार नाही. शिंगाडेही थोडे जडच . भगर वरई पित्तकर .
वैद्य हृषीकेश म्हेत्रे Vaidya Hrishikesh B. Mhetre
© www.MhetreAyurved.com, 9422016871
मग उपासाचे खरे पदार्थ कोणते ?? ज्यांनी पचनसंस्थेला खरंच विश्रांती मिळेल व उभारी येईल असे पचायला हलके आणि सात्त्विक पदार्थ.
उदा.१. लाह्या ... ... राजगिरा, ज्वारी किंवा सर्वोत्तम म्हणजे साळीच्या लाह्या . मक्याच पॉपकॉर्न किंवा तांदळाचे चिरमुरे नव्हे.
२. मूग, मसूर यांचे कढण.
३.भाजलेल्या तांदळाची पेज / मांड.
४. भिजवलेल्या काळ्या मनुका . बेदाणे नव्हे . डाळिंब, अंजीर, आवळा ही फळे .
५. गरम पाणी.
६. पडवळ, दोडका, दुधी भोपळा, मुळा
हे ... हे ... हे काय उपासाचे पदार्थ आहेत का? का ? इंग्रजांनी आणलेले 'जीवनाला अनावश्यक व आरोग्यनाशक असे चहा साबुदाणा मिरची बटाटा शेंगदाणे वनस्पती तूप हे
सगळं उपासाला चालतं ! *मग साळीच्या लाह्या आणि उकडलेल्या फळभाज्या का नाही चालत?*
आता उपवासाचेच महिने आहेत . गटारी आमुशाला खाटखुट म्हणजे नॉन व्हेज खाल्लं की चातुर्मासात मांसाहार बंद . का बरं? श्रावणी, सोमवार, शनिवार, जन्माष्टमी, नागपंचमी, ऋषिपंचमी, हरतालिका, पितृपक्ष, नवरात्र ... इतके उपास का?
वैद्य हृषीकेश म्हेत्रे Vaidya Hrishikesh B. Mhetre
© www.MhetreAyurved.com, 9422016871
कारण वर्षाऋतुतील कुंद दमट आर्द्र वातावरणात 'अग्नि पचनशक्ति' अतिशय क्षीण होतो . त्यावेळी आहार जितका कमी जाईल तेवढं बरं . म्हणजे अपचन व तज्जन्य आम, ज्वर, अतिसार उलट्या इ. विकार व्हायला नकोत. पावसाळा म्हणजे रोग होण्यास अनुकूल काळ . अग्नि मंद . पित्ताचा चय . वाताचा प्रकोप . बिघडलेले वातावरण दूषित जल . म्हणूनच अग्नि टिकवायचा सांभाळायचा . त्यासाठी ढीगभर व्रतं . उपास . खाऊ नका . हलकं खा . म्हणून पंचमीला लाह्या . आणि मांस पचायला खूप जड म्हणून बंद.
धर्माशी आयुर्वेदाची आरोग्यशास्त्राची सांगड आहे .
रूढी समजावून घ्या. त्या परंपरा नसून शास्त्रशुद्ध आरोग्यनियम होत.
आपले पूर्वज हे खरोखर शहाणे होते.
"They were really BAAP"
नावं ठेवणं सोपं आहे, नाव कमावणं खूप अवघड आहे.
.... ... ... मग उद्याच्या उपासाला ... छे छे उपाशनाला / उपवासाला काय खाणार ?
सा सा साबु ... अं अं ... सा सा साळीच्या लाह्या ... ... हं . त्याने उपवास 'मोडत' नाही ... ... "उपवास घडतो”... ... आणि देवाला काय सांगणार? ...
'अविरत ओठी यावे नाम ... ... ...
श्रीराम जय राम जय जय राम'
© Vaidya Hrishikesh B. Mhetre
www.MhetreAyurved.com, 9422016871
उपास उपवास आयुर्वेद वजन मेद स्थौल्य स्थूलता चरबी fat mhetre ayurved upas upavas upvas diabetes diabetes डायबिटिस डायबेटीस मधुमेह