Friday, 20 June 2025

संहिता आणि टीका यांच्यावरील प्रेमाची खरी खरी गोष्ट !!!

 आपण आपल्या "कल्पनांचे लाड" करायचे, मग सर्व सोपं होतं! प्रेमाची गोष्ट ... संहिता आणि टीका यांच्यावरील प्रेमाची खरी खरी गोष्ट !!!

https://www.facebook.com/share/v/16g3RUaki5/


हा 3 मिनिट 12 सेकंदाचा रील खूप छान मनोरंजक आणि श्रवणीय व चिंतनीय आहे ... पहिलं 1 मिनिट संपल्यानंतर, पुढे असं "समजायचं" की ही दोन पात्रं जे बोलतायत, ते त्यांच्या लिखाणा विषयी बोलत नसून ...


✍🏼 वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे, आयुर्वेद क्लिनिक्स @ पुणे & नाशिक 9422016871 


... आपण संस्कृत भाषेतली संहिता + टीका (सोबत भाषांतराची कुबडी 🩼 नसलेलं) वाचायला बसलो आहोत आणि कुठल्याही अध्यायाची सुरुवात अमुक अमुक अध्यायं "व्याख्यास्यामः" अशी होते ... 



आणि मग जर ते "व्याख्यान" 🎙🔊📢🗣देत असतील तर आपण "वाचतो का?📖" 


खरंतर ते व्याख्यान देतायेत असं म्हटलं म्हणजे ते जे काही व्याख्यान देतायेत, ते जे काही "बोलतायत", ते आपल्याला "ऐकू 👂🏼यायला" पाहिजे! 

ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः।

म्हणजे जर "अध्यायं 🗣व्याख्यास्यामः" असेल, तर आपण "श्रुणुयामः👂🏼" असं असायला हवं !!!


जर त्यांनी लिखिष्यामः✍🏼 लिहिलं असतं , तर आपण पठिष्यामः म्हणजे 📖 वाचलं 👀 असतं !!


या रील मध्ये जसं म्हटलंय, तसं "हळूहळू" त्या संहिताकाराशी त्या टीकाकारांशी आपली ओळख होत जाते !!!


आणि मग ते "आपल्याशी बोलू" लागतात आणि मग "ते जे बोलतायत", ते आपल्याला "ऐकू यायला लागतं"! 


अरुण दत्ताची भाषा म्हणजे एखाद्या यंत्राचे सगळे नट🔩⚙️🔧🪛बोल्ट ढिले करून पार्ट न् पार्ट समोर मांडणे, अशा प्रकारची आहे !


डह्लणाची भाषा समवयस्क सलगीच्या मित्राप्रमाणे आहे की जो खांद्यावर हात टाकून समजुतीच्या भाषेत बोलतो.


चक्रपाणि ची भाषा म्हणजे मी एकटाच काय तो हुशार आहे आणि मी तिसऱ्या मजल्यावर उभा राहून बोलणार, तुम्ही जमिनीवर खाली तळमजल्यावर उभा राहून ऐकायचं ... अशी थोडीशी elite किंवा खरं तर जराशी आढ्यतेखोर आहे 


... आणि सर्वात सुंदर अशी भाषा हेमाद्री यांची आहे, की जी आपल्या लाडक्या नातवाला जगाची जाण यावी म्हणून त्याला मांडीवर बसवून, आजोबांच्या वात्सल्याने आणि अनुभवाच्या परिपक्वतेने ते बोलतात!!!🙏🏼


वाग्भट यांची भाषा त्यांच्या नावाप्रमाणे अतिशय प्रगल्भ अशी आहे 


सुश्रुताची भाषा ही स्पष्ट आणि नेमकी अशी आहे!


... तर चरकांची भाषा ही नाही म्हणलं तरी बऱ्यापैकी अघळपघळ आणि विषय सोडून थोडी इकडे तिकडे जाणारी अशी आहे !!!


त्याला कारणंही तशीच असावीत कदाचित !

त्यांचे ते स्वभाव असतील किंवा तत्कालीन सामाजिक परिस्थिती तशी असेल !!!


पण हे "ऐकू येतं", असं माझं फक्त वैयक्तिक "मत" नसून, तो वैयक्तिक "अनुभव" आहे.


अर्थात माझे हे वैयक्तिक अनुभव कथन मत आकलन, हे चुकीचं एककल्ली बायस्ड पूर्वग्रहदूषित असेही काही जणांना वाटू शकेल ! त्यात त्यांची काही चूक किंवा दोष नाही.


पण हा "अनुभव" प्रत्येकाने घेऊन पाहण्याजोगा आहे, की संहिताकार आणि टीकाकार "बोलतात" कसे आणि "ते" आपल्याला "ऐकू कसे येते"


ही जी आयुर्वेदाच्या संहितांची टीकांची संस्कृत भाषा आहे , ती ग्रॅमॅटिकल टेक्निकल सायंटिफिक कॉम्प्लिकेटेड अशी संस्कृत भाषा नाहीये . ती "बोली" संस्कृत भाषा आहे, आपण ज्याला आजच्या भाषेत "स्पोकन" संस्कृत म्हणतो तशी आहे !!!


हे रील शेवटची 2 मिनिटं 12 सेकंद (म्हणजे पहिलं 1 मिनिट झाल्यानंतर) वरती दिलेल्या "दृष्टिकोनाने" आधी तसं 👁👁 पहा ...


✍🏼 वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे, आयुर्वेद क्लिनिक्स @ पुणे & नाशिक 9422016871 


आणि मग तुम्हाला जी संहिता आवडत असेल, खरं तर ... "आवडत नसेल, अवघड वाटत असेल" अशा संहितेतल्या , अवघड स्थानातला, न आवडणाऱ्या स्थानातला, अवघड वाटणारा, न आवडणारा अध्याय उघडून, तो वाचायला लागा ... प्रयत्न करा तर !!!


कदाचित पहिले दोन-तीन दिवस , कदाचित दहा-बारा दिवस काहीच कळणार नाही 🤔⁉️😇😵‍💫 ... पण मग असं खरोखर "ठरवून" अगदी रोज "10 मिनिटं किंवा 5च मिनिटं", सलग "100 दिवस", "खंड न पडू देता", "निष्ठेने निर्धाराने" ते वाचत राहायलात ना ... की 100 व्या दिवशी तुम्हाला संहिता आणि टीका हे "वाचता येणार नाही" ... ते तुम्हाला "ऐकू येऊ लागतील"!!!🙂 


हा एक खूप सुंदर अनुभव असतो ... ज्याला चरक "तत्त्वावबोधो हर्षणानाम्" असं म्हणतो !!!


ही एक स्वसंवेद्य अशी बाब आहे, स्वसंवेद्य अशी घटना आहे, स्वसंवेद्य असा अनुभव आहे ... एक "स्वसंवेद्य भावना feel आहे. जस्ट गो थ्रू इट ... ऑल द बेस्ट ...


आपण आपल्या "कल्पनांचे लाड" करायचे, मग सर्व सोपं होत - प्रेमाची गोष्ट ... संहिता आणि टीका यांच्यावरील प्रेमाची खरी खरी गोष्ट !!!


✍🏼 वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे, आयुर्वेद क्लिनिक्स @ पुणे & नाशिक 9422016871 


फक्त लाल कापडात गुंडाळून संहितेच्या प्रिंटेड पुस्तकाला छातीशी घट्ट धरून फोटोची पोज दिली किंवा तीन बोटं संहितेच्या छापील पुस्तकांच्या ओळीवरनं फिरवली म्हणजे त्याचं रापायणी वैद्य होत नाही आणि ते मेंदूमध्ये इन्स्टस्टॉल होत नाही!!! 


असल्या भाकडकथा, भावनिक मिसगाईड, इमोशनल दिशाभूल याच्यामागे भरकटू नका!!!


शास्त्र हे सत्य आहे तथ्य आहे!!! अभिनय करण्याचं नाटक नाही !!!


आणि संहिता टीका हा त्या पुण्यात्म्यांनी महात्म्यांनी "तुमच्याशी केलेला संवाद" आहे ... या हृदयीचे, त्या हृदयी ... असा !!!


म्हणून चरक वाचा सुश्रुत वाचा ... 

पण अष्टांग हृदय नक्की वाचा !!!


कारण वागभट त्याच्या हृदयातून आयुर्वेद आपल्या हृदयामध्ये खरोखर इन्स्टॉल करतो 


आणि ही शाब्दिक पोकळ बडबड नाही ... हा सलग 35 वर्ष घेतलेला आनंदानुभव आहे !!!


Welcome to True Ayurveda Real Arurveda !!! 


Let us LISTEN to Samhitaa !!!


संहितोक्त आयुर्वेदामध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे !!!


✍🏼 वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे, आयुर्वेद क्लिनिक्स @ पुणे & नाशिक 9422016871

Tuesday, 3 June 2025

भोजन हसत खेळत गप्पा मारत ?? ... की भोजनातील एकाग्रता आणि गोडवा जपत?!

 भोजन हसत खेळत गप्पा मारत ?? ... की भोजनातील एकाग्रता आणि गोडवा जपत?!

*अष्टांगहृदय सद्वृत्त : भाग 195*

5 जून 2025, गुरुवार  

*उपविभाग 137*


✍️🏼 ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871




भोजनविधीचा मूलाधार असलेल्या श्लोकातील नियमांपेक्षा काही विशेष बाबी श्रीमद् वाग्भटाचार्य यांनी अष्टांग हृदय या ग्रंथात सांगितल्या आहेत. 


त्या "विशेष बाबी" पुढील श्लोकांमध्ये बोल्ड टाईप मध्ये व निळ्या रंगात दाखवल्या आहेत


काले सात्म्यं *शुचि हितं* स्निग्धोष्णं लघु *तन्मनाः*॥

*षड्रसं मधुरप्रायं नातिद्रुतविलम्बितम्।* 

*स्नातः* क्षुद्वान् *विविक्तस्थो धौतपादकराननः॥* 

*तर्पयित्वा पितॄन् देवानतिथीन् बालकान् गुरून्।*

*प्रत्यवेक्ष्य तिरश्चोऽपि प्रतिपन्नपरिग्रहान्॥*

*समीक्ष्य सम्यगात्मानमनिन्दन्नब्रुवन्* द्रवम्। 

*इष्टमिष्टैः सहाश्नीयाच्छुचिभक्तजनाहृतम्॥*


*आणि विशेष म्हणजे या वाग्भटाचार्यांनी सांगितलेल्या विशेष बाबी, आजच्या काळात अतिशय आवश्यक, उपयोगी आणि निश्चितपणे आचरणीय अशा "काल सुसंगत" आहेत*


यातील *शुचि* याविषयी आपण मागील लेखामध्ये पाहिले , आज त्या पुढील काही मुद्दे पाहूया


*हितकारक* = सुखकारक नसलं तरी आरोग्यासाठी शरीरासाठी आयुष्यासाठी जे "उपयोगी = हितकारक" आहे, ते भोजन घेतलं गेलं पाहिजे ! 


म्हणजे एखादा चविष्ट पदार्थ हा सुखकारक वाटला, तरी तो हितकारक असेल असं नाही. जसे की पिझ्झा बर्गर सामोसा वडापाव 


आणि एखादा चवीला न आवडणारा पदार्थ हा निश्चितपणे आरोग्यासाठी हितकारक असू शकेल, जसे फळभाज्या मूग मसूर चवळी साजूक तूप


*तन्मना* = एकाग्रता. भोजनासाठीचे अन्नपदार्थ तयार करणाराचेही , ते अन्नपदार्थ तयार करण्यामध्ये, स्वयंपाक करण्यामध्ये, मन एकाग्र पाहिजे ...


आणि *प्रत्यक्ष तो अन्न ते पदार्थ "खाणाऱ्याचे" मनही खाताना त्या अन्नामध्ये त्या पदार्थांमध्ये एकाग्र असायला हवे*. 


गप्पा मारत, फोनवर बोलत, स्मार्टफोन वरती रील बघत, टीव्ही वरती सिरीयल बघत, वाद घालत, विविध विषयांवर चर्चा करत, हसत खेळत; अन्नपदार्थ खाणे भोजन करणे, हे अत्यंत चुकीचे आहे! खेळीमेळीच्या वातावरणात जेवावे, हा सामाजिक गैरसमज आहे!!


जेवताना , तोंडातून "खालच्या दिशेने" अन्न पोटाकडे जात असताना, "हसणे आणि बोलणे, या नाभीकडून कंठाकडे तोंडाकडे वरच्या दिशेने म्हणजेच विरुद्ध दिशेने येणाऱ्या क्रिया" पूर्णपणे वर्ज्य केल्या पाहिजेत. 


गुरुचरित्रामध्ये भोजन करताना, मौन सुटले, एखादा शब्द बोलला गेला, तर ताट तसेच सोडून उठावे, असा निर्देश आहे !!!


"तन्मना" याचं कारण असं की, ते अन्नपदार्थ तुमच्या ताटात येण्यासाठी, शेतकऱ्यापासून ते स्वयंपाक करणाऱ्या गृहिणीपर्यंत, अनेकांनी त्यासाठी खूप कष्ट केलेले असतात... त्यामुळे तो अन्नपदार्थ केवळ अन्नपदार्थ असा नसून, तो प्रसाद ... खरंतर "महाप्रसाद" असतो!!! त्यामुळे शेतकऱ्यापासून, तर घरच्या स्वयंपाक करणाऱ्या = गृहिणी सून आई बहीण बायको मुलगी या सर्वांच्या कष्टाचा "सन्मान आदर", त्यांच्या प्रति "कृतज्ञता" ... या अर्थाने सुद्धा आपण खात असलेल्या अन्नपदार्थावरतीच आपले मन एकाग्र असणे, हे आवश्यक, हितकारक आणि नैतिक आहे.


*षड्रस मधुरप्राय* = नवरात्राच्या देवीच्या आरती मध्ये "षड्रस अन्ने नैवेद्यासी अर्पियली भोजने" असा उल्लेख येतो.

याचा अर्थ रोज आपल्या जेवणामध्ये सहाही चवींचे अन्नपदार्थ असावेत. 

जरी आपल्याला शाळेमध्ये चौरस आहार प्रोटीन कार्बोहायड्रेट मिनरल व्हिटॅमिन फायबर असे शिकवलं असलं, तरी प्रत्यक्षात भारतीय संस्कृतीमध्ये सनातन धर्मामध्ये मधुर गोड, अम्ल आंबट, लवण खारट, तिक्त कडू, कटु तिखट, कषाय तुरट अशा सहाही चवींचे अन्नपदार्थ आपल्या भोजनात असावेत, असा आरोग्य शास्त्रदृष्ट्या निर्देश आहे.


त्यातही मधुर रसाचे पदार्थ, पृथ्वी जल प्रधान अर्थात ज्याला आज आपण कार्बोहायड्रेट म्हणतो, ते अधिक प्रमाणात असावेत! कारण आपलं शरीर हे पार्थिव आहे आणि त्यात 70% पर्यंत जल आहे!!! म्हणजे पृथ्वी जल यापासून बनणारा, मधुर रसाचा = गोड चवीचा अर्थात कार्बोहायड्रेट प्रधान आहार, हा आपले जीवन शरीर याची ऊर्जा शक्ती बल एनर्जी इंधन fuel यासाठी आवश्यक असतो. 


जरी हल्ली प्रोटीन / प्रथिने यावर भर देत देण्यात असला, तरी प्रथिने प्रोटीन हे शरीराचा बांधा जडणघडण फ्रेम वर्क घडवतात, हे सत्य आहे ... परंतु प्रत्यक्ष शरीर "चालणे = सर्व प्रकारच्या गती हालचाली ... हात पाय पचन संस्था हृदय या सर्वांच्याच", त्याचा रोजचा सर्व व्यापार व्यवहार सुरळीत राहणे , यासाठी जे इंधन लागते ... ते कार्बोहायड्रेट मधूनच येते !!!


त्यामुळे प्रोटीन प्रथिन यांचा कितीही गवगवा केला , तरी मधुर रसप्रधान कार्बोहायड्रेट पुरेशा प्रमाणात, किंबहुना प्रोटीन पेक्षा दुप्पट प्रमाणात कार्बोहायड्रेट खाणं , हे शरीराचं चलन वलन इंधन फ्युएल एनर्जी ऊर्जा शक्ती मसल , यासाठी निश्चितपणे आवश्यक असतेच!!! त्यामुळे फळे दूध पोळी भाकरी भात यांचा समावेश रोजच्या आहारात असायलाच हवा.


रोज जेवढी हालचाल करणार (= शारीरिक वैचारिक बौद्धिक भावनिक) त्यासाठी लागणारी एनर्जी ऊर्जा पुरेशी मिळेल , इतका पुरवठा (कार्बोहायड्रेटचा) आहारातून होण्यासाठी मुख्यतः मधुर रसाचा म्हणजे गोड चवीचा समावेश रोजच्या अन्नामध्ये असायला पाहिजे. मधुर गोड याचा अर्थ प्रत्यक्ष साखर गूळ असा नसून, पृथ्वी जल प्रधान बल ऊर्जा देणारे कार्बोहायड्रेट स्वरूपातील , गहू तांदूळ ज्वारी बाजरी दूध फळ बटाटा यांचा आवश्यक तेवढा, पचवता येईल एवढा, पुरेसा अंश रोजच्या आहारात असायला हवा!!


काले सात्म्यं लघु स्निग्धमुष्णं क्षिप्रं द्रवोत्तरम् ।।४६५।। 

बुभुक्षितोऽन्नमश्नीयान्मात्रावद्विदितागमः ।


नमस्कार 🙏🏼 आपण वरती उल्लेख केलेला श्लोक, जो भोजनविधीचा मूलाधार आहे, त्याविषयी सविस्तर पाहत आहोत! 


*देहवाक्चेतसां चेष्टाः प्राक् श्रमाद्विनिवर्तयेत्।* 


आणि


*न पीडयेत् इंद्रियाणि*


हे दोन्ही श्लोक आपण एकत्र पहात आहोत.


_(डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.)_


त्वदीय वस्तु गोविंद 

तुभ्यम् एव समर्पये ।


तेरा तुझको अर्पण

क्या लागे मेरा ।


श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु।

🙏🏼


सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved

Copyright कॉपीराइट ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

MhetreAyurved@gmail.com 

www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/


घरचे / हॉटेलचे अन्नपदार्थ आणि भोजनाचे शुचित्व व कृतज्ञता

घरचे / हॉटेलचे अन्नपदार्थ आणि भोजनाचे शुचित्व व कृतज्ञता

*अष्टांगहृदय सद्वृत्त : भाग 194*

4 जून 2025, बुधवार 

*उपविभाग 136*



✍️🏼 ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871



काले सात्म्यं *शुचि हितं* स्निग्धोष्णं लघु *तन्मनाः*॥

*षड्रसं मधुरप्रायं नातिद्रुतविलम्बितम्।* 

*स्नातः* क्षुद्वान् *विविक्तस्थो धौतपादकराननः॥* 

*तर्पयित्वा पितॄन् देवानतिथीन् बालकान् गुरून्।*

*प्रत्यवेक्ष्य तिरश्चोऽपि प्रतिपन्नपरिग्रहान्॥*

*समीक्ष्य सम्यगात्मानमनिन्दन्नब्रुवन्* द्रवम्। 

*इष्टमिष्टैः सहाश्नीयाच्छुचिभक्तजनाहृतम्॥*


भोजनविधीचा मूलाधार असलेल्या श्लोकातील नियमांपेक्षा काही विशेष बाबी श्रीमद् वाग्भटाचार्य यांनी अष्टांग हृदय या ग्रंथात सांगितल्या आहेत. 


त्या वरील श्लोकांमध्ये बोल्ड टाईप मध्ये व निळ्या रंगात दाखवल्या आहेत


*आणि विशेष म्हणजे या वाग्भटाचार्यांनी सांगितलेल्या विशेष बाबी, आजच्या काळात अतिशय आवश्यक उपयोगी आणि निश्चितपणे आचरणीय अशा काल सुसंगत आहेत*


शुचि = बाह्यतः स्वच्छ आणि मूलतः त्या अन्नाचे घटक द्रव्य आणि कृती करतानाचे साहित्य, तसेच करणाऱ्याचे हात व शरीर हे तर स्वच्छ हवेच ... 


आणि मुख्य म्हणजे आचार विचार भावना बुद्धी हे सर्व शुचि स्वच्छ पवित्र मंगल उदात्त असं असायला हवं! 


हे असं बाह्य अभ्यंतर शारीरिक वैचारिक बौद्धिक भावनिक शुचित्व घरातील गृहिणी बाबत जी स्वयंपाक करून आपल्याला खायला घालते त्या आई पत्नी बहीण सून मुलगी वहिनी यांच्या बाबत शक्य असते,


परंतु अशा प्रकारचे बाह्य अभ्यंतर शारीरिक वैचारिक बौद्धिक भावनिक शुचित्व हे घराबाहेर हॉटेलमध्ये किंवा ऑनलाईन फूड मध्ये असणे कदापिही शक्य नाही!


म्हणून हॉटेलमध्ये खायला जाणे आणि ऑनलाईन फूड मागवणे, यापेक्षा जेव्हा घरच्या स्त्रीला शक्य नसेल तेव्हा किंवा खरंतर आठवड्यातून एकदा, घरच्या स्त्रीला स्वयंपाकातून सुट्टी देऊन, आपण स्वतः किमान वरण-भात मसालेभात एखादी भाजी हे तरी करणं निश्चितपणे शक्य आहे आणि थोडे प्रयत्न केले तर पोळी भाकरी हे ही फार अवघड नाही. पण त्यासाठी फक्त करण्याची तयारी / वृत्ती आणि मुख्य म्हणजे आपल्या घरच्या गृहिणीबद्दल प्रेम आदर आणि कृतज्ञता असणं आवश्यक आहे.


बाहेर हॉटेलमध्ये खायला जाणं किंवा ऑनलाईन फूड मागवणं ही श्रीमंती समृद्धी लक्झरी नसून, ते दरिद्रीपणाचे भणंगपणाचे भिकारडेपणाचे लक्षण आहे, असे संस्कार आपण आपल्या नव्या पिढीवरती लहान मुलांवरती करणं आवश्यक आहे. अन्यथा घरचा एखादा पदार्थ हॉटेल सारखा झालाय असं कौतुक करणं, ही मुळातच अभिरुची खालवल्याचं आणि संस्कारहीनतेचं लक्षण आहे. उलट हॉटेलमध्ये गेल्यानंतर तिथल्या पदार्थांची चव आईच्या गृहिणीच्या सुगरणीच्या हाताप्रमाणे आहे, अशी प्रशंसा होणं, हे हॉटेल साठी कॉम्प्लिमेंट आहे. 


घरच्या स्त्रीला गृहिणीला स्वयंपाक करणे, अगदीच अशक्य असताना... केवळ गैरसोयी मधली सोय, अगतिकपणा अपरिहार्य विकल्प , म्हणूनच हॉटेलमध्ये जाणे , हा शेवटचा पर्याय असला पाहिजे. 


दर वीकेंड ला घरात शिजवायचं नाही, म्हणून भिकाऱ्यांसारखे हॉटेलच्या दारात वेटिंग करत उभं राहायचं आणि कष्टाने कमावलेले पैसे , टुकार दर्जाहीन अन्ना साठी उधळायचे, हा निव्वळ मूर्खपणाच आहे!!!


काले सात्म्यं लघु स्निग्धमुष्णं क्षिप्रं द्रवोत्तरम् ।।४६५।। 

बुभुक्षितोऽन्नमश्नीयान्मात्रावद्विदितागमः ।


नमस्कार आपण वरती उल्लेख केलेला श्लोक, जो भोजनविधीचा मूलाधार आहे, त्याविषयी सविस्तर पाहत आहोत! 


*देहवाक्चेतसां चेष्टाः प्राक् श्रमाद्विनिवर्तयेत्।* 


आणि


*न पीडयेत् इंद्रियाणि*


हे दोन्ही श्लोक आपण एकत्र पहात आहोत.


_(डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.)_


त्वदीय वस्तु गोविंद 

तुभ्यम् एव समर्पये ।


तेरा तुझको अर्पण

क्या लागे मेरा ।


श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु।

🙏🏼


सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved

Copyright कॉपीराइट ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

MhetreAyurved@gmail.com 

www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/

शास्त्रोक्त आयुर्वेदीय विधीनुसार भोजन केले असता, होणारे आरोग्यदायक लाभ

शास्त्रोक्त आयुर्वेदीय विधीनुसार भोजन केले असता, होणारे आरोग्यदायक लाभ

*अष्टांगहृदय सद्वृत्त : भाग 193*

3 जून 2025, मंगळवार 

*उपविभाग 135*



✍️🏼 ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871


1.काले 2 सात्म्यं 3.लघु 4.स्निग्धम् 5.उष्णं 6.क्षिप्रं 7.द्रवोत्तरम् ।।

8.बुभुक्षितोऽन्नमश्नीयान् 9.मात्रावद् 10.विदितागमः ।


नमस्कार आपण वरती उल्लेख केलेला श्लोक, जो भोजनविधीचा मूलाधार आहे, त्याविषयी सविस्तर पाहत आहोत! 


यामध्ये सांगितल्याप्रमाणे भोजन केले असता, काय लाभ होतात, हे पाहिले तर ... 


अर्थातच, याप्रमाणे भोजन नाही केले, तर काय हानी होईल, हेही त्यावरूनच सहज लक्षात येते!


1. काले प्रीणयते भुक्तं 

योग्य वेळी भोजन केले असता ते शरीराचे परिणाम करते म्हणजे क्षय झालेले बल भरून काढते एनर्जी टॉप अप करते


2. सात्म्यम् अन्नं न बाधते

सात्म्य म्हणजे सवयीचे परिचयाचे अन्न सहसा बाधत नाही


3. लघु शीघ्रं व्रजेत् पाकं

हलके अन्न लवकर पचते


4. & 5. स्निग्धोष्णं बलवह्निदम्

स्निग्ध अन्न शरीराला बल प्रदान करते तर 

उष्ण अन्न हे अग्नीची क्षमता वाढवते


6. क्षिप्रं भुक्तं समं पाकं याति

खूप उशीर न करता लवकर भोजन केले असता त्याचे पचन योग्य प्रकारे होते


7. अदोषं द्रवोत्तरम्

भोजनामध्ये द्रव पदार्थांचे पाण्याचे प्रमाण योग्य असेल तर अन्नपचन निर्दोष पणे होते


8. सुखं जीर्यति मात्रावद् धातुसाम्यं करोति च ।

क्षमतेपेक्षा चार खास कमी खाल्ले असता म्हणजेच अन्न सेवन भोजन योग्य प्रमाणात केले असता ते कुठलाही त्रास न होता सहजपणे पचते आणि शरीरातील सर्व शरीर घटक योग्य प्रकारे निर्माण होतात, मेटाबोलिकल इक्विलिब्रियम टिकून राहतो


काले सात्म्यं लघु स्निग्धमुष्णं क्षिप्रं द्रवोत्तरम् ।। 

बुभुक्षितोऽन्नमश्नीयान्मात्रावद्विदितागमः ।


नमस्कार आपण वरती उल्लेख केलेला श्लोक, जो भोजनविधीचा मूलाधार आहे, त्याविषयी सविस्तर पाहत आहोत! 


*देहवाक्चेतसां चेष्टाः प्राक् श्रमाद्विनिवर्तयेत्।* 


आणि


*न पीडयेत् इंद्रियाणि*


हे दोन्ही श्लोक आपण एकत्र पहात आहोत.


_(डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.)_


त्वदीय वस्तु गोविंद 

तुभ्यम् एव समर्पये ।


तेरा तुझको अर्पण

क्या लागे मेरा ।


श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु।

🙏🏼


सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved

Copyright कॉपीराइट ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

MhetreAyurved@gmail.com 

www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/